- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक.मोहिते, सुर्यातीर, उर्जानिर्मिती;ग्रामीण भागाला न्याय हवा…. गेल्या ७५!वर्षात अनेक सरकारे आली आणि गेली,काँग्रेस,संपुआ व आता रालोआच्या काळात वित्त व आता मोदी सरकारच्या काळात नामकरण झालेले निती आयोग,असे एकूण १८ आयोग खर्ची पडले.पण ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकला नाही.आजही ग्रामीण भागातील भूमिपुत्र,शेतकरी वीज व शेतीसिंचनाच्या पाण्यावाचून तडफडत आहे.आजवर एकाही सरकारला हे दोन्ही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावेत,असे वाटले नाही. ग्रामीण भागात दिवसात केवळ दहा ते बारा तास वीज असते. विजेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील बनत चालला आहे.शहरी भागासोबत ग्रामीण भागातही नागरिकरणाला वेग आला असून या भागातील विजेची मागणी अस्मानाला पोहोचली आहे.वीजेच्या मागणीच्या प्रमाणात वीज उपलब्ध करण्याकामी एकाही सरकारकडे…
दीपक मोहिते, नव्या सरकारमध्ये पंकजा मुंडे क्रमांक दोनच्या नेत्या असतील, देवेंद्र फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ अद्याप आकाराला येऊ शकलेले नाही.महायुतीचा मुख्य घटक पक्ष असलेले भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांमध्ये चुरशीची रस्सीखेच सुरू आहे.ज्या गृहखात्यासाठी शिंदे अडून बसले होते,ते त्यांना मिळणार नाही,हे जवळपास निश्चित झाले आहे.याव्यतिरिक्त भाजप महसूल व जलसंपदा ही दोन खातीही स्वतःकडे ठेवेल,अशी चर्चा आहे.अर्थ व ग्रामविकास,ही दोन्ही खाती अजित पवार गटाकडे जातील,तर नगरविकास, सार्व.बांधकाम व शालेय शिक्षण,ही खाती शिंदे गटाला देण्यात येणार आहेत. एकूण ४३ मंत्रिपदापैकी २० ते २१ भाजपला तर उर्वरित २१ पदे पवार,शिंदे गट व १ पद अपक्षाला,असे वाटप होईल.नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात शिंदे…
संजय लांडगे,वाडा शहर, मांडा-वावेघर ग्रामपंचायत सरपंचपदी अमृता ठाकरे, वाडा तालुक्यातील मांडा – वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी असलेल्या वेदिका दळवी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता.त्यामुळे मागील काही दिवसापासून ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त होते.सरपंचपद काही काळ रिक्त राहिल्यामुळे ग्रामपंचायतची अनेक विकासकामे खोळंबली होती.त्यामुळे निवडणुकीद्वारे थेट सरपंचपदाची निवडणूक होईपर्यंत सरपंचपदाचा तात्पुरता कारभार उपसरपंच असलेल्या ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. मांडा- वावेघार ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी थेट निवडणूक झाली होती.या निवडणुकीत वेदिका दळवी या बहुमताने निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी २० ऑक्टों.रोजी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे सरपंचपदाचा राजीनामा वाडा पंचायत समितीच्या सभापतींकडे दिला होता.२१ नोव्हें. २०२४ रोजी झालेल्या मासिक सभेत हा राजीनामा मंजूर करण्यात आला.त्यामुळे…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, आता वेध महानगरपालिका निवडणुकीचे… जून २०२० पासून वसई – विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवटीचा अंमल आहे.केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे.शिंदे सरकारने या निवडणुका विविध कारणावरून पुढे ढकलल्या.या निवडणुकांमध्ये महायुतीचा पराभव होईल,या भितीतून फडणवीस व शिंदे यांनी कोरोना व नंतर ओबीसी प्रश्नावरून त्या लांबणीवर टाकल्या.या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी सरकार आता न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका निकालात काढण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे राज्यातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतील,असा अंदाज आहे. मुंबई,ठाणे,भिवंडी,कल्याण – डोंबिवली,उल्हासनगर, कुळगाव -…
संजय लांडगे,वाडा शहर, स्व.विष्णू सवरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्णांना फळवाटप, महाराष्ट्र राज्याचे माझी आदिवासी विकासमंत्री स्व. विष्णू सवरा यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्यातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना पाटील म्हणाले की,सवरा यांनी फक्त वाड्यासाठीच नाही,तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांचे कार्य अविस्मरणीय असे होते.त्यांच्या अकाली निधनाने पालघर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चाचे पालघर जिल्ह्याध्यक्ष कुणाला साळवी यांनी केले होते. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी रोहन पाटील, कुणाल साळवी,राजेश…
राजू पडबिद्री बेळगाव, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फुटले ; नेत्यांना राज्यात प्रवेशबंदी कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे.वादाची ठिणगी आता नव्याने पडली आहे.कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे.त्यास विरोध करण्यासाठी याच बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासून बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरू झाली.महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते कर्नाटक पोलिसांच्या रडारवर…
दीपक मोहिते, भयाण वास्तव,भाग क्र.५ जिल्हानिर्मितीनंतर आदिवासी जमिनी वेगाने लुटण्यात येत आहेत, मुंबईलगत असलेला पालघर जिल्हा हा पूर्वी ठाणे जिल्ह्यात होता,२०१४ साली या जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला.या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे जिल्ह्याला आदिवासी दर्जा देण्यात आला.पण सरकारचा हा निर्णय आदिवासी समाजाला कितपत फायदेशीर ठरला,हा एक वेगळा विषय आहे. आदिवासी समाजाला केंद्रबिंदू ठेवून सरकारने दहा वर्षापूर्वी जिल्ह्याची ” दिशा व दशा,” निश्चित केली.त्यानुसार जिल्ह्याचा कारभारही सुरू झाला.सुरुवातीचा काळ स्थिरस्थावर होण्यात गेला.जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथे करण्यात आल्यामुळे जव्हार,मोखाडा व विक्रमगडवासियांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते,कालांतराने ते निवळले.जिल्हा निर्मितीमुळे आदिवासी लोकांच्या जीवनात काही बदल झाला का ? त्यांचे…
दीपक मोहिते, ईव्हीएम मशीन ; सरकार घाबरतयं का ? आज ना उद्या अंध:कार दूर होणार.. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल संशयास्पद असल्याचे उभ्या महाराष्ट्राच्या जनतेचे म्हणणे आहे,त्याची शहानिशा व्हावी,यासाठी राजकीय पक्ष विविध सामाजिक संस्था सध्या आक्रमक झाल्या आहेत.त्यांच्या या मागणीची दखल केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय घ्यायला तयार नाहीत.सदर बाब भारतीय संविधानातील कलम ५० चे उल्लंघन आहे.या कलमानुसार न्याययंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून अलिप्त असली पाहिजे.पण गेल्या दहा वर्षात केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय हे दोघे एकाही प्रकरणी अलिप्त नसल्याचे दिसून आले आहे.तर कलम ५१ क नुसार संविधानाचे पालन करणे,हे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते.पण सरकार गेल्या दहा…
नादुरुस्त व कालबाह्य एसटी बसेसमुळे प्रवासी हैराण,खा.डॉ.सवरा यांनी लक्ष घालावे, जव्हार ( प्रतिनिधी ) जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांतील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव पर्याय असलेल्या जव्हार एसटी आगारातील बसेसची अवस्था दयनीय झाली आहे.या बससेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सतत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विस्कळीत बससेवा,वेळेत येजा न करणाऱ्या बसेस, प्रवासादरम्यान बसेस नादुरुस्त होणे,अशा समस्यांमुळे नागरिक त्रस्तआहेत. जव्हार एसटी आगारातून दररोज प्रवाशांसाठी ५३ फेऱ्या चालवण्यात येतात.यामध्ये ३८ बसेस प्रवासी वाहतुकीसाठी तर १८ बसेस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत.मात्र,जवळपास ५६ बसेसपैकी ५० बसेस जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसच्या तुटलेल्या खिडक्या,गळकी छते, तुटलेल्या खुर्च्या अशा समस्यांमुळे प्रवासी नाराज आहेत.पावसाळ्यात गळणाऱ्या…
संजय लांडगे,वाडा शहर, विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षेसोबत इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे-खा. डॉ.सावरा, शालेय विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासह इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी व आपल्या परिवाराचे तसेच देशाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन खा.डॉ. हेमंत सावरा यांनी विद्यार्थ्यांना केले.वाडा शहरातील नुरबाग हॉल येथे आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञानस्पर्धा परीक्षेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. क्रांतिज्योत बहुउदेशीय सामाजिक संघटना व आय. टी.जिनियस कॉम्प्युटर एज्युकेशन,आयोजित थोर महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय व्हावी,ग्रामीण,दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एमपीएससी – युपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी,या उद्देशाने स्पर्धांचे…
