- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
शाम पुरोहित,पालघर, मोखाडा ग्रामस्थांची पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयास भेट, मोखाडा तालुक्यातील चार ते पाच अतिदुर्गम गावातील गावातील ग्रामस्थानी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय पाहण्यासाठी भेट दिली. शिवछत्रपती पाडा समिती सप्रेवाडी आणि परिवर्तन पाडा समिती बेडूकपाडा यांच्यातर्फे ग्रामस्थांसाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यालयातील कार्यालये कशा स्वरूपाची आहेत, तसेच या कार्यालयातील कारभार कसा चालतो,हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी या ग्रामस्थांनी ही भेट दिली.यावेळी प्रत्येक कार्यालयात त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बसून गावकऱ्यांनी अध्यक्ष निकम यांच्या सोबत संवाद साधलाआणि विविध प्रश्नांवर चर्चा केली. पहिल्यांदाच मुख्यालयाची इमारत आणि अधिकारी आणि पदाधिकारी यांची दालने पाहून ग्रामस्थांनी…
पालघर, पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी ; शेतकरी आनंदात, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेला मान्सून काल रात्रीपासून पुन्हा सक्रिय झाला आहे.काल रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.तसेच सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. सुमारे दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने काल रात्री पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्हावासीयांना सुखद धक्का बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले होते.पावसाअभावी शेतीची शिल्लक कामे अनेक दिवसांपासून रखडली होती.तर दुसरीकडे शेतमजुरांना बसून पगार द्यावा लागत होता.त्यामुळे यंदा भातशेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो कि काय ? अशा मनःस्थितीत शेतकरी सापडले होते.शेतमजुरांना बसून पगार दिला नसता तर ते…
शाम पुरोहित,पालघर, भाजप ओबीसी मोर्चाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न, सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.नोव्हें किंवा डिसें. मध्ये येणाऱ्या निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक श्री. विजय भाऊ चौधरी महामंत्री,भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र प्रदेश, आ.योगेश टिळेकर व संजय गाते ( प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश,ओबीसी मोर्चा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मायक्रो ओबीसी घटकांची बैठक व बूथस्तरापर्यंत ओबीसी कार्यकर्त्यांचा प्रवास, विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी मोर्चाची भूमिका याविषयी विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीला ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,विनोद दळवी, वनिता लोंढे, उपाध्यक्ष…
प्रमोद डुंबरे,नालासोपारा, नालासोपारा पूर्वेस पेल्हार येथे महाविकास आघाडीची मूक निदर्शने, असंवेदनशील, मुके,बहिरे,महिलांवरील होणारे अत्याचार रोखू न शकणारे आणि गुन्हेगारांना संरक्षण देणारे महाराष्ट्राच्या महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) आणि शिवसेना ( उबाठा ) या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले.हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशप्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत पेल्हार हायवेवर काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे अभिजित घाग,अम्मार पटेल,निझाम खान,आनंद चौबे,अशोक शर्मा,रितेश सोलंकी,संदीप किणी, संकेत वसईकर,आमिर देशमुख,तारिक खान,देवा तरे,जमील देशमुख, इब्राहिम बकाई,मुस्तफा इसाभाई पटेल,अब्दुल रेहमान,अरफात शेख, सज्जाद अन्सारी,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) जिल्हा उपाध्यक्ष सोहेल शेख,समर खान तसेच…
अजय काळभोर,वसई, वसई पाचूबंदर क्षेपणभूमी ( डम्पिंग ) ; त्वरित बंद करा- वसईकरांचा आक्रोश, वसई-पाचूबंदर येथे असलेल्या बेकायदा क्षेपणभूमीमुळे येथील मत्स्यव्यवसाय व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.ही क्षेपणभूमी त्वरित बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. याविषयी नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वसई भाजपचे नेते मनोज पाटील यांनी आरोग्य निरीक्षक व स्थानिक नागरिकांच्या सोबत सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणीत येथे बेकायदा क्षेपणभूमी ( डम्पिंग) निर्माण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षेपणभूमीवर मोठ्या प्रमाणात कचरा आणण्यात येत असल्याचेही त्यांना दिसून आले.त्यामुळे मनोज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत वसई-विरार महापालिकेच्या गाड्यांना या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध केला. शिवाय पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना जाब…
अनिल वैद्य,नाशिक, ताणतणावाच्या वातावरणातही मुख्यमंत्री शिंदे निसर्गाच्या सानिध्यात रमले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असलेल्या संवेदनशील निसर्गप्रेमी माणसाचे दर्शन आज नाशिककराना घडले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिक येथे लाडकी बहीण मेळाव्याच्या निमित्ताने दौऱ्यावर आले होते.नाशिक जवळच असलेल्या ओझर विमानतळाजवळ असणाऱ्या वनराईमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका मोराच्या हालचालीने त्यांचे लक्ष वेधले.आकाराने खूप मोठा असणारा मोर विमानतळाच्या कंपाऊंड लागत असलेल्या डीपीच्या बॉक्सवर बसला होता.या परिसरात मोर आणि अन्य वन्यजीवांचे मोठ्याप्रमाणावर वास्तव्य आहे.सतत राजकीय वातावरणात आणि ताणतणावात काम करत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष त्या मोरावर गेले.त्यांच्यातील निसर्गप्रेमी संवेदनशील माणूस जागृत झाला आणि त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या मोराचा…
प्रमोद डुंबरे,नालासोपारा, नालासोपारा पूर्व भागात एकाची हत्या तर अन्य तीन जण जखमी, तीन दिवसांपूर्वी एका मुलांवरून झालेल्या किरकोळ भांडणातुन आज तरुणाने तीन जणांवर हल्ला केला.यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या जखमीना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री नालासोपारा पूर्व भागातील कारगिल या परिसरात ही घटना घडली.किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोन गट एकमेकांना भिडले,यावेळी रफिक,सलीम व त्यांच्या अन्य चार साथीदारांनी दिपू उर्फ दीपक पाल,आकाश पाल व शुभम ठाकूर या तिघांवर धारदार चाकूने हल्ला चढवला.या हल्ल्यात दिपू जागीच ठार झाला तर आकाश व शुभम ठाकूर हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले.तर दुसऱ्या गटातील…
अनिरुद्ध सावंत,मुंबई, न्यूजलाईन, मविआचे राज्यात सर्वत्र मूक निदर्शने, महाराष्ट्र बंदला,न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्षानी आज तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने केली.या निदर्शनामध्ये शिवसेना ( उबाठा ),राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,हे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष सहभागी झाले होते.तर दुसरीकडे भाजपने या निदर्शनाला काऊंटर करण्यासाठी प्रती आंदोलन केले.भाजपच्या या कृतीमुळे अनेक नागरिकांनी नापसंती व्यक्त केली. महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या या मूक आंदोलनात शरद पवार,उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,सुप्रिया सुळे,विजय वडेट्टीवार,नाना पटोले,संजय राऊत,अंबादास दानवे,सुषमा अंधारे,वर्षा गायकवाड व अन्य वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.भर पावसात हे आंदोलन पार पडले.या आंदोलनाला अपशकुन करण्यासाठी भाजपनेही काऊंटर आंदोलन छेडले.वास्तविक भाजपने छेडलेल्या या…
दीपक मोहिते, ” न्युजलाईन,” नियती ही नेहमी चांगल्याला साथ देत असते, ४७ वर्षांपुर्वीबरोबर आजच्या दिवशी, स्वातंत्र्यानंतर प्रथमच,काँग्रेस आणि इंदिरा गांधींचा अत्यंत दारूण पराभव झाला होता. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या आवारात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांना जनता पक्ष आणि आताच्या भाजपच्या तत्कालीन जनसंघाने एक घोषणा तयार केली होती ” काँग्रेसवाला दाखवा आणि शंभर रु.मिळवा,” त्यावेळी काँग्रेसजनांनी हा अपमान गिळला होता.त्यावेळी युवक काँग्रेस मात्र चांगलीच आक्रमक झाली होती. दिल्लीच्या मतमोजणीत काँग्रेसचे सारे उमेदवार भरपूर मागे पडले असतांना,बिकट स्थितीतही काँग्रेसचे युवक या घोषणेला आव्हान देत उभे होते, ” हां हां हम है काँग्रेसी, लाओ सौ रूपये,” अशी प्रतिघोषणा देण्याचे धाडस त्यांनी…
अनिल वैद्य,नाशिक, शेतकऱ्यांच्या व्यथा, सोयाबीनच्या घसरत्या दराबाबत हस्तक्षेप करा ; किसान सभा, खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत.सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा ७९२ ते १ हजार ३९२ रु. प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना होत असलेला तोटा थांबवावा व आगामी काळात सोयाबीनला जास्त भाव मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा,अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा केली आहे. केंद्र सरकारने सुरू असलेल्या हंगामासाठी सोयाबीनला ४ हजार ८९२ रु प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता.मात्र शेतकऱ्यांना बाजारामध्ये सध्या ३ हजार ते ४ हजार…
