Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, मुंबईच्या क्षितिजावरून… सुज्ञ मतदार,मिंध्ये सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही, कोरोनानंतर मुंबई महानगर पालिकेचा प्रशासकीय कारभार शासनानियुक्त प्रशासकाकडे गेल्यानंतर नावाजलेल्या शहराची अक्षरशः दुर्दशा झाली.प्रशासकाच्या माध्यमातून मिंध्ये सरकारने मनमानी तसेच उधळपट्टीचा कारभार करत आपले खिसे भरले.अधिकारी व मिंध्ये सरकारच्या नेत्यांनी ” आपण दोघे भाऊ भाऊ,धुसून पुसून खाऊ,” असे धोरण राबवले.या नेत्यांची व अधिकाऱ्यांची घरे भरली,पण मुंबई शहरातील करदात्यांची मात्र पार दैना झाली.चालायला धड रस्ते नाहीत,अनधिकृत फेरीवाल्यांचे पदपथावर अतिक्रमण,वाहतूककोंडी,शहर स्वच्छतेवर हजारो कोटी रु.खर्च करूनही शहराला आलेले बकाल स्वरूप,महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भ्रष्टाचाराला आलेला ऊत, रस्त्याच्या कामात बोकाळलेला आर्थिक गैरव्यवहार,निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना देण्यात येणारी कामे,कामे न करता देयके अदा…

Read More

दीपक मोहिते, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढत, महाविकास आघाडीतर्फे १३२ नालासोपारा व १३३ वसई हे दोन विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार आहेत,याविषयी असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पंकज देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.बविआचे क्षितिज ठाकूर,भाजपचे राजन नाईक व शिवसेनेचे ( उबाठा ) पंकज देशमुख यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल,अशी शक्यता आहे. भाजपचे राजन नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले भाजपचे नेतृत्व आहे.गेली अनेक वर्षे त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषवले असून वसई तालुक्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडूनही गेले होते.२०१४ साली त्यांनी विधानसभा लढवली होती.त्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या…

Read More

दीपक मोहिते, भान, लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांचा संयम व समंजसपणा वाखाणण्याजोगा, संकटकाळात संयम,समजूतदारपणा व सामंजस्य हे तीन मानवी गुण लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांच्या ठायी ठायी भिनले आहेत,याचे प्रत्यंतर गेल्या पंधरा दिवसात जिल्हावासीयांना आले.माध्यमे राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून सर्वत्र दिशाभूल करणारी व कोणताही आधार नसताना वृत्ते प्रसारीत करत होती.पण या काळात लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर हे दोघे पितापुत्र शांतपणे आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होते.हे दोघेही आपल्या विवा महाविद्यालयातील कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताना भेटत होते व त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकण्यात गर्क होते.त्यांनी दाखवलेला हा संयमी व समंजसपणा खरोखरच कौतुकास्पद असाच होता.दररोज अनेक बातम्या कानावर येत होत्या,पण त्यांनी कधीही त्यावर…

Read More

दीपक मोहिते, सुर्यातीर, बेसुमार वृक्षतोड ; सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात… १९७० च्या दशकात आकाशवाणीवर नेहमी एक गाणं आम्ही ऐकत असू,ते गाणं असायचे,”वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी,” हे गाणं आम्हाला इतकं पाठ असायचे,कि आमचे आई व बाबा म्हणायचे,अभ्यास लक्षात राहत नाही,पण गाणी मात्र चांगली लक्षात राहतात,पण त्यांनाही हे गाणं खूप आवडतं असे.आता काळ बदलला,बदल व आधुनिकतेच्या लाटांमध्ये सार काही लुप्त झाले.उरल्या त्या केवळ आठवणी…मानवजात आता वृक्षवल्ली आम्हा सोयरी मानायला तयार नाही,उलट आज तो वृक्षवल्लीच्या जीवावर उठला आहे.विकासाच्या नावाखाली मानवाने जो धुडगूस घातला आहे,तो पाहता येणाऱ्या काळात पर्यावरणाचा प्रश्न अधिकाधिक जटील होणार आहे.एकीकडे ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प तर दुसरीकडे जंगलेच नाहीशी करण्याचे षडयंत्र,अशा…

Read More

दीपक मोहिते, वसई विधानसभा मतदारसंघाचा आमदार मीच असेन – आ. हितेंद्र ठाकूर, अखेर आम्ही केलेली दोन्ही भाकीते खरी ठरली,पहिलं भाकीत होत की चहाच्या पेल्यात उठलेले वादळ लवकरच शमणार.दुसरं भाकीत होत,वसई विधानसभा मतदारसंघातून आ.हितेंद्र ठाकूर हेच बविआचे उमेदवार असतील.आज विरार येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विरार पश्चिमेस असलेल्या क्लब वन येथे आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या उमेदवारी संदर्भात घोषणा केली. त्यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी त्याचे भाषण थांबवून वसई विधानसभा मतदार संघातून त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी केली.त्यानंतर बोलताना आ.ठाकूर पुढे आपल्या भाषणात म्हणाले,माझा…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, नालासोपारा विधानसभा ; भाजपच्या राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.गेल्या दहा दिवसापासून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार,यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती.पण भाजपच्या पहिल्या यादीत नालासोपारा येथून राजन नाईक यांची उमेदवारी जाहीर होईल,असा अंदाज होता,तो खरा ठरला आहे. या मतदारसंघात डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या नावांची चर्चा होत होती.पण गेली तीन दशके भाजपमध्ये सक्रिय असलेले राजन नाईक यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिली पसंती दिली.राजन नाईक यांनी २०१४ साली या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती.त्यावेळी बविआचे आ.क्षितिज ठाकूर,सेनेचे शिरीष चव्हाण व भाजपचे राजन नाईक,यांच्यामध्ये…

Read More

दीपक मोहिते, वसई शिवसेनेचे ( उबाठा ) पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देणार, महाविकास आघाडीच्या जागावाटपात १३३ वसई विधानसभा मतदारासंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे.मात्र ही जागा शिवसेनेला ( उबाठा ) देण्यात यावी,अन्यथा वसई तालुक्यातील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी व शिवसैनिक आपल्या पदाचे राजीनामे देतील,असा इशारा देण्यात आला आहे.आज वसई शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांची स्वाक्षरी असलेले पत्रक वायरल झाले आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत १३३ वसई विधानसभा ही गेली २४ वर्षे लढवत शिवसेना लढवत आली.या मतदारसंघात शिवसेनेला चांगला जनाधार असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारती कामडी यांनी ६६…

Read More

दिपक मोहिते, धुरळा खाली बसला,पदाधिकारी कार्यकर्ते व पीआर कंपन्या कामाला लागले, अफवांचे पीक निवळले व समज-गैरसमजाचा धुरळा खाली बसल्यानंतर बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता एकीने व एकदिलाने कामाला लागले आहेत.तिन्ही मतदारसंघात बविआच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.सर्वत्र बैठकांचा सिलसिला जोरात सुरू झाला आहे. या तिन्ही विधानसभा जागांवर बविआसमोर फार मोठे आव्हान नसले तरी वरिष्ठ नेते कार्यकर्त्याना गाफिल न राहता,मतदारांशी सतत संपर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.लढतीचे चित्र स्पष्ट झाले कि प्रचाराचे धुमशान सुरू होणार आहे.प्रचारासाठी यावेळी सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे.अनेक पक्षांनी प्रचारासाठी मुंबईतील पीआर कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत.या कंपन्या आचारसंहिता व निवडणूक आयोगाची करडी नजर सांभाळून उमेदवाराच्या प्रचाराची…

Read More

दिपक मोहिते, परतीच्या पावसाचा प्रताप,शेतकरी भितीच्या सावटाखाली, गेल्या चार दिवसांपासून दररोज संध्याकाळी होत असलेल्या परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यातील भातउत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.भातपिकाची अतोनात हानी झाली असून या हानीची सरकारने अद्याप दखल न घेतल्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे शेतकरी खूप आनंदात होते,तसेच पावसाने प्रारंभी दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची प्राथमिक कामे जलदगतीने उरकली.नंतरच्या काळातही शेतीला आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.नांगरणी,पेरणी, आवणी,लावणी इ.कामे वेळेवर करणे,शक्य झाले.मात्र भाताची रोपे तयार झाल्यानंतर ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार परतीच्या पावसाने कोकण विभागातील जिल्ह्यांना जबर फटका देण्यास सुरुवात केली.गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये घमासान, जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये सध्या घमासान सुरू झाले आहे.दोघांचे वरिष्ठ नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत असले तरी दोघांच्या घराच्या चिमणीतून धूर बाहेर पडू लागला आहे.महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले व संजय राऊत या दोघांमध्ये दररोज कलगीतुरा रंगत आहे.नाना पटोले याना आवर घालण्यासाठी राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे या दोघांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांना मुंबईत पाचारण केले आहे.त्यांनी मुंबईत आल्या आल्या मातोश्रीवर जाऊन सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली व तोडगा दृष्टीक्षेपात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही ” रबर तुटेपर्यंत ताणू नका,” असे स्पष्ट करत…

Read More