- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे माणुसकीची छत्री,आणि वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न, जव्हार तालुक्यातील रामनगर कातकरीपाडा या गावाच्या शाळेत यारी दोस्ती फाऊंडेशन पालघरतर्फे माणुसकीची छत्री, शैक्षणिक आणि एक सदस्य एक वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. यारी दोस्ती ग्रुप मधील सर्व मित्रांनी निधी जमा करून निस्वार्थ भावनेने गरजूंना मदत करण्याचे ठरवले.या निधीमधून माणुसकीची छत्री म्हणून या पावसाळ्यात पालघर जिल्ह्यातील गरजू व्यक्तीचा शोध घेवून त्यांना छत्री वाटप केले.शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या मुलांना ग्रुपतर्फे बक्षीसे देवून गौरवण्यात आले.त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षण म्हणून सर्व सदस्यांनी या पावसाळ्यात एक वृक्ष लागवड करून…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे लोकसंख्या दिन साजरा, जव्हार तालुक्यातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे काल जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एम.आर.मेश्राम आणि उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यक्रमात इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.शैलेश बगडाने यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा सखोल ऊहापोह केला.त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे प्रा.महेंद्र जाधव आणि प्रा.प्रताप देवरे यांनीही आपल्या भाषणातून लोकसंख्या नियंत्रणच्या…
दिपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार… राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्यात घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त माध्यमाच्या हाती आले आहे.राज्यातील ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या आहेत.गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूका घेण्यासंदर्भात आयोगाला निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.या निवडणुका सर्वसाधारणपणे ऑक्टो.ते डिसें.दरम्यात होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी आयोगाला ६ लाख ५० हजार ईव्हीएम मशिन्सची आवश्यकता आहे.पण त्या मशीन्स सध्या उपलब्ध नसल्यामुळे आयोग या निवडणुका तीन टप्यात घेण्याचा विचार करत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकीसाठी १…
दीपक मोहिते, “हल्लाबोल,” भाग क्र.२,( अंतिम ) जनसुरक्षा विधेयक २०२५ ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना गुंडाळले, काल कोणताही गोंधळ न होता,जनसुरक्षा विधेयक २०२५ बहुमताने संमत झाले.मार्क्स.कम्यु.पक्षाचे कॉ.विनोद निकोले या एकमेव आमदाराने या विधेयकाला सभागृहात विरोध केला.विरोधी पक्षाचे सर्व आमदारांनी या विधेयकाला मूक संमती दिली.त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे शब्दांचा धूर्त खेळ करत विरोधकांना आपल्यासमोर लोटांगण घालायला लावले. या विधेयकातील अनेक तरतुदी,या लोकशाहीला मारक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली सरकारला अमर्याद अधिकार मिळणार आहेत.”अर्बन नक्षलवाद,” वाढत असल्याची भिती दाखवत सरकारने हे विधेयक आणले आहे.”अर्बन नक्षलवाद रोखणे,” हा एकमेव उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत…
सचिन पाटील,विरार विवा महाविद्यालय येथे ” अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया,” चे भव्य उद्घाटन विवा महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.विवा महाविद्यालय ही फक्त एक शैक्षणिक संस्था नसून पालघर जिल्ह्यातील आजच्या घडीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे,विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे, उद्योजक निर्माण करणारे, विविध व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवणारे नामांकित महाविद्यालय आहे. विवा महाविद्यालय आणि द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार क्षितीज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच गुरू पौर्णिमादिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमांतर्गत “अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया” या अनोख्या आणि ऐतिहासिक संग्रहालयाचे भव्य उद्घाटन पार पडले. या आगळ्यावेगळ्या म्युझियमचे उद्घाटन आयसीए संस्थेचे पदाधिकारी केतन साईया ( चेअरमन,डबल्यू आईआरसी…
वसंत भोईर,वाडा नैसर्गिक नाल्यात संरक्षक भिंत बांधल्यानमुळे भातशेतीचे नुकसान वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर रिसायकलिंग कंपन्या चिंचघरपाडा,मुसारणे ( पाटील पाडा ) या दोन गावातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत.येथे पूर्वापार असलेल्या नैसर्गिक नाल्यात टायर कंपनी मालकाने संरक्षक भिंत बांधल्याने नाल्याचे संपूर्ण सांडपाणी भातशेतीत गेले असून पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेले असुन आता ही संपूर्ण भातशेती नापीक झाली आहे.त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात निवेदन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले होते.त्या अनुषंगाने आज कुडूसच्या मंडळ अधिकारी यांनी तलाठ्यांसमवेत जागेवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या टायर कंपनी मालकाने शेतकऱ्यांना दमदाटी करून मनमानी पद्धतीने नैसर्गिक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” इंडिया व महाविकास आघाडी लवकरच सरणावर जाणार… महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे.शिवसेनेचे ( उबाठा ) मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी याविषयी नुकतेच संकेत दिले आहेत.तसेच राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीमध्येही बिघाडी झाली आहे.आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या चुली वेगवेगळ्या मांडल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खा.सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन सुमारे २७ पक्षांची ” इंडिया आघाडी,” या नावाने मोट बांधली होती.या आघाडीचे निमंत्रक म्हणून खर्गे यांची नियुक्ती झाली.पण या पदासाठी ममता बॅनर्जी…
दीपक मोहिते, अंतस्थ हेतू निराळा आहे…. मीरा रोड येथे मराठी भाषेच्या अस्मितेवरून झालेले आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेतर्फे आता मोर्चाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या १८ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोड येथे येत आहेत.या त्यांच्या दौऱ्यात ते जाहीर सभा घेतील,अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेकडून मीरा-रोड येथे नुकताच मोर्चा काढण्यात आला होता.त्यानंतर आता राज ठाकरे मीरा रोड येथे येत आहेत. येत्या १८ जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे मीरारोड येथे दाखल होणार आहेत.मनसेच्या आंदोलनानंतर राज ठाकरे प्रथमच मीरा रोडच्या दौऱ्यावर जात असल्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे.कारण यावेळी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१ जनसुरक्षा विधेयक २०२५ ; लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न, राज्यातील गुन्हेगारी व दहशतवाद रोखण्यासाठी पुरेसे कायदे असताना राज्य सरकारने केंद्राच्या सांगण्यावरून काल जनसुरक्षा कायदा २०२५ विधानसभेत मंजूर केला.राज्यात यापूर्वी म्हणजे आणीबाणीच्या काळात मिसा,त्यानंतर टाडा,पोटा व मकोक्का हे कायदे अमलात आले. आणि आता युएपीए ( संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा ) आणला आहे. त्यापैकी पूर्वीचे मिसा,टाडा व पोटा हे कायदे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.ज्यांना हे कायदे लावण्यात आले,त्यापैकी ९० % टक्के लोकांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला.या सर्व लोकांविरुद्ध तपास यंत्रणा पुरावे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे अनेकांची सुटका झाली.पण त्या सर्वांना पाच ते सहा वर्षे जेलमध्ये…
दीपक मोहिते, राज्यात चांगला पाऊस, विदर्भ जिल्हा मात्र उपेक्षितच… राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे,त्यामुळे विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे.निसर्गाच्या या कृपेमुळे,ग्रामीण भागात सध्या शेतीच्या कामाना वेग आला आहे.यंदा ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी सहा जिल्हे अद्यापही कोरडे आहेत.विदर्भाच्या एकूण अकरा जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ६ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात पर्जन्यमान सतत उतरणीवर लागले आहे.त्यामुळे शेती करायची कशी ? अशा विवंचनेत शेतकरी सापडला होता.यंदाचे वर्ष मात्र त्यास अपवाद ठरले आहे.यावर्षी मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली,आजमितीस तो शेतीसाठी पुरेसा नसला तरी यंदा चांगले पीक शेतकऱ्यांच्या…
