Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” प्रकरण अंगलट आल्यामुळे आयुक्त मधुकर पांडे यांचा बळी.. एखादे प्रकरण अंगलट आले की सरकार सनदी अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवत असते.गेल्या ६५ वर्षात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने हेच केले.पण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक अधिकाऱ्यांना वारंवार बळीचा बकरा बनवण्यात एकप्रकारे विक्रमच केला आहे.आपल्या अपयशाचे खापर ते वारंवार सनदी अधिकाऱ्यांवर फोडत आले आहेत. मीरा रोड येथे मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली,त्यामुळे मीरा रोड परिसरात लोकांचा उद्रेक झाला.मोर्चा निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत करत समर्थन करत होते.मात्र दुपारी मराठी भाषिकांचा झालेला उद्रेक पाहून पोलिसांनी आंदोलकांना परवानगी दिली.त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांची…

Read More

दिपक मोहिते, “अनेकांची दयनीय अवस्था,” अनेक बिल्डर्सना रात्रीची झोप लागत नाही… ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) वसईत धाडी घातल्यामुळे विकासक,आर्किटेक्ट, दलाल,महानगरपालिकेचे अभियंते व अधिकारी यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.तर बिल्डर्स व आर्किटेक्ट मंडळींची रात्रीची झोप पार उडाली आहे.सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असलेल्या यादीत आपले नाव तर नाही ना ? याची खातरजमा करण्यासाठी ही सर्व मंडळी आपल्या ओळखीच्या माणसाकडे सतत चौकशी करत आहेत.तर प्रतिनियुक्तीवर आलेले मनपाचे अनेक अधिकारीही आता बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्रालयाच्या नगरविकास विभागापर्यंत पोहोचले असल्यामुळे त्या विभागातील अधिकाऱ्यांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. अनेक बिल्डर्स आपल्या संपर्कातील पत्रकारांना कॉल करून सतत विचारणा करत…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” काँग्रेसनेही महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली… स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने संकेत दिल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.काल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोकण प्रभारी यु.बी. व्यंकटेश यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या या बैठकीला कार्यकर्त्यांचा प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यानी या पूर्वीच पक्षबांधणीकडे लक्ष द्यायला हवे होते,ते न दिल्यामुळे वसई काँग्रेस गेली तीन दशके अंधारात चाचपडत राहिली.बबनशेठ नाईक,जॉन आल्मेडा व अन्य काँग्रेसजन हितेंद्र ठाकूर सोबत गेले.त्यामुळे काँग्रेस पक्षाची पार वाताहत झाली.अनेक वर्षे वसई तालुक्यात पक्षाला खंबीर असे नेतृत्व मिळाले नव्हते.दरम्यानच्या काळात मायकल फुर्ट्याडो,अशोक पेंढारी…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात गुन्हेगारीचा वेलू गगनावर… राज्यात गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असून आता लोकप्रतिनिधी देखील गुंडासारखे वागू लागले आहेत.” आमचं कोणी वाकडं करू शकत नाहीत,” असा एकप्रकारचा माज त्यांना व त्यांच्या मुलांना आला आहे.काल आ.संजय गायकवाड यांनी कँटीन कामगारांना जबर मारहाण केली.तर आ.सुरेश धस यांच्या मुलाने एका तरुणाला आपल्या गाडीखाली चिरडले.काही दिवसापूर्वी महसूलमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या मुलानेही आपल्या कारने एकाला उडवले होते.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे आपले राज्य उद्योग क्षेत्रात नव्हे तर गुंडगिरीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे. वारंवार होणाऱ्या अशाप्रकारच्या घटना ” आमचं कोण वाकडे करू शकतो,” अशा अहंकारातून घडत असतात.या अशा घटनांमध्ये आरोपींना जामिन देखील अवघ्या आठ ते…

Read More

जव्हार प्रतिनिधी, मेलबिगारी कामगारांची पदे रद्द केल्यानमुळे रस्त्यांची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ग्रामस्तरावरील यंत्रणेत कार्यरत असलेली ” मेल,” बिगारी कामगारांची पदे रद्द करण्यात आल्यापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.त्याचे थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर,पर्यावरणाच्या समतोल व वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याचे दिसून आले आहे. ” मेल,” बिगारीमुळे आजवर अनेकांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी मेलबिगारी कामगार हे रस्त्यावर पडलेले लहानमोठे खड्डे तात्काळ माती टाकून बुजवत असत,त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांची जाणीव होत नसे.मात्र सध्या रस्त्यावर पडलेले खड्डे,महिने उलटूनही जैसे स्थितीत आहेत.परिणामी अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.यापलीकडे मेलबिगारी फक्त खड्डे बुजवणेच,नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाणी देऊन जगवणे,कोवळ्या रोपांची निगा राखणे,इ.कामे…

Read More

नदीम शेख,पालघर खावडा ट्रान्समिशन प्रकल्पासाठी टीएलआर सर्व्हे वेगाने सुरू, मुसळधार पावसात पालघर जिल्ह्यातील वाडा,विक्रमगड, आणि जव्हार तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात टीएलआर ( तालुका भूमी अभिलेख निरीक्षक ) सर्व्हे वेगात सुरू आहे.खवडा प्रकल्पासाठी जमीनभरपाई दरांची अंतिम ठरवण होण्याआधीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्रकल्प रेसोनिया लिमिटेड ( पूर्वी स्टरलाइट पावर ट्रांसमिशन लिमिटेडचा पायाभूत सुविधा विभाग ) कंपनीकडून उभारण्यात येत आहे.या अंतर्गत ग्रीन एनर्जी ट्रान्समिशनसाठी जमिनीच्या हक्कसंपादनाचा आणि वीज वाहिन्या टाकण्याचा मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे.गुजरातमधील कच्छ प्रदेशातून,जेथे भारतातील सर्वात मोठे सौर आणि हरित ऊर्जा प्रकल्प आहे,वीज वाहतूक करण्यासाठी ही पायाभूत यंत्रणा उभी राहणार आहे.महाराष्ट्रात विजेच्या मागणीपेक्षा पुरवठा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, जव्हार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा न्याहाळे खुर्द येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका सुलभा मोहिनीराज जोशी,त्यांच्या कन्या मृदुला गोखले,आणि पुत्र आशिष जोशी यांनी पुढाकार घेतला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.तसेच,शाळा प्रवेश उत्सव आणि कैलासवासी मोहिनीराज जोशी ( माजी मुख्याध्यापक, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी लेझीम संचाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात तुलसी स्टील, सहकार नगर,पुणे यांच्याकडून पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चटईचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे, पद्माकर भिसे…

Read More

दीपक मोहिते, शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड मारहाण प्रकरणी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात… शिवसेनेचे ( शिंदे गट ) वादग्रस्त आ.संजय गायकवाड हे मंत्रालयाशेजारी असलेल्या कँटिंनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.आज घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून,गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.आ.गायकवाड यांच्यावर यापूर्वी देखील मारहाण केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. संजय गायकवाड यांनी कँन्टीनमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यांचा आरोप आहे की,कँन्टीनमधून देण्यात आलेली डाळ,ही शिळी आणि वास येणारी होती.याबाबत कँन्टीन व्यवस्थापकाशी त्यांचा वाद झाला.हा वाद इतका विकोपाला गेला की, गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,गायकवाड यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरत कठोर शब्दांत सुनावले.…

Read More

सुरेश वैद्य,पालघर पर्यायी रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन, नवली रेल्वे फाटक बंद केल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून पर्यायी मार्गाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नवली व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांची भेट घेऊन त्यांना नागरिकांच्या होणार्‍या गैरसोयीची सविस्तर माहिती दिली. नवली रेल्वे फाटक परिसरात अनेक शाळा,तहसील कार्यालय,तलाठी कार्यालय, शासकीय आरोग्य केंद्र असुन येथे येणाऱ्या नागरिकांची सतत वर्दळ सुरु असते.पूर्व भागातील नवली,वेवूर, डॉ.आंबेडकरनगर, भीमाईनगर,कमारे,वरखुंटी, भोगोलेपाडा अशा अनेक गावपाड्यातील शेकडो ग्रामस्थ,असंख्य विद्यार्थी, नोकरदार यांना दैनंदिन कामासाठी पूर्व-पश्चिम रहदारीचा एकमेव जवळचा मार्ग म्हणजे नवली रेल्वेफाटक असल्याचे या शिष्टमंडळांने यावेळी निदर्शनास आणून दिले.सदर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अर्थविभागाच्या दिशाहीन व आत्मकेंद्रित कारभारामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… सध्या अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ” वर्षा,” येथे ही बैठक झाली.या बैठकीसाठी भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.या बैठकीमध्ये मंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे,असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकांबाबत राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.गेल्या आठवड्यात राज व उद्धव या ठाकरे बंधुचा विजयी मेळावा झाला.या मेळाव्यानंतर…

Read More