- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, धोपटपाडा गावात रानभाज्यांचा मेळावा, जव्हार तालुक्यातील रायतळे ग्रामपंचायत क्षेत्रात धोपटपाडा येथे स्थानिक महिलांच्या पुढाकाराने रानभाज्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. या अनोख्या उपक्रमात रानभाज्यांपासून बनवलेले विविध पारंपरिक पदार्थ सादर करण्यात आले.सदर रानभाज्या मेळाव्यात खुरसणीचा पाला,कोहरूळ, कुरडू, शिंद,करटोली,इ. जवळपास १७ प्रकारच्या विविध रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक स्टॉलवर त्या भाजीचे पौष्टिक गुणधर्म, औषधी फायदे आणि पाककृतीची माहिती देण्यात आली.गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी वयम चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर, भरत पाटारा व महेंद्र पाटारा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रानभाज्या महोत्सव हा कार्यक्रम पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणे,आरोग्य व महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक…
वसंत भोईर, वाडा, त्या टायर रिसायकलिंग कंपनीला अखेर टाळे… तालुक्यातील कोनसई गावात टायर रिसायकलिंगच्या अनेक कंपन्या असून, या कंपन्यांमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या कंपन्याचे रासायनिक सांडपाणी आसपासच्या शेतीमध्ये जात असल्याने भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ही कंपनी बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षापासून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने या टायर कंपनीवर बंद करण्याची कारवाई केली आहे.या प्रदूषणकारी टायर कंपनी मुळे कोणसई गावातील ३० शेतकऱ्यांच्या ५० एकर भात शेतीचे तसेच सुमारे १५ लाखापर्यंत या आर्थिक नुकसान झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या नुकसानीची प्रशासनाने पाहणी…
दीपक मोहिते, हल्लाबोल, आता सर्वसामान्य करदात्यानी एकत्र येऊन लढायला हवे… वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.१७ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर आता महानगरपालिकेला जाग आली आहे.पण या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अधिकारी,स्थानिक नगरसेवक,प्रभाग समितीचा सभापती,सहा.प्रभारी आयुक्त इतकी वर्षे झोपले होते का ? हा खरा प्रश्न आहे.आज या महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाची संख्या सुमारे एक लाखाच्या घरात पोहोचली आहे.या प्रकरणी सरकारने सखोल चौकशी करून या समाजकंटकाच्या पाठीशी असलेले खरे चेहरे लोकांसमोर आणले पाहिजेत.एरवी समाजात व्हाईट कॉलर म्हणून वावरत असलेल्या लोकप्रतिनिधींचीही तपास यंत्रणेद्वारा चौकशी झाली पाहिजे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिलकुमार पवार याने एकट्याने शिक्षा भोगू नये,त्यांनी या लुटीमध्ये सामील…
दीपक मोहिते, मराठा आरक्षण ; आपले मणिपूर होता कामा नये, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागला आहे.मराठ्यांचे नेते जरांगे पाटील हे ” जिंकू किंवा मरू,” अशा आवेशात आता मैदानात उतरले आहेत. गेली तीन वर्षे या प्रश्नाचा तिढा सुटू शकला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून फडणवीस यांनी या प्रश्नांची संवेदनशीलता लक्षात घेऊन या दोन्ही समाजाला समान न्याय मिळेल,असा तोडगा काढण्याची गरज होती. पण त्यांनी प्रश्न चिघळत ठेवला. जरांगे सारख्या फाटक्या माणसाला आपण सहज गुंडाळू,अशा भ्रमात ते होते. पण आज त्या फाटक्या माणसाच्या मागे दोन कोटी मराठे एकवटले आहेत व त्यांनी जरांगे सोबत मुंबईला जोरदार धडक दिली आहे. दुसरीकडे ओबीसी…
वसंत भोईर,वाडा गौराईमातेच्या आगमनासाठी वाडा तालुक्यातील बाजारपेठा सजल्या, तालुक्यातील व्यापाऱ्यांनी गौराई मातेच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजवल्या आहेत. मात्र यंदा वाढलेल्या महागाईने खरेदीसाठी आलेल्या सामान्य भक्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यात वाडा,कुडूस,खानिवली,कंचाड,शिरीष पाडा,या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत.या बाजारातील फळ विक्रेत्याच्या मनमानी व्यवहारावर नियंत्रण नसल्यामुळे व्यापारांच्या मनाप्रमाणे येथे फळांचे भाव असतात.मुंबई,ठाणे,कल्याण पेक्षाही येथे फळे चढ्या भावाने विकण्यात येत असतात. द्राक्षे -३५० रू.कि.लो.सफरचंद-१२० ते १६० रू.कि.लो. केळी ( वेलची )-७०ते ८०रू.डझन, साधी केळी-५०रू.ते ८०रू.डझन, पेरू-१०० रू.कि.लो.चिकू-१००रू.कि.लो.डाळिंब-१६०रू.कि.लो. नासपती-१२० रू.कि.लो.पपई-७०रू.नग, सुपारी-१० रू.नग असे भाव असून हे भाव सामान्य नागरिकाला न परवडत नाहीत.यावर प्रशासनाने नियंत्रण आणून योग्य दराने फळांची विक्री व्हावी.अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली…
दीपक मोहिते, ” अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके नेमा,” – आ.स्नेहा दुबे, वसई-विरार परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बेकायदा व धोकादायक बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.अलीकडेच विरार पूर्वेकडील विजयनगर येथे रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत १७ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.या घटनेची गांभीर्याने दखल घेत वसई विधानसभा मतदारसंघाच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसई-विरार महानगरपालिकेला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात आयुक्ताना दिलेल्या निवेदनात त्यांनी अनेक महत्वाच्या सूचना केल्या आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम हा एक ज्वलंत आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारा धोकादायक प्रकार असून तत्कालीन आयुक्तांच्या निदर्शनास काही बाबी आणल्या होत्या व त्यावर…
दीपक मोहिते, नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकार गोठवणारे ” जनसुरक्षा विधेयक – २०२४,” अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेणारा,एकत्र जमण्याचा,संघटना करण्याचा मौलिक अधिकार हिरावून घेण्याचा कायदा राज्य सरकारने नुकताच संमत केला आहे.ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे आणि याच महिन्यात स्वातंत्र्याची अशी गळचेपी करणारा कायदा सरकारने आणला आहे.कदाचित नागरिकांना आता तिसऱ्या स्वातंत्र्य युद्धाला सामोरे जावे लागणार आहे.पहिले १९४७ त्यानंतर दुसरे १९७५ साली आणीबाणीच्या काळात आपण धैर्याने लढलो.आता पून्हा आपल्यावर तशीच पाळी येण्याची शक्यता आहे.हा कायदा कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनाना लगाम घालण्यासाठी सरकारने ” अर्बन नक्षलवाद,” गोंडस नावाखाली हा कायदा लागू केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या कायद्याचा वापर…
वसंत भोईर,वाडा वाड्यात भावपूर्ण वातावरणात शेकडो गणरायाला निरोप तालुक्यात काल दीड दिवसांसाठी घरोघरी आगमन झालेल्या बाप्पा मौज मजे सह गोड धोडांची लय लूट करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना,आम्हाला अशा घोषणा देत, ढोल ताशे बँजोच्या साथीने गुळाची उधळण करीत येथे गणरायाला निरोप देण्यात आला तालुक्यात हजारोंच्या संख्येने घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.गणपती विसर्जन काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उभा रण्यात आलेल्या कृत्रिम तलावात, तर काही ठिकाणी गणपती विसर्जन गावच्या नद्या,ओहोळ व तलावात करण्यात आले.यावेळी गणेश भक्तांमध्ये भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.काल वाड्यात दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे विसर्जनास गणेश भक्तांची चांगली तारांबळ उडाली होती.त्यामुळे पावसाच्या…
दीपक मोहिते, विरार दुर्घटना ; संबंधित अनधिकृत बांधकाम व्यवसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनास्थळाची पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला तसेच राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रु.ची मदत जाहीर केली. यावेळी खा.डॉ.हेमंत सवरा, आ.स्नेहा दुबे,आ.राजन नाईक,वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी तसेच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, २६ ऑगस्ट रोजी विरार पूर्वेस मध्यरात्री विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा भाग कोसळून सदर दुर्देवी घटना घडली.या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६ महिला,८ पुरुष व ३…
दीपक मोहिते, ” भयानक वास्तव,” विरार येथील दुर्घटना ; दोन्ही आमदारांनी संक्रमण शिबिरासाठी प्रयत्न करावेत, वसई तालुक्यात हल्ली मरण खूप स्वस्त झालं आहे.कोणाला कधी मरण येईल,हे सांगणे सध्या कठीण झाले आहे.नागरिकांचे होणारे अपघाती मृत्यू लक्षात घेता याला कोण जबाबदार आहे ? याचा खोलात जाऊन शोध घेतल्यास दळभद्री विकासक,मुर्दाड बनलेली प्रशासकीय यंत्रणा व खादाड अधिकारी त्यास जबाबदार असल्याचे दिसून येते. विरार येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत १५ निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर इतर ९ जण जखमी झाले आहेत.रात्री साखरझोपेत असताना मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.क्षणार्धात या सर्व कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.आतापर्यंत इमारतीच्या मातीच्या ढिगाऱ्यात दबलेल्या २४ जणांचा शोध लागला आहे.या दुर्घटनेनंतर आपली प्रशासकीय…
