Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर जोरदार हल्ला, मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ” महाराष्ट्र बंद ,” च्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद बोलावली होती.या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.यावेळी त्यानी मुख्यमंत्री शिंदे हे विकृत मानसिकतेचे असल्याचा आरोप केला. बदलापूर येथे शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले,या दुर्देवी घटनेमुळे लोकांमध्ये संताप असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.तर पोलीस व शाळेचे संस्थाचालक यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे.तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला.त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बदलापूरकरानी रस्त्यावर उतरून…

Read More

संजय निपाणे,जळगाव, ….तर महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबू शकते, पाणीटंचाई व दुष्काळ ही दोन्ही संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत.दरवर्षी ग्रामीण भागातील जनता या दोन्ही संकटाचा कायम मुकाबला करत आली आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिला व लहान मुले पाहिली की हृदय पिळवटून निघते. ग्रामीण भागात असे चित्र कायम पहावयास मिळते,ते आजवर बदलण्याचे प्रयत्न झाले खरे,परंतु या प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा नव्हता.त्यामुळे आजही ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.ग्रामीण भागातील पाणीटंचाई संपुष्टात यावी,यासाठी अनेक योजना आल्या.हजारो कोटी रु.खर्च झाले.परंतु परिस्थिती ” जैसे थे,” च राहिली,ती आपण बदलू शकलो नाही.आजही ग्रामीण भागात डोंगरमाथ्यावरुन दररोज कोसळणारे अब्जावधी द.ल.लि.पाणी वाया जात असते,ते पाणी अडवण्यासंदर्भात सरकारने पावले उचलली…

Read More

अनंत साटम, कोकणातील ३०० गांवे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल,यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिध्द केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका- ४४,खेड – ८५, लांजा-५०,राजापूर- ५१ व संगमेश्वर तालुक्यातील ८१ अशी एकूण पाच तालुक्यातील ३११ गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.या अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी जीवनावर परिणाम होणार आहे,अशा ग्रामस्थांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड,नवी दिल्ली यांच्याकडे आपला अभिप्राय नोंदवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर चे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पोलिसांनी निदान आता तरी वामन म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अखेर बदलापूरच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर पोलिसांनी अँट्रोसिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस टाळाटाळ करत होते.मात्र या प्रकरणी सदर महिला पत्रकाराने असभ्यपणे वागणाऱ्या वामन म्हात्रे याना धडा शिकवण्याचे ठरवल्यामुळे पोलीस पुन्हा अडचणीत आले होते. अखेर त्यानी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७९ व अनु.जाती व अनु.जमाती ( अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ ( १ ) ( ब ) ( २ ) व कलम ३ ( २ )…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्री शिंदे यांचे ताळतंत्र सुटले, बदलापूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बेताल व्यक्तव्य केले,त्यामुळे आता आगीत तेल ओतले गेले आहे.वास्तविक या संवेदनशील विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे होते.आपला एक सहकारी आंदोलकांवर बेफाम आरोप करत असताना त्यांनी आवर घालण्याऐवजी त्याची री ओढल्यामुळे आंदोलकामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.ते काय म्हणाले ते पहा,” या आंदोलनात स्थानिक नागरिक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते.अनेक आंदोलकांना बाहेरुन गाड्या भरून आणले होते,या सर्व घडामोडीमागे राजकीय प्रेरणा आहे,असा हास्यास्पद दावा केला. पीडित मुलीच्या पालकांना बदलापूर पोलीस बारा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं,त्या मुलीच्या गरोदर आईच्या अंगात १०२ ताप…

Read More

दीपक मोहिते, भयावह वास्तव, मराठी पत्रकारितेच्या घसरणीला आपणच जबाबदार, ” जेफप्लस,” यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्यंगचित्राने प्रसिद्धी माध्यमावर सध्या धुमाकूळ घातला आहे.एक गाढव कागदावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे,असे या व्यंगचित्रात दाखवण्या आले आहे.गाढवाच्या डोक्याऐवजी एक मानवी हात आहे,जो पेन धरून लिहीत आहे.हे व्यंगचित्र आजच्या मराठी पत्रकारितेची अवस्था कशी झाली आहे,यावर प्रकाश टाकते. आज मराठी पत्रकारितेत अर्धवट माहिती असलेल्या संपादक व पत्रकारांची संख्या सतत वाढत आहे.हे पत्रकार कोणत्याही विषयाची सखोल माहिती न घेता,अर्धवट तथ्य आणि वस्तुस्थितीवर आधारीत बातम्या देत नाहीत.त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. पत्रकारितेचे ओळखपत्र घातल्याने कोणी पत्रकार होत नाही.संपादक व पत्रकार होण्यासाठी उत्तम लेखन कौशल्य…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, २४ ऑगस्ट रोजी ” महाराष्ट्र बंद,” बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षाने आता महायुतीच्या सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.येत्या शनि.२४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने ” महाराष्ट्र बंद,” ची हाक दिली आहे.शाळेची संस्था भाजपशी संबधित असल्यामुळे पोलिसांनी दबावाखाली येऊन कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून महायुती सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचे माध्यमासमोर आज स्पष्ट केले. बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी संस्थाचालक व पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे बदलापूरकरांचे म्हणणे आहे.त्यामुळे काल लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले.या घटनेमुळे सरकार आता अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या काही…

Read More

सुधाकर नेवरेकर, हाल – बेहाल, मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, मराठवाडा महसूल विभागात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावात पावसाळा सुरू असतानाही तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.जालना जिल्ह्यात सुमारे ४० गावात ७७ टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून याभागातील नागरिकांना पाण्याअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग असून अनेक जिल्हे दरवर्षी पाणीटंचाईमध्ये होरपळत असतात.त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुक्याना टँकरचा आधार घ्यावा लागतो.जालना तालुक्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या ऑक्टो.पासून सुरू झालेले पाण्याचे टँकर ऑगस्ट २०२४ संपत आला तरी सुरूच आहेत.या तालुक्यात असलेले जुई धरण अद्याप कोरडेठाक पडल्यामुळे एकूण ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” रामदास कदम यांचे ” हात दाखवून अवलक्षण,” मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण या दोघामध्ये चांगलीच जुंपली आहे.रामदास कदम यांनी चव्हाण यांचा राजीनामा घ्या,अशी थेट मागणी केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला असून युतीमध्ये असताना अशाप्रकारची टीका जाहीरपणे करणे योग्य नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.तर रविंद्र चव्हाण यांनी तोंड सांभाळून बोला अन्यथा थोबाड फोडू,असा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या घटक पक्षात तू तू मै मै सुरू झाली आहे.अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणे,मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांमध्ये कलगीतुरा रंगणे,यामुळे महायुतीची वाटचाल काट्याकुट्यानी भरलेल्या…

Read More