Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, मुंबईलगत असलेल्या गुजरातच्या प्रवेशद्वारावर वसलेला पालघर जिल्हा हा निसर्गाच्या लेण्यानी नटलेला असा हा जिल्हा आहे.पुर्वेस खोलडोंगरदऱ्या,विपुल वनसंपदा व भातशेतीची आगरे दुसरीकडे पश्चिमेस अथांग समुद्रकिनारा,बागायती, फुलशेती व पारंपारीक पद्धतीने मासेमारी करणारी समुद्रकिनारी वसलेली मच्छीमारांची असंख्य गावे.शहरीकरण होवुनही या संपूर्ण परिसराने आजही आपले गावपण टिकवून ठेवले आहे.वास्तविक येथील वातावरण हे पर्यटन उद्योगाला पोषक असूनही राज्य व केंद्र सरकार त्याकडे का दुर्लक्ष करत आहे,याचा उलगडा होत नाही. जिल्ह्याच्या पश्चिमेस वसई ते थेट डहाणू व पूर्वेस मनोर,विक्रमगड़,जव्हार,मोखाडा परिसर हा पर्यटनासाठी उत्तम असा प्रदेश आहे.जव्हार तालुका हा मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातो. हा तालुका पर्यटनासाठी पोषक असा तालुका…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईडीने ” थर्डडिग्री,” चा वापर केल्यास सगळे पोपट पटापट बोलायला लागतील… शासकीय अधिकारी व राजकारणी पैश्याच्या मागे सतत धावत का असतात ? या प्रश्नाचे उत्तर आहे,स्वार्थ व वरिष्ठाची मर्जी सांभाळणे होय. मलईदार जागी पोस्टिंग मिळवण्यासाठी या अधिकाऱ्यांना वसुली अधिकारी व्हावे लागते. दरमहा ठराविक रक्कम दिल्यानंतर तुम्हाला करदात्याच्या पैश्याची लूट करण्याचा एकप्रकारे परवानाच मिळतो,या अशा गोरखधंद्यामध्ये हे अधिकारी देखील आपले हात धुवून घेत असतात.वसई – विरार महानगरपालिकेत गेल्या सोळा वर्षात जी लूट झाली.त्यामध्ये हीच पद्धत अवलंबण्यात आली.त्यामुळे आयुक्तासोबत अति.आयुक्त बाव उपायुक्त व मंत्रालयात बसलेले झारीतील शुक्राचार्य यांना सक्तवसुली संचलनालयाने शोधून काढले पाहिजे.हल्लीचे राजकारण आणि प्रशासन दोन्हीही अर्थकारणाभोवती…

Read More

सचिन पाटील,वसई चिंचोटी-भिवंडी रस्ता दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी मंत्रालयात बैठक संपन्न, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन चिंचोटी-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली.या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत या राजमार्गाची तात्काळ दुरुस्ती सुरू करण्याबाबत चर्चा होऊन मंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना पुढील दोन दिवसांत काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले.तसेच, रस्त्याची पुनर्बांधणी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले.हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आवश्यक परवानग्या मिळवून प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे यावेळी आदेशही देण्यात आले. या सकारात्मक निर्णयासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.तसेच,वसईच्या नागरिकांच्या प्रश्न व समस्याचे निराकरण…

Read More

वसंत भोईर,वाडा अमली पदार्थांविरोधात वाडा पोलिसांची जनजागृती मोहीम, वाडा पोलिस ठाण्यातर्फे रियल अकॅडमी येथे “अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती,” मोहीम राबवण्यात आली. या कार्यक्रमात दत्तात्रेय किंद्रे यांनी अमली पदार्थांचे वैयक्तिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम,कुटुंब व समाजावर होणारे परिणाम,तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाण्यामुळे होणारे मानसिक,आर्थिक आणि सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण,क्रीडा व सकारात्मक छंदांकडे वळावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमली पदार्थांविरुद्ध पोलीस प्रशासनाच्या विविध मोहिमा, कायदेशीर तरतुदी आणि त्यांची अंमलबजावणी याविषयीही माहिती देण्यात आली.उपस्थित विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांना ” नाही,” म्हणण्याचा संकल्प केला. या उपक्रमाला रियल अकॅडमीचे संचालक शशांक ठाकरे,विशाल ठाकरे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर…

Read More

वसंत भोईर,वाडा चिंचघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कैलास ठाकरे यांची निवड तालुक्यातील चिंचघर या प्रतिष्ठित समजल्या जाणा-या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक काल पार पडली.या निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सत्ताधारी कमिटीला धक्का देत भाजपचे कैलास ठाकरे हे निवडून आले.त्यांच्या या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. चिंचघर या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या दहा असून या ग्रामपंचायतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सत्ता असून त्यांचे पाच तर भाजपचे पाच सदस्य होते.या ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच मनेश पाटील यांनी आपल्या पॅनल मध्ये ठरलेल्या समझोत्यानुसार काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.तसेच याच पॅनलच्या अन्य एका सदस्याचे पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केल्यानमुळे सत्ताधारी पक्षाचे चार सदस्य उरले होते. आज ग्रामपंचायतीच्या…

Read More

दीपक मोहिते, विरोधकांच्या टीकेला उत्तर देत बसू नका,भाजपकडून कार्यकर्त्यांना टिप्स, वसईतील राजकीय घडामोडीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी मी दोन दिवसांपूर्वी दोन राजकीय पक्षाच्या मुंबईस्थित मुख्यालयात गेलो होतो.यावेळी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या.अनेक नेत्यांशी चर्चा झाली असता चर्चेच्या ओघात मंत्रिमंडळाच्या गमती जमती देखील ऐकायला मिळाल्या.त्यामध्ये शिंदे गटाच्या परतीच्या सुरस कथांचा समावेश होता.पण वसईत घडणाऱ्या राजकीय घडामोडीसंदर्भात काही हाती लागत नव्हते.आपली ही मुंबई फेरी वाया जाते की काय ? असे वाटू लागले.त्यामुळे येथे काही मिळणे शक्य नाही,असे समजून बॅलॉर्ड इस्टेट येथील सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय गाठूया,असे मनोमनी ठरवून निघत असताना एका पदाधिकाऱ्याने शिपायाला पाठवून मला बोलावून घेतले.तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांच्या जनसंपर्काचे काम करणारा…

Read More

दीपक मोहिते, आपण लोकप्रतिनिधीना का व कशासाठी निवडून पाठवतो ? वाचा आणि विचार करा …. १ ) नगरसेवक :- परिसर स्वच्छता,गटारव्यवस्था, पाणीपुरवठा, चांगले रस्ते व परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, परंतु ही कामे करण्याऐवजी आपले नगरसेवक अनधिकृत बांधकामे,विकासकाना नळजोडण्या मिळवून देणे,त्यांच्या अनधिकृत बांधकामाना संरक्षण देणे,ठेकेदाराकडून टक्केवारी मिळवणे,इ.कामांवर लक्ष देत असतात. २ ) आमदार :- मतदारसंघातील विकासाच्या जटील समस्या सोडवणे,उद्योगधंदे वाढ,शिक्षण,कृषी, रोजगार,कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडु नये,जातीय सलोखा अबाधित राखणे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी व समस्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करणे व परिसर विकासाला चालना मिळावी,यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक निधी मिळवणे,प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणे, परंतु ही सार्वजनिक कामे करण्याऐवजी साखर कारखाने काढणे,दुग्ध…

Read More

दीपक मोहिते, ७९ वा स्वातंत्र्यदिन ; ” ख़ुशी कम,जादा गम,” येत्या १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहे.गेल्या ७९ वर्षाच्या काळात आपल्या देशाने बरीच प्रगती केली.आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपण भरीव कामगिरी करू शकलो.आज जगातील विकसनशील देशाच्या रांगेत आपला क्रमांक सहावा आहे.संरक्षण क्षेत्रात आपण सक्षम तसेच अन्न-धान्य उत्पादनातही आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.१९६४ ते १९७२ हा काळ आपल्यासाठी कसोटीचा काळ होता.एकामागोमाग तीन युध्ये,दुष्काळ,अन्न-धान्यटंचाई व बेरोजगारी इ.समस्यानी देश आर्थिक खाईत सापडला होता.पण त्याकाळी दूरदृष्टी असलेल्या शासनकर्त्यांनी या सर्व संकटाचे धनुष्य यशस्वीपणे पेलले व देश त्यातून बाहेर पडला.देशाची धुरा जनतेने स्व. जवाहरलाल नेहरू त्यानंतर स्व. लालबहादूर शास्त्री व…

Read More

दिपक मोहिते, असे काय घडले महेश पाटील बाहेर पडले ? काल सांयकाळी साडेसातच्या सुमारास अचानक माझा मोबाईल खणखणला,संध्याकाळी ५.०० ते ८.०० दरम्यान माझे दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन सुरू असते.त्यामुळे मला या दरम्यान कोणाचे सहसा कॉल येत नसतात.पण काल याच दरम्यान मला कॉल आला.मी वैतागलेल्या चेहऱ्याने कॉल उचलला.पलीकडून आवाज आला.” मोहिते साहेब,तुमच्या वेबपोर्टलसाठी ब्रेकिंग आहे.” ते ऐकल्यावर माझी उत्सुकता एका क्षणात टिपेला पोहोचली.तो कॉल माझ्या एका जवळच्या मित्राचा होता, त्याने जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर मी चक्क उडालो,त्याची ब्रेकिंग होती,बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय,त्यांच्या सुखदुःखात सतत त्यांना साथ देणारे प्रसिद्ध उद्योजक व माजी नगरसेवक महेश…

Read More

दिपक मोहिते, निवडणूक आयोगाचा दणका, केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.निवडणूक आयोगाने फक्त सहा राजकीय पक्षांचाच राष्ट्रीय पक्षांचा दर्जा कायम ठेवला आहे. राष्ट्रीय सहा पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेस,आम आदमी पक्ष,माकप,एनपीपी आणि स्व.कांशीराम यांनी स्थापन केलेल्या आणि मायावती यांचे नेतृत्त्व असलेल्या ‌बहुजन समाज पार्टी‌’चा त्यामध्ये समावेश आहे.याव्यतिरिक्त इतर अनेक राजकीय पक्षांचा प्रादेशिक दर्जा कायम ठेवला आहे.समाजवादी पक्ष,तृणमुल काँग्रेस,दोन्ही शिवसेना,दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस,द्रमुक अण्णाद्रमुक,तेलंगणा राष्ट्रीय समिती,हरियाणा विकास पार्टी,आसाम गण परिषद, वायएसआर काँग्रेस,बिजू जनता दल,राजद,ज.द.( धर्मनिरपेक्ष ) अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाचा सदर निर्णय बहुजन…

Read More