- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, निवडणुकीच्या तोंडावर भाजप,बहुजन विकास आघाडीला घेरण्याच्या तयारीत… विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.उमेदवार निवडीची त्यांची प्रक्रिया अंतिम टप्यात पोहोचली असून येत्या दोन दिवसात त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी भाजप व शिंदे गट विविध हातखंडे वापरू लागले आहे.२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.त्यावेळी शिवसेना – ०५,भाजप – ०१,अपक्ष -०३ असे बलाबल निर्माण झाले होते.त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने दैदिप्यमान असा…
दीपक मोहिते, संपादकीय, दोघा भावांची युती झाली खरी,पण ती किती काळ टिकणार ? नॅशनल डेस्कसाठी, तब्बल सतरा वर्षाच्या प्रदीर्घ वनवासानंतर अखेर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे घोडं एकदाचे गंगेत न्हालं,प्रभू रामचंद्राला १४ वर्षे वनवास भोगावा लागला.पण,या दोघा बंधूंना त्याहीपेक्षा अधिक काळ वनवास भोगावा लागला.आता या दोघांमध्ये दिलजमाई झाल्यामुळे या युतीमधून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.पण या दोघा भावांचे स्वभाव लक्षात घेता,हे दोघे भाऊ जास्त काळ एकत्र राहतील,असे वाटत नाही.सध्या एकत्र आले असले तरी यांची ही दिलजमाई किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे. आम्हीच मराठी माणसाचे खरे राखणदार असल्याचा या दोघांचा दावा आहे.विकासाच्या प्रश्नी या दोघांमध्ये मतभिन्नता आहे,त्यामुळे…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, आमच्या नशिबी पक्षाच्या सतरंज्या उचलणेच का ? पक्षासाठी खस्ता खालेल्या भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश, भाजपमध्ये बाहेरून आलेल्या आयारामाच्या मांदियाळीमुळे पक्षाचे जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.गेल्या महिन्यापासून विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहोळ्याला चांगलाच वेग आला आहे.दिवसागणिक हे सोहळे पार पडत आहेत.त्यांचबरोबर तालुक्याच्या भाजपामध्ये सध्या सरळ दोन गट पडले असून हे दोन्ही गट अनुक्रमे मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय स्तरावर सक्रिय असलेले विनोद तावडे यांच्या गटात विभागले गेले आहेत.दुसरे राजकीय पक्ष फोडून पक्षप्रवेशाचे होणारे सोहळे हे जुन्याजाणत्या संघियांना मान्य नाही.तसेच पक्षप्रवेशाचा हा वेग पाहून प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते सध्या भयभीत झाले आहेत.या आयारामाना उमेदवारी देण्याचे तोंडी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” डहाणू निवडणूक ; अहंकार व एकाधिकारशाहीला मूठमाती देणारी, डहाणू नगरपरीषदेच्या निवडणुकीच्या निकालाने भाजपला यापुढे जिल्ह्याच्या राजकारणात अंतर्मुख होऊन विचार करावा लागणार आहे.या नगरपरिषदेच्या निवडणुकीत २७ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या भाजपला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र तोंडावर आपटावे लागले,ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरली आहे.अहंकार व एकाधिकारशाही यांना लोकशाही व्यवस्थेत स्थान नसते,हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत रजपूत यांचा राजकीय प्रवासही विलक्षण असाच आहे.” हम करे सो कायदा,” अशा पद्धतीचे त्यांचे वागणे,पक्षाला या निवडणुकीत भारी पडले.त्यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूमध्ये हजेरी लावली होती.पण त्यांचा काडीमात्र फायदा होऊ शकला नाही.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
दिपक मोहिते, बविआच्या ” बी,” टीमने निदान आता तरी बोध घ्यायला हवा, आजपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.या निवडणुकीसाठी हजारो इच्छुकांची गर्दी झाली आहे.एकूण ११५ जागांसाठी बहुजन विकास आघाडी व भाजप- शिवसेना ( शिंदे गट ) या दोन्ही पक्षांकडे सरासरी ६०० इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपले अर्ज सादर केले आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश लक्षात घेऊन इच्छुकांनी या भाजपकडे चांगलीच भाऊगर्दी केली आहे.त्यामुळे उमेदवारांची निवड करताना पक्षाच्या वरीष्ठ मंडळींना आता तारेवरची कसरत करावी तर लागणारच आहे,पण उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांची समजूत काढण्याच्या दिव्यातूनही त्यांना जावे लागणार आहे.भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कालच्या निकालाने विरोधी पक्षांवर भितीचे सावट, अपेक्षेप्रमाणे महायुतीने पालघर जिल्ह्यात चांगली मुसंडी मारल्याचे काल लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) हे स्वतंत्रपणे लढले असले तरी हे दोघेही सत्तेत एकत्रपणे पाहायला मिळतील.या दोघांनी जिल्ह्यात मिळवलेले यश हे विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.ही पहिली घंटा असून महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुसरी तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकी दरम्यान तिसरी घंटा वाजणार आहे.त्यामुळे विरोधकामध्ये सध्या चलबिचल झालेली पाहायला मिळत आहे. काल लागलेल्या निकालाने विरोधी पक्षांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप,हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तरी त्यांची कामगिरी सरसच…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची किमया ; कालचे शत्रू,आज जिवलग मित्र, राजकरणात कोणी,कधी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो,या वाक्याचा सध्या वसई तालुक्यात पावलोपावली अनुभव येत आहे.गेली दिन दशके हितेंद्र ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी एकेकाळी ज्या साऱ्या राजकीय पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते,त्या पक्षाचे नेते आज हितेंद्र ठाकूर यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.हा नियतीने उगवलेला एकप्रकारचा सूडच म्हणावा लागेल.ठाकुर यांचा ” दहशतवाद व टँकर लॉबी,” या दोन शब्दाचा आधार घेत कायम रान उठवणारे विरोधी पक्ष आज आपले अस्तित्व टिकून राहावे,यासाठी जिवाच्या आकांताने धडपडत आहेत.ही सारी किमया भाजपच्या झंझावातामुळे शक्य झाली आहे. भाजपच्या भितीमुळे राजकीय पक्षांना आपली ध्येये व…
दीपक मोहिते, असंघटित कामगार आणखी कीती वर्षे उपेक्षित जीवन जगणार ? जगभरातील अनेक देशात कामगार क्षेत्र,हे संघटित व असंघटित,अशा दोन भागात विभागले आहे.आपल्या देशात असंघटित कामगाराची संख्या ही संघटीत कामगारापेक्षा अनेक पटीने जास्त आहे.संघटित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अटी,शर्ती मान्य केल्या आहेत,कामाची हमी दिली जाते.मासिक वेतन,बोनस,भविष्य निर्वाह निधी,इ.कायदे लागू केले जातात,ते क्षेत्र संघटित क्षेत्र म्हणून ओळखले जाते.तर असंघटित क्षेत्र,हे ज्याची सरकार दरबारी नोंद नाही,रोजगाराची हमी मिळत नाही,सरकारी कायदे व नियम लागू होत नाहीत व कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात,ते क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र होय. अशा या असंघटित क्षेत्रात आजमितीस कोट्यवधी कामगार,आपले हलाखीचे जीवन जगताहेत. अशा या असंघटित क्षेत्रात,नाका कामगार,घरेलू कामगार,ऊसतोड…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मतदानाच्या अगोदरची रात्र ; ” नजर हटी,तो सबकुछ फटी,” येत्या २३ डिसें.पासून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यास सुरुवात होणार आहे.ही प्रक्रिया तब्बल आठ दिवस म्हणजे ३० डिसें.पर्यंत चालणार आहे.पुढच्या वर्षी म्हणजेच २ जाने.२०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेस लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.राजकीय पक्षाच्या हाती अद्याप पंधरा दिवस आहेत.या पंधरा दिवसात जागावाटप,उमेदवारी निश्चित करणे,उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचाराची दिशा ठरवणे व त्यानंतर निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा उभारणे,अशी कामे हातावेगळी करणे,अशा अनेक आव्हानांना राजकीय पक्षांना सामोरे जावे लागणार आहे.निवडणुकीच्या काळातील हे सारे सोपस्कार वर्षानुवर्षे अंगवळणी पडले असल्यामुळे राजकीय पक्षांना ही प्रक्रिया राबवताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. या सर्व प्रक्रियेत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आघाडी होण्याऐवजी बिघाडीचीच शक्यता अधिक, एकेकाळचे कट्टर शत्रू आता भाजपच्या भितीमुळे गळ्यात गळा घालून हिंडू लागले आहेत.मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या गळ्यात हे ” नको ते घोंगडे,” अडकवून घ्यायला तयार नाही.मागचा इतिहास लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते या नव्या महाविकास आघाडीपासून लांब राहण्याच्या मानसिकतेत आले आहे.शरद पवार गटाचे शहरी भागात अस्तित्व नगण्य असल्यामुळे त्यांना फारसे कोणी गृहीत धरत नाही. ९० च्या दशकात माजी आ.ठाकूर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केल्यानंतर ठाकूर यांनी जुन्या काँग्रेसजनांना हाताशी धरून वसई तालुक्यात आपली वेगळी चूल मांडली.ठाकूर यांनी त्यावेळी केलेल्या खेळीने काँग्रेस पक्षाचा अक्षरशः पालापाचोळा झाला.त्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आजही तालुक्यात स्वतःला सावरू…
