Author: दीपक मोहिते

सुरेश काटे,तलासरी तलासरी पोलिसांनी गांजा पकडला, दोघांना अटक, तलासरी पोलिसांना तलासरी इभाडपाडा तास्कंद हॉटेल जवळ गांजा विक्रीसाठी दोन इसम येणार आहेत,अशी खबर मिळाली होती. पोलिसांनी इभाडपाडा येथे रविवारी सकाळपासून सापळा रचला होता.दोन इसम मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळ सव्वा दोन किलो गांजा सापडला. याप्रकरणी संतोष दुर्योधन स्वाईन,राहणार तलासरी तसेच बापटीस नवसु धोडी राहणार खेरडी,नगर हवेली या दोघांना अटक केली त्यांच्याकडून ४७ हजार रु. किमतीचा गांजा तसेच २९ हजार रु रोख रक्कम,दोन मोटार सायकली,दोन मोबाईल फोन,असा एकूण रुपये ३ लाख ९४ हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे,…

Read More

वसंत भोईर,वाडा बामण शेत गावात सोयी -सुविधांचा पत्ताच नाही, तालुक्यातील अनेक गाव पाड्यात स्वातंत्र्यानंतरही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.नांदणी अंबरभुई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बामण शेत गावातील आदिवासी बांधवांना गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे त्यांना चिखल तुडवत पायवाटेने जावे लागते. पाण्याची समस्या,वीज आहे, परंतु असून नसल्यासारखी. त्यामुळे आम्ही आदिवासींच्या पोटी जन्म घेतला आणि तोही दुर्गम भागात घेतला हा आमचा गुन्हा झाला काय ? असा संतप्त सवाल या गावातील आदिवासींकडून सरकारला विचारण्यात येत आहे. बामण शेत हे गाव घनदाट जंगलात डोंगर माथ्यावर आहे. साधारणपणे ३५ ते ४० घरांची लोकवस्ती असून या गावची लोकसंख्या २०० च्या आसपास आहे. निवडणूकीच्या काळात लोकप्रतिनिधी…

Read More

दीपक मोहिते, नवनिर्वाचित आमदारांचे प्रगती पुस्तक, वसईच्या आ.स्नेहा दुबे – पंडित अव्वल क्रमांकावर… नवनिर्वाचित आमदारांच्या कारकिर्दीला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत.या सहा महिन्यांच्या काळात आमदारांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने किती प्रयत्न केले,याविषयीचा लेखा – जोगा,त्यांना मतदान केलेल्या मतदारांसमोर मांडायला हवा.त्यासाठी हा लेखप्रपंच होय.आपला वसई तालुका वसई, नालासोपारा व बोईसर अशा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे.या तीनही मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे सारे प्रश्न एकमेकांपासून भिन्न स्वरूपाचे आहेत.मात्र हे सारे प्रश्न येथील मतदारांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत.त्यामुळे आ.स्नेहा दुबे-पंडित,आ.राजन नाईक व आ.विलास तरे,या तिघांच्या एकूण कामकाजाचा आढावा घेणे,क्रमप्राप्त होते.तो आढावा आम्ही नुकताच घेतला.या सर्व्हेक्षणानंतर जे प्रगतीपत्रक…

Read More

दीपक मोहिते, आरोग्य,शिक्षण,मुलभूत व पायाभूत सुविधाची कामे प्राधान्याने पूर्ण करा – पालकमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीस खा.सुरेश म्हात्रे,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.राजेंद्र गावीत,आ.दौलत दरोडा,आ.शांताराम मोरे,आ.विलास तरे आ.विनोद निकोले,आ. हरिश्चंद्र भोये आ.स्नेहा दुबे पंडित,राजन नाईक,तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधिक्षक यतिश देशमुख,डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री,जव्हार प्रकल्प अधिकारी,अपूर्वा बासुर,जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ५ फेब्रु.रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” लोकप्रतिनिधी म्हणून गांभीर्याने विचार करा… गेल्या रवि. वसई येथे आ. स्नेहा दुबे-पंडीत यांच्या प्रयत्नातून स्वयं पुनर्विकास योजने संदर्भात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला वसईकर नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.पुनर्विकास म्हणजे नक्की काय व या योजनेचा सर्वासामान्य लोकांना कसा फायदा होतो,या दोन महत्वाच्या विषयावर नागरिकांना अवगत करण्यात आले.त्यामुळे भविष्यात या योजनेचे फायदे सर्वसामान्यजनांना होऊ शकतो.कारण वसई विरार भागातील जमिनीचा विकास पूर्ण होत आला आहे.त्यामुळे बिल्डर लॉबीची नजर जुन्या इमारतीवर पडू लागली आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक बिल्डर्सनी अनेक गृहनिर्माण संस्थांची घोर फसवणूक केली आहे.ती तशीच सुरु राहता कामा नये, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आ. स्नेहा दुबे-…

Read More

दीपक मोहिते, वसई तालुक्याच्या स्वयं पुनर्विकासाला सुरुवात, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, स्वयंपुनर्विकास हे जनआंदोलन म्हणून पुढे आले आहे.ठाणे,पनवेल,घणसोली येथे या योजनेची शिबीरे, सभा,बैठका झाल्या. शिवधनुष्य पेलवणे फार अवघड असते,पण स्वयंपुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलवणार आहोत,असा विश्वास भाजपचे गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी वसई येथे झालेल्या शिबिरात व्यक्त केला. वसई येथे भाजपा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी नालासोपाऱ्याचे आ.राजन नाईक,वसई विरार शहर महानगरपालिका नगर रचना विभाग प्रभाग उपसंचालक शेखर दिघावकर,प्रांत अधिकारी शेखर घाडगे, सहकारी संस्था पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, सहकारी संस्था उपनिबंधक वसई अमर…

Read More

दीपक मोहिते, महाविकास आघाडीसमवेत बविआने युती केल्यास फटका बसण्याची शक्यता… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी एकत्रितपणे लढतील,असे संकेत मिळत आहेत.गेल्या काही दिवसापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची जवळीक वाढत चालल्यामुळे आगामी निवडणुका आ.ठाकूर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवतील,अशा चर्चाना उधाण आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय पाटील यांना वसई मधून लक्षणीय मते मिळाली होती.तर महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांना केवळ अडीच ते तीन हजार मताचे मताधिक्य मिळाले होते.विजय पाटील व हितेंद्र ठाकूर यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही स्नेहा दुबे यांना मिळालेल्या एकूण मतापेक्षा कैक पटीने अधिक होती.ती…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात, राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अभियान राबवत असते.या शैक्षणिक वर्षांत देखील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ५ ते २० जुलै २०२५ दरम्यान हे सर्वेक्षण राबवण्यात येत आहे. त्यासाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व जिल्हा व तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना आवश्यक ती तयारी करून सर्वेक्षण प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शाळाबाह्य आणि स्थलांतरित कामगारांच्या बालकांचा शोध घेणे आणि त्यांना पुन्हा शाळेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे,असा आहे.अनेक वेळा विविध सामाजिक,आर्थिक व स्थलांतराच्या कारणांमुळे लहान मुले शिक्षणापासून वंचित राहतात.या मुलांना शोधून त्यांचा शिक्षणाचा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार अर्बन बँकेकडून ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय, ग्रामीण भागातील जनतेचा आधार म्हणून ओळखली जाणारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.जव्हारने आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे.संचालक मंडळाने व्यावसायिक, शेतकरी,तरुण उद्योजक आणि लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कर्ज व्यवहारात मोठा बदल जाहीर केला आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले असून, विविध कर्ज योजनांची मर्यादा वाढवून अधिक रकमेचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्वरित कर्ज मंजुरीसाठी सोपी प्रक्रिया आणि परवडणारे व्याजदर यामुळे ग्राहकांसाठी नवी दालने खुली झाली आहेत, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बाबुराव मुकणे यांनी दिली. घर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती सरकारची लोकप्रियता उतरणीला… राज्य मंत्रीमंडळाची सध्याची अवस्था पाहिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान चार ते पाच मंत्र्यांच्या हाती नारळ द्यावा लागणार आहे. मंत्रिमंडळाची सध्याची अवस्था ही ” जोकरांची सर्कस,” अशी झाली आहे.या सरकारमधील लफडेबाज मंत्र्यांची एकामागोमाग लफडी बाहेर येत आहेत.त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते पार वैतागून गेले आहेत. कँटीन मॅनेजरला मारहाण करणारे आ.संजय गायकवाड,घोटाळेबाज मंत्री संजय शिरसाठ,घरात होमहवन करणारे व सभागृहात बाजूच्या आमदाराकडून तंबाखू घेऊन स्वतःच्या तोंडात कोंबणारे भरत गोगावले,सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे माणिकराव कोकाटे,दारूच्या आर्थिक घोटाळ्यात आकंठ बुडालेले खा.संदीपन भुमरे व आपल्या विभागाच्या निविदा घोटाळ्यात अडकलेले,संजय राठोड या सर्वांच्या उपदव्यापाने देवेंद्र फडणवीस पार त्रासून गेले…

Read More