- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
सचिन परब,वसई अवकाळी पावसामुळे वसई विजयोत्सव दिन उत्सवाच्या तारखेत बदल, वसई विरार शहर महानगरपालिकेने २८७ वा वसई विजयोत्सव दिन सोहळा १० ते १२ मे २०२५ असा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता.मात्र,मंगळ.६ ते ८ मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक परिसरामध्ये पाणी साचले, सोबत या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण असलेला परिसरात चिखलाचे सम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच हवामान खात्याच्या सुचनेनुसार,पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने वसई विजयोत्सव कार्यक्रम तीन दिवसांच्या ऐवजी फक्त एक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोम.१२ मे २०२५ रोजी फक्त एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केला…
दीपक मोहिते, ” फ्रँटलाइन,” पाकिस्तानने वेळीच शहाणे व्हावे,अन्यथा तीन तुकडे होण्याची शक्यता, भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले असून युद्धाची व्याप्ती सतत वाढत आहे.हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याची शक्यता आहे.या युद्धाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसणार आहे.गेल्या काही वर्षात या देशाची आर्थिक घडी पार विस्कळीत झाली आहे.औद्योगिक उत्पादन,व्यापार,जीडीपी,कृषी व रोजगार या क्षेत्रात पाकिस्तान जगाच्या क्रमवारीत १०९ क्रमांकावर घसरला आहे.वाढती महागाई व बेरोजगारी,यामुळे जनता अधूनमधून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते. देशाचे चारही प्रांत सिंध,पंजाब,पख्तुनख्वा व बलुचिस्तान,अशांत बनले आहेत.बलुचिस्तान व पख्तुनख्वा,हे दोन्ही प्रांत फुटून निघण्याच्या तयारीत आहेत.अशा स्थितीत हे युद्ध त्यांच्या…
जव्हार प्रतिनिधी, वाड्यात मशाल गौरव पुरस्काराचे वितरण, ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘मशाल’ या वृत्तपत्राच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमीत्त मशाल गौरव पुरस्कारांचे वितरण शरद नगर येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील,माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, खा.डॉ.हेमंत सवरा,सद्गुरु अलोकनाथ महाराज,उबाठाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामधे आदर्श लोकप्रतिनीधी खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा,आदर्श संस्थाचालक शिल्पा शिंदे, आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कमा कामडी,आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरु आलोकनाथ महाराज,आदर्श फोटोग्राफर दिपक गोळे,उत्कृष्ट पत्रकार दिपक चंदे,आदर्श युवा उद्योजक प्रितम भोपतराव, आदर्श सामाजिक…
दीपक मोहिते, अखेर शहाणपण सुचलं.. चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर करा- सर्वोच्च न्यायालय, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाची मुदत संपून तीन ते चार वर्षे पूर्ण होत आली पण या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याविषयी अंतिम सुनावणी झाली असता घटनापीठाचे प्रमुख न्या.सूर्य कांत यांनी येत्या चार आठवड्यात या निवडणुका करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश दिले. तसेच ही निवडणूक प्रक्रिया चार महिन्यात संपवावी अशी सूचना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना…
दीपक मोहिते, नेत्रदिपक कामगिरी, दि ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेला २१८ कोटी रु.चा नफा, सहकार क्षेत्रात अग्रेसर बँक आणि शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून प्रसिद्ध असलेली ठाणे आणि पालघरवासियांची बँक दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील आर्थिक वर्षात २१८ कोटी ९७ लाख रु.चा नफा चालू आर्थिक वर्षात मिळवला आहे.राज्यातील अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेने दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ठाणे नेहमीच अग्रेसर राहिली आहे.बँकेने वर्षअखेर १ हजार ५९३ कोटी २५ लाख रु.चा निधी उभारला आहे. सद्यस्थितीत बँकेकडे ९ हजार ६३१ कोटी ४७ लाख रु.च्या ठेवी आहेत.यात बँकेने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५५९ कोटी ७३ लाख रु.ची वाढ झाली आहे.बँकेने ४…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” राज्याच्या राजकारणाची अधोगती सुरू, ” युद्ध व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,” असं म्हंटल जातं ते खरंच आहे.पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे,त्याचे ” राजकारणाची अधोगती,” असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये.दीड दशकापूर्वी दोन ठाकरे बंधू एकमेकांच्या उरावर बसले होते,तर दोन वर्षांपूर्वी काका-पुतण्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष निर्माण होऊन पक्षाची दोन शकले झाली. स्वार्थी राजकारणाचा हा परिपाक होता.पुतण्याने पक्ष, चिन्ह व आमदार पळवल्याचे सांगत काकाश्रीनी राज्यभरात आपला ऊर बडवला.आज तेच काका/पुतण्या व दोन ठाकरे बंधू ” आम्ही एकत्र आलो तर आश्चर्य वाटता कामा नये,” असा ढोल पिटण्यात धन्यता मानत आहेत.गेल्या ६६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची…
दीपक मोहिते, ” विनाशकाले विपरीत बुद्धी, ” भारताने पाकची अनेक शहरे केली बेचीराख… काल पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या वायुदलाने तो हाणून पाडला.यावेळी झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानची चार ते पाच विमाने पाडली व त्यांच्या तीन वैमानिकांना ताब्यात घेतले आहे.आपण केलेल्या लष्करी कारवाईंनंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानच्या एक तृतीयांश भुभागावर मुसंडी मारली आहे. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानच्या सियालकोट शहरात अफरातफरी माजली आहे. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला पदावरून हटवण्यात यावे,अशा मागणीने जोर धरला आहे.दरम्यान तुर्कस्तानचे कार्गो विमान पाकिस्तानात पोहोचले असुन या विमानात ड्रोन असल्याची माहिती मिळाली आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात प्रखर हल्ले चढवल्यामुळे सर्वत्र ब्लँकआउट घोषित…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पाकिस्तान भितीच्या सावटाखाली ; चार शहरे स्फ़ोटानी हादरली, भारतीय वायू दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले.जैश ए मोहमद,लष्कर ए तोयबा व हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानातील तीन प्रमुख दहशतवादी गटाचे कंबरडे मोडले गेले.या कारवाईमुळे पाकिस्तानात हडकंप माजले आहे. भारतीय सैन्याकडून अधिक हल्ले होतील,अशा भितीमुळे सीमेवरील अनेक गावे ओस पडली आहेत.दरम्यान जगातील अनेक देशांनी पाकीस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये,तसेच भारतानेही या प्रश्नी संयम बाळगावा असे म्हंटले आहे.दरम्यान पाकिस्तानच्या लाहोर शहरात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी स्फोट झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बलुचिस्तान व पख्तुन ख्वा या दोन प्रांतात पाकिस्तान विरोधात वातावरण…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पाकिस्तान भितीच्या सावटाखाली ; चार प्रमुख शहरे स्फ़ोटानी हादरली, भारतीय वायू दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले.जैश ए मोहमद,लष्कर ए तोयबा व हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानातील तीन प्रमुख दहशतवादी गटाचे कंबरडे मोडले गेले.या कारवाईमुळे पाकिस्तानात हडकंप माजले आहे. भारतीय सैन्याकडून अधिक हल्ले होतील,अशा भितीमुळे सीमेवरील अनेक गावे ओस पडली आहेत.दरम्यान जगातील अनेक देशांनी पाकीस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये,तसेच भारतानेही या प्रश्नी संयम बाळगावा असे म्हंटले आहे.दरम्यान पाकिस्तानच्या लाहोर शहरात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी स्फोट झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बलुचिस्तान व पख्तुन ख्वा या दोन प्रांतात पाकिस्तान विरोधात…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन, तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा पंचायत समिती तलासरी सभागृह येथे आ.विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी आर. यु.ईभाड यांनी केले.या कार्यशाळेत खरीप हंगाम नियोजन व २०२५ या वर्षात घ्यावयाचे कार्यक्रम याविषयी त्यांनी सादरीकरण केले. तसेच कृषी विभागाकडून लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील संनियंत्रण अधिकारी म्हणून विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी पालघर हे उपस्थित होते.त्यांनी भात लागवडीची माहिती देताना खर्चाच्या बाबी कशा कमी करता येतील,याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया,उगवण क्षमता चाचणी यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच…
