- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
जव्हार,प्रतिनिधी १० वी च्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत – भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, जव्हार येथे १० वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि पहिल्या पेपरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संदेश दुमाडा गटविकास अधिकारी,जव्हार, भुसाळ,सहा.पोलीस निरीक्षक, के.पी.तरवारे प्राचार्य भारती विद्यापीठ,अवधूत गावंड मुख्याध्यापक,के.व्ही. हायस्कूल,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिस्तबद्ध आणि नक्कलविरहित परीक्षा पार पाडण्यासाठी ” कॉपी मुक्त परीक्षा,” अभियानांतर्गत परीक्षाकेंद्र विनवळ येथे गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी मनीषा डांगे यांनी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली.त्यांनी केंद्रप्रमुख व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडल्यामुळे महायुतीचे अनेक मंत्री भितीच्या सावटाखाली, थोर समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.गेले एक दशक मौन बाळगून असलेले हजारे अचानक राजकीय भाष्य करू लागल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दोनच दिवसापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यास त्यानी आपली नैतिक जबाबदारी म्हणून सर्वप्रथम आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणी केली आहे.तसेच ज्या आमदारांवर आरोप आहेत,अशा लोकांना मंत्रिमंडळात घेताना विचार केला पाहिजे.त्यासाठी निकष ठरवण्याची गरज आहे.यावेळी अण्णा हजारे यांनी वादग्रस्त मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे,हे दोन मंत्री भ्रष्टाचार प्रकरणी वादग्रस्त ठरले असताना अण्णा…
दीपक मोहिते, ” घरचा आहेर,” एसटी जमिनविक्री ; ” रोगापेक्षा उपचार भयानक,” असे होता कामा नये, लाडक्या बहिणींना व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात आल्याची प्रांजळ कबुली परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिली.यावेळी त्यांनी अशा आकर्षक योजनांमुळे एसटीला दरदिवशी ३ कोटी रु.चा तोटा होत असल्याचे सांगितले.यावरून महायुती सरकार हे सत्तेच्या हव्यासापोटी राज्याला कसे आर्थिक खाईत ढकलत आहे,हे स्पष्ट होत आहे. गद्दारी करून सत्तेत आलेले आपले सरकार टिकले पाहिजे,यासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या,आल्या सवंग लोकप्रियतेच्या योजना लागू केल्या.या योजना लागू करताना राज्याची आर्थिक स्थिती ढासळेल,याची तमा न बाळगता सवंग लोकप्रियतेच्या…
तलासरी पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन, तलासरीच्या दयानंद नर्सिंग कॉलेज वडवली येथे आज सकाळी विद्यार्थी व शिक्षक यांना भारतीय न्याय संहिता-२०२३,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३,भारतीय साक्ष अधिनियम-२०२३, या नवीन कायद्याबाबत तलासरी पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक विजय मूतदक, तसेच कर्मचाऱ्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पालघर याचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे जनजागृती बाबत व्हिडीओ दाखवण्यात आले तसेच महिला अत्याचार, सायबर क्राईम,डायल ११२, लैंगिक अत्याचार,रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता,याबाबतही मार्गदर्शन करण्यात येऊन पालघर पोलीस दलाच्या वेबसाईट,इंस्टाग्राम पेज व फेसबुक पेजला भेट व फॉलो करणेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
दीपक मोहिते, विकास करताना स्थानिकांचा आधी विचार झाला पाहिजे-निवृत्त न्या.गोखले, कुठल्याही प्रदेशात विकास करताना स्थानिक जनता,संस्कृती आणि त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार केला पाहिजे.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे सुराज्य स्थापन करताना आधी रयतेच्या अशा हिताचा विचार केला होता.अशाप्रकारचे सुराज्य स्थापन करण्यासाठी जी निवडक मंडळी धडपडत आहेत,त्यापैकी मनवेल तुस्कानो एक आहेत. जनहिताचे प्रश्न बाजूला सारून कुठल्याही मार्गाने सत्तेवर राहण्यासाठी सत्तांतर,पक्षफोडी अशा कुरापतींना प्राधान्य देण्याची पद्धत रूढ होत असताना तत्त्वासाठी लढणारे माणूसप्रेमी व साधे सरळ आयुष्य जगणारी माणसं आता दुरापास्त होत आहेत. विरार पश्चिमेस नंदाखाल गावी काल संपन्न झालेल्या मनवेल तुस्कानो अमृतमहोत्सवी गौरव सोहळा समिती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून सभेला…
संजय नेवे,विक्रमगड भाताचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आज तहसील कार्यालयात आंदोलन, तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या आधारभुत भातखरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाने विक्री केलेल्या व महामंडळाने खरेदी केलेल्या भाताच्या रक्कमेपासुन अनेक शेतकरी वंचित राहीले आहेत सुमारे नऊशेहुन अधिक शेतकऱ्यांची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही,याविरोधात आज शेतकरी तेजस भोईर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार कार्यालयासमोर न्याय मागण्याकरीता उपोषणास बसले होते. जोपर्यत न्याय मिळत नाही,तोपर्यत हे उपोषण चालुच राहील,असे यावेळी शेतकरी शिष्ठमंडळाने सांगितले.त्यामुळे रिजनल अधिकारी योगेश पाटील यांनी शेतक-यांच्या शिष्ठमंडळाशी समक्ष चर्चा करुन येत्या २६ फेब्रु.पर्यत शेतक-यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील,असे लेखी अश्वासन दिल्यांनतर सदर उपोषण शेतक-यांनी मागे घेतले.मात्र दिलेल्या मुदतीत…
विरार येथे वार्षिक कला उदघाटनाचा सोहळा संपन्न, विरार येथील विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधील विद्यार्थ्यांनी सुरेख काम करत देशातील अत्यंत जुन्या संस्थेची बरोबरीच केली आहे, असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व निर्माता रवि जाधव यांनी अतिथी म्हणून मुलांना मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात काढले.रवि जाधव यांच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर तसेच मार्गदर्शक राजू वनमाळी,अनिल ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट,या विरार पूर्व,शिरगाव येथील कला महाविद्यालयात २०१० साली बी.एफ.ए.या पदवी अभ्यासक्रमात अप्लाइड आर्ट व पेंटिंग हे दोन विषय…
वसंत भोईर,वाडा ऑनलाइन पीक पाणी न झालेले शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी करण्याची मागणी, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते.यावेळी सुमारे विविध विभागांचे सातशे एकोणचाळीस तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी वाडा तालुक्यातील विविध समस्यांबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदने सादर केली आहेत.आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केली जाते.यासाठी ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.मात्र अनेक शेतकऱ्यांकडून तांत्रिक कारणांमुळे पीक पाहणी करण्यात आलेली नाही.अशा शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून ऑफलाइन पद्धतीने पिक पाहणी सातबारा उतारावर केली आहे.पण या शेतकऱ्यांची धान (…
संजय नेवे,विक्रमगड तलवाडा विक्रमगड मार्गावर मालवाहु ट्रकचा भिषण अपघात, वाहनचालकाचा मृत्यू, विकमगड…तलवाडा-सेलवाल येथिल कंपनीतुन लोखंडी ब्लेड घेवुन मालहु ट्रक वाडा येथील कंपनीत जात असतांना तलवाडा-विक्रमगड मार्गावरील दादडे गावानजीक ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक वळणावर असलेल्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाला धडकला.या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ट्रकचालक बिपीन राधेश्याम राय रा.खानवेल याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यु झाला. हा अपघात वइतका भिषण होता की ट्रकच्या केबीनचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.त्यामुळे वाहनांचा फिटनेस तसेच जुन्या झालेल्या ट्रकचा आरटीओ विभागाकडुन तपासला जातोय की नाही,असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरसंघचालक भागवत यांचे नथीतून तीर मारणे सुरूच… महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजित पवार ) अनेक नेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी एकामागोमाग उजागर होत असल्यामुळे भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चांगलीच आगपाखड केली आहे. पक्षाचे धनंजय मुंडे हे अडचणीत आले असताना त्यांचे कृषीमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे देखील आता जेलची हवा खाण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटात स्वतः अजित पवार,धनंजय मुंडे,माणिकराव कोकाटे,हसन मुश्रीफ,या चार वरिष्ठ मंत्र्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,माजी मंत्री छगन भुजबळ,नबाब मलिक व खा.प्रफुल्ल पटेल,असे एकूण आठ जण भ्रष्टाचार प्रकरणी वादग्रस्त ठरले आहेत.या लोकांमुळे आपल्या पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.…
