- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा, वाडा येथे मधमाशांचा हल्ला : अनेक नागरिक किरकोळ जखमी, तालुक्यातील तिळसेश्वर येथे आज सकाळी दशक्रिया विधी कार्यक्रम सुरू असताना मधमाशानी अचानकपणे हल्ला केल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात भटजी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.अनेक नागरिकांना मधमाशांनी चावा घेतल्याने नागरिकांची पळापळ झाली. हाती आलेल्या वृत्तानुसार, तालुक्यातील भावेघर येथे एक व्यक्ती मयत झाल्याने त्यांचा दशक्रिया विधी आज तिळसेश्वर येथे होता.दशक्रीया विधी कार्यक्रम सुरू असतानाच जवळच असलेला मधमाशांचा पोळा उठल्यामुळे मधमाशांचा हैदोस सुरु झाला.पिसाळसलेल्या मधमाश्यानी विधीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना चावा घेतला. भटजींचा कडकडून चावा घेतल्याने ते सैरभर पळू लागले.शेवटी भटजींनी नदीमध्ये उडी मारून…
दीपक मोहिते माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा : भाड्याच्या खोलीत राहत होते… एका घरमालकाने भाडेकरूने त्याचे घरभाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. त्या म्हातार्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी,एक प्लॅस्टिकची बादली शिवाय अन्य काहीही सामान नव्हते. म्हाताऱ्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनाही म्हातार्याची दया आली आणि त्यांनीही भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती घरमालकाला केली.घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला. म्हातार्याने सामान आत घेतले. तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून हे सर्व दृश्य पाहिले.ही बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे,फायदेशीर ठरेल असे त्याला वाटले.त्याने ” क्रूर घरमालक पैशासाठी म्हातार्याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो.”…
दीपक मोहिते, ग्रामीण पाणीपुरवठा ; सरकारकडे निश्चित धोरणाचा अभाव, फेब्रु.महिना सुरू झाला की पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांची डोक्यावर हंडे घेऊन भटकंती सुरू होत असते.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र असंच सुरू आहे. गेल्या काही वर्षात ऋतुचक्र कोलमडून पडले असून त्यांचा परिणाम वातावरणावर जाणवू लागला आहे.पावसाचे आगमन उशिराने होणे,पावसाचे मधूनच गायब होणे,अवकाळी व परतीचा पाऊस,अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांना दरवर्षी फेब्रु.ते जून असे पाच महिने पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.पर्यावरण व प्रदूषण,अशा दोन कारणामुळे पावसाचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. दरवर्षी मार्चपासून ग्रामीण भागातील विहिरी व बोअरिंग कोरड्याठाक पडू लागतात,ते थेट जूनच्या अखेरीस पावसाचे आगमन होईस्तोवर..पूर्वी मे व जून,असे दोन महिने…
जव्हार, प्रतिनिधी, जव्हार येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी. जव्हार तालुक्यातील सिंफनी रिसॉर्ट येथे क्रांतिकारी संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जव्हार तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सेवालाल महाराज यांना समाजाच्या परंपरेनुसार भोग लावून करण्यात आली.त्यानंतर बंजारा संस्कृतीचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले,ज्यात समाजातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.महिला मंडळांनीही रंगारंग सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले.संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने सादर केलेल्या कार्यक्रमांत पारंपरिक नृत्य,लोकगीतं आणि सांस्कृतिक कथा,यांचा समावेश होता. या सर्व…
वसंत भोईर,वाडा वाड्यात उन्हाळी भातपिकाची शेती.. वाडा तालुक्यातील खैरे – पासोरीपाडा येथील शेतकरी अशोक कोंडू पाटील या शेतक-याने आपल्या ४ एकर जागेत उन्हाळी भातपिकाची शेती केली असून जया या भात वाणाची लागवड केली आहे. उन्हाळी भातपीक शेती करण्याची ही माझी पहीलीच वेळ असून विंधन विहीरीच्या साहाय्याने पाणी देत आहे.या शेतीत विशेष नफा झाल्यास उन्हाळी शेतीमध्ये सातत्य कायम ठेवीन,असे त्यांचे म्हणणे आहे. वाडा तालुक्यात भात हे प्रमुख कृषी उत्पादन आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा नसतानाही उन्हाळी हंगामात ही भातपीकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी अशोक पाटील यांनी भाताचे उत्पादन घेण्याचे धाडस केले आहे.उन्हाळी भातशेती ही कष्टप्रद आणि त्रासाची असते.या सबबीखाली येथील शेतकरी…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” सुप्तावस्थेत असलेला राज्याचा सत्तासंघर्ष टोकाला जाऊ शकतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. फडणवीस व अजित पवार,या दोघांमध्ये वाढत असलेली जवळीक,दिल्ली दरबारी अजित पवार यांना मिळणारे झुकते माप व आपल्या पक्षाला मिळणारी सावत्रपणाची वागणूक,या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे समांतर आता सरकार चालवू पाहत आहेत.तसेच संघटनात्मक स्तरावरही शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर गेल्या काही दिवसापासून कुरघोडी करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.कोकणात त्यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे.भाजपच्या तुलनेत कोकणात त्यांच्या पक्षाचा विस्तार वेगाने होत आहे. कोकणात आपल्या पक्षाचा जनाधार वाढ़वण्यासाठी त्यांनी किरण व उदय सामंत या दोन बंधुसमवेत राजन साळवी…
वसंत भोईर,वाडा टॉमेटोचे विक्रमी उत्पादन,आवक वाढल्याने बाजारात भाव कोसळला,शेतकरी अडचणीत, मोठ्या मेहनतीने पिकवलेला टोमॅटो,भाजीपाला मातीमोल दराने विकायची पाळी आल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या अशा अस्मानी संकटामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.बाजारात सध्या टोमॅटो दहा रु.किलो दराने विकला जात आहे. शेतकरी भातशेतीसोबत भाजीपाल्यासह फळभाज्यांची लागवड करत असतो.दोन पैसे गाठीला येतील,या आशेने तो आपल्या शेतीत विविध बागायती उत्पन्न घेत असतो. परंतु,बाजारात या उत्पादनांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.सध्या बाजारात टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून घेतलेले टोमॅटोचे उत्पादन जनावरांपुढे टाकण्याची वेळ त्याच्यावर ओढवली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने…
सुशील भोईर,वसई प्रयागराज महाकुंभ मेळ्यात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा, बालय़ोगी श्री सदानंद महाराजांच्या कृपाशिर्वादाने संत ज्ञानेश्वर महाराज नगर,सेक्टर ९,लक्ष्मीद्वार येथे प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात हिंदी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ बालयोगींच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर वारिंगे महाराज,विलास महाराज भोसले,कबीर महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून बालयोगींचे सुमारे अडीच हजार भक्तगण आले आहेत.त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १६ ते २३ फेब्रु.दरम्यान चालणाऱ्या या ज्ञानेश्वरी सप्ताह सोहळ्यात बीडचे तुकाराम महाराज शास्त्री,हे रामकथा कथन करणार असुन योगीराज गोसावी पैठण, विश्वनाथ महाराज वारिंगे अंबरनाथ,विजय महाराज जगताप पुणे,जगन्नाथ महाराज पाटील शहापूर यांची किर्तने होणार आहेत,तर सांगता कार्यक्रम कथा प्रवचनकार सर्वश्वरीताई याच्या उपस्थितीत दिपोत्सव…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आउटगोइंगला प्रचंड वेग : आम्हाला काही फरक पडत नाही,उद्धव ठाकरे यांचा हा हट्टीपणा पक्षाला मारक ठरणार, शिवसेनेची ( उबाठा ) मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले चिपळूणचे आ.भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर केलेल्या भाष्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खा.विनायक राऊत यांनी ” आ.भास्कर जाधव हे आमचे नेते आहेत,ते जर नाराज असतील तर त्यानी पक्षप्रमुखाशी बोलायला हवे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.आ.भास्कर जाधव हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात.कोकणात राणे कुटुंबियांशी सरळ दोन हात करण्यात ते कायम आघाडीवर राहीले.पण अनेक संकटप्रसंगी त्यांना पक्षाकडून कधीच मदत मिळाली नाही.यापूर्वी देखील अशाच वागणुकीमुळे सेनेला सोडचिठ्ठी…
दीपक मोहिते, सर्वच्या सर्व ४१ अनधिकृत इमारती जमिनदोस्त ; तेवीसशे कुटुंबाचे संसार रस्त्यावर…. नालासोपारा पूर्व भागातील सर्वच्या सर्व ४१ अनधिकृत इमारती महानगरपालिकेने जमिनदोस्त केल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.मात्र या कारवाईमुळे सुमारे तेवीसशे कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत.याला जबाबदार कोण ? या प्रश्नाच्या खोलात शिरूनही आपल्याला उत्तर सापडणार नाही.मात्र या प्रकरणामध्ये असलेली मोडस ऑपरेंडी आपण लक्षात घ्यायला हवी. भूमाफिया,अनधिकृत बांधकाम व्यवसायिक,दलाल व अधिकारी,कसे संगनमताने गोरगरीब जनतेची फसवणूक करतात,हे दिसून आले आहे.ज्या जमिनीवर या अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या,ती जमीन शासकीय कामासाठी आरक्षित आहे.कुख्यात भूमाफिया सीताराम गुप्ता ( माजी नगरसेवक ) यांनी त्या जमिनीवर कब्जा करून विविध अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांना विकल्या.त्यांनी…
