- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” विधानसभा निवडणुका ; महविकास आघाडी बाजी मारण्याची शक्यता, निवडणुकीत उभे असलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.मतदारराजा या निवडणुकीत आपला कौल कसा देतो ? याकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागले आहे.दैदिप्यमान इतिहास असलेले पुरोगामी राज्य व आर्थिक राजधानी असलेली मुंबई,आपल्या ताब्यात राहावी,यासाठी देव पाण्यात टाकून बसलेल्या केंद्रीय नेतृत्वाचे मनसुबे तडीस जातील का ? या प्रश्नाचे उत्तर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून मिळणार आहे. उद्या राज्यातील ९ कोटी मतदार एकूण २८८ लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतील.राज्यातील एकंदरीत राजकीय वातावरण लक्षात घेता या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.महायुती व महाविकास आघाडी,या दोघांनी या निवडणुकीत आपले सर्वस्व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपाच्या गुजराती नेत्याला ओरिजनल शिवसेना का संपवायची आहे ? ही सल आहे कुबेर नगरी हातातून निसटल्याची ही सल आहे,आंतराष्ट्रीय व्यापार-उद्योग असलेल्या शहरावरील कब्जा गेल्याची, ही सल आहे आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेचा ताबा नसल्याची.” १९६० ला जे जमलं नाही त्याचा “बदला” घेण्याची तयारी आता सुरू झाली आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत कधीही अखंड देश नव्हता. छोटी छोटी संस्थाने आणि थेट ब्रिटिश अंमलाखाली असलेले प्रांत मिळून स्वातंत्र्यानंतर आजचा ” भारत देश,” अस्तित्वात आला.भारताची मूळची प्रांतीय स्वायत्तता कायम ठेवण्याचे वचन घटनेने लोकांना दिले होते.प्रांतांची निर्मिती कशी करावी,यावर खूप चर्चा झाली.अखेरीस पंतप्रधान नेहरुंनी भाषावार प्रांत रचना करण्यास मान्यता दिली.त्यानुसार देशातील सगळे…
दीपक मोहिते, ” रणसंग्राम,” कुडाळ विधानसभा ; आ.वैभव नाईक यांचे पारडे जड, कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक व निलेश राणे,या दोघांमध्ये होणारी लढत केवळ मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नसून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) विद्यमान आ.वैभव नाईक विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राणे पुत्र निलेश राणे या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मतदारसंघातील वातावरण लक्षात घेता वैभव नाईक यांचे पारडे जड आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला,” अशी या मतदारसंघाची ओळख आहे.मात्र शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे.हे जरी खरं असलं तरी स्थानिक जनतेवर नाईक यांचा चांगला प्रभाव…
नवीन पाटील, ” रणसंग्राम,” बोईसर विधानसभा बविआसाठी प्रतिष्ठेची,शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत होणार चुरशीची लढत बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत चुरशीची स्पर्धा होणार असून बोईसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.मतदारसंघ निर्मितीपासून बोईसर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा बहुजन विकास आघाडीने विजय मिळवला आहे.बहुजन विकास आघाडीतून दोन टर्म आमदारकी भूषवलेले माजी आ.विलास तरे शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर बहुजन विकास आघाडीकडून विद्यमान आ.राजेश पाटील पुन्हा रिंगणात आहेत तर डॉ. विश्वास वळवी शिवसेनेच्या ( उद्धव ठाकरे ) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटनेकडून नरेश धोडी आणि मनसेचे शैलेश भूतकडे निवडणुकीच्या रिंगणात…
प्रितेश पाटील, ” रणसंग्राम,” डहाणू विधानसभा ; निकोले व मेढा या दोघांमध्ये सरळ लढत, महाराष्ट्राचे शेवटचे टोक असणाऱ्या आदिवासी बहुल डहाणू अनु.जमाती विधानसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी,खरी लढत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्स.कम्यु. पक्षाचे विद्यमान आमदार कॉ.विनोद निकोले आणि महायुतीचे भाजपच उमेदवार विनोद मेढा यांच्यात होत आहे.जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार कल्पेश भावर,बहुजन विकास आघाडीचे सुरेश पाडवी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय वाडिया,बहुजन समाज पक्षाचे संतोष ठाकरे,अपक्ष उमेदवार वसंत भसरा,आणि मिना भड रिंगणात असले तरी खरी लढत निकोले व मेढा या दोघांमध्ये होईल,असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. डहाणू अ.ज.विधानसभा मतदारसंघात एकूण ३…
दीपक मोहिते, रणसंग्राम, आज संध्या.प्रचार थंडावणार,उमेदवारांची जीवाची घालमेल सुरू, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ च्या मतदानाला अवघे ४८ तास उरले आहेत.आज संध्या.५.०० वाजता या निवडणुकीचा प्रचार थंडावणार आहे.गेले १४ दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने या निवडणुकीच्या प्रचारात मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणे,चौक सभा,बाईक रॅली,पदयात्रा,यावर भर दिला.भाजप एकमेव पक्षाचा अपवाद वगळता इतर राजकीय पक्षांनी जाहीर सभा घेतल्या नाहीत.केंद्रीय मंत्री राजनाथसिंह काल येऊन गेले. आज प्रचार बंद होणार असला तरी छुपा प्रचार मात्र सुरूच राहणार आहे,तसेच आज व उद्या अशा दोन रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” हे नाट्य जोमात रंगण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या अनेक…
दीपक मोहिते, निवडणूक संग्राम, पालघर विधानसभा ; गावित – दुबळा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत, १३० पालघर विधानसभा मतदारसंघात चार प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत.अनु .जमातीसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात राजेंद्र गावित शिवसेना ( शिंदे गट ) व जयेंद्र दुबळा शिवसेना ( उबाठा ) या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पालघरवासियांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे.त्याचा फायदा त्यांच्या पक्षाच्या जयेंद्र दुबळा यांना होण्याची दाट शक्यता आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.पक्षात फूट पडल्यानंतर सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले.त्यामध्ये पालघर नगरपरिषद,पालघर पंचायत समिती,पालघर जिल्हा…
दीपक मोहिते, निवडणुकीच्या जीवघेण्या खेळामध्ये शेतकरी/कष्टकरी दुर्लक्षित, ” सूर्यातीर,” राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला कोणालाही वेळ नाही.ग्रामीण भागातील आमचा हा कष्टकरी अन्नदाता,सध्या अडचणीत सापडला आहे.पिकाची नुकसानी व जगण्याची धडपड,अशा कात्रीत सापडला आहे.दुसरीकडे आलिशान गाड्यातून फिरणारे राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत वावरत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या हातात आली पाहिजे,यासाठी या मंडळींची कटकारस्थाने सुरू आहेत.प्रचारात उमेदवार व त्यांचे नेते अवकाळी पाऊस,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,शेतमालाला हमी भाव,पिकाची पाहणी,पंचनामे,अहवाल व त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया,यास मूठमाती देऊन ही मंडळी एकमेकाची बदनामी करण्याच्या खेळात मग्न आहेत.पावसाळ्याच्या मध्यात अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी व परतीच्या पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते केले.पण एकाही पक्षाला या ज्वलंत प्रश्नाची दखल…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” महायुतीच्या नेत्यांना सध्या भितीने ग्रासले आहे… विधानसभा निवडणूकीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.२३ नोव्हे.रोजी कसा निकाल लागेल ? याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.महाराष्ट्र राज्य ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते तर मुंबई शहर देशाची तिजोरी असून त्याच्या चाव्या आपल्याकडे असाव्यात,यासाठी सध्या हा रणसंग्राम सुरू आहे.२० नोव्हें.२०२४ रोजी राज्यातील ९ कोटी जनता आपले २८८ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. पूर्वी देश व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असायची,पण १९७७ सालापासून विविध पक्षाने एकत्र येऊन युती व आघाड्या स्थापन केल्या. १९४७ ते १९७७ पर्यंत एकाच पक्षाच्या हाती सत्ता होती.१९७७ साली…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” रात्रीच्या वेळी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होणे गरजेचे, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आजपासून जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघात पैशाचा ओघ सुरू झाला आहे.स्थानिक पोलिसांनी तीन ठिकाणी वाहनांची तपासणी करून कोट्यवधी रु.जप्त केले आहेत.त्या पार्श्वभूमीवर वसई – विरार पोलीस आयुक्तालयाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.काल रात्री प्रचार संपल्यानंतर अनेक वाहने परिसरात फिरत होती,ती वाहने कोणत्या पक्षाची होती,त्याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा.केवळ चौकाचौकात महिला पोलिसांना बसवून मतदारसंघात होणारी पैशाचे आवागमन रोखणे कदापी शक्य होणार नाही.निवडणूक अधिकारी व पोलीस यांनी कोंबिंग ऑपरेशन हाती घेणे अनिवार्य आहे. मतदानाला अवघे ७२ तास उरले असून…
