- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, सामाजिक भान, अर्नाळा जलमार्गांवरील पुलाचे काम सूरू होण्याची शक्यता, वसईच्या आ.ॲड.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत आपल्या वसई मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा शासनस्तरावर सतत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे अनेक विकासकामे आता मार्गी लागत आहेत.गेल्या जून महिन्यात त्यांना अर्नाळा ग्रामपंचायतीने अर्नाळा किल्ला व अर्नाळा गाव दरम्यान जलमार्गावरील वर्षानुवर्षे रखडलेला पूल बांधण्यात यावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.त्या निवेदनाच्या आधारे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्या कानावर सदर बाब घातली होती.या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागाला याप्रकरणी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार शासनस्तरावर हालचाली…
दीपक मोहिते, विश्लेषण, नेपाळमधील अस्थिरता ही भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. नेपाळमधील स्फोटक राजकीय परिस्थिती आशिया खंडाला अशांततेच्या खाईत ढकलणारी आहे. दोन वर्षापूर्वी श्रीलंका,त्यानंतर म्यानमार,बांगला देश व आता नेपाळ,या दक्षिण आशियाई देशात झालेल्या राजकीय उलथापालथी लक्षात घेऊन भारताने सावध होणे आवश्यक आहे.नेपाळमध्ये जो उठाव झाला,त्यामागे तेथील सरकारची निष्क्रियता हे एकमेव कारण नाही,तर अमेरिका व चीन या दोन महासत्तामध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची झालर देखील आहे.नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे घेतल्यानंतर अवघ्या १३ महिन्यात नेपाळची आर्थिक स्थिती पार ढासळली.देशातील बेरोजगारी,महागाई व विकासाची गती खुंटणे,या कारणामुळे तरूणवर्ग बिथरला व अखेर ओली यांना देश सोडून पळ काढावा लागला.संतप्त तरुणांनी संसद,सर्वोच्च…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुका, संघर्षाला तोंड फुटले, पालघर जिल्ह्यात महायुती तुटण्याची शक्यता… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारे राजकीय पक्ष आतापासूनच एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.महायुतीमध्येही भाजप व एकनाथ शिंदे गटात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले आहे.दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्या कृष्णकृत्याचा पाढा वाचत पक्ष सोडण्यासाठी भाजपकडून दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप आतुर झाले आहेत.हे कार्यकर्ते सतत भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.बहुजन विकास आघाडीचे दोन महत्वाचे पदाधिकारी देखील आपली कृष्णकृत्ये बाहेर येऊ नयेत,त्यासाठी आपल्याला…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.९, अनधिकृत इमारतींचा सुळसुळाट असलेला प्रभाग ; या निवडणुकीत परिवर्तन अटळ, प्रभाग क्र.९ हा अत्यंत गजबजलेला असा प्रभाग आहे.या प्रभागात परप्रांतीयांचे प्रचंड प्राबल्य आहे.त्यामुळे या प्रभागात मराठी माणसाला उमेदवारी देणे,म्हणजे ” हात दाखवून अवलक्षण,” करून घेण्यासारखे आहे.गेल्या दोन निवडणुकीत या प्रभागात बहुजन विकास आघाडीने बाजी मारली होती.पण या निवडणुकीत त्यांना ते शक्य होणार नाही.या प्रभागात गेल्या दहा वर्षात बेसुमार अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या,त्यांचे जनक कोण आहेत,हे सांगायला नको.गेली दहा वर्षे येथील परप्रांतीय मतदार हा बहुजन विकास आघाडीला भरभरून मतदान करत आला.पण या निवडणुकीत हा मतदार भाजपकडे वळेल,अशी शक्यता आहे.हा प्रभाग देखील अस्वच्छ प्रभाग म्हणून…
दीपक मोहिते, ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरात लवकर वाजण्याची शक्यता आहे.काल ग्रामविकास विभागाने ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार अनु.जमाती पुरुष : २ पुरुष,अनु.जमाती महिला : ३ एकूण ५ जागा, सर्वसाधारण पुरुष : ७,सर्वसाधारण महिला : ७,एकूण १४,जागा, अनु.जाती पुरुष : ३,अनु.जाती महिला : २,एकूण ५ जागा, नागरिकांचा मागासवर्ग पुरुष : ४ नागरिकांचा मागासवर्ग महिला : ६ एकूण १० जागा, असे एकूण ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण पडले आहे. ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे – ठाणे -सर्वसाधारण ( महिला ) पालघर – अनुसूचित जमाती रायगड- सर्वसाधारण रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.८, सर्वात बदनाम प्रभाग क्र.८ बविआच्या हातून निसटणार, नालासोपारा पूर्वेस असलेला हा प्रभाग अत्यंत मागासलेला तसेच ८० % अनधिकृत बांधकामाचा वेढा असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो.अठरापगड अस्वच्छता व अश्मयुगातील रस्त्याची आठवण करून देणारा असा हा प्रभाग आहे.या प्रभागात मराठी माणूस अल्पसंख्यांक म्हणून ओळखला जातो.मुस्लिम,उत्तर भारतीय व मारवाडी व्यापारी हे या प्रभागात बहुसंख्यांक आहेत.झोपडपट्या,अनधिकृत चाळी व अनधिकृत इमारती इ.चा प्रचंड सुळसुळाट,जागोजागी कचऱ्याचे ढीग,गुंडाचा मुक्त वावर,गुरुचरण,वन व सरकारी जमिनी या आपल्या बापजाद्यांची जायदाद असल्याची मानसिकता बाळगणारे चाळमाफिया,याना सर्वच राजकीय पक्षांनी पोसले आहे.पाणी,आरोग्य व शिक्षण,कायदा व सुव्यवस्था,स्वच्छता इ. समस्या या प्रभागाच्या पाचवीला पूजल्या आहेत.गेल्या पंधरा वर्षात या…
दीपक मोहिते, विकासकामांना वेग, अर्नाळा किल्लावासीयांची मुख्य समस्या मार्गी लागण्याची शक्यता, वाहतुकीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या अर्नाळा किल्लावासीयांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात,यासाठी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न चालवले आहेत.अनेक वर्षांपासून अर्नाळा किल्ला गाव ते अर्नाळा गाव दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात यावा,अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाकडे लावून धरली आहे.या महत्वाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे,काही तांत्रिक कारणामुळे मात्र हे काम अनेक वर्षे रखडले आहे.या प्रकरणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी हस्तक्षेप करावा,अशी मागणी करण्यात आल्यानंतर आ.दुबे यांनी संबधित विभागाकडून सविस्तर माहिती मागवून घेतली व मुख्यमंत्री कार्यालयाशी त्वरीत पत्रव्यवहार सुरू केला आहे.लवकरच या विषयी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन हा तिढा लवकरात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा सुरु, ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच,भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “ रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल,तुम्ही तयार आहात का ? ” असे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.नाईक यांच्या विधानाला शिवसेना ( शिंदे गट ) खा. नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. वर्तकनगर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पक्ष बैठकीत बोलताना गणेश नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी “ नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता…
दीपक मोहिते, शिंदे गट सक्रिय, मनोर / पालघर येथे शिंदे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची “ संघटनात्मक बैठक,” काल उद्योगमंत्री उदय सामंत, पालघर जिल्हा संपर्कमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व हमी, फलोत्पादन,खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले व पालघर जिल्हासंपर्क प्रमुख शिवसेना उपनेते रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटनात्मक घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली.तसेच,पक्षाची आगामी राजकीय दिशा,पक्ष संघटनेची नव्याने रचना, प्रभावी जनसंपर्क आणि संवाद,प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका अधिक सक्रिय कशी राहील,विकास आणि जनसेवा या प्रमुख मुद्द्यांसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुखांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या…
वाडा प्रतिनिधी, शून्य प्लास्टिक मोहिमेमध्ये शिक्षक व विद्यार्थी सहभागी, वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतने शून्य प्लास्टिक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये चिंचघर गावातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.त्यामुळे शून्य प्लास्टिक मोहिमेचे उद्दिष्ट गाठण्यात ग्रामपंचायतला मदत होणार आहे. वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत गेल्या दोन वर्षांपासून ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असून सुक्या कचऱ्यातून मिळालेले प्लास्टिक पुनर्रप्रक्रियेसाठी पाठवले जाते, पुनर्रप्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या विविध दैनंदिन वापराच्या वस्तू ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वापरण्यात येत आहेत.या प्रकल्पामुळे चिंचघर गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत झाली आहे.ग्रामपंचायतच्या या प्रकल्पाला सी.ए.सी.आर.व ई.पी.एल.या स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. यावर्षी या संस्थांनी चिंचघर ग्रामपंचायतच्या सोबतीने गावात…
