Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.९, अनधिकृत इमारतींचा सुळसुळाट असलेला प्रभाग ; या निवडणुकीत परिवर्तन अटळ, प्रभाग क्र.९ हा अत्यंत गजबजलेला असा प्रभाग आहे.या प्रभागात परप्रांतीयांचे प्रचंड प्राबल्य आहे.त्यामुळे या प्रभागात मराठी माणसाला उमेदवारी देणे,म्हणजे ” हात दाखवून अवलक्षण,” करून घेण्यासारखे आहे.गेल्या दोन निवडणुकीत या प्रभागात बहुजन विकास आघाडीने बाजी मारली होती.पण या निवडणुकीत त्यांना ते शक्य होणार नाही.या प्रभागात गेल्या दहा वर्षात बेसुमार अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या,त्यांचे जनक कोण आहेत,हे सांगायला नको.गेली दहा वर्षे येथील परप्रांतीय मतदार हा बहुजन विकास आघाडीला भरभरून मतदान करत आला.पण या निवडणुकीत हा मतदार भाजपकडे वळेल,अशी शक्यता आहे.हा प्रभाग देखील अस्वच्छ प्रभाग म्हणून…

Read More

दीपक मोहिते, ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरात लवकर वाजण्याची शक्यता आहे.काल ग्रामविकास विभागाने ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार अनु.जमाती पुरुष : २ पुरुष,अनु.जमाती महिला : ३ एकूण ५ जागा, सर्वसाधारण पुरुष : ७,सर्वसाधारण महिला : ७,एकूण १४,जागा, अनु.जाती पुरुष : ३,अनु.जाती महिला : २,एकूण ५ जागा, नागरिकांचा मागासवर्ग पुरुष : ४ नागरिकांचा मागासवर्ग महिला : ६ एकूण १० जागा, असे एकूण ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण पडले आहे. ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे – ठाणे -सर्वसाधारण ( महिला ) पालघर – अनुसूचित जमाती रायगड- सर्वसाधारण रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.८, सर्वात बदनाम प्रभाग क्र.८ बविआच्या हातून निसटणार, नालासोपारा पूर्वेस असलेला हा प्रभाग अत्यंत मागासलेला तसेच ८० % अनधिकृत बांधकामाचा वेढा असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो.अठरापगड अस्वच्छता व अश्मयुगातील रस्त्याची आठवण करून देणारा असा हा प्रभाग आहे.या प्रभागात मराठी माणूस अल्पसंख्यांक म्हणून ओळखला जातो.मुस्लिम,उत्तर भारतीय व मारवाडी व्यापारी हे या प्रभागात बहुसंख्यांक आहेत.झोपडपट्या,अनधिकृत चाळी व अनधिकृत इमारती इ.चा प्रचंड सुळसुळाट,जागोजागी कचऱ्याचे ढीग,गुंडाचा मुक्त वावर,गुरुचरण,वन व सरकारी जमिनी या आपल्या बापजाद्यांची जायदाद असल्याची मानसिकता बाळगणारे चाळमाफिया,याना सर्वच राजकीय पक्षांनी पोसले आहे.पाणी,आरोग्य व शिक्षण,कायदा व सुव्यवस्था,स्वच्छता इ. समस्या या प्रभागाच्या पाचवीला पूजल्या आहेत.गेल्या पंधरा वर्षात या…

Read More

दीपक मोहिते, विकासकामांना वेग, अर्नाळा किल्लावासीयांची मुख्य समस्या मार्गी लागण्याची शक्यता, वाहतुकीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या अर्नाळा किल्लावासीयांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात,यासाठी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न चालवले आहेत.अनेक वर्षांपासून अर्नाळा किल्ला गाव ते अर्नाळा गाव दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात यावा,अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाकडे लावून धरली आहे.या महत्वाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे,काही तांत्रिक कारणामुळे मात्र हे काम अनेक वर्षे रखडले आहे.या प्रकरणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी हस्तक्षेप करावा,अशी मागणी करण्यात आल्यानंतर आ.दुबे यांनी संबधित विभागाकडून सविस्तर माहिती मागवून घेतली व मुख्यमंत्री कार्यालयाशी त्वरीत पत्रव्यवहार सुरू केला आहे.लवकरच या विषयी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन हा तिढा लवकरात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा सुरु, ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच,भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “ रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल,तुम्ही तयार आहात का ? ” असे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.नाईक यांच्या विधानाला शिवसेना ( शिंदे गट ) खा. नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. वर्तकनगर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पक्ष बैठकीत बोलताना गणेश नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी “ नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता…

Read More

दीपक मोहिते, शिंदे गट सक्रिय, मनोर / पालघर येथे शिंदे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची “ संघटनात्मक बैठक,” काल उद्योगमंत्री उदय सामंत, पालघर जिल्हा संपर्कमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व हमी, फलोत्पादन,खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले व पालघर जिल्हासंपर्क प्रमुख शिवसेना उपनेते रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटनात्मक घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली.तसेच,पक्षाची आगामी राजकीय दिशा,पक्ष संघटनेची नव्याने रचना, प्रभावी जनसंपर्क आणि संवाद,प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका अधिक सक्रिय कशी राहील,विकास आणि जनसेवा या प्रमुख मुद्द्यांसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुखांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या…

Read More

वाडा प्रतिनिधी, शून्य प्लास्टिक मोहिमेमध्ये शिक्षक व विद्यार्थी सहभागी, वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतने शून्य प्लास्टिक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये चिंचघर गावातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.त्यामुळे शून्य प्लास्टिक मोहिमेचे उद्दिष्ट गाठण्यात ग्रामपंचायतला मदत होणार आहे. वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत गेल्या दोन वर्षांपासून ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असून सुक्या कचऱ्यातून मिळालेले प्लास्टिक पुनर्रप्रक्रियेसाठी पाठवले जाते, पुनर्रप्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या विविध दैनंदिन वापराच्या वस्तू ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वापरण्यात येत आहेत.या प्रकल्पामुळे चिंचघर गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत झाली आहे.ग्रामपंचायतच्या या प्रकल्पाला सी.ए.सी.आर.व ई.पी.एल.या स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. यावर्षी या संस्थांनी चिंचघर ग्रामपंचायतच्या सोबतीने गावात…

Read More

जव्हार प्रतिनिधी जव्हार येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद पालघर तथा पंचायत समिती जव्हार यांच्यातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालय सभागृह, जव्हार येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा गटविकास अधिकारी,पंचायत समिती जव्हार हे होते.यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रतिनिधी,सरपंच महिला प्रतिनिधी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत संचालक,स्वदेश फाऊंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सदर अभियानाची पार्श्वभूमी,उद्दिष्टे, विविध घटक,अभियानाचा कालावधी तसेच अभियान दरम्यान ग्रामपंचायती व संबंधित यंत्रणांनी पार पाडावयाच्या भूमिका,…

Read More

वाडा प्रतिनिधी वाड्यात भात लागवडीवर “बगळ्या,” रोगाचा प्रादुर्भाव, यंदा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत होता.भात रोपाची लागवड केलेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे भात पिकावर बगळ्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संकटामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्याची ओळख भाताचे कोठार म्हणून आहे.येथे मोठ्या प्रमाणावर भातपिकाचे उत्पादन घेतले जात असून वाडा कोलम तांदुळ देशभरात नावारूपाला आला आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीत लागवड केलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुका कृषी विभागाने शेतक-यांना मदतीच्या दृष्टिकोनातून गावा- गावातील बाधित शेतकऱ्यांची तात्काळ माहिती घेऊन त्यांना…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.७, ” ओरबाडून खाणे,” हा एकमेव एककलमी कार्यक्रम राबवण्यात आला, काल निवडणूक शाखेने प्रभाग रचनेवर आलेल्या १६० हरकतीवर सुनावणी नुकतीच पार पाडली.या सूनावणीमध्ये किती हरकतीचा निपटारा करण्यात आला. याविषयीची माहिती अद्याप प्रसिद्ध झाली नाही.मात्र तिचा रीतसर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्राने सांगितले.प्रभाग रचना व आरक्षण,ही महत्वाची कामे हातावेगळी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.मात्र हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे असून या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील.अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता जरी असली तरी राज्य निवडणूक आयोगाने…

Read More