- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
वाडा प्रतिनिधी, बससेवा झाली सुरू,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,” तालुक्यातील कळंभे ग्रामपंचायत क्षेत्रातील निशेत या पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.हा रस्ता यंदाच्या पावसाळ्यात पूर्णपणे खड्ड्यात गेला असून त्यामुळे बससेवा बंद झाली होती.सदर बससेवा तत्काळ सुरू करण्यात आली,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,” अशीच असून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरुस्ती करण्यास चालढकलपणा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कळंभे ग्रामपंचायत हद्दीत निशेत व ठाकूरपाडा असे दोन पाडे आहेत.या पाड्यावर बससेवा होती.मात्र हा रस्ता पावसाळ्यात खड्ड्यात गेला असून रस्त्यावर जागोजागी दोन ते अडीच फुटांचे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या महामार्गावरील बससेवा बंद करण्यात आली.मात्र रस्त्याच्या दुर्दशेबाबत व शाळेत जाणा-या विद्यार्थाची…
दीपक मोहिते, भाजपला रोखणे,ठाकरे बंधूंना शक्य होणार नाही,बविआ देखील सध्या संभ्रमावस्थेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी राज्यस्तरावर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना,या दोन पक्षात युती होण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे.या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) सोबत घेण्यासंदर्भात सेनेचे नेते खा.संजय राऊत प्रयत्नशील आहेत.तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मात्र मनसेला सोबत घेऊन निवडणुका लढण्यास तयार नाही.त्यामुळे आजच्या घडीला भारतीय राष्ट्रीय पक्ष स्वबळावर रिंगण्यात उतरण्याच्या तयारीत आहे.शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील या दोघा ठाकरे बंधू सोबत जातील,असे वाटत नाही. या सर्व घडामोडीकडे भाजप मात्र बारकाईने पाहत असून सेना – मनसे यांचे एकत्र येणे,हे…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम २०२५, पालघर जिल्ह्यात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलीच हवा दिली आहे.काल विविध पक्षाचे दोन ते हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख भरत रजपूत,खा.डॉ.हेमंत सवरा व आ.हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते.आजचा हा प्रवेश सोहोळा हा आगामी निवडणुकांमध्ये मित्रपक्षासह विरोधकांना इशारा देणारा असल्याचे मानले जात आहे.या सोहोळ्यानंतर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला उत येण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सारे राजकीय पक्ष सावध झाले आहेत. मुंबईला लागून असलेल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्ली प्रचंड तणावाखाली आहेत… सहकारी मंत्र्यांच्या उचापतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तणावाखाली आले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटील कारस्थानामुळे हवालदिल झालेले शिंदे गृहराज्यमंत्री योगेश कदम व त्यांचे वडील रामदास कदम या दोघांमुळे सध्या प्रचंड तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे.आज सकाळपासून योगेश कदम हे शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याच्या आवारात गेल्या दोन तासापासून ताटकळत बसले आहेत.पण,शिंदे काही पहिल्या मजल्यावरून खाली आले नाहीत.शिंदे हे कदम पितापुत्रावर प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात आपल्या विरोधात असलेले खटले तसेच मंत्रिमंडळात फडणवीस यांचे दबावाचे राजकारण,अशा द्विधा मनस्थितीत असताना कदम पितापुत्राच्या…
वाडा प्रतिनिधी, महाविकास आघाडीचा करवाढीविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा, वाडा नगरपंचायतीतर्फे निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणीच्या नोटीशा बजावण्यात आल्या असून पूर्वीच्या करापेक्षा दुप्पट तिपटीने करवाढ केली आहे.या वाढीव करवाढीचा बोजा नागरिकांना पडणार असल्याच्या निषेधार्थ व कर वाढ रद्द करावी,या मागणीसाठी आज महाविकास आघाडीतर्फे वाडा नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.वाढीव करवाढ रद्द न केल्यास दिवाळी सण नगरपंचायत कार्यालयात साजरी करू,असा इशारा नेत्यांनी प्रशासनाला दिला. वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली व दुय्यम दर्जाची ग्रामपंचायत असून त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबत वृक्ष कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,अग्निशमन कर,उपयोग कर्ता अशा अतिरिक्त करामध्ये वाढ झाली आहे.अचानक झालेल्या करवाढीमुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे.…
दीपक मोहिते, आम्हाला पैश्याची उधळपट्टी करणारी मॅरेथॉन स्पर्धा नको,आम्हाला दर्जेदार नागरी सुविधांची गरज आहे… स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेची १३ वी मॅरेथॉन स्पर्धा प्रशासनाने तात्पुरती स्थगित केली आहे.मनपा प्रशासनाचा हा निर्णय स्तुत्य असला तरी याविषयी करदात्यांच्या मनात अनेक प्रश्नाचे काहूर उठले आहे.आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ते कारण खरं नाही.तालुक्यातील रस्त्याची झालेली पार दुर्दशा हे कारण,या निर्णयामागे असावा,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक ही मॅरेथॉन स्पर्धा आर्थिकदृष्ट्या बोजवारा उडालेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला परवडणारी नाही.पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गेली बारा वर्षे या स्पर्धेवर कोट्यवधी रु.ची उधळपट्टी झाली.गेल्या बारा वर्षात…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आपला देश कधीही ” आत्मनिर्भर,” होऊ शकणार नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परकीय नागरिकांसंदर्भात जी काही भूमिका घेतली आहे,ती त्यांच्या देशाच्या हिताची आहे. आज त्यांच्या देशात लाखो आशियाई स्थायिक झाले आहेत.त्याचा परिणाम रोजगार व त्यांच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे.त्यामुळे ट्रम्पच्या सरकारने विजा विषयक कायदे कडक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरात सध्या स्थानिक व स्थलान्तरीत,असा वाद वेगाने रंगू लागला आहे.अमेरिकमध्ये ट्रम्प सरकार पुन्हा सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या वादाला अधिक गती मिळाली व त्याचे अल्पावधीत उमटलेले पडसाद आपण पाहिले.अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.या सर्व घडामोडीमागे बेरोजगारी व आर्थिक स्तर अशी…
वाडा प्रतिनिधी, वाडा येथे फटाके व्यापाऱ्याकडून खंडणी घेताना एकाला रंगेहाथ पकडले, वाडा शहरातील दिलीप ट्रेडर्स या फटाके विक्रेत्याकडून खंडणी वसुल करताना वाड्यातील एका इसमाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.सदर घटना काल साडेआठच्या सुमारास वाडा मारूती मंदिराच्या मागे वाडा परळी रोडवरील प्रितम सेल्स एजन्सी यांच्या फटाका स्टाॅल समोर घडली.या घटनेने वाडा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. निलेश चव्हाण रा.पाटील आळी,वाडा असे त्या खंडणीखोराचे नाव आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी निलेश चव्हाण याने त्याच्या स्वतःच्या मोबाईलवरून फिर्यादी सुशील पातकर यांना व्हाॅटसअप करून फटाके विक्रीचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचेकडे १४ लाख ७० हजार रू.ची मागणी केली…
दीपक मोहिते, अमानुष घटना उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमजीवीतर्फे स्वातंत्र्यदूत सन्मानाने गौरव, पालघर व ठाणे जिल्ह्यांतील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना सलग दोन दिवस उजेडात आल्या आहेत. आदिम कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचे तीन ज्वलंत धक्कादायक प्रकार श्रमजीवी संघटनेच्या सतर्क कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आल्या.वाड्यातील घटना उघडकीस आणणारे मोतीराम वारे,शहापूरमधील घटनेला आळा घालणारे संजय मुकणे तर जव्हारमधील घटना कमलाकर वाघ यांच्यामुळे उघडकीस आली.त्यांना आज श्रमजीवी संघटनेच्या आयोजित विशेष कार्यक्रमात श्रमजीवी संघटनेकडून देण्यात येणारे विशेष बहुमान स्वातंत्र्यदूत या पुरस्काराने, संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित व संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत परळी परिसरातील बुधावली…
तलासरी प्रतिनिधी, तलासरी येथे कविता वाचन स्पर्धेचे आयोजन, आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय तलासरी येथे कला अकादमी व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त कविता वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. बी.ए.राजपूत हे अध्यक्षस्थानी होते.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात,प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे,सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे,आपली बोलीभाषा अभिमानाने बोलली पाहिजे,प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली भाषा श्रेष्ठ राहावी या हेतूने प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या मायबोलीवर प्रेम केले पाहिजे. आपल्या भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न…
