Author: दीपक मोहिते

शुभम सावंत,विरार, विवा महाविद्यालयात “अ‍ॅक्युप्रेशर अँड अ‍ॅक्यूपंक्चर,” व्याख्यान संपन्न, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “अ‍ॅक्युप्रेशर अँड अ‍ॅक्यूपंक्चर” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शैला सावंत, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी.श.अडिगल,उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि उपप्राचार्या डॉ.दीपा वर्मा, महिला सक्षमीकरण कक्षाच्या प्रमुख प्राक्तना कोरे उपस्थित होते. महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्राचे उद्दीष्ट अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्यूपंक्चरच्या उपचारात्मक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे होते. शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी दबाव आणि सुया वापरणाऱ्या या प्राचीन चीनी उपचारपद्धतींचे महत्त्व या सत्रात स्पष्ट…

Read More

नाशिक प्रतिनिधी, सरकारने साडेचार कोटी कामगारांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील साडेचार कोटी संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कामगार खात्यासाठी फक्त १७१ कोटीची तरतूद केली आहे. राज्य सरकारने उद्योग वाढीसाठी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.या धोरणानुसार चाळीस लाख कोटी रु.ची गुंतवणूक तसेच ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यासाठी उत्पादन तसे निर्यात प्रोत्साहन धोरणाची अंमलबजावणी ही करण्यात येणार आहे.अर्थात त्यांची ही घोषणा पूर्वीच्या घोषणांप्रमाणेच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडे ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात उद्योग विभागासाठी १०२१ कोटीची तर कामगार विभागाला फक्त १७१ कोटीची तरतूद केली…

Read More

संजय लांडगे,वाडा थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघटनेचा वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा, आपल्या देशातील प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे,म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.या योजनेतील कामगारांची थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघानेचा वाडा तहसील कार्यालयवर मोर्चा आपल्या देशामध्ये प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.मात्र या योजनेकडे शासन व प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे हजारो नागरिकांना हक्काच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे.वाडा तालुका हा ग्रामीण तथा आदिवासी बहुल तालुका असून मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करतात.…

Read More

दीपक मोहिते, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता, राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी ” मल्हार सर्टिफिकेट,” या नावाने नवीन उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याअंतर्गत राज्यभरात झटका मटण विकणाऱ्या दुकानांची नोंदणी केली करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र मिळणारी दुकाने केवळ हिंदू समुदायातील लोक चालवतील,असं त्यामध्ये म्हंटलं आहे. नितेश राणे यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ” आज आज आम्ही महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ( https://malharcertification.com ) या निमित्ताने सुरू केलं आहे.मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटणाची दुकाने…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, ” बिल ऑफ लँडिंग,” विधेयक देशाला फायदेशीर, देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदर प्रकल्पाला गती देणाऱ्या आणि भारताच्या सागरी व्यापाराला नवी दिशा देणाऱ्या ” बिल ऑफ लॅडिंग,” विधेयकाचे देशभरात स्वागत करण्यात येत आहे.पालघरचे खा.डॉ.हेमंत सवरा यांनीही हे विधेयक आपल्या जिल्ह्याच्या विकासाला गती देईल,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या महत्त्वपूर्ण विधेयकामुळे वाढवण बंदर, भारतातील सर्वात मोठे बंदर असेलला प्रकल्प आणखी सक्षम होणार आहे.तसेच पालघर जिल्ह्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास अधिक वेगाने पुढे जाईल.फक्त पालघरच नव्हे,तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार आहे. हे एक कायदेशीर दस्तऐवज असून,मालवाहतूक व्यवहारासाठी अत्यावश्यक असे एक विधेयक आहे.मालवाहतूक कराराचा पुरावा,माल मिळाल्याची पावती,वस्तूंच्या मालकी हक्काचा…

Read More

संजय नेवे,विक्रमगड शिक्षक समिती,विक्रमगड तालुकाध्यक्षपदी सुनील अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर यांची सभा नुकतीच आश्रमशाळा माण येथे पार पडली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर जिल्हाध्यक्ष राजू महाले यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा घेण्यात आली.या सभेत विक्रमगड शाखेच्या अध्यक्षपदी सुनील अधिकारी यांची तर सचिव पदी रविंद्र जायभाये व जिल्हा सदस्यपदी अजित भोईर यांची निवड करण्यात आली. सुनील अधिकारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड येथे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर संपन्न, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय विक्रमगडतर्फे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर उत्साहात संपन्न झाले. संत रोहिदास सभागृह,रोहिदास नगर, विक्रमगड येथे नुकतेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार व विक्रमगड पंचायत समिती गटविकास अधिकारी मिलिंद जगदाळे यांनी भेट दिली. या शिबिरात प्रलंबित ई-केवायसी,एनपीसीएल मॅपिंग,लँड सिडींग,वनपट्टेधारक व कातकरी समाज बांधव यांना लाभ,ऍग्रीस्टॅक नोंदणी,आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे,याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. येत्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे हप्ते मिळवण्याकरता ऍग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.

Read More

वसंत भोईर,वाडा अंभई/आमगाव ग्रामस्थांनी घातला पंचायत समिती कार्यालयाला घेराव, तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह सहनिर्देशनास आणूनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी गेल्या बुधवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सहाव्या दिवशीही या उपोषणाची दखल न घेतल्याने आज अंभई आमगाव ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला. या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी वस्तूंची खरेदी करताना अनावश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा,छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे,असे विविध आरोप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषण…

Read More

दीपक मोहिते, मागचा वाईट अनुभव, नदीजोड प्रकल्प : अर्थसंकल्पात ८८ हजार कोटी रु.ची आर्थिक तरतूद,फडणवीस/ विखे पाटील यांनी सावध राहण्याची गरज, अर्थमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्याची घोषणा केली आहे.या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रु. असून,त्याचा ३ लाख ७१ हजार २७७ हे.शेतजमिनीला फायदा होणार आहे.गेली अनेक वर्षे हा नदीजोड प्रकल्प धूळ खात पडला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.वाजपेयी यांनी त्यावेळी खा.सुरेश प्रभू यांना या योजनेच्या प्रमुखपदी नियुक्त केले होते.प्रभू यांनीही या योजनेचे काम धूमधडाक्यात सुरु केले होते. पण…

Read More

दीपक मोहिते, राज्यात होळी व धुलीवंदनाची जोरदार धूम, होळी व धुलीवंदन या दोन सणाची बाजारात धूम सुरू झाली आहे.पूजेचे साहित्य,विविध प्रकारचे रंग,पिचकारी इ.साहित्य खरेदीसाठी महिला व बाळगोपाळांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.हिंदू लोकांचा हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.यंदाही तो त्याच पद्धतीने साजरा होणार आहे.होळी हा सण आपण का साजरा करतो,हा सण साजरा करण्यामागे कोणती पार्श्वभूमी आहे,हे सर्वप्रथम आपण जाणून घेणे गरजेचे आहे. पूर्वी हिरण्यकश्यपू हा एक राजा होता,तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचा, आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही,अशी त्याला घमंड होती.पण गर्वाच घर नेहमी खाली असते,या न्यायानुसार या हिरण्यकश्यपू याने त्याचा मुलगा प्रल्हाद याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न…

Read More