Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” कलमा म्हणजे काय ? इस्लाममध्ये त्याला इतकं महत्व का ? पहलगामच्या हल्ल्यात पर्यटकांना म्हणायला लावलेला कलमा म्हणजे काय ? याच हल्ल्यादरम्यान कलमा म्हटल्याने माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे प्राण वाचले,असं आसामचे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य म्हणाले.देबाशिष हे एका झाडाखाली पुरुषांच्या गटासोबत बसले आणि कलमा म्हणू लागले.त्यामुळे त्यांच्यावर दहशतवाद्याने गोळी झाडली नाही. पहलगाममधील बैसनर याठिकाणी २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुष गोळीबार केला. ” तुमच्यापैकी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण आहेत ? तुमचा धर्म कोणता आहे ? मुस्लिम असाल तर कलमा वाचून दाखवा,” असं म्हणत दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केलं. सर्व मुस्लिमांनी कलमा जाणून घेणं आवश्यक असतं,कारण ते इस्लामी श्रद्धेचा…

Read More

संदीप जाधव,बोईसर भाजप बोईसर मंडळ निवडणुकीवरून वाद ; अनेक कार्यकर्ते नाराज, भाजपच्या बोईसर मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेवर आरोप होत असून,व्यापारी मोर्चा व वाहतूक आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेतून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे.याप्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहेत. भाजपच्या बोईसर मंडळ निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव होता.व्यापारी मोर्चा आणि वाहतूक आघाडीचे सक्रिय पदाधिकारी असूनही दुर्गेश सोलंकी आणि अहमद खान यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले.निवडणूक प्रक्रियेची कुठलीही पूर्वकल्पना न देता एकतर्फी पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात भाजप नेते आशिष संखे…

Read More

जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी, ” जव्हारचा ढाण्या वाघ,” अशी ओळख असलेले व १९४२ च्या ” चले जाव,” आंदोलनात सक्रिय भाग घेतलेले खरवंद गावचे सुपुत्र स्वातंत्र्य सैनिक वीर रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती आज जिल्हा परिषद शाळा चौक,तालुका जव्हार,केंद्र वाळवंडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाची सुरुवात स्वा.सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे पदवीधर शिक्षक रवी बुधर यांनी स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी म.गांधी यांच्या नेतृत्वाखालील सत्याग्रह आंदोलनात केलेल्या…

Read More

दीपक मोहिते ” निर्लज्जपणा, ” शिंदे यांनी म्हस्के यांना वेळीच आवरावे,अन्यथा पक्ष अडचणीत येण्याची शक्यता, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खा.नरेश म्हस्के हे वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. काश्मीर येथे घडलेल्या घटनेनंतर वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.मस्के हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून या-ना त्या कारणावरून वादात सापडत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकाविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले व पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करणे,ही राज्य सरकारची जबाबदारी असताना,अशा प्रकारचे वक्तव्य करणे,हे अपमानास्पद आणि…

Read More

दिपक मोहिते, बदला घेणार,म्हणजे नक्की काय करणार ? जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते.या घटनेला चार दिवस उलटून गेले.पण ज्या दहशतवाद्यांना पाककडून रसद पुरवण्यात येते,त्या पाकिस्तानला आपले मोदी सरकार केवळ इशारे देत बसले आहे.एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही,अशा सिंहगर्जना करण्यात आपले सरकार धन्यता मानत आहे.हे दहशतवादी आता पाकीस्तानच्या आश्रयाला गेले आहेत.त्यांना हुडकून काढून त्यांना ठार मारणे,ही आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. पाकिस्तानशी युद्ध करणे,ही अशक्यप्राय गोष्ट आहे.पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ आपण उध्वस्त करू शकतो,पण त्या देशाशी आपल्या लोकांना आपल्याला थेट युद्ध करणे,शक्य नाही.कारण दोन्ही देश न्यूक्लिअर पॉवर देश आहेत.दोन्ही देशात युद्ध झालेच तर ते तिसऱ्या…

Read More

वसंत भोईर,वाडा १९ हजार रू.ची लाच घेताना सरपंचाला रंगेहाथ पकडले, तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण १९ हजार रू.ची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून सरपंचावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठणे या ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा सुनिल गवारी वय ३६ या आहेत.येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच सरपंच शोभा गवारी यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी…

Read More

सचिन परब,विरार लायन्स क्लबतर्फे आगाशी जिल्हा परिषद शाळेला बेंचेसची भेट, राज्यातील जिल्हा परीषद शाळांची दुर्दशा व दिवसेंदिवस कमी होत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे.गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था नेहमीच खारीचा वाटा उचलत असतात. विरारमधील एका शाळेला लायन्स क्लबकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.या मदतीमुळे विद्यार्थ्याँना दिलासा मिळाला आहे. वस‌ई तालुक्यातील आगाशी येथील जिल्हा परिषद शाळा ही एकेकाळी नावाजलेली अशी शाळा.बदलत्या काळात इंग्रजीच्या ओढ्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या उतरणीला लागली.तसेच शासनाच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या शाळेची पार दुरावस्था झाली आहे. शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सध्या अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत होते.या शाळेत…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यात जागतिक हिवताप दिन साजरा, जागतिक हिवताप दिना निमित्त आरोग्य विभागाकडून तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानीवली,प्रा.आ.केंद्र गोऱ्हे, प्रा.आ.केंद्र परळी,प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावर्षी जागतिक हिवताप दिन ” चला हिवताप संपवू या : पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा.आ.केंद्र खानिवली अंतर्गत येणाऱ्या मौजे तुसे येथे वैद्यकीय अधिकारी अश्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तुसे गावात हिवताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माध्यमिक विद्यामंदिर तुसे येथील विध्यार्थ्यांना हिवताप,डेंगू,चिकन गुनिया, हत्ती…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जिजाऊ रथयात्रेचे जव्हार नगरीत भव्य स्वागत, “ बहुजन मराठा जोडो अभियान,” अंतर्गत महाराष्ट्रभर प्रवास करणारी जिजाऊ रथयात्रा काल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या जव्हार नगरीत दाखल झाली.विविध परंपरा,ऐक्य आणि बहुजनांच्या संघर्षांचा वारसा मांडणारी,ही यात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादाने संस्मरणीय ठरली. यात्रेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ येथे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर यात्रेने आदिवासी क्रांतिकारक चौक गाठले,जेथे पारंपरिक तारपा नृत्य पथक साखरशेत यांनी सादर करून आदिवासी समाजाच्या थोर क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली.सांस्कृतिक परंपरेच्या अभिव्यक्तीचा हा भाग उपस्थितांमध्ये भारावणारा ठरला.त्यानंतर सहविचार सभा व ” बहुजन समाज…

Read More

संजय नेवे,विक्रमगड बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा, खा.डॉ.हेमंत सवरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन मतदार संघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. या भेटीत तीन विषयांवर शासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी करण्यात आली. बेपत्ता खलाशांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देणे. ४ मार्च २०२५ रोजी समुद्रात झालेल्या अपघातात झाई गावातील चार खलाशी समुद्रात बुडाले होते.यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून उर्वरित तीनजण अद्याप बेपत्ता आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट ओढवले आहे.तसेच दोन खलाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व शासनाच्या योजनांतून सहाय्य मिळावे, अशी मागणी खा. सवरा केली…

Read More