- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणुकीचे बिगुल वाजले, लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय एकट्याने लाटण्याचा शिंदे यांचा प्रयत्न ; भाजपमध्ये तीव्र नाराजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुका तीन टप्यात होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाला लागले आहेत.काल त्यांनी पालघर येथे पक्षाचे वरिष्ठ नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली,तसेच मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षाच्या काळात आपण कसं काम केलं यावर त्यांनी आपला फोकस ठेवला.त्यांच्या भाषणाचा ८० टक्के वेळ,हा आपण मुख्यमंत्री म्हणून किती…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नेहरुंचा आधार घेऊन आणखी किती दिवस काढणार ? शहा व मोदीना जळी स्थळी नेहरूच दिसतात…. पहलगामचे हत्याकांड व त्यानंतर झालेले भारत – पाक युद्ध,त्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर व त्यानंतर अचानक झालेला युद्धविराम,यावर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मोदी यांच्या सरकारने १६ तास राखून ठेवले होते.पण या चर्चेदरम्यान विरोधकांनी मोदी सरकारची लक्तरे वेशीला टांगली गेली.विरोधकांनी चढवलेल्या हल्ल्याला मोदी,राजनाथसिंग व अमित शहा हे तिघे तोंड देऊ शकले नाहीत. युद्धात ज्या काही घडामोडी घडल्या,त्यावर चर्चा करण्याऐवजी हे तिघेही नेहरू,सरदार पटेल,इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत त्यांनी काय केले ? यावर भर देत राहिले.नेहरूंची जेवढी आठवण काँग्रेसजन करत नाही,त्याहीपेक्षा तिप्पट पटीने हे…
दीपक मोहिते, ” विध्वंस,” भाग क्र.१, वसईकर आजही मरण यातना भोगतच आहेत… एकेकाळी निसर्गरम्य अशा कृषीप्रधान तसेच वैभवशाली वसईचे काँक्रीटच्या जंगलात रूपांतर करण्याचे पाप कोणी कोणी केले ? हे नव्या पिढीला कळायला हवे,म्हणून हा लेखप्रपंच… नरवीर चिमाजी आप्पाच्या पदस्पर्शाने पावन झालेली वसईनगरीची ओळख ऐतिहासिक नगरी अशी होती.१९६० पर्यंत या वैभवशाली वसईत सर्वकाही आलबेल होते.स्थानिक भूमिपुत्र शेतीवाडी व बागायती उत्पन्नावर आपला चरितार्थ चालवायचे.पहाटे पहिली लोकल पकडून शेतकरी आपला शेतमाल घेऊन दादर गाठत असत.मोगरा,कागडा, पालेभाज्या व अन्य भाज्यांना दादरच्या बाजारात चांगला भाव मिळत असे.” वसईची भाजी,” या नावाने त्याची विक्री होत असे.यातून मिळणाऱ्या पैश्यात वसईकर आनंदी जीवन जगत होते.या वैभवशाली वसईची १९६०…
वसंत भोईर,वाडा वाडा- भिवंडी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला ब्रेक, वाडा- भिवंडी महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शासनाने या मार्गासाठी आठशे कोटीचा निधी मंजूर करून या कामाचा ठेका ईगल कंपनीला दिला आहे.परंतु,झालेल्या कामाचे बिल शासनाकडून अदा करण्यात न आल्याने या कंपनीने काम बंद केले आहे. गेल्या सहा दिवसापासून हे काम बंद झाले असुन या रस्त्यावर सध्या खड्ड्याचे सम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी त्याची अवस्था बिकट झाली आहे.मडक्याचा पाडा येथील एका तरुणाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला.हा संपूर्ण महामार्गच खड्डेमय झाला असून वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाने आक्रमक पवित्रा घेत…
सुरेश काटे,तलासरी माकपाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश, तलासरी तालुका भाजपचे माजी अध्यक्ष तसेच डहाणु विधानसभा संयोजक विनोद मेढा यांच्या नेतृत्वाखाली तलासरी तालुक्यातील उपलाट पडवळपाडा येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल भाजपात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी तलासरी, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी येथे हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.माकपाचे विलास वाघात,सुरेश वाघात यांच्यासह जवळपास २५ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्र निकुंभ, जेष्ठ नेते बबला धोडी,वडवली सवणे गावाचे उपसरपंच सुनिल टोकरे,नगरसेवक गटनेता राजेश हाडळ,झरी गावाचे उपसरपंच अरविंद भावर,महेंद्र गोवारी,संतोष रांधे,वासू घुटे,शैलेश पाह, सुरेश पडवले,गणपत झाटीया यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” मुंबईसह पालघर/ठाण्यातील वाहतूककोंडी ; सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा… हल्ली मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर होणाऱ्या सततच्या वाहतूककोंडीमुळे मुंबई,ठाणे व पालघर या तीन जिल्ह्यातील व्यापार उदिमावर परिणाम जाणवू लागला आहे.गेले वर्षभर या महामार्गाचे कॉक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम सूरू आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.त्यामुळे मुंबई, पालघर,ठाणे व गुजरात राज्यातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.मात्र लोकांच्या शेकडो तक्रारीनंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. या चारही महानगराची लोकसंख्या आजमितीस चार कोटीच्या घरात पोहोचली आहे.लोकसंख्या वाढली तसेच वाहनाच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होत गेली.पण रस्त्यामध्ये वाढ झाली नाही. मेट्रो,सागरी…
दीपक मोहिते, ” जिल्हा वर्धापनदिन विशेष,” जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ आजही उपेक्षित जीवन जगताहेत, काल पालघर जिल्ह्याचा ११ वा वर्धापन दिन होता,पण जिल्ह्यात कुठेही उत्साह व आनंदाचे वातावरण नव्हते.कारण गेल्या ११ वर्षाच्या प्रदीर्घ काळात जिल्ह्यात विकासाची गंगा अवतरली नाही.नव्याने जिल्हानिर्मिती होऊनही लोकांच्या जीवनमानात तसूभरही फरक पडला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून ज्या समस्या प्रलंबित होत्या,त्या आजही ” जैसे थे,” स्थितीत आहेत.रोजगार,कुपोषण, रोजगारासाठी स्थलांतरण,चालायला धड रस्ते नाहीत,आरोग्य सेवा व शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा, जिल्हावासीयांच्या पाचवीला पूजलेलाच आहे.अशा परिस्थितीत नागरिक जिल्ह्याचा वर्धापन दिन तरी कसा साजरा करणार ? या जिल्ह्याला आदिवासी दर्जा मिळाल्यामुळे दरवर्षी प्रचंड प्रमाणात आर्थिक निधी मिळत असतो.पण तो लोककल्याण व जिल्हाविकास…
वसंत भोईर, जिल्हा वर्धापनदिन विशेष, कृषिप्रधान पालघर जिल्ह्याची ओळख हरवतेय… ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्याला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत.नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याची सागरी,डोंगरी,आणि नागरी अशी विभागणी झाली असली तरी कृषी क्षेत्रात विविध उत्पादने घेणारा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो.परंतु जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यातील कृषीक्षेत्राकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कृषिप्रधान जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसली जातेय की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर भातशेती केली जाते.बहुसंख्य भागात शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहे.यात प्रामुख्याने वाडा तालुक्यासह डहाणू,पालघर, वसईच्या ग्रामीण भागात घेण्यात येणाऱ्या ‘वाडा कोलम’, ‘झिनी’ ह्या भाताला देशभरात लौकिक मिळाला आहे.बाजारपेठेत वाडा कोलम…
सुरेश वैद्य, पालघर महसूल विभाग अत्यंत महत्वाचा विभाग – पालकमंत्री गणेश नाईक, महसूल विभागाचे कार्य हे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असून,शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारा महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटले आहे. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह-२०२५ चे आयोजन करण्यात आले असून महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. यावेळी आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित,आ.राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी महेश सागर,तेजस चव्हाण,विजया जाधव,मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील,तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित…
दीपक मोहिते, ” देवाभाऊंचा रडीचा डाव,” माणिकरत्न आता क्रीडामंत्री झाले ; आता दिवसरात्र ” रमी,” खेळ म्हणावं…. देवाभाऊंनी माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नावाच्या माणिकरत्नाला ” पब्लिक क्राय,” डावलून आता क्रीडामंत्री केले आहे.क्रीडा खाते मिळाल्यानंतर हे माणिकरत्न आता आपला रमीचा खेळ मोठ्या जोमाने खेळून दाखवणार आहेत.” वारे वा देवाभाऊ,तुम्ही अगदी आवेशात हे सारे ” करून दाखवले,” असाच निकष आता संजय शिरसाठ,संजय गायकवाड,भरत गोगावले,संजय राठोड या चौघांनाही लावण्यात यावा,अशी आमची इच्छा आहे.आज हे मंत्री कम गुन्हेगार,तुमच्यामुळे मोकाट सुटले आहेत.जे माणिकरत्न तुमच्या सरकारला भिकारी म्हणते,त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता,एवढा लाचार मुख्यमंत्री उभ्या महाराष्ट्राने गेल्या ६५ वर्षात कधीही पाहिला नव्हता.आता या माणिकरत्नाला म्हणावं, तुला…
