दीपक मोहिते,
भारताची डोकेदुखी वाढणार…
कट्टर इस्लामिक उजव्या आणि बांग्ला राष्ट्रवादाची विचारसरणी असलेला बांगला नॅशनल पार्टी, या पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भारताच्या शेजारी असलेल्या बांग्लादेशात काल गुरुवारी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. तब्बल ३०० सदस्य असणाऱ्या बांग्लादेशाच्या संसदेत उजव्या विचारसरणीच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ( बी. एन. पी. ) प्रचंड बहुमत मिळाले आहे. बीएनपीने तब्बल २०० चा आकडा पार केला आहे. बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे पंतप्रधान होणे, आता निश्चित झाले आहे. ते दोन जागांवर निवडून आले आहेत.
शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांग्लादेशात हंगामी सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यांचे नेतृत्व मोहम्मद युनूस यांच्या हाती सोपवण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या निवडणुका घेतल्या. मात्र या निवडणुकांमध्ये हसीना यांची अवामी लीग सहभागी झाली नव्हती.
त्यामुळे बीएनपी आणि जमान – ए – इस्लाम, या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत झाली. मात्र, जे कल हाती येत आहेत, त्यावरून बीएनपी प्रचंड बहुमतांकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०० पेक्षा अधिक जागांवर या पक्षाने विजय मिळवला आहे.
बीएनपी पक्षाची स्थापना झियाउर रहमान यांनी १९७८ मध्ये केली होती. इस्लामिक कट्टर उजव्या विचारसरणीचा हा पक्ष आहे. झियाउर रहमान हे बांग्लादेशचे राष्ट्रपती होते. तर, त्यांची मुलगी खालिदा झिया यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. आता त्यांचे पुत्र तारिक रहमान हे बीएनपीचे नेतृत्व करत आहेत. निवडणुकीत ते ढाका आणि बोगरा या दोन जागांवर विजयी झाले आहेत. त्याचा पक्ष सत्तेत येण्यामुळे
भारताची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. बीएनपी हा पक्ष अमेरिका चीन व पाकिस्तानचा कायम पाठराखण करणारा पक्ष आहे. तर
बांग्लादेशातील आवामी लीगने नेहमी भारत समर्थक अशी भूमिका घेतली होती. मात्र, बीएनपी हा कट्टर भारत विरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बीएनपी सत्तेत आल्याने भारताची डोखेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वास्तविक बांगला देशाला पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारताने १९७१ साली आपले सैन्य बांगला देशात घुसवले होते. १६ डिसें. १९७१ रोजी पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली व शेख मुजीबर रेहमान बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. काही काळानंतर त्यांची हत्या झाल्यानंतर झिया उर रेहमान यांनी देश आपल्या ताब्यात घेतला. त्यांची हत्या झाल्यानंतर शेख हसीना व खालिदा झिया या दोन महिला नेत्याकडे आलटून पालटून सत्ता येत – जात राहिली. अडीच वर्षांपूर्वी शेख हसीना यांच्या सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी उठाव केल्यानंतर त्यांनी रातोरात पलायन केले व भारतात आश्रय घेतला. त्यांच्या पलायनानंतर डॉ.मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आले., दरम्यान खालिदा झिया यांचे पुत्र व बीएनपीचे नेते तारिक रहमान हे निवडणुकीच्या तोंडावर बांगला देशात परतले व त्यांच्या पक्षाने निवडणूक लढवली व चांगले बहुमत मिळवले.
बांगला नॅशनल पार्टी ही भारत विरोधी पार्टी असून भविष्यात अमेरिका, पाकिस्तान व चीनच्या नादी लागून भारताला त्रास देईल, अशी शक्यता आहे.

