Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आचोळे हॉस्पिटल ” तू,तू,मै,मै,” ; निदान लोकांसाठी तरी एकमेकांच्या उरावर बसू नका… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर वसई तालुक्यातील राजकारण हळूहळू तापू लागले आहे.नव्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय उपटण्यासाठी राजकीय पक्ष आता एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.पण मतदारांच्या लेखी,या अशा स्पर्धेला काडीचीही किंमत नाही.राजकीय पक्षाच्या अशा या ” पळा,पळा कोण पुढे पळे तो,” शर्यतीमध्ये वसईकराना बिलकुल स्वारस्य नाही.त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या,अडचणी कशा मार्गी लागतील व प्रभावी नागरी सुविधा कशा उपलब्ध होतील,याची चिंता आहे. गेली अनेक वर्षे खितपत पडलेला हॉस्पिटलचा प्रश्न वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून एकदाचा…

Read More

वसंत भोईर,वाडा अंभई ग्रामस्थांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा तालुक्यातील अंभई गावच्या ग्रामस्थांनी काल पासुन तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंभई या गावाच्या हद्दीत असलेल्या झीको इंडिया या कंपनीत स्थानिक कामगारांना डावलण्यात येत असून स्थानिकांना या कंपनीत प्राधान्य देण्यात यावे,अंभई ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात चुकीचा अहवाल देणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,तसेच आमगाव येथे ग्रामस्थांची फसवणूक करून तयार करण्यात आलेले रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.विनापरवाना रस्ते खोदणा-या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी,या सर्व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नरेश पाटील, मनोज गोवारी,गोंविदा कातारे व विलास बरड या चार ग्रामस्थांनी तहसीलदार…

Read More

दिपक मोहिते ” हल्लाबोल, ” नवा जव्हार जिल्हा निर्माण करताना सरकारने सारासार विचार करावा, पालघर जिल्हा,हा देशातील ३६ व्या क्रमांकाचा जिल्हा आहे.दहा वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी नवीन आदिवासी जिल्हा निर्माण करण्यात आला.नागरी परिसराचा विचार न करता तत्कालीन राज्य सरकारने सागरी व डोंगरी,असा जिल्हा निर्माण केला.वास्तविक जिल्ह्याचे विभाजन करताना तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण यांनी भौगोलिक परिस्थितीचा सारासार विचार करून नागरी, सागरी व डोंगरी असे त्रिभाजन करायला हवे होते. या जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ व विकासाची मंदावलेली गती पाहून सरकारला आता पुन्हा जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्याची उपरती झाली आहे. २०१४ साली चव्हाण सरकारने जिल्हावासि्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर…

Read More

दीपक मोहिते पर्यटनवाढीला चालना, वर्षानुवर्षे रखडलेली सर्व विकासकामे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली मार्गी लागतील – आ.स्नेहा दुबे पंडित, राज्याच्या पर्यटनवाढीला चालना मिळावी,यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत वसई विभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ कोटी रु.चा निधी नुकताच मंजूर केला आहे.या प्रकरणी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या आठ महिन्यात वसई विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यात यश मिळवले.गेल्याच आठवड्यात त्यांनी वर्षानुवर्षे रखडलेले पाच उड्डाणपूले व रिंगरूटचा प्रश्न सोडवला.याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्तहस्ते निधी देऊ केला आहे.त्यानंतर दोनच दिवसापूर्वी वसई विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागातील मूलभूत सुविधा…

Read More

दीपक मोहिते, ऋतुचक्र विस्कळीत होणे,अत्यंत धोकादायक, निसर्गाने उधळण केलेल्या संपूर्ण रचनेत हवा,पाणी,जमीन,वनस्पती,पशु,पक्षी, कीटक व माणूस या सर्वांचा समावेश मिळून पर्यावरण तयार होत असते.त्याचे प्रमाण व रचना,ही आपापल्या गरजेनुसार करण्यात आली आहे.हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्याचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते.पूर्वी काळी तो विचार केला जात होता,परंतु जसजशी लोकसंख्या वाढत गेली निसर्गाचे हे चक्र विस्कळीत होत गेले.त्यामुळे आज तुम्हा-आम्हा सर्वाना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत.यूरोप खंडातील अनेक शहरे आज अधुन मधून निसर्गाच्या तडाख्यात सापडलेली आपण पाहतो.आधुनिक पद्धतीची शहरे वसली,परंतु ही शहरे वसवताना पर्यावरणावर त्याचा काय परिणाम झाला ? याचा आपण कधीच विचार केला नाही.त्याचे परिणाम सध्या आपल्याला भोगावे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” पालघर जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर…” विमा क्षेत्रात खाजगी विमा कंपन्यांना रान मोकळे करून देण्याचा तत्कालीन काँग्रेस सरकारचा निर्णय,शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनला आहे.शेतकऱ्यांना परतावा देण्यास,या विमा कंपन्यांची मानसिकता नसल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या हवालदील झाला आहे.या प्रश्नी राज्य सरकारही डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे.गेल्या महिन्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.या नैसर्गिक संकटात जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते झाले.पण जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी अद्याप सुप्तावस्थेत आहेत.पाऊस मात्र अद्याप थांबायचे नांव घेत नाही. खाजगी कंपन्यांचा आडमुठेपणा व राज्य सरकारची उदासीनता,त्यामुळे काही वर्षांपूर्वी अनेक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक भूमिकेत आले होते.शेतकऱ्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य किसान सभेने याविषयी…

Read More

दीपक मोहिते, हे कसले गतिमान सरकार ? हे तर गुन्हेगारांना अभय देणारे सरकार… गेल्या पाच वर्षात आपले राज्य पूर्णपणे रसातळाला गेले असून या परिस्थितीला तीन इंजिनच्या सरकारचा भ्रष्ट व अकार्यक्षम कारभार कारणीभूत आहे.राज्यात सुरू असलेले हत्यासत्र,मोक्याच्या जमिनी बळकावणे,आर्थिक घोटाळे व गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढणे,इ.घटनांमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन सध्या असुरक्षित बनले आहे.गेल्या ७७ वर्षात पूर्वीचे एकही सरकार पोलिसांच्या कामात कधीही हस्तक्षेप करत नसत,पण हल्ली देवेंद्र फडणवीस यांचे सरकार त्यास अपवाद ठरले आहे.आजच्या घडीला पोलीस यंत्रणा गृहमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय एकही निर्णय घेऊ शकत नाही.या अशा परिस्थितीमुळे राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पार खालावली आहे. गेल्या पाच वर्षात संतोष…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” बिघडते पर्यावरण संतुलन ; आपल्यासमोर एक आव्हान… जगभरात ओझोन व पर्जन्यमानाचे प्रमाण सतत कमी होत चालले आहे.त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाना आता सभोवतालच्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागत आहे.ज्या सजीवाना आपल्यामध्ये बदल घडवण्यात यश मिळते,ते तग धरून राहतात व ज्याना ते शक्य होत नाही,अशाना आपले प्राण गमवावे लागतात.अशी स्थिती का निर्माण झाली ? यावर गेल्या १०० वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोट्यवधी कार्यशाळा,चर्चासत्रे,उपक्रम पार पडले.परंतु पर्यावरणाचा होत असलेला विनाश मात्र रोखणे,एकाही देशाला शक्य झाले नाही.आपल्या पालघर जिल्ह्यात पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस रसातळाला जाऊ लागले आहे.यंदा मे महिन्यात सुरु झालेला पाऊस नोव्हें.उजाडला तरी थांबण्याचे नांव घेत नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.…

Read More

वसंत भोईर, वाडा, रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान तालुक्यातील निचोळे ग्रामपंचायत हद्दीतील श्री कृष्णा फाॅर्म कंपनीतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या भाताचे नुकसान झाले आहे.प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निचोळे येथील श्री कुष्णा फॉर्म ही कंपनी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला लागून असल्याने कंपनीतील प्रक्रियेतील रसायनयुक्त सांडपाणी,कंपनी शेतामध्ये सोडत असल्याने शेतीचे पूर्ण अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत अनेकदा वाडा तहसीलदारांना निवेदन दिले तरी काही एक उपयोग झाला नाही.पाण्यामुळे दुर्गंधी आणि सांडपाणी शेतात शिरते. त्यामुळे कोणतेही पीक येत नाही.अनेक वेळा तक्रार केली तरी अधिकारी गप्प आहेत. त्यांचे कंपनी मालकांशी साटेलोटे असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आघाडी व युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणे,हे दिवास्वप्नच असेल, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई तालुका हा दिवसेंदिवस संवेदनशील बनत चालला आहे.कोणताही विषय असो,भाजप व बहुजन विकास आघाडी एकमेकांच्या नाकदुऱ्या काढण्यात आघाडीवर आहेत.गेल्या तीस वर्षात वसईकर नागरिकांना अशी स्थिती कधीच पाहायला मिळाली नाही.त्यामुळे आगामी निवडणुकीत निवडणूक आयोग,महानगरपालिका व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या प्रचारावर पोलिसांना यंदा करडी नजर ठेवावी लागणार आहे. विधानसभा काबीज केल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने देखील भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली आहे.या दोघांच्या जीवघेण्या स्पर्धेत शिवसेना ( उबाठा ), शिवसेना ( शिंदे गट ),भारतीय राष्ट्रीय…

Read More