- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, न्यूजलाईन, ( नॅशनल डेस्क ) भारत – बांगला देश ; संघर्षाचे पर्व संपुष्ठात येण्याची शक्यता, बांगला देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगला नॅशनल पार्टीने ( बीएनपी ) ३०० पैकी २०४ जागा जिंकत कट्टरवादी जमात – ए – इस्लामी या पक्षाला रोखण्यात यश मिळवले. या पक्षाला केवळ ७६ जागा जिंकता आल्या. उर्वरित १० जागा इतर पक्षानी जिंकल्या आहेत. त्यांच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावी पंतप्रधान तारिक रहमान यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिद झिया यांचे चिरंजीव आहेत.त्यांच्यावर भ्रष्टाचार व गुन्हेगारीचे अनेक आरोप झाले होते.ते गेली अनेक भितीपोटी परदेशात वास्तव्याला होते. शेख हसीना यांचे…
दीपक मोहिते, भारताची डोकेदुखी वाढणार… कट्टर इस्लामिक उजव्या आणि बांग्ला राष्ट्रवादाची विचारसरणी असलेला बांगला नॅशनल पार्टी, या पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भारताच्या शेजारी असलेल्या बांग्लादेशात काल गुरुवारी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. तब्बल ३०० सदस्य असणाऱ्या बांग्लादेशाच्या संसदेत उजव्या विचारसरणीच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ( बी. एन. पी. ) प्रचंड बहुमत मिळाले आहे. बीएनपीने तब्बल २०० चा आकडा पार केला आहे. बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे पंतप्रधान होणे, आता निश्चित झाले आहे. ते दोन जागांवर निवडून आले आहेत. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांग्लादेशात हंगामी सरकार स्थापन करण्यात आले…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, सत्तेचा स्वार्थ आणि मराठी अस्मिता, मराठी माणसाचे हित व अस्मितेसाठी एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांची तोंडे आता एकमेकांच्या विरोधात वळू लागली आहेत. हे दोघे, निवडणुकीपूर्वी जो उद्देश उराशी बाळगून एकत्र आले,त्या उद्देशालाच या दोघांनी हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे त्यांना आता मराठी माणूस,मराठी भाषा व मराठी अस्मिता हा अजेंडा वापरता येणार नाही. मनसेने निवडणुकीचे निकाल लागताच भाजपला रोखण्यासाठी कल्याणमध्ये शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर चंद्रपूर येथे शिवसेनेने ( उबाठा ) भाजपला पाठिंबा देत उट्टे काढले. या दोन्ही घडामोडीवरून एकच निष्कर्ष निघतो,तो म्हणजे राज व उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू, हे मराठी माणसाचे हित…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, नॅशनल डेस्कसाठी, आजच्या भारत बंदमध्ये कामगार व शेतकरी सामील, आज देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे या बंदमध्ये सुमारे ३० कोटीहून अधिक कामगार सामील होणार आहेत. आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंदपैकी हा बंद असण्याची शक्यता आहे.या बंदमुळे संपूर्ण देशाचा कारभार ठप्प होणार आहे.या बंदला देशभरातील शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दिल्यामुळे त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या चार कामगार कायद्यामुळे औद्योगिक कामगारांच्या नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे.हे नवीन कायदे कामगारांना कामावरून काढून टाकण्यासाठी मालकांना व्यापक अधिकार देतात,तसेच कामगारांना असलेले अधिकार व हक्क यांना बाधित करतात,त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी…
दीपक मोहिते, जि. प. व पं. स. निवडणूक ; महायुतीचेच वर्चस्व, १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधकांचा पार सफाया केला.सर्वच्या सर्व जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांपैकी १११ पंचायत समित्यांवर महायुतीने आपला झेंडा फडकावला.काल लागलेल्या निकालातून प.महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा व रायगड या चार विभागात आम्हीच दादा आहोत, हे महायुतीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या तिन्ही पक्षाचे अक्षरशः पानिपत झाले. या तिन्ही पक्षांच्या हाती एकही जिल्हा परिषद लागली नाही. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक ०८ जिल्हा परिषदा जिंकून महायुतीमध्ये आपलाच दबदबा असल्याचे दाखवून…
दीपक मोहिते, १२ जि. प. व १२५ पं.स.साठी आज मतदान, आज १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्याच्या निवडणुका होत आहेत.या निवडणुकीत सुमारे २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीत एकूण ७ हजार ४३८ उमेदवार उभे आहेत. गेल्या काही वर्षांपासू रखडलेल्या या निवडणुका दोन किंवा तीन टप्यात होत आहेत.पहिल्या टप्यातील निवडणुक आज होत आहे.रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे,सातारा, सांगली,सोलापूर, कोल्हापूर,छ.संभाजीनगर,परभणी, धाराशिव व लातूर यांचा त्यामध्ये समावेश आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकूण २५ हजार ४७१ मतदानकेंद्रे स्थापन केली आहेत.वास्तविक या निवडणुका ५ फेब्रु.रोजी होणार होत्या.पण गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ही निवडणूकल…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” ( नॅशनल डेस्क ) लोकशाहीच्या मंदिरात पंतप्रधान असुरक्षित कसे ? चीनकडून लडाख परिसरात होणारी घुसखोरी व मोदी सरकारचे होत असलेले दुर्लक्ष,यावरून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्याची पाळी आली तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहातून पळ काढला.त्यामुळे विरोधी पक्षांनी सभात्याग केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या पंतप्रधानांना पाठीशी घालताना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संसदेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.मोदी यांची पाठराखण करताना ओम बिर्ला यांनी मोदी यांच्या जीवाला धोका असल्यामुळे,मी त्यांना आज सभागृहात येऊ नका, अशी सूचना केल्याचे सांगितले. त्यांच्या या…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या ” आईचा घो,” आपल्या शिक्षण व्यवस्थेत किती सावळागोंधळ आहे,हे एका मान्यताप्राप्त संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या खालवणे व शाळा बंद पडणे,हे प्रकार आपल्या पाचवीला पुजले असताना आता तिसरी धक्कादायक बाब ” यु डायस प्लस,” संस्थेच्या अहवालातून उघड झाली आहे.राज्यातील एकूण ३ हजार शाळेत गेली अनेक वर्षे विजेचा पत्ताच नाही.तसेच देशभरात विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊन ती आता २४.८ कोटींवर आली आहे.पण दुसरीकडे शिक्षकांची संख्या मात्र १ कोटी वर गेली आहे. सन २०१८- २२ दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या २६.३६ कोटी इतकी होती.त्यामध्ये १.५५ कोटीने घट होऊन २४.८१ कोटीवर आली आहे.विद्यार्थ्यांच्या…
दीपक मोहिते, न्यूजलाइन ( नॅशनल डेस्क ) भाग क्र. १, अखेर आपले विश्वगुरु हे जगदगुरु समोर झुकले.. अनेक वर्षे रखडलेला व अमेरिका – भारत दरम्यान होऊ घातलेला व्यापार करार अखेर मार्गी लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः भाईगिरी करत आपल्याला नाक घासत शरण यायला भाग पाडले आहे. या व्यापार कराराला मूर्तस्वरूप देण्यापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत,कृषी व आर्थिक क्षेत्रात कधीही तडजोड करणार नाही,असे छातीठोकपणे सांगत होते. पण, प्रत्यक्षात ते ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण घालत होते. ट्रम्प यांनी रशियाकडून तेलखरेदी व अमेरिकी मालावर झिरो शुल्क, या दोन जाचक अटी मोदी यांना मान्य करायला लावल्या. त्या बदल्यात अमेरिकेने भारताकडून आयात…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” सरकार इतकं घाबरतंय कशासाठी ? गेल्या दोन दिवसापासून लोकसभेत प्रचंड गोंधळ होत असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत – चीन सीमेवर घडलेली घटना आणि माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लिहिलेले ” फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी,” या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पित्त खवळले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह,गृहमंत्री अमित शहा व किरन रिजीजू यांनी सभागृहात गोंधळ करण्यास सुरुवात केली.त्यानंतर भाजपचे खासदार यांनी प्रचंड गोंधळ घालत राहुल गांधी यांना बोलू दिले नाही. माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी लिहिलेल्या पुस्तकात अनेक खळबळजनक घटनांवर लेख आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना हे पुस्तक प्रकाशित करू दिले नाही.त्यांच्या या लेखात आपले…
