- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणुकीच्या जीवघेण्या खेळामध्ये शेतकरी/कष्टकरी दुर्लक्षित, ” सूर्यातीर,” राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला कोणालाही वेळ नाही.ग्रामीण भागातील आमचा हा कष्टकरी अन्नदाता,सध्या अडचणीत सापडला आहे.पिकाची नुकसानी व जगण्याची धडपड,अशा कात्रीत सापडला आहे.दुसरीकडे आलिशान गाड्यातून फिरणारे राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत वावरत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या हातात आली पाहिजे,यासाठी या मंडळींची कटकारस्थाने सुरू आहेत.प्रचारात उमेदवार व त्यांचे नेते अवकाळी पाऊस,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,शेतमालाला हमी भाव,पिकाची पाहणी,पंचनामे,अहवाल व त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया,यास मूठमाती देऊन ही मंडळी एकमेकाची बदनामी करण्याच्या खेळात मग्न आहेत.पावसाळ्याच्या मध्यात अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी व परतीच्या पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते केले.पण एकाही पक्षाला या ज्वलंत प्रश्नाची दखल…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” महायुतीच्या नेत्यांना सध्या भितीने ग्रासले आहे… विधानसभा निवडणूकीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.२३ नोव्हे.रोजी कसा निकाल लागेल ? याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.महाराष्ट्र राज्य ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते तर मुंबई शहर देशाची तिजोरी असून त्याच्या चाव्या आपल्याकडे असाव्यात,यासाठी सध्या हा रणसंग्राम सुरू आहे.२० नोव्हें.२०२४ रोजी राज्यातील ९ कोटी जनता आपले २८८ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. पूर्वी देश व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असायची,पण १९७७ सालापासून विविध पक्षाने एकत्र येऊन युती व आघाड्या स्थापन केल्या. १९४७ ते १९७७ पर्यंत एकाच पक्षाच्या हाती सत्ता होती.१९७७ साली…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” रात्रीच्या वेळी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होणे गरजेचे, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आजपासून जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघात पैशाचा ओघ सुरू झाला आहे.स्थानिक पोलिसांनी तीन ठिकाणी वाहनांची तपासणी करून कोट्यवधी रु.जप्त केले आहेत.त्या पार्श्वभूमीवर वसई – विरार पोलीस आयुक्तालयाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.काल रात्री प्रचार संपल्यानंतर अनेक वाहने परिसरात फिरत होती,ती वाहने कोणत्या पक्षाची होती,त्याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा.केवळ चौकाचौकात महिला पोलिसांना बसवून मतदारसंघात होणारी पैशाचे आवागमन रोखणे कदापी शक्य होणार नाही.निवडणूक अधिकारी व पोलीस यांनी कोंबिंग ऑपरेशन हाती घेणे अनिवार्य आहे. मतदानाला अवघे ७२ तास उरले असून…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, भाई उर्फ जयेंद्र ठाकूर यांच्या प्रचारात हजारो तरुण सहभागी, आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना,आ.हितेंद्र ठाकूर यांचे थोरले बंधू जयेंद्र ठाकूर यांनी गेल्या चार दिवसांपासून तिन्ही विधानसभा मतदासंघाचा ग्रामीण भाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या प्रचारात तरुण,ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.त्यांच्या धुवांधार प्रचाराला शहरी व ग्रामीण भागात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधी उमेदवारांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. भाई उर्फ जयेंद्र ठाकूर हे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे काँग्रेसचे माजी ज्येष्ठ पदाधिकारी व विविध संस्थांचे विश्वस्तही सहभागी होत आहेत.विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारात तरुण वर्गाचा मोठा भरणा पाहायला मिळतो.भाई ठाकूर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजप खासदारांकडून ” घरचा आहेर,” सूर्याला कितीही लपवून ठेवलं तरी सकाळ व्हायची टळत नाही,अशीच एक घटना नालासोपारा येथे घडली.काल राज्यसभा खा.सीमा द्विवेदी या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नालासोपारा शहरात आल्या होत्या.त्यांनी या मतदारसंघात झालेल्या विकासाबाबत माध्यमाकडे आपले मतप्रदर्शन केले.त्या म्हणाल्या,” मी प्रत्येक निवडणुकीत नालासोपारा येथे येत असते.गेल्या काही वर्षात या परिसराचा मोठ्याप्रमाणात विकास झाला आहे.रस्ते पाणी,भवन या साऱ्या समस्या सुटल्या असून पूर्वीच्या तुलनेत भरपूर विकास झाला आहे.माध्यमांशी त्या बोलत असताना त्यांच्यासोबत असलेले भाजपचे उमेदवार राजन नाईक यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांना या परिसरातील विकासकामे पाहून कौतुक वाटते.पण स्थानिक पदाधिकारी व…
दीपक मोहिते, ” वास्तव,” वसई-विरारमधील विकासकामांना प्रत्यक्ष मिळालेल्या निधीपेक्षा अधिक “आमदार निधी,” खर्च, पालघर जिल्ह्यातील अन्य आमदारांच्या तुलनेत आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी प्रत्यक्ष रकमेपेक्षा अधिक ” आमदार निधी,” वसई-विरार शहरांतील विकासकामांवर खर्च केला आहे,असा खुलासा बहुजन विकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे. आ.क्षितिज ठाकूर यांनी सन २०१९ – २० ते सन २०२४ – २५ या पाच वर्षांच्या कालावधीत १७ कोटी ८५ लाख ३० हजार ९०रु.चा निधी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी वापरात आणला आहे,अशी माहिती देत बहुजन विकास आघाडीने विरोधकांना तोंडघशी पाडले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनी ” आमदार निधी,” खर्च न केल्याने तो तसाच पडून…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, स्थानिक उमेदवाराची नाळ मातीशी जुळलेली असते.. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे चार दिवस उरले आहेत.त्यामुळे या चार दिवसात जाहीर सभांना उत येणार आहे.प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राष्ट्रीय नेत्यांना या जाहीर सभांसाठी पाचारण करणार आहेत.बाहेरच्या नेत्यांना पाचारण करून मतदार आपल्याकडे वळतील,अशी अपेक्षा करणे,मुळात चुकीचे आहे.लोक जाहीर सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावतात,पण ते नेत्यांची भाषणे ऐकून आपली मते देत नसतात.जाहीर सभेला येणारी मंडळी केवळ भाषणे ऐकायला येत असतात.पण आपले मत कोणाला द्यायचे हे मनात पक्के ठरवून असतात.जो उमेदवार परिसर विकासाला सर्वोच्च प्राधान्य देतो,मतदार त्यालाच डोक्यावर घेत असतात.तीन दशकांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वसईमध्ये भूतो…
दीपक मोहिते, आमची बांधिलकी परिसराच्या सर्वांगीण विकासाशी – आ.क्षितिज ठाकूर, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार क्षितिज ठाकूर हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.एक अभ्यासू व उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे.आपल्या मतदारसंघाच्या विकासाबाबत कायम दक्ष असणारे आ.क्षितिज ठाकूर विकासाच्या नवनवीन योजना राबवणे,त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळवणे,आदी कामावर त्यांचा कायम भर असतो.असा या तरुण तडफदार व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वर्षाचे बारा महिने उपस्थित राहणाऱ्या आमदारांकडून त्यांनी केलेली विकासकामे व भविष्यातील त्यांच्या योजना समजून घेण्यासाठी आमच्या प्रतिधीनीने आज त्यांची मुलाखत घेतली. प्रतिनिधी – गेली पंधरा वर्षे तुम्ही आमदार म्हणून निवडून येत आहात,प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला मिळालेलं मताधिक्य पाहता या मतदारसंघातील नागरिकांनी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फियास्को झाला…. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे सरकारने आरक्षण,निवडणूक लढवणे व पाडापाडीचे राजकारण करणे,या तिन्ही विषयी अक्षरशः फियास्को केला आहे.विरोधात उमेदवार उभे करणार,त्यानंतर उमेदवार पाडणार,अशा गगनभेदी गर्जना करणारे मनोज जरांगे पाटील आता वृत्तवाहिनीच्या स्क्रिनवरूनही दिसेनासे झाले आहेत.काही महिन्यांपूर्वी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अंतरवाली सराटी येथे महिनो न महिने बूम व कॅमेरे घेऊन ठाण मांडून बसायचे,आता सारं काही ओस पडल आहे.सरकार पण आता त्यांची फारशी दखल घेत नाही.जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवाराकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवले,त्यांच्या मुलाखती घेतल्या व त्यानंतर अचानक त्यांनी निवडणुका न लढवण्याचे जाहीर केले.ज्या इच्छुकांनी आपले उमेदवारी…
दीपक मोहिते, प्रचंड मताधिक्य घेऊन आम्ही दोघे विजयी होऊ,आमचा विजय ” न भूतो,न भविष्यती,” असा असेल – आ हितेंद्र ठाकूर, राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.जवळपास सर्वच उमेदवारांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होत आली आहे.पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार त्याला अपवाद नाहीत.कडक उन्हात व घामाच्या धारांनी ओथंबून जात,प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठभेठी घेत आहेत.१८ नोव्हें.सायंकाळी ५.०० वाजता प्रचाराचा धुरळा खाली बसणार असून २० नोव्हेंबर रोजी २९ लाख मतदार त्यांच्या नशिबाचा फैसला करतील.या निवडणुकीच्या निमित्ताने news 27.in media, हे नावाजलेले वेबपोर्टल काही उमेदवारांच्या मुलाखती प्रसिद्ध करत आहेत.या उमेदवारांनी आमदार म्हणून केलेली विकासकामे तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती त्यांच्याकडून…
