Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या दहा मिनिटात हाऊसफुल्ल, दलाल व रेल्वे कर्मचाऱ्याची मिलीभगत, सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेवर दलालांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.कोकण रेल्वेचे बुकिंग सुरु होताच अवघ्या दहा मिनिटात कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागणार आहे.खाजगी बस ऑपरेटर देखील आता लुटीच्या तयारीत आहेत. यंदा मध्य रेल्वेने मुंबई-कोकण दरम्यान गणेशोत्सवासाठी २०२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्याच्या आरक्षणास कालपासून सुरुवात करण्यात आली.सकाळी आठच्या सुमारास बुकिंगला सुरुवात होताच अवघ्या दहा मिनिटात आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.दलालांनी या बुकिंगवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला…

Read More

दीपक मोहिते, जिल्हाधिकारी बोडके यांनी केली महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी, काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निषेधार्थ ढोल बजाव आंदोलन केले होते. या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष जनतेला होणाऱ्या त्रासाकडे वेधले जाईल व त्याचीत ते दाखल घेतील,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण निद्रावस्थेत असलेल्या प्राधिकरणाचे अधिकारी या आंदोलनाने जागे झाले नाहीत.त्यामुळे विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची नुकतीच भेट घेऊन या विषयी कैफियत मांडली होती.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते विजय पाटील यांच्या सोबत महामार्गाची झालेली दुरवस्था व खड्ड्याची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत वसई तहसीलदार अविनाश कोष्टी,मंडळ अधिकारी, तलाठी,राष्ट्रीय महामार्ग…

Read More

दीपक मोहिते, अमित शहा यांची विखारी टीका ; महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता, दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली.त्याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले.खुद्द अजित पवार गटाच्या अनेक आजी-माजी आमदारांनी त्यांच्या टिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तर दस्तुरखुद्द अजित पवार यांनी याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ” नो कॉमेंट्स,” असे सांगत वेळ मारून नेली.शहा यांच्या या अशा टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसेल,अशी भिती आमदार खाजगीत व्यक्त करत आहे. एकीकडे भाजप शरद पवार यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांनी…

Read More

पालघर, वसई पूर्व मुख्य रास्ता पाण्याखाली,रस्तावर खर्च झालेले लाखो रु.पाण्यात, वसई पूर्वेस मुंबई-अहमदाबद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दिवसभर अत्यंत धिम्यागतीने सुरू होती. वसई ते सातीवली फाटा दरम्यान दरवर्षी गुढघाभर पाणी भरते.त्यामुळे सातीवली फाटा,गोखीवरे,सातीवली गाव,वालीव,गवराईपाडा, भोयदापाडा हजारो नागरिकांना किमान चार ते पाच दिवस हालअपेष्टा सहन करावे लागते.या रस्त्याची उंची कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता.याविषयी नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर महानगरपालिकेने रस्त्याची पुनर्बांधणी व रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला व एप्रिल व मे या दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण केले.त्यासाठी लाखो रु.चा निधी खर्ची पडला.पण हा खर्च पहिल्याच पावसात वाहून गेला आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेची…

Read More

पालघर, रहिवाशांना महसूल विभागाकडून नोटीसा, महसूल विभागाने जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या रहिवाश्यांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रामध्ये प्रचंड नाराजी आहे. डहाणूच्या तहसीलदारांनीही चिंचणी येथे वर्षानुवर्षे राहत असलेल्या मच्छीमार लोकांना अतिक्रमण केल्याचे नमूद करत ते राहत असलेली घर खाली करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.सदर नोटीसा घेऊन चिंचणी येथील मच्छीमारांचे नेत्यांनी आ.श्रीनिवाजी वनगा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली. आले.या चर्चेदरम्यान आ.वनगा यांनी यावेळी वर्षानुवर्षे राहत असलेल्या रहिवाशांना नियमाकुल करून घ्यावे,अशी विनंती तहसीलदाराना केली.त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यामुळे मच्छीमाराना काही अंशी दिलासा मिळाला आहे.भेटीस गेलेल्या शिष्टमंडळात पालघर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी व पालघर विधानसभेचे आ.श्रीनिवास वनगा पालघर तालुका…

Read More

पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…

Read More

पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…

Read More

मुले होणार संगणक सुशिक्षित- आ. राजेश पाटील, पालघर, सर्वदा प्रतिष्ठान आणि नवनीत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवाडी आश्रम शाळेमधील १२ वी च्या विद्यार्थांसाठी मोफत एमएस-सीआयटी हा कोर्स मुलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवनीत फाउंडेशन हे आपल्या बेलवाडी आश्रमशाळेमध्ये १० उपलब्ध करणार असून सर्वदा प्रतिष्ठान अणि नवनीत फाऊंडेशन हे या केंद्राची संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे.मी देखील याच आश्रमशाळेचा विद्यार्थी होतो,आज मी आमदार झालो आहे, शिक्षणासाठी ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत,त्या सर्व मी उपलब्ध करुन देईन,असे आ.राजेश पाटील यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात सांगितले.या कार्यक्रमासाठी सर्वदा प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित पटेल,नवनीत फाऊंडेशनचे वैभव चौहान, प्रणिता जाधव,वसई पंचायत समितीच्या…

Read More

सूर्या कालव्यांच्या होणार कायापालट, पाण्याची नासाडी थांबणार, डहाणू पूर्व, सूर्या कालव्यामधून ग्रामीण भागातील शेकडो गावांना उन्हाळ्यात रब्बी हंगामात पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र या कालव्यांची होणारी गळती लक्षात घेऊन सूर्या कालव्यांची नवीन आधुनिक पद्धतीने अस्तरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सूर्या प्रकल्पाचे कालवे दुरुस्ती अंतर्गत सूर्या उजवा मुख्य कालव्यावर ७ किमी अंतरावर थेरोंडापासून सोनाळे दरम्यान ही कामे करण्यात येणार आहेत. कोकणातील पाच जिल्हातील इतर कालव्यापैकी पहिल्यांदा पालघर जिल्ह्यात या मुख्य कालव्यावर डहाणू तालुक्यातील वाघाडी जवळ पेव्हर कॉक्रीटीकरण नवीन पद्धतीने काम करण्यात आले आहे. या ,७ कि.मी.लांबीच्या कामासाठी १९ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षात सूर्या कालव्यांची…

Read More

पालघर, औषध कंपनीला भिषण आग,कोणतीही जीवितहानी नाही, तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सफायर लाईफ सायन्सेस औषध उत्पादन घेणाऱ्या कंपनीला आग लागली आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.मात्र या कंपनीच्या आजूबाजूला बांधकामे झाली असल्यामुळे आग विझवताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही,मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे समजते,ही आग कशामुळे लागली,हे देखील अद्याप समजू शकले नाही.

Read More