- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
नदीम शेख,पालघर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण मोहीम, खावडा ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रम राबवण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.हा उपक्रम पर्यावरणीय शाश्वततेबाबतच्या प्रकल्पाच्या कटिबद्धतेचे निदर्शक आहे, जो भारताच्या वीज प्रेषण पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या त्यांच्या मुख्य उद्दिष्टासोबत असा सुसंगत आहे. या वृक्षारोपण मोहिमेत स्थानिक समुदायांचा, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत सामायिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.विक्रमगड तालुक्यातील उटवली गावाच्या आदर्श विद्यालयात १०० रोपांची लागवड करण्यात आली, ज्यामध्ये ३० विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.विद्यार्थ्यांना रोपे देखील देण्यात आली. जेणेकरून त्यांनी त्यांची काळजी घेत पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना कळावी.…
जव्हार प्रतिनिधी, १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सिल्वर मेडल, ज्ञानराज इंग्लिश मिडीयम स्कूल,आळे,ता.जुन्नर,जि.पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या ८ वीचा विद्यार्थी कु.भाग्येश संतोष रजपुत याने इंटरनॅशनल इंडो-नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये १०० मी.धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल पटकावले आहे.या उल्लेखनीय यशासाठी भाग्येशला त्याचे आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठोर मेहनत,सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. या यशामुळे त्याचे जव्हार तालुक्यातील ग्रामस्थ,शिक्षक, मित्रमंडळी व कुटुंबीयांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून,भाग्येश हा भविष्यातील एक आशादायक खेळाडू म्हणून पुढे येतो आहे, याबाबत संपूर्ण परिसरात अभिमान व्यक्त होत आहे.समस्त ग्रामस्थ जव्हार यांच्यातर्फे कु.भाग्येश रजपुत याचे मनःपूर्वक…
वाडा, प्रतिनिधी, वाडा येथे रॅलीचे आयोजन, वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाडा उपविभाग येथे विद्युत सुरक्षा व वीज बचत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रवीण सुटे कार्यकारी अभियंता वसई यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी रॅलीचे उद्घाटन केले. उपविभागातील शाखाधिकारी वाडा शहरचे नागेश कांबळे, वाडा ग्रामीणचे राहुल शिंदे, खानवली शाखेचे तसंव्वर मंसूरी व वाडा उप विभागाचे गुण नियंत्रक प्रयास मांडवे व शाखा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आज सकाळी वाडा उपविभाग ते परळी नाकामार्गे तहसील कार्यालय ते खंडेश्वरी नाका अशी रॅली काढली.
दीपक मोहिते, ” सत्तेचे राजकारण,” बिहार विधानसभा निवडणुक ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे सुरू झाले, यावेळी सत्तापालट होण्याची शक्यता, येत्या नोव्हें.महिन्यात बिहार व मे २०२६ मध्ये आसाम,केरळ,तामिळनाडू व प.बंगाल या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.बिहार राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून गेल्या महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहार राज्याचे दौरे सुरू झाले आहेत.या राज्यात भाजप व नितीशकुमार यांच्या पक्षाचे संयुक्त सरकार आहे.आसाममध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे.केरळ,तामिळनाडू व प.बंगालमध्ये अनुक्रमे मार्क्स.कम्यु.द्रमुक व तृणमूल काँग्रेस,हे तिन्ही पक्ष गेली अनेक वर्षे सत्तेत आहेत.भाजपने गेल्या काही वर्षांपासून दक्षिणेत आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले.पण कर्नाटक वगळता त्यांना इतर राज्यात जनतेचा फारसा प्रतिसाद मिळू शकला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकारणाच्या जीवघेण्या खेळात,पालघरवासियांची अवस्था,” सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,” पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे दौरे,जनता दरबार, आढावा बैठकी व गावांना भेटी,अशा वारंवार होणाऱ्या गैरलागू उपक्रमामुळे पालघर जिल्ह्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहॆ.जिल्हा परिषद,जिल्हाधिकारी,प्रांत कार्यालय,तहसीलदार व पंचायत समित्या, नगरपरिषदा,नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन व उपक्रम राबवण्यात शक्ती व प्रचंड सार्वजनिक पैसा खर्ची पडत आहॆ. त्यामुळे प्रशासकीय कामकाजही दिवसेंदिवस विस्कळीत होत चालले आहॆ.या सर्व कार्यालयाचे तमाम अधिकारी व कर्मचारीवर्गाला दप्तर घेऊन पालकमंत्र्यांच्या मागे धावे लागत आहॆ.मात्र लोकांची कामे मात्र मार्गी लागत नाहीत.त्यामुळे पालकमंत्र्यांनी हा तमाशा बंद करावा,अशी मागणी करण्यात येत आहॆ. लोकांची कामे…
सफाळे प्रतिनिधी, सफाळ्यात महावितरणचा भोंगळ कारभार,ग्रामस्थ त्रस्त, महावितरणच्या सफाळे विभागात गेल्या काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहॆ. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.दोन दिवसापूर्वी पालघर बिडको भागात ३३ के.व्ही.लाईन जळाल्यामुळे रात्री साडेसातच्या सुमारास सफाळे आणि आसपासच्या परिसरात खंडीत झाला.तो वीजपुरवठा तब्बल १५ तासानंतर सुरळीत झाला. सफाळे पूर्व आणि पश्चिम भागातील विविध गावापाड्यात गेल्या काही दिवसापासून सतत वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे नोकरदारवर्ग, विद्यार्थी,व्यापारी यांच्यासह बँका तसेच विविध ऑनलाईन व्यवहाराला फटका बसला आहे.महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. सफाळे पूर्व-पश्चिम भागात अनेक गावे असून शेती वाड्या,दुग्ध व्यवसाय,करत असतात. यंदा मेच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर परिसरात सातत्याने वीजपुरवठा…
दीपक मोहिते, जागतिक पर्यावरण दिन विशेष, पर्यावरणाचे बिघडते संतुलन ; मानवाची वाटचाल विनाशाकडे, आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे.पर्यावरणाचे महत्व व भविष्यातील संकटे,यावर सतत विचारमंथन होणे,गरजेचे आहे.आपण सारे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो व त्यानंतर मात्र ” ये रे माझ्या मागल्या,” असेच होत असते.यावरून असे स्पष्ट की आपल्याला केवळ ५ जून एकमेव दिवसाचे महत्व असते.या दिनी पर्यावरण विषयक कार्यक्रम व उपक्रमाची अक्षरशः रेलचेल असते.उर्वरित ३६४ दिवस आपण व आपले राज्यकर्ते या ज्वलंत विषयाकडे ढुंकूनही बघत नाहीत.त्यामुळे आपल्या देशाच्या पर्यावरणाचे संतुलन पार विस्कळीत झाले आहे.अवकाळी पाऊस,अवेळी पाऊस पडणे,दुष्काळ,अधूनमधून ओला दुष्काळ,अशा घटना आपल्या पाचवीला पूजल्या आहेत. पर्यावरण व…
वसंत भोईर,वाडा प्रदूषणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात ; तोरणे शाळा बंद ठेवण्याचा इशारा, वाडा तालुक्यातील तोरणे ग्रामपंचायत हद्दीतील मे. शिवकृपा स्टील अँड अलाइज प्रा.लि.या रासायनिक कंपनीमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे.परिणामी,या परिसरातील नागरिकांचे व जि.प.शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी या कंपनी विरोधात लेखी व तोंडी तक्रारी केल्या,मात्र कंपनी मालक त्याला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे कंपनी ठोस उपाययोजना करत नाही,तोवर शाळा बंद करण्याचा इशारा भूमिपुत्र विकास फाउंडेशनने दिला आहे. मे. शिवकृपा स्टील अन अलाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून निघणारा घातक धूर दिवसाढवळ्या हवेत सोडला जातो.या वायुप्रदूषणामुळे शाळेत शिकणाऱ्या सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या आरोग्याला तसेच हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ; जागा कमी व इच्छुकांची भाऊगर्दी, जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणूका या कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जातात.त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांची संख्या मोठी असते.लहानातला लहान कार्यकर्ता हा देखील या निवडणुकीत इच्छुक असतो.राज्यात गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाना न्यायालयाच्या आदेशामुळे आता लवकरच मुहूर्त लागणार आहे.त्यामुळे या निवडणुकीची तयारी करीत असलेल्या कार्यकर्त्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.दुसरीकडे महायुतीमधील तीन घटक पक्ष आगामी काळात होत असलेली ही निवडणूक युती करून लढवणार की स्वबळावर लढणार,यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.द दरम्यान मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.जागा…
