Author: दीपक मोहिते

दिपक मोहिते, सूर्यातीर, विकासाच्या नावाखाली सुरु असलेली वृक्षतोड व हवेतील प्रदूषण रोखा, दरवर्षी पडणारा अवकाळी पाऊस व माघारी फिरणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते.यंदाही परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र अविरतपणे सुरू आहे.मात्र सरकार अवकाळी व परतीचा पाऊस,या दोन ज्वलंत विषयावर संशोधन व उपाययोजना करण्याबाबत कायम उदासीन राहिले.दरवर्षी हमखास येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीच्या मुळाशी विस्कळीत पर्यावरण,हे एकमेव कारण आहे.भरमसाठ होणारी वृक्षकत्तल व जल/हवेतील प्रदूषण रोखण्याबाबत सरकार प्रचंड उदासीन असल्यामुळे निसर्गाचे ऋतुचक्र पार लयाला गेले आहे.त्याचे परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.या महिन्यात राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने…

Read More

दीपक मोहिते, वारे व्वा…. इशारे कोणाला देता ? आपल्या पायाखाली काय जळतय,ते पहा जरा.. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आश्चर्याचा धक्का बसला.हे दोघे आपल्या भाषणात जे काही म्हणाले,ते समोर जमलेल्या प्रचंड गर्दीला पाहून भारावून गेले असावेत,असे वाटते.पण त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकाना आश्रर्य वाटलेच,पण बऱ्यापैकी मनोरंजन देखील झाले. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात काय म्हणाले ते पहा जरा, विरोधकांना टोला लगवताना ते म्हणाले,मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे,मी आनंद दिघेसाहेबांचा चेला आहे,मला हलक्यात घेऊ नका,मी मैदानातून पळणारा नाही,तर पळवणारा नाही.अहो शिंदेसाहेब,बंड करण्यापूर्वी तुमचा माणूस ईडीच्या भितीने कुठे गायब झाला होता ? तुम्ही देखील…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पुरोगामी राज्य राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पार रसातळाला गेले, दुसऱ्याचे घर फोडण्यात आघाडीवर असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना काल रात्री झालेल्या घटनेतून तरी शहाणपण येईल,अशी अपेक्षा आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पार खालावली असताना आपले गृहमंत्री महाशय,हे तीन वर्षांपासून इतरांची घरे फोडण्याचे पाप करण्यात रममाण आहेत.लोकसभा निवडणुकीत आपटी खाल्यानंतरही फडणवीस यांचे डोके अद्याप ताळ्यावर आलेले नाही.बदलापूर बलात्कार,पुणे बलात्कार,पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस,हिट अँड रनच्या वाढत्या घटना,त्या घटनातील आरोपींना वाचवण्याचे झालेले प्रयत्न,महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,ओबीसी,मराठा व धनगर आरक्षण प्रकरणी त्यांच्याकडून होत असलेला ” अशी ही बनवाबनवी,” चा प्रयोग,महायुतीमधील अंतर्गत वाद,इ.कारणे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या दारुण पराभवाला कारणीभूत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे,गृहमंत्र्यांनी पायउतार व्हावे, काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेने कायदा-सुव्यवस्थेसोबत सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली.राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खालावली असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंबई,पुणे व नागपूर या तीन शहरात गुंडगिरीने जो हैदोस घातला आहे,तो पाहता या शहरात आता कोणीही सुरक्षित नाही,हे स्पष्ट झाले आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.जे गृहखाते एका माजी राज्यमंत्र्याचे संरक्षण करू शकत नाही,त्या खात्याच्या प्रमुखपदी असलेल्या फडणवीस यांनी पायउतार व्हायला हवे,अशा मागणीने जोर धरला आहे. राज्याची राजधानी मुंबई,उपराजधानी नागपूर व सांस्कृतिक…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” नळावरचे भांडण, ” सुंठीवाचून खोकला,” जाण्याच्या प्रतिक्षेत देवेंद्र फडणवीस, शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या मार्गात अजित पवार यांचा खोडा, मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक नळावर जस महिलांचे पाण्यासाठी भांडण होत असते,तसेच या बैठकीत पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधून विस्तव जात नाही.अशावेळी अजित पवार यांनी अचानकपणे ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने,” चे ” माझी लाडकी बहीण,” असे नामकरण केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारा चढला व मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत ” तीन पैश्याचा तमाशा,” सुरू झाला.नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वप्नातला ” अलिबाग-विरार कॉरिडॉर,” प्रकल्पाचा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सयाजी शिंदे यांना अशी उपरती का व्हावी ? आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग क्षेत्र गाठलेल्या व्यक्ती आपल्या जीवनात अनेकदा अक्षम्य चुका करत असतात,क्षणिक फायद्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल,हे त्यांच्या यशस्वी करकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरते.काल अशीच एक घटना घडली.सिनेसृष्टीमध्ये प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख असलेले सयाजी शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.त्यांना अशी उपरती का झाली ? हे न समजणाऱ्या कोड्यासारखे आहे.प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोघेही ” पाणी,” व ” शेतकाऱ्यांच्या आत्महत्या,” या अत्यंत जिव्हाळ्याच्या दोन विषयावर त्यांच्या ” नाम,” संस्थेच्या माध्यमातून प्रचंड काम करत आहेत.पण त्यांनी कधीही राजकीय पक्षाची वाट धरली नाही.उलट…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवारजी,आ.हितेंद्र ठाकूर यांच्यासारखे धाडस दाखवा, राजकारणात कधी काहीही घडू शकते,हे आज नाशिकचे माजी आ.माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दिलेल्या सल्ल्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास गेल्या काही दिवसांपासून मागे पुढे करत असताना कोकाटे यांनी त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा,अशी ऑफर दिली.पक्षाचे अध्यक्ष इतरांना उमेदवारी देत असतात,पण कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा सुरक्षित मतदारसंघ असून अजित पवार यांनी येथून उभे राहावे,असा मानभावी सल्ला दिला आहे.त्यांच्या या सल्ल्यानंतर काही क्षणात अजित पवार यांनी ” बारामती माझी आहे,त्यामुळे माझ्या घरट्यात मी जाणार,” असे स्पष्ट केले.कोकाटे यांनी जी ऑफर दिली,त्यावरून बारामती…

Read More

दीपक मोहिते, धडाडीचे नेतृत्व, आदिवासींचे नेते काळूराम धोदडे काळाच्या पडद्याआड, आदिवासीचे आधारस्तंभ व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे काळूराम काकड्या धोदडे काका हे एक बहुआयामी नेते होते.आज त्यांचे वृद्धापकाळामुळे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. जल,जमीन व जंगल,यावर आदिवासींचा हक्क आहे,तो त्यांना मिळायला हवा,यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या काळूराम धोदडे यांना आदिवासी समाजात अनन्यसाधारण महत्व व त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता.भूमिसेना व आदिवासी एकता परिषद,या दोन संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजासाठी अनेक आंदोलने केली.आपला समाज हा स्वाभिमानाने जगला पाहिजे,असे स्वप्न त्यांनी कायम आपल्या उराशी बाळगले.त्यांनी वेठबिगारी,लगीनगडी, घरगडी,खावटी व पालमोड अशा प्रथा मोडून काढल्या.गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते,पण त्यांनी काम थांबवले नव्हते.त्यांच्यावर आज…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न व समस्या आजही ” जैसे थे,” स्थितीतच, काल मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत महायुतीच्या सरकारने एका दमात ८० निर्णय घेण्याचा विक्रम नोंदवला.यापूर्वी झालेल्या तीन ते चार बैठकीतही २०० ते २५० निर्णय घेतले होते.हा एकप्रकारे विक्रमच म्हणावे लागेल.निवडणुकीवर डोळा ठेवून सरकार हे अशाप्रकारच्या उचापती करण्यात रममाण झाल्याचे पाहायला मिळत आहे.पण घेतलेले निर्णय हे तुमचे-आमचे हित साधण्यासाठी नसून पक्षीय स्वार्थ साधण्यासाठी आहेत.हे एका घटनेवरून सिद्ध झाले आहे.मंत्रीमंडळाच्या बैठकीतून उपमुख्यमंत्री हे मधूनच निघून गेले,कारण अजित पवार गटाच्या अनेक प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी थेट वाटाण्याच्या अक्षता लावल्या.त्यामुळे अजित पवार यांनी संतापाच्या भरात बैठक अर्ध्यात सोडली.आता ते काही कारणे सांगत सारवासारव करत…

Read More

शिंदे/फडणवीस काका,माझ्या प्रश्नाची उत्तरे देशाल का ? १) आमच्या बापाच्या आत्महत्या थांबवणार का ? २) आदिवासी बालकांच्या कुपोषणावर तुमचे सरकार उपाययोजना करणार का ? ३) ग्रामीण भागातील आमची शिवारे पाण्याने भरतील का ? ४) भूमीपुत्राच्या शेतीला पीक विमा योजनेचे लाभ मिळणार का ? ५) ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या जमिनी धनदांडग्याच्या घश्यात घालण्याची सरकारची कटकारस्थाने तुम्ही रोखणार आहात का ? ६) रोजगाराअभावी ग्रामीण भागातील तरुण उध्वस्त होतोय,त्याच्या हाताला काम देणार आहात का ? ७) अंगणवाडीच्या पोषण आहारातील भ्रष्टाचार व गैरप्रकार तुम्ही थांबवणार आहात का ? ८) आश्रमशाळामधील गोरगरीब विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल तुम्ही थांबणार आहात का ? ९) राज्यातील लाखो खेडी…

Read More