Author: दीपक मोहिते

सुरेश वैद्य,पालघर पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा- डॉ. भोयर, गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. आज पालघर येथे होणारी कार्यशाळा ही महाराष्ट्रात पहिली कार्यशाळा आहे.याचा मला अभिमान असल्याचे, प्रतिपादन गृह ( ग्रामीण ),गृहनिर्माण,शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पालघर जिल्हा पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस खा.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित, आ.हरिश्चंद्र भोये,विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील,जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड,पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे,अपर…

Read More

शुभम सावंत,विरार विरार येथे ” पिकलबॉल,” खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान विकसित, ” पिकलबॉल,” हा सर्व वयोगटांसाठी,विशेषतः ज्येष्ठ नागरिकासाठी एक आदर्श खेळ असून,या खेळामुळे हृदय,स्नायू,मानसिक संतुलन आणि सामाजिक बंध यांसारखे शरीराच्या अनेक अवयावांना फायदे होत असतात. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो आरोग्यासाठी वरदान ठरणारा आहे. पिकलबॉल हा एक मजेदार, कमी प्रभावाचा खेळ आहे.जो सर्व वयोगटांसाठी शारीरिक व मानसिक फायदे मिळवून देतो.अशा या अनोख्या खेळाचे मैदान विरार येथील यशवंत नगरमध्ये नूकतेच विकसित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष सुधीर वालावलकर,माजी महापालिका आयुक्त कल्याण केळकर,माजी नगरसेवक जीतू…

Read More

सचिन परब,विरार विरार येथे जलतरण व बुद्धीबळ स्पर्धा  संपन्न, विरार अमेय क्लासिक क्लब येथे संपन्न झालेल्या या जलतरण स्पर्धेत ६ ते ७० वयोगटातील १७५ स्पर्धक सहभागी झाले होते.विशेष म्हणजे+यामध्ये २ दिव्यांगांचाही समावेश होता तर बुद्धिबळ स्पर्ध्येत ६ ते ५० वयोगटात ५५ स्पर्धक सहभागी झाले होते. या जलतरण स्पर्ध्येत ६ ते ७० वयोगटातील १७५ स्पर्धक सहभागी झाले होते त्यात २ दिव्यांगांचाही समावेश होता तर बुद्धिबळ स्पर्ध्येत ६ ते ५० वयोगटात ५५ स्पर्धकांनी भाग घेतला. या दोन्ही स्पर्धाचे खेलो मास्टर्स गेम्स पालघर जिल्हा अध्यक्ष व माजी महापौर राजीव पाटील,हेमंत म्हात्रे,जीतू शहा,अजिव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, भगवान बिरसा मुंडा बलिदान दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा. गेल्या नऊ वर्षात आदिवासी समाजातील तळागाळातील समाज बांधवांना जागृत करून पारंपारिक संस्कृती टिकवण्याचे प्रामाणिक कार्य करत असलेल्या जनजाती विकास मंचाचे काम हे प्रेरणादायी असून सध्याच्या आधुनिक युगात समाजाला याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल,असे गौरवोउद्गार पालघर लोकसभेचे खा. डॉ.हेमंत सवरा यांनी काढले. जनजाती विकास विकास मंच आयोजित भगवान बिरसा मुंडा बलिदान दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने जव्हार येथे सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…

Read More

वाडा प्रतिनिधी, वाड्यात निवडणूक आयोगा विरोधात मशाल मोर्चा, देशातील निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे, हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे,परंतु मागील निवडणुकीतील काही घटना पाहता या स्वायत्त संस्थेवरील जनतेचा व राजकीय पक्षांचा विश्वास कुठेतरी कमी होत असल्याचे दिसत आहे. त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हें. २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक गैरप्रकार दिसून आले आहेत. असे मत काँग्रेस कमिटीचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी मांडले आहे.ते पत्रकारांशी बोलत होते. वाडा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत,ते पुढे म्हणाले की,मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेत मोठा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यातही खाजगीकरणाचे वारे वेगाने वाहू लागले ; ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला, केंद्र सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यसरकारनेही शासकीय संस्था व सार्वजनिक उपक्रम,धनदांडग्याच्या घश्यात घालण्यास सुरुवात केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने नूकताच घेतला आहे.या निर्णयानंतर एसटी सेवाही आता पाईपलाईनमध्ये आहे.बीओटी या गोंडस नावाखाली हा खेळ आता सुरू झाला आहे.या तत्वावर यापूर्वीच रस्तेबांधणी सुरू झाली आहे.या उपक्रमाच्या कोट्यावधी रु.च्या जमिनी हडप करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या खाजगी खाजगी संस्था व विश्वस्त संस्थाना नाममात्र अनामत रकमेवर चालवण्यास देण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची ( आयटीआय…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” “अपरिपक्वता,” कोण कोणाचा बाप ? यावरून मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडा्जंगी, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची काल मुंबईत बैठक झाली.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ” कोण कोणाचा बाप,” यावर तमाशाचा फंड चांगलाच रंगला होता. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. ” सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे,” असे नितेश राणे आपल्या भाषणात म्हणाले होते.नितेश राणे यांचे हे वक्तव्य शिवसेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागले.त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांकडे याविषयी तक्रार केली,त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले. शिवसेनेच्या मंत्र्यांनीही “आमचा बाप बाळासाहेब ठाकरे,तुमचा कोण ?…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरीत बालविवाह नाही, पण अल्पवयीन मातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, कायद्याने बालविवाहावर बंदी असल्यामुळे हल्ली बाल विवाह होत नाहीत.तलासरी सारख्या आदिवासी भागात बाल विवाह होत नसले तरी अल्पवयात प्रेमसंबंधामुळे माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमसंबंधाने विवाह न करता अल्पवयातच तरुण – तरुणी एकत्र राहत असल्यामुळे अल्पवयीन माताचे प्रमाण तलासरी भागात मोठया प्रमाणात वाढले आहे.अशी स्थिती असतानाही आरोग्य विभागाच्या दप्तरी मात्र केवळ ४० अल्पवयीन मातांची नोंद आहे.यामध्ये उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र ०३,वसा प्राथमिक आरोग्य केंद्र ०६, सूत्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र ११,आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २०,अशी आकडे वारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि…

Read More

दीपक मोहिते, एकनाथ शिंदे व अजित पवार गटाच्या आमदारांवर सध्या स्वाभिमान गुंडाळून ठेवण्याची पाळी आली आहे, महायुती सरकारमध्ये शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या दोघांना भाजपकडून मिळणारी वागणूक लक्षात घेता या दोन्ही गटाच्या आमदारांना आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागत आहे.तशीच परिस्थिती निर्माण झाली तर अजित पवार हे पुन्हा शरद पवाराकडे वळू शकतात.पण एकनाथ शिंदे काय किंवा त्यांच्या आमदारांना पुन्हा उद्धव गटात एंट्री मिळणे कदापि शक्य नाही.कारण ” गद्दारांना क्षमा नाही,” या बाळासाहेबाच्या धोरणानुसार उद्धव ठाकरे यांनी वागायचे ठरवल्यामुळे शिंदे गटाच्या आमदाराना उबाठाची दारे आता बंद झाली आहेत. गेल्या वर्षी मोदी सरकारने सत्तेत…

Read More

वसंत भोईर,वाडा घराचे अनधिकृत बांधकाम बंद केल्याच्या रागातून उपसरपंचास धमकी, तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील घराचे अनधिकृत बांधकाम नोटीस देऊन बंद केल्याच्या रागातून सोनाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन तिखंडे यांना मोबाईलवरून धमकी देण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती. अमोल गोरे व कल्पेश कोर अशी धमकी देणाऱ्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,यातील आरोपीनी सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अजय कुमार चोखणी यांच्या घरांचे बांधकाम काम सुरू केले होते.सदरचे काम अनधिकृत असल्यामुळे ग्रामपंचायतीने ते नोटीस देऊन बंद केले होते.याचा राग मनात धरून आरोपींनी उपसरपंच सचिन यांना दूरध्वनीवरून ” तु,आमचे साईटवरचे काम का बंद केले ? तुमचा त्या…

Read More