Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, सूर्यातीर रणसंग्राम, पालघर जिल्हा ; पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर, एकेकाळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेला हा परिसर कालांतराने पालघर लोकसभा ( अनु.ज. ) म्हणून नावारूपाला आला.या मतदारसंघात वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता पालघर,डहाणू,मोखाडा, बोईसर व विक्रमगड हे पाचही मतदारसंघ अनु.जमातीसाठी आरक्षित आहेत.वसई,नालासोपारा,पालघर,बोईसर व डहाणू हे पाच तालुके रेल्वे व रस्त्यांनी जोडले गेल्यामुळे गेल्या वीस वर्षांत या परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला.नागरीकरणाच्या प्रचंड वेगामुळे नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणांचा अक्षरशः बोजवारा उडाला.पाणी,आरोग्य,शिक्षण,पर्यावरण,प्रदूषण,वैद्यकीय सेवा,रस्ते,वीज व अन्य समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केले.तर दुसरीकडे डोंगरी विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा व विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांना अश्मयुगातील जीवन जगावे…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर,विधानसभा रणसंग्राम-२०२४, १) १२८-डहाणू विधानसभा मतदारसंघ -अनु.ज. डहाणू विधानसभा ; भाजप – मार्क्स.कम्यु.अशीच लढत होणार, १२८-डहाणू विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेला हा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे.पूर्वी हा मतदारसंघ तलासरी विधानसभा म्हणून ओळखला जायचा,२००९ साली झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये तलासरीचा परिसर डहाणू मतदारसंघाला जोडून नवीन डहाणू विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.पूर्वीच्या तलासरी विधानसभा मतदारसंघावर मार्क्स.कम्यु.पक्षाचे कायम वर्चस्व राहिले.त्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने ९० च्या दशकात मार्क्स.कम्यु.पक्षाशी जोरदार संघर्ष केला.भाजपचे नेते कै. गोपीनाथ मुंडे यांचे या मतदारसंघावर कायम लक्ष असायचे.मार्क्स.कम्यु.व भाजपच्या कार्यकर्त्यात अनेकदा तुफान हाणामाऱ्या झाल्या.पण अनेक वर्षे भाजपची डाळ शिजू शकली नाही.२०१४ साली मात्र भाजपने या…

Read More

दीपक मोहिते, उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर जोरदार हल्ला, मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ” महाराष्ट्र बंद ,” च्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद बोलावली होती.या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.यावेळी त्यानी मुख्यमंत्री शिंदे हे विकृत मानसिकतेचे असल्याचा आरोप केला. बदलापूर येथे शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले,या दुर्देवी घटनेमुळे लोकांमध्ये संताप असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.तर पोलीस व शाळेचे संस्थाचालक यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे.तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला.त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बदलापूरकरानी रस्त्यावर उतरून…

Read More

संजय निपाणे,जळगाव, ….तर महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबू शकते, पाणीटंचाई व दुष्काळ ही दोन्ही संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत.दरवर्षी ग्रामीण भागातील जनता या दोन्ही संकटाचा कायम मुकाबला करत आली आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिला व लहान मुले पाहिली की हृदय पिळवटून निघते. ग्रामीण भागात असे चित्र कायम पहावयास मिळते,ते आजवर बदलण्याचे प्रयत्न झाले खरे,परंतु या प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा नव्हता.त्यामुळे आजही ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.ग्रामीण भागातील पाणीटंचाई संपुष्टात यावी,यासाठी अनेक योजना आल्या.हजारो कोटी रु.खर्च झाले.परंतु परिस्थिती ” जैसे थे,” च राहिली,ती आपण बदलू शकलो नाही.आजही ग्रामीण भागात डोंगरमाथ्यावरुन दररोज कोसळणारे अब्जावधी द.ल.लि.पाणी वाया जात असते,ते पाणी अडवण्यासंदर्भात सरकारने पावले उचलली…

Read More

अनंत साटम, कोकणातील ३०० गांवे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल,यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिध्द केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका- ४४,खेड – ८५, लांजा-५०,राजापूर- ५१ व संगमेश्वर तालुक्यातील ८१ अशी एकूण पाच तालुक्यातील ३११ गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.या अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी जीवनावर परिणाम होणार आहे,अशा ग्रामस्थांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड,नवी दिल्ली यांच्याकडे आपला अभिप्राय नोंदवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर चे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पोलिसांनी निदान आता तरी वामन म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अखेर बदलापूरच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर पोलिसांनी अँट्रोसिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस टाळाटाळ करत होते.मात्र या प्रकरणी सदर महिला पत्रकाराने असभ्यपणे वागणाऱ्या वामन म्हात्रे याना धडा शिकवण्याचे ठरवल्यामुळे पोलीस पुन्हा अडचणीत आले होते. अखेर त्यानी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७९ व अनु.जाती व अनु.जमाती ( अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ ( १ ) ( ब ) ( २ ) व कलम ३ ( २ )…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्री शिंदे यांचे ताळतंत्र सुटले, बदलापूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बेताल व्यक्तव्य केले,त्यामुळे आता आगीत तेल ओतले गेले आहे.वास्तविक या संवेदनशील विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे होते.आपला एक सहकारी आंदोलकांवर बेफाम आरोप करत असताना त्यांनी आवर घालण्याऐवजी त्याची री ओढल्यामुळे आंदोलकामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.ते काय म्हणाले ते पहा,” या आंदोलनात स्थानिक नागरिक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते.अनेक आंदोलकांना बाहेरुन गाड्या भरून आणले होते,या सर्व घडामोडीमागे राजकीय प्रेरणा आहे,असा हास्यास्पद दावा केला. पीडित मुलीच्या पालकांना बदलापूर पोलीस बारा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं,त्या मुलीच्या गरोदर आईच्या अंगात १०२ ताप…

Read More

दीपक मोहिते, भयावह वास्तव, मराठी पत्रकारितेच्या घसरणीला आपणच जबाबदार, ” जेफप्लस,” यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्यंगचित्राने प्रसिद्धी माध्यमावर सध्या धुमाकूळ घातला आहे.एक गाढव कागदावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे,असे या व्यंगचित्रात दाखवण्या आले आहे.गाढवाच्या डोक्याऐवजी एक मानवी हात आहे,जो पेन धरून लिहीत आहे.हे व्यंगचित्र आजच्या मराठी पत्रकारितेची अवस्था कशी झाली आहे,यावर प्रकाश टाकते. आज मराठी पत्रकारितेत अर्धवट माहिती असलेल्या संपादक व पत्रकारांची संख्या सतत वाढत आहे.हे पत्रकार कोणत्याही विषयाची सखोल माहिती न घेता,अर्धवट तथ्य आणि वस्तुस्थितीवर आधारीत बातम्या देत नाहीत.त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. पत्रकारितेचे ओळखपत्र घातल्याने कोणी पत्रकार होत नाही.संपादक व पत्रकार होण्यासाठी उत्तम लेखन कौशल्य…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, २४ ऑगस्ट रोजी ” महाराष्ट्र बंद,” बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षाने आता महायुतीच्या सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.येत्या शनि.२४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने ” महाराष्ट्र बंद,” ची हाक दिली आहे.शाळेची संस्था भाजपशी संबधित असल्यामुळे पोलिसांनी दबावाखाली येऊन कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून महायुती सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचे माध्यमासमोर आज स्पष्ट केले. बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी संस्थाचालक व पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे बदलापूरकरांचे म्हणणे आहे.त्यामुळे काल लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले.या घटनेमुळे सरकार आता अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या काही…

Read More