Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” महानगरपालिका रणसंग्राम,” ” हिंदीची सक्ती,” महायुतीसाठी आत्महत्या ठरू शकते, केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर केला नसला तरी राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.” हिंदीची सक्ती,” हा एकमेव अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघा ठाकरे बंधूनी महायुतीला चांगलेच खिंडीत पकडले आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने लादलेली ” हिंदीची सक्ती,” महायुती सरकारच्या चांगलीच अंगलट आली आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारचा आत्मघाती निर्णय घेऊन भाजपने ” हात दाखवून अवलक्षण,” अशी स्वतःची अवस्था करून घेतली आहे.सरकारला सुचलेली ही अवदसा,आम्हा इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते,अशा प्रतिक्रिया महायुतीमधून व्यक्त होत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती…

Read More

सुरेश वैद्य,पालघर, जव्हार आणि मोखाडा अंगणवाडी सेविका बनल्या प्रशिक्षक, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील मॉडेल अंगणवाडी सेविकांनी ” पालवी,” प्रकल्पाच्या सहाव्या स्तराचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी स्विकारली आहे. ” पालवी,” हा उपक्रम क्वेस्ट संस्थेने रोटरी क्लबच्या आर्थिक साहाय्याने,महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या सहकार्याने २०२४ मध्ये सुरू झाला. २५ व २६ जून २०२५ रोजी मोखाडा येथील हिल व्ह्यू रिसॉर्ट येथे हे निवासी प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणात क्वेस्ट संस्थेचे कल्पेश पाटील आणि पालिका मोरे यांनी सेविकांना प्रत्यक्ष शैक्षणिक कृतींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.अक्षर ओळख, लेखनवाचन,गणिती संकल्पना,गट खेळ, अभिनयगीत यांसारख्या कृतींमधून बालकांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर…

Read More

वसंत भोईर,वाडा जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही, वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.मात्र या दोन्ही शाळांमध्ये अद्याप शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतबला केवळ बसून राहाण्याची पाळी आली आहे. पालघर जिल्हा परिषदेकडून २०१७ पासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत,या दोन वर्गांसाठी मानधन तत्वावर खाजगी शिक्षणाची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे मानधन जिल्हा परिषद सेस फंडातून दिले जाते.मात्र यंदा शाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले,तरीही सदर शिक्षकांची नेमणूक केली नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या…

Read More

वसंत भोईर,वाडा उचाट शिक्षण संस्थेचे शिक्षक कैलास पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा, तालुक्यातील उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी विद्यालय व ना.आ.शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक कैलास जगन्नाथ पाटील ( उच्च माध्यमिक ) यांचा सेवापूर्तीचा भावपूर्ण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कैलास पाटील यांनी २६ वर्षे समर्पित भावनेने सेवा बजावली.मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व असल्याने त्यांचे शिकवणे प्रभावी कसे होते,हे एका माजी विद्यार्थिनीने आपल्या ओघवत्या शैलीत सांगितले.विशेष म्हणजे पाटील हे अनेक वर्षांपासून रोज न चुकता एका टेकडीवर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात योगासने करीत असतात. म्हणून त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम योग दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थी व उपस्थितांसोबत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून योगधारने संबंधी उद्बोधक…

Read More

दीपक मोहिते, काय बोलावे ? 🤦‍♂️ ” पर्यावरण रुसले व पर्यावरणवादी चिखलात रुतला,” दोन दिवसांपूर्वी बोरिवली येथे एका विकासकांच्या घरी जाऊन वसुलीचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एका तथाकथित पर्यावरणवादी पदाधिकाऱ्यावर बोरिवली येथील कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर काँग्रेसच्या प्रदेक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पर्यावरण प्रेमीला तडकाफडकी पर्यावरण विभागाच्या अध्यक्षपदावरून निलंबित केले.दुसरीकडे याच पक्षाचे एक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरनॉल्ड जिगुल व तिघांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली जिल्हाभरात अक्षरशः धुडगूस घातला होता.मध्यंतरीच्या काळात हा पर्यावरणवादी समुद्रकिनारी सुरू असलेल्या…

Read More

वसंत भोईर,वाडा विजय गांगुर्डे सेवेतून बडतर्फ,२७ कोटींच्या वसूलीचे आदेश, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना धान्य खरेदीत केलेल्या कोट्यावधी रु.च्या गैरव्यवहार प्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यावर सुमारे २७ कोटी रु.ची वसुली लावण्यात आली आहे.असा आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिला आहे.त्यामुळे आदिवासी विकास महामंडळात प्रचंड खळबळ माजली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आधारभूत धान्यखरेदी करण्यात येते.गांगुर्डे हे जव्हार येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक असताना आधारभूत धान्य खरेदी हंगाम सन २०२२ – २३ अंतर्गत शहापूर येथील उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत पळशीण…

Read More

सुरेश वैद्य,पालघर प्रतिबंधात्मक कारवाई करावी – जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी नुकतेच दिले आहेत. जिल्हास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.यावेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी,सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. शशिकांत साळुंके तसेच सर्व तालुका आरोग्य् अधिकारी पोलिस विभागाचे प्रतिनीधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड म्हणाल्या की, समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांच्या अर्हतांची तपासणी पुर्ण करावी,अशी…

Read More

दीपक मोहिते, २०५० साली पाणीटंचाईची बातमी अशी असू शकते, यवतमाळ येथील विहीरीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.पाण्यासाठी परिसरात तणाव कायम आहे… प्रत्येक हापशी पंपावर सुरक्षेसाठी एक पोलीस तैनात करणार..गृहमंत्र्यांची घोषणा, रेशन दुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करणार..! अन्न व औषधी मंत्र्यांची घोषणा, गोदामावर छापा टाकुन पाच हजार लिटर पाणी केले जप्त….पोलीसांची धडक कार्यवाही, पाण्याअभावी दोघांचा मृत्यू ……समाजमन हळहळले,गावावर शोककळा पसरली, पाण्याचा हंडा हिसकवणारी बाईकर गँग पोलीसांच्या जाळ्यात, रूग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू……..आरोग्यमंत्री, प्रत्येक तालुक्यात आता पाणी बचत बँक…..अर्थमंत्री, मित्रांनो,हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आलं ते,कळलं सुद्धा नाही.अशी वेळ आपल्यावर येऊ नये,हीच परमेश्वराकडे प्रार्थना………… पाणी अडवा,पाणी जिरवा,झाडे लावा,झाडे जगवा,

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा, ५० वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात आणीबाणी लागू केली.प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कार करणारा,मानवी हक्क व अधिकार यास सर्वोच्च प्राधान्य देणारा देश म्हणून जगभरात ओळख असलेल्या भारतात या दिवशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली.सुमारे २१ महिने आपला देश अंधारात चाचपडत होता.राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण सांगून इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने देशव्यापी आणीबाणीची शिफारस केली.तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम ३५२ (१) नुसार देशभरात आणीबाणी जारी केली. पण लोकशाही व्यवस्थेवर दृढविश्वास असणाऱ्या भारतीय जनतेने या आणीबाणीला कडाडून विरोध केला.त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या सरकारने…

Read More

जव्हार प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांचे शिष्टमंडळ शासकीय कुटीर रुग्णालयाच्या भेटीवर, जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासी बहुल तालुके असून येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असलेले जव्हार हे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखण्यात येते. जव्हार येथे असलेले पतंगशहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो.इमारती,वैद्यकीय उपकरणे,बेड आणि आवश्यक साहित्य यामध्ये बरीच आधुनिक सुधारणा झाली आहे.मात्र,रुग्णालयात अद्याप तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, सर्जन नसणे,शस्त्रक्रिया न होणे,अतिदक्षता विभागाची अनुपलब्धता,तसेच डिजिटल एक्स-रे,एमआरआय यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. फिजिओथेरेपी उपकरणे असूनही त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही. या भागातील आदिवासी रुग्ण दूरवर असलेल्या डोंगरदऱ्यांतून हे रुग्णालय गाठत असतात.मात्र,गंभीर आजाराच्या रुग्णांना वापी, सेल्वासा,नाशिकसारख्या शहरांमध्ये हलवावे लागते. तालुक्याच्या…

Read More