- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार,
- जव्हार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तिरंगा रॅली,
- वसई – विरारच्या विविध प्रश्नासाठी माजी खा. किरीट सोमय्या यांचा धावता दौरा,
- अंजुमन इस्लामतर्फे ४३ वा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न,
- वाढवण बंदर ; नुकसानभरपाई पॅकेजबाबत ८ सप्टें. रोजी हितधारकांची बैठक,
- कायमस्वरूपी पुलासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास प्रस्ताव सादर,
- वसई व नालासोपाऱ्याच्या मतदारांमध्ये प्रचंड नैराश्य,
- ६४ कोटीच्या कचरा प्रक्रिया घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, अवाजवी पाणीपट्टी दरवाढीविरोधात भाजपची जोरदार निदर्शने, वसई-विरार शहर महानगरपालिकेची मासिक महासभा काल ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता पार पडली. मात्र, ही सभा सुरू होण्यापूर्वी महापालिका मुख्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी अवाजवी पाणीपट्टी, पाणी लाभ कर आणि मलप्रवाह सुविधा कराच्या दरवाढीविरोधात निदर्शने करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. यापूर्वीही भाजपतर्फे १६ ऑगस्ट रोजी या करवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. गेल्या महासभेत प्रशासकीय ठराव क्र. १९१७ ( १६/०१/२०२५ ) नुसार शहरातील मालमत्ताधारकांवर पाणीपुरवठा लाभकर व मलप्रवाह सुविधा लाभकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्ता करामध्ये ( घरपट्टी ) थेट २० टक्के किंवा त्याहून अधिक वाढ झाली आहे.या…
दीपक मोहिते ” उच्च दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांच्या नशिबी नाही.. लेखाचे हेडिंग वाचून तुम्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असेल, साहजिकच आहे. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेची सध्याची अवस्था लक्षात घेता, माझ्या या लेखासाठी हेच हेडिंग समर्पक असल्याचे वाटले व ते मी देवून टाकले. पुढे तुमच्या वाचनात येणाऱ्या या लेखात हे हेडिंग देण्यामागचा उद्देश नक्कीच स्पष्ट होणार आहे. गेल्या काही वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था फारशी समाधानकारक नाही. कालानुरूप प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतो, असा निसर्गाचा नियम आहे व तो मानवी जीवनाशी निगडीत असा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या शिक्षण व्यवस्थेतही अमुलाग्र बदल होत गेले. आमच्या काळातील प्रचलित शिक्षण व्यवस्था व सध्याची…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, आता पक्षांतरबंदी कायद्याची फेररचना करण्याची गरज, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात तीन वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्यात प्रचंड गदारोळ उडाला होता. हा निर्णय कसा पक्षपाती आहे, यावर संविधानाच्या अभ्यासकांनी टिकेची झोड उठवली होती. नार्वेकर यांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्या या आरोपात तथ्य होते. अनेक घटनातज्ञानीही हा निकाल आपल्या संसदीय व लोकशाही प्रणालीचा गळा घोटणारा आहे,अशी मते नोंदवली होती, तसेच निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळचे सरन्यायधीश दोघांसह राहुल नार्वेकर अशा तिघांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. या प्रश्नावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचे…
दीपक मोहिते, आपण,आणखी किती काळ ठराविक कुटुंबाची गुलामी करणार आहोत ? स्वातंत्रपूर्व काळात आपण इंग्रजाची गुलामी स्विकारली होती. त्यामुळे देशातील संसाधनाची त्यांनी चांगलीच लूट केली.ईस्ट इंडिया या छोटेखानी कंपनीने दीड ते शतकापूर्वी आपल्या देशात घुसखोरी केली व हां हां म्हणता त्यांनी देश ताब्यात घेतला. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. गुलामगिरीचे हे जोखड भिरकावण्यासाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनात अनेक स्वातंत्र्यवीरानी आपले देह ठेवले. अनेकांची कुटुंबे त्या लढ्यात बेचीराख झाली. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या व आपण मोकळा श्वास घेऊ लागलो. या ऐतिहासिक घडामोडीनंतर आपल्याला खूप काही भोगावे लागले. इंग्रजानी त्यावेळी देशाचे भारत…
deepak mohite, Grandmother’s Footsteps – The Grandson’s Journey ” Frontline,” Author: Deepak Mohite, Exactly 49 years ago from today, on 23rd August 1977, for the first time after independence, the Indian National Congress and Indira Gandhi suffered a crushing defeat. A wave of anger against the Congress had swept across the country.During the counting of votes for the 1977 Lok Sabha elections in the premises of Delhi’s Tis Hazari court, the Janata Party and the then Jana Sangh, now the BJP, came up with a slogan – “Show a Congressman and get Rs. 100.” This slogan hurt many Congressmen deeply.…
दीपक मोहिते, कॉक्रोचच्या दणक्याने भाजपचा तरुणाईशी संवाद, अभिजित दिपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीने भाजपची झोप उडवून टाकली आहे. भविष्यात आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या संकटाची चाहूल भाजप व त्यांची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोघांनी तरुणाईशी संवाद साधण्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. आजपासून नागपूरच्या रेशीमबागमध्ये होणाऱ्या या अधिवेशनात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तरुण पदाधिकारी झेन-जी पिढीच्या ३० हजार तरुणाशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार देखील तरुणांसाठी नव्या उपक्रम सुरु करण्याच्या तयारीला लागले आहे.” एक दिवस,एक उपक्रम,”असा हा कार्यक्रम असून दररोज एका मंत्र्याने एका विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधयचा आहे. या भेटीत विद्यार्थ्यांच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्ही करदात्यांनी तुमचं काय घोडं मारले ? वसई तालुक्यात गेल्या वर्षी परिवर्तन झाल्यापासून भाजप व इतर सामाजिक संघटना चांगल्याच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या बहुजन विकास आघाडीचा आपण पराभव करू शकतो, असा विश्वास त्यांच्यामध्ये दुणावला व तालुक्यात वेगळे वारे वाहू लागले. यंदा झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला जबरदस्त फटका बसल्यामुळे भाजप व या सामाजिक संघटना अधिक आक्रमक झाल्या.त्यांचे आक्रमक होण्यामुळे बहुजन विकास आघाडीची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत विरोधी पक्षाने विकासाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली. गेली १६ वर्षे या महानगरपालिकेत जाब विचारणारा विरोधी पक्ष नव्हता, त्यामुळे अकरा वर्षे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महानगरपालिकेत ” लुटालूट,” हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे…🤦♂️🤦♂️ वसई विरार शहर महानगरपालिका गेल्या अनेक वर्षांपासून विविध भानगडीमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. गेली सतरा वर्षे या महानगरपालिकेत विरोधी पक्ष नावापुरता होता. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला मनमानी कारभार करता आला. पण गेल्या निवडणुकीत भाजपने ४४ जागा जिंकल्या व विरोधी पक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली व विरोधी पक्षाने राखणदाराची भूमिका यशस्वीपणे राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक आर्थिक घोटाळे लोकांसमोर येऊ शकले. भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी पक्षाला अनेकदा माघार घ्यावी लागली. माध्यमाचा बेमालूम वापर करत भाजपच्या लोकांनी आजवर कधीही बाहेर न आलेले आर्थिक घोटाळे चव्हाट्यावर आणले. आजच्या घडीला भाजपला रोखणे, सत्ताधारी…
” दीपक मोहिते,” ” बॉटमलाईन,” ” कारगिल विजय दिन ; भारतीय लष्कराची दैदिप्यमान कामगिरी , दरवर्षी संपूर्ण भारतात ” कारगिल विजय दिन,” साजरा करण्यात येतो.युद्धविषयक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या भूभागात घुसखोरी करत आपला भूभाग ताब्यात घेतला होता.३ मे १९९९ रोजी पाक लष्कराने घुसखोरी करत कारगिलमधील अनेक टेकड्यावर ताबा मिळवला. सुमारे ८५ दिवसाच्या घनघोर लढाईनंतर भारताने हा परिसर पुन्हा ताब्यात घेतला व पाक घुसखोरांना यमसदनी धाडले. या पराभवामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच नालस्ती झाली. भारताच्या तोफखान्याच्या माऱ्यासमोर पाकच्या सैन्याची धुळदाण उडाली व भयभीत झालेले लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ याना साकडे घातले. कोणत्याही परिस्थितीत…
दीपक मोहीते, ” बॉटमलाईन, ” आपले सरकार वैचारिक दारिद्राच्या उंबरठ्यावर… सुशिक्षित, पुरोगामी व वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ अशी जी आपली ओळख होती, ती आता सरकारच्या नाकर्तेपणामुळे हळूहळू नाहीशी होत चालली आहे. दिवसरात्र श्रीरामाचा जयघोष करणाऱ्यांनी या बदलामध्ये फार मोठी भूमिका पार पाडली आहे. आपल्या देशात शाहू, फुले व आंबेडकर यांना विसरायला लावण्याचे काम सध्या वेगाने सुरु झाले आहे, मात्र ते कदापि शक्य होणार नाही. ज्या शिक्षणमंत्र्यांच्या विभागाने शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला, त्या शिक्षणमंत्र्याला पाठीशी घालणे म्हणजेच वैचारिक दारिद्रपणा होय. प्रभू रामाचा जयघोष करत अभिजित दिपके याच्यावर शाईफेक करणे, हा देखील एकप्रकारे वैचारिक दारिद्रपणाच आहे. तुमचे आमचे पुरोगामी विचार ठेचायचेच, असा उद्देश उराशी…
