- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, राज्याच्या शहरी भागात दरडोई उत्पन्न वाढले, नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक पाहणीत आपल्या राज्याचे दरडोई उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रु.इतके झाले आहे.तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न हे १ लाख ८८ हजार ८९२ रु.आहे.मात्र ज्या शहराचे दरडोई उत्पन्न वाढले आहे,तेथे दरडोई खर्चात देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात एकूण ३६ जिल्हे असले तरी आर्थिक पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा गृहीत धरण्यात आला आहे. तर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्र दरडोई उत्पन्न दाखवण्यात आले आहे.अहवालातील आकडेवारीनुसार राज्यातील १२ जिल्हे हे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या…
वसंत भोईर, वाडा ग्रामपंचायत खानिवलीची महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड, ग्रामपंचायत खानिवलीच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक सामजिक उपक्रम राबवण्यात येत असुन महिलांच्या रोजगार,व्यावसायिक प्रशिक्षणे,आरोग्य तपासणी,शिक्षण या विषयांवर भर देण्यात येत आहे.रोजगार हमीच्या कामांवर महिलांना १०० % प्राधान्य देण्यात आले आहे.अनेक व्यवसायभिमुख प्रशिक्षणे महिलांना देण्यात आली आहेत.या सर्वांचा एकत्रित परिणाम की केंद्र शासनाच्या पंचायत विकास निर्देशांकमध्ये देशातील साडे सातशे ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत.या मध्ये ग्रामपंचायत खानिवली ची निवड झाली असुन पालघर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. महाराष्ट्रातील ३४ ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यामध्ये…
सुरेश काटे,तलासरी वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच, अपघाताचे प्रमाण वाढले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वर्षभरापासून काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी अजूनही उड्डाणपुल,सेवा रस्ते इ. कामे काम शिल्लक आहेत.महामार्गावरील अपघात कमी व्हावेत व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा,यासाठी सध्या काँक्रीटीकरण करण्यात येत असले तरी कामाचे नियोजन नसणे व हलगर्जीपणा इ. कारणामुळे गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चारोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये मेंढवन खिंड ते अच्छाड असा ५१ कि.मी.लांबीचा महामार्ग येतो. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागात १०५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत.या अपघातामध्ये ५७…
वसंत भोईर,वाडा वाडा – चिंचघर शाळेतील महिलांचा सन्मान, तालुक्यातील चिंचघर येथील ह. वी.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून कुडूस विभाग शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकांत भोईर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. यावेळी भोईर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाची ज्योत पेटवणाऱ्या तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा चालवत आहात.त्यामुळे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्या कार्याला सलाम असल्याचे सांगून सर्व महिलांबरोबर मनमोकळा संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका पूनम भोईर व चेतना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदेश पाटील यांनी आज तुमचा सन्मान होत असताना काळाची गरज लक्षात घेऊन जबाबदारी…
शुभम सावंत,विरार जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा पालिकेतर्फे सन्मान, महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन, महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि त्यांच्या जीवनात नवी पहाट उगवली.समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग असावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून ” जागतिक महिला दिन,” साजरा केला जातो. महिलांप्रती जिव्हाळा व आदर व्यक्त करुन त्यांचा सन्मान करुन समाजप्रबोधन घडवण्याच्या दृष्टीने सदर दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत…
सुशील भोईर,वसई हिरकणी कक्षाचे आज जागतिक महिला दिनी उदघाटन, वसई तहसीलदार कार्यालयात आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिरकणी कक्षाचे उदघाटन करण्यात आले. तहसीलदार,प्रांत,कोर्ट, पंचायत समिती कार्यालय असून महिला मोठ्या प्रमाणात शासकीय कामानिमित्ताने येत असतात.परंतु लहान मुलांना घेऊन आलेल्या स्ननदा मातांना बाळाला दुध पाजण्यासाठी आडोसा शोधावा लागतो.महिलांची ही अडचण लोकशाही महिला संघटनेच्या लक्षात आली.महिला संघटनेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वसई तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी यांच्याकडे या विषयी सतत पाठपुरावा करत होते.अनेक आंदोलन व मोर्चे सुध्दा या विषयावर काढण्यात आले.अखेर लोकशाही महिला संघटनेच्या लढ्याला यश मिळाले.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काही शासकीय कामानिमित्ताने आलेल्या गायत्री अनंता ठाकरे व त्यांचे बाळ शिवमई वय १३…
संजय लांडगे,वाडा वाडा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा, चैतन्य संस्था प्रेरीत सुयोदय ग्रामीण महिला संघ शिवणसई यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील अंबरभुई ( भोवरे पाडा ) येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनासंबंधी ग्रामीण महिलांना व बचत गटाच्या महिलांना जिल्हा देखरेख आधिकारी राजश्री तरसे यांनी मार्गदर्शन करुन आजच्या दिवसाचे महत्व सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच महिलांसाठी चैतन्य संस्था कशी कार्यरत आहे, याविषयी माहिती देवून संस्था महिलाना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अर्थसहाय्य करते यावर सविस्तर विवेचन केले.तसेच आपल्या मुलांना शिक्षण देवून मोठे करा,असे आवाहन केले.त्यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम होवून, बचत गट अध्यक्ष,सचिव, सदस्य यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुद्दा योग्य असला तरी ” औलादी,” या शब्दाचे समर्थन होऊ शकत नाही… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अद्याप पडसाद उमटत आहे.त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र जोरदार टीका झाली.मनसे नेते राज ठाकरे यांनीही तीव्र संताप व्यक्त करत भय्याजी जोशी यांना याविषयी खडे बोल सुनावले.त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ऍड.सदावर्ते गुणरत्ने यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.ते एवढ्यावरच थांबले नाहीत,तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. टीका करताना ते म्हणाले,राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, मला खरोखर त्यांची कीव येते.राज ठाकरे,मला सांगा तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या ?…
दिपक मोहिते, अबब… आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल : महाराष्ट्राची भयावह आर्थिक स्थिती आली समोर, ” भीक नको,पण कुत्र आवर, ” या म्हणीप्रमाणे सध्या राज्यातील जनतेची झाली आहे.महायुती सरकारमधील नेत्यांच्या मताच्या हव्यासापोटी राज्यासमोर आर्थिक संकट वाढत चालले आहे.महसुली उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्च वाढत असून कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होत आहे.त्यामुळे भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय सरकारपुढे अन्य पर्याय उपलब्ध नाही.आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल काल वित्तमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर मांडला. आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातून राज्याची बिकट परिस्थिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात हा अहवाल मांडला. गेल्या वर्षी राज्यात सुमारे २०० तालुक्यांमध्ये अतिरिक्त, ६८ तालुक्यांमध्ये सरासरी आणि…
जव्हार जव्हार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ग्रामीण आदिवासी युवा कलाकार कृष्णा सदाशिव भुसारे ( वारली चित्रकार ) यांनी जिल्हा परिषद शाळा मोकाशीपाडा व जिल्हा परिषद शाळा दादरकोपरा, केंद्र-हिरडपाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ( पेंटिंग किट ) वाटप केले. कार्यक्रमाचे ठळक मुद्दे: विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम – राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वारली चित्रकार कृष्णा भुसारे यांनी विद्यार्थ्यांना पेंटिंग किट वाटप करून चित्रकलेला चालना दिली. या उपक्रमासाठी दीपक चौधरी सरांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांना चित्रकलेबाबत प्रेरित करून त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या वतीने कृतज्ञता व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून शिक्षकांनी विद्यार्थी हितासाठी असे उपक्रम पुढेही राबवावेत अशी भावना…
