- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- हुथी हे इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धात थेट सहभागी नाहीत, पण सतत दबाव टाकत असतात,
- आज पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता,
- यशस्वी जीवनाचे रहस्य,
- ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार, वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघर मधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार,
- मुंढवा जमीन घोटाळा ; पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी राजकीय शक्ती सक्रिय,
- काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढत आहे,
- गेल्या ४० दिवसापासून राज्यातला पाऊस गायब, भविष्यात अस्मानी संकट,
- सारासार विचार करण्याची गरज आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” चौथी मुंबई ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ” मुंगेरीलाल के हसीन सपने,” राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या सीएनबीसी – टीव्ही १८ च्या ग्लोबल लिडरशीप समिट,मध्ये मुलाखत देताना,येत्या तीन वर्षात वाढवण बंदराचा पहिला टप्पा पूर्ण होईल,अशी ग्वाही दिली.तसेच या विषयी अधिक माहिती देताना येथील समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला पण आता मंजुरी मिळाली आहे,असे स्पष्ट केले.या विकासकामामुळे नवी मुंबई येथे तिसरी मुंबई तर वाढवण परिसरात चौथी मुंबई आकाराला येणार आहे,असे त्यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे पालघरवासीय नक्कीच स्वागत करतील,पण आज या जिल्ह्याची भौगोलिक,आर्थिक व सामाजिक परिस्थिती कशी आहे ? लोकांचे राहणीमान,त्यांचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” निवडणूक रणसंग्राम,” तीन नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणुकानंतर पालघर जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटणार…. राज्यात पुढील महिन्यात नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.त्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.पहिल्या टप्यातील या निवडणुका पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्यात जिल्हा परिषद/पंचायत समिती,त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीनंतर पालघर जिल्ह्याचे राजकीय चित्र पार बदलण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका साधारणपणे फेब्रु.२०२६ मध्ये होतील,असा अंदाज आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या या निवडणुकीचा प्रचाराचा भर हा प्रामुख्याने विकासकामांवर असेल.तर शहरी भागात मात्र समाज रचना,कडवे हिंदुत्व व विकासकामे,हे तीन मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील.भाजप,या निवडणुकीत प्रभागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे,हे…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणूक रणसंग्राम, कोकणात राणे विरुद्ध राणे असा संघर्ष रंगणार,आणखी एक घराणं दुभंगण्याच्या वाटेवर, राजकारणापायी आजवर अनेक घराणी दुभंगली.सत्तेच्या अमृताची गोडी फार काळ टिकत नाही,कालांतराने या अमृताचे विष होते व हे विष हळूहळू कुटुंबात पसरत जाते.राज्यात गेल्या पंधरा वर्षात अनेक कुटुंबे दुभंगली.पवार विरुद्ध पवार,मुंडे विरुद्ध मुंडे,ठाकरे विरुद्ध ठाकरे,हर्षवर्धन जाधव विरुद्ध त्यांची पत्नी संजना जाधव याव्यतिरिक्त अनेक कुटुंबाचा या यादीत समावेश आहे.आता नव्याने राणे विरुद्ध राणे असा संघर्ष कोकणात सुरू झाला आहे. खा.नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश व नितेश,ही दोन्ही मुले गेली अनेक वर्षे कोकणच्या राजकारणात सक्रिय आहेत.पण या दोघांमधून विस्तव जात नाही.अखेर गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनी…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पुण्याचे राजकारण तापले,अजित पवार व मुरलीधर मोहोळ चांगलेच अडचणीत… शिवसेनेचे ( शिंदे गट ) अनेक मंत्री व आमदारांची लक्तरे वेशीला टांगण्यात भाजपला यश आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमधील अदृश्य शक्तीने,राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे.अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आजवर अनेक प्रकरणी अडचणीत आले असून आता पुणे कोरेगाव पार्क उच्चभ्रू नागरी वसाहतीमधील सुमारे १८०० कोटी रु.ची जमीन ३०० कोटी रु.विकत घेतल्याचे प्रकरण शिवसेनेचे ( शिंदे गट ) अंबादास दानवे यांनी उघडकीस आणले. याप्रकरणाशी आपला दुरान्वये संबंध नसल्याचा दावा अजित पवार जरी करत असले तरी…
दीपक मोहिते, वसईमधील विविध विकासकामांचा आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते शुभारंभ, वसईतील विविध रस्त्यांच्या विकासकामांचा भव्य शुभारंभ कार्यक्रम आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते काल पडला. वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सुविधासाठी आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. वसई आणि बोईसर विधानसभा मतदारसंघातील वसई भागातील रस्त्यांची दुरावस्था आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी वसई मतदारसंघाच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरील कामे तातडीने हाती घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्याची विनंती केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या होत्या. महानगरपालिका आयुक्तांनी सदर आदेशांचे त्वरीत पालन करून वसई…
दीपक मोहिते, दादरा नगरहवेली व दीव – दमण या केंद्रशासित प्रदेशात स्था.स्व.सं.च्या निवडणुकीत भाजपची सरशी,तर विरोधक भुईसपाट… पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या दादरा नगरहवेली व दीव – दमण या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे.एकतर्फी लागलेल्या या निकाला विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने १२२ पैकी तब्बल ९१ जागा ( सुमारे ७५% ) बिनविरोध जिंकल्या आहेत. काँग्रेसने या निवडणुकीवर आक्षेप घेतला असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून या निवडणुका “…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” निवडणूक रणसंग्राम, ” पालघर नगरपरिषद निवडणूक ; भाजप वेगळी चूल मांडणार.. पालघर नगरपरिषदेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.येथे शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप या महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नाते विळ्या – भोपळ्याचे असून पालघरच्या ग्रामीण भागातील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना कायम पाण्यात बघत असतात.गेल्या महिन्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी शिंदे गटाचे सुमारे हजारभर कार्यकर्ते फोडल्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अशा फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली व आम्हीही हा गलिच्छ प्रकार करू शकतो.त्यामुळे भाजपने महायुतीचा धर्म पाळावा,असा इशारा दिला आहे. भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाची साथसंगत…
दीपक मोहिते, ” निवडणूक संग्राम, ” पालघर जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा व एक नगरपंचायतीची निवडणूक होणार… काल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यकम जाहीर केला.यामध्ये पालघर जिल्ह्यातील पालघर,डहाणू व जव्हार या नगरपरिषदा तसेच वाडा या नगरपंचायतीचा समावेश आहे.नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी २ डिसें. रोजी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसें. रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.त्यामुळे निवडणूक क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीमध्ये गेल्या निवडणुकीत एकूण १७ जागा होत्या.नगराध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाच्या गीतांजली कोलेकर विराजमान झाल्या होत्या.एकूण १७ जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक,भाजपा-६ शिवसेना शिंदे गट २,काँग्रेस २,राष्ट्रवादी १,बहुजन विकास आघाडी १,आरपीआय १…
दीपक मोहिते, हातबट्ट्याचा व्यवहार, ….अन्यथा एसटी महामंडळाच्या लाखमोलाच्या जमिनी धनदांडग्याच्या घश्यात जातील.. व्यवसायिक जेंव्हा मंत्री होतो, तेंव्हा त्याचा व्यवसायिक दृष्टिकोन मात्र तसाच राहतो. आपण आता केवळ व्यवसायिक नसून लोकसेवक आहोत,याची त्यांना जाणीव नसते.राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.बिल्डर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहनमंत्री आल्या आल्या त्यांची वक्रदृष्टी एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जमिनीवर पडली व त्यांनी आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी या जमिनी विकण्याचा घाट घातला.परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले.पण त्यानंतरही या प्रताप सरनाईकांचे प्रताप मात्र सुरूच आहेत. त्यांनी पुन्हा आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जमिनीवर २५० ठिकाणी व्यवसायिक तत्त्वावर…
दीपक मोहिते, मत्स्यव्यवसायाच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठक, वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या काही महिन्यांपासून वसई तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी अनेक विकासकामाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव आर्थिक निधीही दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील रस्ते,उड्डाणपूल,रिंगरुट, एसटी सेवेत नव्या वाहनाचा समावेश,गृहनिर्माण संस्थांना ओसी,सीसी उपलब्ध करणे,स्वयंपुनर्विकास व मासेमारी व्यवसायाच्या समस्या,याचा त्यामध्ये समावेश आहे. काल त्यांनी मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील मासेमारी प्रश्नासंदर्भात भेट घेतली व प्रदीर्घ चर्चा केली.मासेमारी व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याबद्दल त्यांनी राणे यांचे आभार मानले,तसेच मत्स्यव्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या,जेटी,नवीन रो रो सेवा सुरू करणे, मच्छीमारांच्या पारंपारिक जमिनी,मच्छीमारांच्या विविध मागण्या व प्रलंबित समस्या विषयी चर्चा केली.सदर बैठकीस…
