Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ताकद नसताना पाठिंबा देण्याचे नाट्य… वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या दोघांनी अनुक्रमे बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.त्यांच्या या कृतीकडे वसई- विरारकर मतदार एक ” अफलातून विनोद,” दृष्टीने पाहत आहेत.वसई तालुक्यात या दोन्ही पक्षाची ताकद असून नसल्यासारखी आहे,या दोन्ही पक्षाना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणे आजवर कधीच शक्य झाले नाही.अशीच परिस्थिती संपूर्ण पालघर जिल्ह्यात देखील पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षानी काल पक्षाने बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले.त्यामुळे येथील मतदार…

Read More

दीपक मोहिते, सत्तेत कोणीही या,पण आम्ही दिलेल्या मताशी प्रतारणा करू नका,भ्रष्ट व अनागोंदी कारभार रोखा, निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास संपल्यात जमा आहेत. उमेदवार व मतदारांना मतदान व मतमोजणी होणाऱ्या दोन दिवसाची प्रतिक्षा आहे.गेल्या तीन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच पक्षाची उमेदवारी न मिळालेले नाराज उमेदवार आता प्रचाराला लागले आहेत.प्रचार सुरू झाला असला तरी राजकीय पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते हे रिंगणात उतरलेल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सक्रिय झाले आहेत.त्यांना या कामात किती यश येते हे,येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. मतविभागणी टाळण्यासाठी हे सारे काही करावे लागत असते.ही प्रक्रिया गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहे.” आम्हाला उमेदवारी का नाही ? आयुष्यभर…

Read More

दीपक मोहिते, कुरुक्षेत्र, वसई विरार मनपा निवडणूक ; काँग्रेस व मनसेने आपल्या निवडणूक चिन्हाना श्रद्धांजली वाहण्याची गरज नव्हती… निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास पूर्ण झाले असून उद्यापासून प्रचाराचे ढोल ताशे वाजू लागणार आहेत.भाजप – शिंदे गट या दोघांची अभेद्य युती विरोधात विरोधकांची विस्कळीत आघाडी,अशी सरळ लढत होत आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) घड्याळ मात्र सुरूच झाले नाही.त्यांची टिकटिक वसईच्या मतदारांच्या कानावर पडण्या अगोदरच भाजपने ते बंद पाडले. या निवडणुकीत शिंदे गटाने समंजसपणा दाखवला नसता तर त्यांचाही राष्ट्रवादी झाला असता.पण एकनाथ शिंदे यांचे वास्तवाचे भान ठेवून वागण्याचे कसब नक्कीच कौतुकास्पद असेच आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांनी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणुकीचे तिकीट,आता एटीम कार्ड बनले आहे… दोन दिवसांपूर्वी मांडवातील गोंधळ संपला आहे.गेले सात दिवस प्रतिक्षेत असलेल्या नवरा व नवरी मुलींचा संसार आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.कुटुंबातील कर्त्या धर्त्यांनी एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमात नवरा -नवरीला प्रचंड मनस्ताप दिला,त्यामुळे थकले भागलेले हे दोघे आता संसाराची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहेत.त्यांचा हा संसार १६ जाने.नंतर रुळावर येणार आहे.पण येणारा १५ दिवसाचा हा काळ,त्यांच्यासाठी अत्यंत खडतर असाच आहे.१५ जाने.रोजी होणाऱ्या अग्निदिव्यातून गेल्यानंतर मात्र त्यांना सलग पाच वर्षे रिसेप्शन साजरा करायला मिळणार आहे.या काळात त्यांना केवळ आहेराची पाकिटे घेत राहायचे आहे.त्यामुळे सध्याचा त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे.हा त्रास केवळ एक महिन्यापूरता…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” राजकारणात कधीही काहीही होऊ शकते,” वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज ३.०० वाजता थांबणार आहे.आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिका परिसराला छावणीचे स्वरूप येणार आहे.मित्रपक्षाशी बोलणी व बंडखोरीची भिती,अशा दोन कारणामुळे उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाने विलंब लावला.त्यामुळे आज उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे.तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होणार आहे. अशी परिस्थिती असतानाही काही उमेदवारांची नांवे जाहीर झाली आहेत.पण,ज्यांना उमेदवारी मिळाली नाही,त्यांनी आता आपली वाघनखे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.तर काही राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी पक्षातील नाराजांच्या नाराजीला प्राणवायू देत आहेत.निवडणुकीच्या…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, वसई विरार मनपा निवडणूक ; पराकोटीचा संघर्ष व हाणामाऱ्या पाहायला मिळणार… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्राच्या चार शहरात राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.एकमेकांवर होत असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे.त्यासाठी सोशल मीडियाचा बेसुमार वापर सुरू झाला आहे.प्रचाराची दिशा पाहता,या निवडणुकीत प्रचाराचा भर हा ” सकारात्मक दृष्टिकोना,” वर आधारित नसणार,हे स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत युट्युब चॅनलला सुगीचे येणार,हे स्पष्ट होत आहे.” स्वस्त व मस्त,” अशा चौकटीत होणाऱ्या त्यांच्या प्रचाराला उमेदवारांची पहिली पसंती मिळू लागली आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी या युट्युबर्सना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे.फेसबुक,व्हाट्सअप व इंस्टाग्रामवर उमेदवारांच्या मुलाखतीचा जो सिलसिला सुरू झाला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बविआ,मनसे व काँग्रेस आघाडी ; भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर पाडणारी… वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोन प्रमुख पक्षांनी जागावाटपाच्या प्रक्रियेत बाजी मारली आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शिवसेना ( उबाठा ) ही निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे.पण उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांच्या मनसेने मात्र बहुजन विकास आघाडीच्या निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचे मान्य केल्याचे समजते,पण त्याबाबतची अधिकृत घोषणा मनसेकडून अद्याप झालेली नाही.त्यामुळे बविआ व मनसे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.बविआ व मनसे या दोन पक्षात होणारी युती भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” वसई विरार शहर मनपा निवडणूक ; भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला ( अ.प.गट ) घराबाहेर काढले, वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांनी अखेर जागावाटपाचा तिढा यशस्वीपणे सोडवला आहे.जागावाटपाचा समझोता करताना त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक महायुतीच्या घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवले.या दोघांनी केलेल्या समझौत्यामध्ये भाजपने ९१ तर शिंदे गटाला २४ जागा असे ठरवले.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तीळपापड झाला आहे.भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा दिली नाही.वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानी युतीतील हे दोन दिग्गज पक्ष आपल्यासाठी जागा सोडतील,अशी अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे होते.कारण,राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजित…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, निवडणुकीच्या तोंडावर भाजप,बहुजन विकास आघाडीला घेरण्याच्या तयारीत… विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.उमेदवार निवडीची त्यांची प्रक्रिया अंतिम टप्यात पोहोचली असून येत्या दोन दिवसात त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी भाजप व शिंदे गट विविध हातखंडे वापरू लागले आहे.२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.त्यावेळी शिवसेना – ०५,भाजप – ०१,अपक्ष -०३ असे बलाबल निर्माण झाले होते.त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने दैदिप्यमान असा…

Read More

दीपक मोहिते, संपादकीय, दोघा भावांची युती झाली खरी,पण ती किती काळ टिकणार ? नॅशनल डेस्कसाठी, तब्बल सतरा वर्षाच्या प्रदीर्घ वनवासानंतर अखेर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे घोडं एकदाचे गंगेत न्हालं,प्रभू रामचंद्राला १४ वर्षे वनवास भोगावा लागला.पण,या दोघा बंधूंना त्याहीपेक्षा अधिक काळ वनवास भोगावा लागला.आता या दोघांमध्ये दिलजमाई झाल्यामुळे या युतीमधून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.पण या दोघा भावांचे स्वभाव लक्षात घेता,हे दोघे भाऊ जास्त काळ एकत्र राहतील,असे वाटत नाही.सध्या एकत्र आले असले तरी यांची ही दिलजमाई किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे. आम्हीच मराठी माणसाचे खरे राखणदार असल्याचा या दोघांचा दावा आहे.विकासाच्या प्रश्नी या दोघांमध्ये मतभिन्नता आहे,त्यामुळे…

Read More