Author: दीपक मोहिते

सुशील भोईर,वसई, हर्ष सेन मृत्यूप्रकरणी दोषी व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, हर्ष सेन यांच्या दुर्दैवी आणि अकाली मृत्यूला जबाबदार असलेल्या फनफेअर आयोजक व ऑपरेटर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी वसई फेडरेशनतर्फे महत्त्वाची बैठक घेण्यात आली.या बैठकीस आम आदमी पार्टी,शिवसेना ( उबाठा ) आणि काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस चेतन मेच्चा,सुशील द्विवेदी जॉन परेरा,आम आदमी पार्टी, प्रवीण म्हाप्रळकर, सुरेंद्र सिंह,शिवसेना ( उबाठा ) रवी भूषण,काँग्रेस,वसई-विरार तसेच,वसई फेडरेशनचे पदाधिकारी जोसेफ वर्गीस आणि संदीप मायकर उपस्थित होते. या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजीत कुमार पवार यांची भेट घेऊन…

Read More

सचिन परब,वसई, वसईत धान्याचा काळाबाजार करणाऱ्या ५ दुकानाचे परवाने रद्द, वसईत धान्याचा काळाबाजार करणार्‍या ५ शिधावाटप दुकानांचे परवाने पुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आले आहेत.सध्या या रास्तभाव दुकानातील कार्ड्स आसपासच्या परिसरातील दुकानाना जोडण्यात आली आहेत.जेणेकरून लोकांना या कारवाईचा त्रास होणार नाही. या दुकानात येणारे धान्य खाजगी बाजारात विकले जात असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे सातत्याने येत होत्या.याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात रास्तभाव दुकानदारांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. शिधावाटप दुकानात धान्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.भारतीय खाद्य निगमकडून येणारे धान्य शिधावाटप केंद्रात न उतरवता ते अन्य ठिकाणी उतरवले जात होते.यामध्ये रास्तभाव दुकान चालवणारे जगदंबा महिला बचत गट,जितेंद्र चव्हाण,श्रमिक महिला बचत…

Read More

दीपक मोहिते बॉटमलाईन, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या : कर्जमाफी हा उपाय नाही,शेतकऱ्यांच्या गरजा सरकारने लक्षात घ्यायला हव्यात… शेतकरी आत्महत्येचा आलेख सतत वर जात असुन तो थांबवण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले,तरी शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे.गेल्या सहा महिन्यात राज्यात अडीच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.आजही शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे.कर्ज काढून पेरणी करणे,पीक वाचवण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी शेतमालाला भाव नाही.अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी,याविषयी कायम घोर लागलेला असतो.या व इतर कारणांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या (एन.सी.आर.बी.) अहवालानुसार २०२० मध्ये देशात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” फडणवीस सरकारने नैतिक जबाबदारी स्विकारून पायउतार व्हावे, दोन दिवसापूर्वी झालेल्या दंगलीनंतर आता नागपूर शहर तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.पोलिसांनी आता दंगलखोरांचे अटकसत्र सुरू केले आहे.या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दंगलीमागे ” सुनियोजित पॅटर्न,” असल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे ही दंगल घडवून आणण्यामागे असलेले ” सुनियोजित पॅटर्न,” अमलात आणणारे कोण आहेत,हे हुडकून काढण्याची जबाबदारी ही त्यांच्याच सरकारची आहे,ती त्यांनी टाळता कामा नये.दरम्यान शहरातील तणावाचे वातावरण झपाट्याने निवळत आहे,ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे.पण या घटनेने या सरकारची विश्वासार्हता पार रसातळाला गेली आहे.महाराष्ट्राच्या गेल्या ६५ वर्षीच्या वाटचालीला काळिमा घडणारी ही घटना असून मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या फडणवीस…

Read More

वसंत भोईर,वाडा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे गुरुवारी वाड्यात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या गुरुवारी वाड्यात येणार असून काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते,पदाधिकारी व ब्लाॅक अध्यक्षांसोबत ते लवीश हाॅल हरोसाळे येथे संवाद साधणार आहेत. काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे गुरूवारी वाड्यात येत आहेत. ते हरोसाळे येथील लवीश हाॅल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.गुरुवारी सकाळी १०.०० वाजता त्यांचे वाड्यात आगमन होईल त्यांनंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी व ब्लाॅक अध्यक्षांसोबत ते संवाद साधणार आहेत.हा कार्यक्रम उरकल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेनंतर होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष…

Read More

दीपक मोहिते, नागपूर हिंसाचार: सरकारने संयमाने वागण्याची गरज,विरोधकांनीही आगीत तेल ओतू नये, ज्याची भिती होती,तेच नेमके नागपूर शहरात घडलं,या शहरात जी दंगल घडली,त्यामागे कोण आहेत.हे हुडकून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.पण या सर्व प्रकरणी राज्याच्या तपास यंत्रणाचे पितळ उघड्यावर पडले आहे.शहरात काय चाललंय, याची खबरबात म्हणा सुगावा जर अन्वेषण विभागाला लागत नसेल तर या विभागाचीही सखोल चौकशी व्हायला हवी. सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलाच वादंग सुरू असून राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून कबर हटवण्याची मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र,राज्याची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरातील या आंदोलनानंतर तेथे हिंसाचार उफाळला व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली.नागपूरच्या चिटणीस पार्कजवळ आणि शिवाजी चौक परिसरात जाळपोळ व…

Read More

शुभम सावंत,विरार, विवा महाविद्यालयाला सलग दोन वर्षे पुरस्कार,सर्वत्र कौतुकाचा वर्षाव, विरार येथील विवा महाविद्यालयाला २०२४ या वर्षांकरिता ” सेंटर ऑफ एक्सलन्स,” राज्यस्तरीय ” उत्कृष्ट महाविद्यालय,” ( पाचवा क्रमांक ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य उच्च,तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा राज्यस्तरीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा २०२५ नुकताच यशवंराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडला. राज्यातील ५० महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे.यावर्षी महाविद्यालयाने करिअर कट्टा उपक्रमाद्वारे विविध उपक्रम व योजना राबवत पालघर जिल्हात प्रथम येत ए + ग्रेड सोबतच सेंटर ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त केला.हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या…

Read More

शुभम सावंत विरार, विरार येथे स्त्री सन्मान सोहोळा संपन्न, बहुजन विकास आघाडी,युवा विकास आघाडी व विराट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.भारती देशमुख स्मृतिप्रित्यर्थ जागतिक महिला दिन विशेष “ स्त्री सन्मान,“ सोहळा व खाद्य कला महोत्सव,” चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या खाद्य महोत्सवांमध्ये ५० महिलांनी विविध प्रकारचे स्टॉल्स लावले होते.तर ५० महिलांनी विविध आपल्या विविध कला सादर केल्या. या सोहळ्यात ४० महिलांचा त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्त्री सन्मान हे चिन्ह देवून त्यांना गौरवण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी डिजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला.सोबतच सर्व सहभागी महिलांना सन्मानचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यास स्व.भारती देशमुख यांची कन्या गौरी देशमुख…

Read More

नाशिक प्रतिनिधी, किल्ले रामशेज येथे श्रमदान व स्वच्छता मोहीमेचे आयोजन, भारतीय जनता युवा मोर्चा आणि मावळा मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित किल्ले रामशेज येथे श्रमदान आणि स्वच्छता मोहीम पार पडली. या मोहिमेत तरुणांसह किल्ले दुर्ग संवर्धन सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाशिक पेठ गुजरात महामार्गावर असलेल्या स्वराज्यातील रामशेज किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व असून छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघलांनी केलेल्या हल्ल्यात रामशेजचा किल्लेदार आणि शत्रूच्या तुलनेत संख्येने खूपच कमी असलेल्या शूर मावळ्यांनी हा किल्ला सहा वर्षे लढवून मोघलांना नामोहरम केल्याचा इतिहास आहे. या किल्ल्याकडे सरकारचे फारसे लक्ष नसले तरी दुर्गप्रेमींनी हल्ली या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिले आहे.गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्याच्या…

Read More

मनिष धानू,डहाणू डहाणू येथे पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, डहाणू येथे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे काल दोन विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू झाला.सदर दुर्घटना डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकड आंबा शिरसून पाडा येथे घडली आहे. या गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत टाकीचे बांधकाम सुरु आहे.येथे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे अर्धवट अवस्थेत आहे. तसेच हे बांधकाम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असुन काल अचानक स्लॅब कोसळल्यामुळे दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर अन्य एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यामध्ये हर्षला रशू बागी आणि संजना प्रकाश राव या सातवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर…

Read More