Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघातर्फे, ” पेन्शनर्स डे, ” साजरा, अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघातर्फे साजरा होणारा ” पेन्शनर्स डे, ” कार्यक्रम काल भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक सभागृह, विरार येथे पार पडला. या कार्यक्रमाला वसई -विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर व सामजिक कार्यकर्ते राजीव पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दिवाकर लोवलेकर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पेन्शनरांच्या अडचणी व त्याबाबतचे मार्गदर्शन,तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार,गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देवुन गुणगौरव करण्यात आले.या कार्यक्रमात कै. यशवंत केशव पाटील स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समितीच्या एका सदस्याचा रु. २१०००/- रोख पारितोषिक…

Read More

अनिरुद्ध पाटील, विरार, साहित्य चावडीवर उलगडला प्रभू येशूचा जीवनपट, भारतासह संपूर्ण जगभरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.नाताळ सणाचे औचित्य साधून मंगलमुर्ती मंदिर वाय. के.नगर विरार पश्चिम येथे ” साहित्य चावडीवर प्रभू येशूचा जीवनपट,” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साहित्य चावडीचे ६४ वे पुष्प असलेल्या या कार्यक्रमाचे सरपंच कवी एमेल जोसेफ आल्मेडा यांनी आपल्या भाषणात,संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरीता प्रभू येशू यांनी बलिदान दिल,त्या प्रभू येशू यांच्या विषयीचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला.एमेल जोसेफ आल्मेडा यांनी नाताळ विषयी संपूर्ण माहिती सांगून हा सण कशाप्रकारे साजरा करण्यात येतो, याविषयी परिपूर्ण माहिती सांगितली.कोणताही जातीभेद व धर्मभेद न पाळता सर्व सण एकत्रित…

Read More

दीपक मोहिते, टिवरी ग्रामपंचायतीचा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम मशीनवर उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर वसईतील टिवरी ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेत आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.टिवरी ग्रामपंचायत ही पालघर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे, ज्यांनी इव्हीएमला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. टीवरी ग्रामपंचायतीची २० डिसें.रोजी झालेली ग्रामसभा हा ठराव मंजूर करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. या सभेचे अध्यक्षपद उपसरपंच नुतनकुमार भोईर यांनी भूषवले तर माजी उपसरपंच नंदकुमार चौधरी हे या ठरावाचे सूचक होते.ग्रामस्थांनी एकमताने इव्हीएम हटावचा नारा दिला आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान घेण्याचे ठरवले.या ऐतिहासिक ठरावाला गावचे पोलीस पाटील अजित भोईर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अशा पाहणीतून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं, मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर काही कॅबिनेट मंत्री झाडून पुसून कामाला लागल्याचे चित्र विविध वृत्तवाहिनीवर पाहायला मिळाले.अनेक मंत्र्यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या विभागांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.ही पाहणी करताना मंत्रीमहोदय नजरेस आलेल्या गैरप्रकाराबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांना झापायला देखील विसरत नाहीत.चांगली गोष्ट आहे,कारण अधिकारीवर्गाला अनागोंदी कारभाराबद्दल फैलावर घेतलेच पाहिजे.पण त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं.अन्यथा मंत्र्यांची पाठ फिरली की पुन्हा ” ये रे माझ्या मागल्या,” तसं झाल्यास मंत्र्यांची ही कृती ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” असे होईल.त्यामुळे या मोहिमेतून काहीतरी चांगलं निर्माण होईल,व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होईल,अधिकारीवर्ग झाडून कामाला लागतील,अशी…

Read More

दीपक मोहिते, ” अजातशत्रू,” अटलबिहारी वाजपेयी ; सृजनशील मनाचा सुधारणावादी नेता, भाजपचे थोर नेते,विचारवंत व देशाचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज शंभरावी जयंती आहे.त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत तीनवेळा पंतप्रधानपद भूषवले.१९९६,१९९८ व १९९९,असे तीन वेळा ते पंतप्रधान झाले.प्रखर राष्ट्रवादी,पत्रकार,साहित्यिक व यशस्वी राजकारणी, अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली.खासदार म्हणून त्यांनी चाळीस वर्षे संसदेत त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. आजीवन अविवाहित राहून त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशभर प्रचार केला.१९९९ साली त्यांनी २४ राजकीय पक्षाची एकत्रित मोट बांधत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली.त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना ११ व १३ मे १९९८ दरम्यान पोखरण येथे पाच अणुस्फोट करून भारत अणुशक्ती…

Read More

दीपक मोहिते, ” राज्याची अधोगती,” संतोष देशमुख हत्या ; आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू पुसणाऱ्याना नियती सोडणार नाही, राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे बीड जिल्ह्याची ओळख,” गुन्हेगारीचा जिल्हा,” अशी झाली आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीची प्रकरणे एकामागोमाग बाहेर येत असूनही आपले मायबाप सरकार जागे व्हायला तयार नाही.त्यांच्याच पक्षाचे आ.सुरेश धस यांनी सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली आहेत.पण सरकार त्यातून काही बोध घ्यायला तयार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत,त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.त्यांनी ही मागणी करताना मुंडे यांचे वाल्मिक कराड यांचे एकमेकांशी कसे घनिष्ट संबंध आहेत,हे पुराव्यानिशी दाखवून दिले,पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत.फडणवीस हे दररोज…

Read More

जव्हार,प्रतिनिधी, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, महाराष्ट्र शासन राज्य पेसा कक्ष पुणे,ग्रामविकास व पंचायतराज विभाग,जिल्हा परिषद पालघर,पंचायत समिती जव्हार पेसा कक्ष आणि ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पेसा कायद्याच्या निर्मितीला २८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे आणि लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या हस्ते झाले.धरतीआबा भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उदघाटन सोहळा पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारचे सहा.गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर…

Read More

सुरेश काटे,तलासरी, जीवनात शिस्तीसोबत सामाजिक शिस्तही महत्वाची – सत्यम गांधी, ज्ञानमाता संस्थेच्या झरी शाळेचा पालक दिन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा काल प्रमुख पाहूणे सत्यम गांधी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदि‌वासी विकास,डहाणू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात सत्यम गांधी यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली व पालकांनी हा कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून न घेता त्यातील सामाजिक बोधही समजून घ्यावा.तसेच प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.वि‌द्याथ्यांनो, जीवनात शिस्ती बरोबरच सामाजिक शिस्तही स्वतःला लावणे गरजेचे आहे.मुलींना खूप शिकवा,असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक फा.निलम लोपीस, झरी गावच्या सरपंच सीना ठाकरे,शाळेच्या प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडीस व मोठया संख्येने पालक आणि विद्यार्थी…

Read More

दिपक मोहिते, लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, वनविभागातील आणखी एक बडा अधिकारी आज लाचलुचपत विभागाने रचलेल्या जाळ्यात अडकला.संदीप तुकाराम चौरे,असे या वनअधिकाऱ्याचे नावं असून तो वनविभागाच्या मांडवी कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत होता.जप्त मिळकतीचा वस्तुस्थितीदर्शक अहवालाचा कागदोपत्री मोबदला म्हणून चौरे याने तक्रारदाराकडून २० लाख रु.च्या लाचेची मागणी केली होती.त्यापैकी १० लाखाची लाच स्विकारताना लाचखोर चौरे एसीबीच्या जाळ्यात सापडला.या कारवाईत एसीबीने चंद्रकांत पाटील व अन्य एका अनोळखी इसमालाही ताब्यात घेतले आहे.यापूर्वीही एसीबीने लाचखोरी प्रकरणात वसईतून वनविभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली होती.या पार्श्वभुमीवर वनविभाग लाचखोरीच्या दलदलीत रुतल्याचे स्पष्ट होत आहे. वसई तालुक्यातील गाव ससुनवघर हद्दीत ‌” विस्तारित सासुपाडा‌,” गावठाण या ठिकाणी…

Read More

दीपक मोहिते, नंडोरे ग्रामपंचायततर्फे पेसा दिन साजरा, आज नंडोरे ग्रामपंचायत मार्फत पेसा दिन साजरा करण्यात आला.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर,सरपंच सोनल घोडके,पेसा अध्यक्ष सुरेंद्र सांबरे,अशोक जाधव,पंचायत समिती सदस्य सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पेसा दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने २४ डिसें.हा दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायत मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आले होते.त्यानुसार जिल्ह्यात पेसा ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन…

Read More