- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
प्रमोद बक्षी,आनंदवन, गडचिरोली, येणारे वर्ष सुख – समृद्धी – समृद्धीने ओतप्रोत भरलेले, म्हणता म्हणता चोरपावलांनी २०२४ सरत चालले.काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले.बघा ना,जेव्हा आपण घर बदलतो,त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण,त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो.तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गतवर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे. “आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते..” शेवटी भूतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव,आठवणी यांचं कोलाज,असं म्हणतात.पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य होय.वर्ष कोणतेही…
दीपक मोहिते, ” माही वसई,” व ” कोकण पर्व, ” या लोकप्रिय कार्यक्रमाचे वसईत आयोजन, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाकडून आयोजित करण्यांत येणाऱ्या भव्य कला क्रीडा महोत्सवाचे यंदाचे हे ३५ वे वर्ष आहे. रौप्य महोत्सवी कला – क्रीडा महोत्सवानिमित्त “ माही वसई,” तर ३० व्या वर्षानिमित्त “ कोकण पर्व कोकण सर्व,” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले आहे.वसई कला – क्रीडा महोत्सवाचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकेश सावे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “ माही वसई,” या कार्यक्रमातून वसई तालुक्यातील विविध जातीधर्मीयांची संस्कृती, व्यवसाय,चालीरिती,परंपरा यांचे यथार्थ दर्शन घडवण्यात आले होते.तर ” कोकण पर्व कोकण, ” यामधून कोकण प्रांतातील सर्व जिल्ह्यातील जीवनपद्धती,संस्कृती…
वसंत भोईर,वाडा, उपसरपंचपदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड, तालुक्यातील घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पडली.या निवडणूकीत उपसरपंच पदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घोणसई मेट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिलीप पाटील यांची मुदत संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.आज उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.या निवडणुकीत विशाल पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ते बिनविरोध निवडून आले. त्यांच्या निवडीनंतर सरपंच शैला जाबर यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.ग्रामपंचायतीत विकासकामे करून आदर्श ग्रामपंचायत करू,असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.पीठासीन अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबल यांनी काम पाहिले.
संदीप बोराडे, डहाणू, वाकी ग्रामपंचायतीमध्ये महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न, डहाणू तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या आशागड-2 बीट अंतर्गत वाकी ग्रामपंचायतीमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आ.विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच,जिल्हा परिषद सदस्य जयंवत डोंगरकर,सरपंच दिनेश दयात, ग्रामपंचायत सदस्य सावित्री कान्हात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महिलांसाठी आहार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय,सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत स्थानिक महिलांनी पारंपरिक नृत्य आणि ” तारका, ” नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.कार्यक्रमाने महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणा दिली आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली. या मेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायतीने विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या प्रतिसादामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कराड याचे स्वतःहून हजर होणे,सरकार व पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली… अखेर,वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाला.त्याने स्वतः हजर होऊन पोलीस,राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व फडणवीसांच्या गृहखात्याच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत.सरकार व गृहविभाग कसे नसावे,हे या घटनेने दाखवून दिले आहे.तब्बल २२ दिवसांनी वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर अज्ञात शक्तीचा दबाव होता,हे स्पष्ट झाले आहे.ज्या महाराष्ट्र पोलिसांची देशभरात ख्याती होती,ती या कराडाने अक्षरश: धुळीस मिळवली. एकेकाळी गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले विनायक वाकटकर,ज्युलिओ रिबेरो,विजय साळसकर,हेमंत केरकर,अशोक कामटे यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र पोलिसांचे नाव शिखरावर नेऊन ठेवले होते,आज त्या महाराष्ट्र पोलिसांना या कराड महाशयाने तोंड दाखवायला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुख्यमंत्र्यांनी नितीश राणे यांना वेळीच आवरावे- काँग्रेस नेते थोरात, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान,त्यामुळे प्रियांका गांधी खासदार झाल्याचे वक्तव्य,मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केल्यानंतर राज्यात जोरदार वादळ उठले आहे.त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांनी राणे यांना आवरावे,अशी मागणी केली आहे.यापूर्वीही नितीश राणे यांनी ” मशिदीत घुसून मारू,” अशी वलग्ना केली होती. मुस्लिम समाजात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते.मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे,हा संविधानाने आखून दिलेल्या चौकटीची मोडतोड करणारे असल्याची टीका सर्वत्र करण्यात येत आहे. गेल्या रविवारी पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बोलताना…
दीपक मोहिते, खा.हेमंत सवरा याना अनावृत्त पत्र, भाग क्र.१ पालघरवासीयांना तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत…. लोकसभा निवडणूका होऊन जवळपास सात महिन्याचा काळ लोटला असून ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” आता ओसरली आहे.पालघर लोकसभा निवडणुकीत पालघरवासीयांनी खा.डॉ. हेमंत सवरा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते.त्या पालघरवासीयांच्या खा.सवरा यांच्याकडून जिल्हा विकासाबाबत फार नाही,पण माफक अपेक्षा आहेत.यापूर्वीही चिंतामण वनगा,बळीराम जाधव व राजेंद्र गावित,हे येथून खासदार म्हणून निवडून गेले होते.पण या तिघांच्या काळात जिल्हा कात टाकू शकला नाही.गेली अनेक वर्षे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने या तिघांच्या काळात फारसे प्रयत्न झाले नाहीत.त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. पालघर जिल्ह्याच्या विकासाचे अनेक…
जव्हार,प्रतिनिधी, कौलाळे गटात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार, तालुक्यातील कौलाळे गटात एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तीन जिल्ह्यातील स्पर्धकांनी हजेरी लावली होती.तर पंचक्रोशीतील दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद घेतला.गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयाने बंदी हटवल्याने महाराष्ट्रामध्ये पुन्हा बैलगाडा शर्यती जोमात सुरू झाल्या आहेत.या निर्णयानंतर गेल्या तीन वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुकाच्या गारादेवी मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. दरम्यान झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून काल कौलाळे गटात बैलगाडा शर्यत आयोजीत करण्यात आली होती.यासाठी पालघर, ठाणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैल जोडी…
सुरेश काटे,तलासरी, विभागीय क्रीडा स्पर्धेत झरी शाळेची उत्तुंग भरारी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल शेंडेगाव,शहापूर येथे आदिवासी विकास विभागांतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा,२७ ते २९डिसें.या कालावधीत पार पडल्या. स्पर्धेत ठाणे विभागातून डहाणू,घोडेगाव, पेण,जव्हार,शहापूर,सोलापूर हे सहा प्रकल्प सहभागी झाले होते. आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत डहाणू प्रकल्पाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक ७८ विद्यार्थी हे ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय,झरी तालुका तलासरी या शाळेचे असून झरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी डहाणू प्रकल्पातून सहभागी होऊन विविध क्रीडा प्रकारात उत्तुंग भरारी मारली. शाळेच्या प्राचार्या सि.बस्तियान फर्नांडीस,सर्व सहभागी विद्यार्थी,शिक्षकांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्ञानमाता सदन संस्था तलासरी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू यांच्याकडून तसेच…
नवीन पाटील, सफाळे, ३१ डिसें. सेलिब्रेशनसाठी केळवे बीच सज्ज… ३१ डिसे.साजरा करण्यासाठी पालघर तालुक्यातील केळवे बीचला पर्यटकांची पसंती मिळत असून मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागातून शेकडो पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासह गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येथे मोठी गर्दी करणार आहेत.याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी केळवे सागरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. केळवारोड स्थानकाच्या पश्चिमकिनारपट्टी भागातील निसर्गरम्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्र लाभलेल्या केळवे बीचला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.उद्या मंगळ.३१ डिसें.२०२४ या वर्षांचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवशी बुधवार आल्याने सरत्या वर्षाला गुड बाय व नव्या नवर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची थोडी अडचण…
