Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” जुगलबंदी,” लवकरच धुळवडीचे शिमग्यात रूपांतर होणार, आपल्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी आपण एकमेकांवर रंगाची उधळण करत असतो.पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक पूर्व धुळवडीला सुरुवात केली आहे.या धुळवडीचे येणाऱ्या काळात शिमग्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना, ” आपल्याला गुलाबी रंगाची गरज नाही,आपला सफेद असलेला पेहराव स्वच्छ आहे,आणि तो इतर कोणत्याही रंगाला फिकट करु शकतो.त्यामुळे आपल्याला गुलाबी होण्याची गरज नाही,असे वक्तव्य केले.त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका न करता ” सफेद रंग हा चांगलाच असल्या,” चे सांगून यावरून वाद…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे यांच्या मुखातून भाजपच बोलत आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुका,या नोव्हे.मध्ये होतील,असे संकेत दिले आहेत.या निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे,असेही ते पुढे म्हणाले. निवडणूक कधी होणार,याविषयी शिंदे यांनी दिलेल्या संकेतासोबत त्यांनी महायुतीचे जगावाटप कशा पद्ध्तीने होईल,याबाबत माहिती दिली आहे.ते म्हणाले,नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट पाहून जागावाटप होईल.यापूर्वी भाजपनेही महायुतीमध्ये या अशाच पद्धतीने जागावाटप करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे काल शिंदे यांनी जे भाष्य केले,त्यावरून त्यांच्या मुखातून भाजपच बोलले आहे,अशी चर्चा सुरू झाली आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्ट्राईक रेट मध्ये अव्वल क्रमांकावर होता,त्यानंतर शिवसेना (…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, स्थानिक भूमीपुत्रांचे पारंपारीक व्यवसाय टिकायला हवेत, कोकण विभाग हा शेती व मासेमारी व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.या विभागाला ७२० कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.येथे शेती व मासेमारी या दोन व्यवसायावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.या दोन्ही व्यवसायाने स्थानिक भूमीपुत्राना आर्थिक सुबत्ता मिळवून दिली.मात्र गेल्या काही वर्षात या दोन्ही क्षेत्राला घरघर लागली असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात घटत गेले.मासेमारी क्षेत्र मात्र कमी होण्यामागे अनेक मानवनिर्मित कारणे आहेत. या दोन्ही व्यवसायात अपार कष्ट करत स्थानिक भूमिपुत्र कसेबसे टिकून आहेत.पण गेल्या काही वर्षात स्थानिक भूमिपुत्राची मुले या क्षेत्रापासून फारकत घेऊ लागले आहेत.कारण या व्यवसायात धनदांडग्याचा शिरकाव,निसर्गाचा लहरीपणा व मत्स्यउत्पादनात सतत होणारी घट,इ.महत्वाच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई विधानसभा ; कॉग्रेसच्या अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, महाविकास आघाडीमध्ये सध्या वसई विधानसभा मतदारसंघ ही जागा कोणी लढवायची यावरून शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मतैक्य होत नसल्याचे समोर आले आहे.आजच्या घडीला शिवसेनेकडे पण आ.हितेंद्र ठाकूर यांना टक्कर देईल,असा चेहरा नाही,तरीही त्यांनी या जागेचा हट्ट धरला आहे.पण ही जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यांचे उमेदवार संभाव्य उमेदवार विजय पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७६ हजार ९५५ मते घेतली होती.तरीही आ.हितेंद्र ठाकूर यांच्याकडून त्यांचा २५ हजार ९९५ मतांनी पराभव झाला.या लढतीत आ.ठाकूर यांना १ लाख २ हजार ९५० मते मिळाली होती.त्यांना…

Read More

दीपक मोहिते, “सांस बोल,” वसई गाव; कॉग्रेसच्या अनेकांचे ” गुडघ्याला बाशिंग,” शिवसेना (उबाठा) यांच्याकडून महाविकास राज्यामध्ये सध्या वसईेंद्र कोड ही जागा कोणीही समाधानी आहे. पण ही जागा भारतीय राष्ट्रीयत्वाकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यांचे समर्थक विजय पाटील यांनी २०१९ च्या लोकशाहीच्या सुमारे ७६ हजार ९५५ मते मांडली होती तरी आ.हितेंद्र ठाकूर यांच्याकडून २५ हजार ९९५ मत मांडले होते. मत ५४.१८ % तर विजय पाटील यांना ४०.०५ % मते पडली. आमदार मनसेचे प्रफु ठाकूर यांना ३ हजार ५४० मते (१.८६ % ) विजय पाटील यांना विजय पाटील यांनी सांगितले. ख्रीष्टी मते होती.पण या कदापि ही माहिती पुन्हा आ.ठाकूर यांच्या पारत जाण्याची…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नोटांच्या खोक्यावर ज्या पक्षाचा डोलारा उभा आहे,ते फुलं नाहीतर नोटाच उधळणार… ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मठात नोटाची उधळण करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन शिवसैनिकावर आता पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.पण ही कारवाई करताना शिंदे गटाने या दोघा शिवसैनिकाकडून खुलासा करा,आदेश दिला आहे.या घटनेची व्हिडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली असताना त्यांच्याकडून खुलासा मागणे,हे न समजण्या पलिकडचे आहे.कारण ज्या पक्षाचा डोलारा हा खोक्याच्या पायावर उभा आहे.त्यांच्या शिलेदारांकडून नोटांचाच पाऊस पडणार,त्यांनी ते कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडले. कारण,त्यांनी आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा इव्हेंट पार पाडला आहे.अडीच वर्षांपूर्वी या पक्षाचे नेते व आमदारांवर खोक्यांचा पाऊस पडला होता.तर…

Read More

दीपक मोहिते राज्यात हळवे भात कापणीला सुरुवात, राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे भाताचे पीक बऱ्यापैकी आले आहे.राज्याच्या पठारी व डोंगराळ भागात हळवे,गरवे व नीमगरवे अशा तीन प्रकारच्या भाताची लागवड करण्यात येते.सध्या हळवे भात तयार झाले असून पिकाची कापणी वेगाने सुरू झाली आहे.गरवे व निमगरवे भाताच्या कापणीला अनंत चतुर्दशीनंतर सुरुवात करण्यात येणार आहे. दरवर्षी राज्यात मान्सून पाठशिववणीचा खेळ करत असतो,यंदा मात्र त्याने भातउत्पादक शेतकऱ्यांना नाराज केले नाही.जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचे आगमन झाल्यानंतर त्याने सलग महिनाभर हजेरी लावली.त्यामुळे शेतीची प्राथमिक व नंतरची उर्वरित कामे मार्गी लावता आली.नांगरणी,पेरणी, लावणी व आवणीची कामे वेळेवर पार पडली.त्यानंतरच्या काळात राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली, पण ती भातशेतीला…

Read More

दीपक मोहिते, ” आपला आनंद हरपला,” ठाण्यात “आनंद हरपला आहे,” ज्या आनंद मठात आनंद दिघे यांचे वास्तव्य होते,त्या खोलीत पैसे उधळण्याचा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.पैश्याचा इतका माज बरा नाही,अशा प्रतिक्रिया ठाण्यात दिवसभर उमटत होत्या. गणेशोत्सवातील मिरवणुकीत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर ढोल पथकांवर पैसे उधळण्यात आले.ज्या धर्मवीर आनंद दिघे यांनी आयुष्यभर संस्कार,तत्व व हिंदुत्व याची जपणूक केली,त्या दिघे यांच्या मठात असा प्रकार घडावा,हे अत्यंत दुःखदायक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य ठाणेकरामधून व्यक्त होत आहेत.धर्मवीर आनंद दिघे याना दैवत मानतो,त्यांची आपण पूजा करतो,त्यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळणे,अत्यंत निंदनीय आहे,असे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी म्हंटलं आहे.खऱ्या अर्थाने ” आपला आनंद…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” याला ” सबका साथ,सबका विकास,” म्हणायचं का ? मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचे काम आता युद्धपातळीवर सुरु झाले आहे.दुसरीकडे बहुचर्चित वाढवण बंदराचे काम ही लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी अनेक धनदांडग्यांनी या प्रकल्पाच्या परिसरातील गोरगरीब भूमीपुत्राच्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी करण्याचा सपाटा लावला होता.आता या जमिनी सरकारने आपल्याकडून खरेदी कराव्यात,यासाठी ही मंडळी दिल्ली दरबारी येजा करत आहेत.मातीमोल भावाने खरेदी करण्यात आलेल्या या जमिनी हे लोक आता या प्रकल्पाना दामदुपट्टीने विकू पाहत आहेत.या गोरखधंद्यामध्ये सरकारी अधिकारीही सामील आहेत. बुलेट ट्रेन व वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प ग्रामीण भागातील जनतेच्या उरावर उभारण्यात येत आहेत.ग्रामीण भागातील…

Read More

पालघर, मच्छीबाजार फुलले ; खवय्यांची चंगळ सुरू, मात्र,माश्यांच्या दरात प्रचंड वाढ, गेल्या नारळी पौर्णिमेनंतर खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली.आता मच्छिमार बोटी समुद्रकिनारी परंतु लागल्या आहेत.येथे असलेल्या जेट्ट्या गजबजल्या असून मच्छीचे बाजारही सध्या तेजीत आले आहेत. दोन महिन्यांच्या बंदीच्या काळानंतर मासेमारीसाठी गेलेल्या बोटी आता परतू लागल्या आहेत.त्यामुळे सकाळच्या प्रहरी समुद्रकिनारी घाऊक मासेखरेदी करण्यासाठी दररोज झुंबड उडत आहे.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना मासे भरपूर मिळाल्यामुळे मच्छीमारांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.सरंगा,हलवा,सुरमई,बोंबील,कर्ली,कोळंबी,मुशी व अन्य माश्यानी मच्छीबाजार फुलून गेले आहेत.श्रावण महिना संपल्यामुळे खवय्यानीही आपला मोर्चा मच्छीबाजारच्या दिशेने वळवला आहे.रवि,बुध व शुक्र.अशा तीन दिवशी मच्छीबाजारात प्रचंड गर्दी होत असते.तसेच मच्छीच्या दरातही ४० ते ५० रु.ने वाढ झाली…

Read More