Author: दीपक मोहिते

संदीप जाधव,बोईसर सरपंचांवर हल्ला : निषेधार्थ मनोर बाजारपेठ बंद, मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने मनोर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनोर बाजारपेठ पूर्णतः बंद करण्यात आली असून,अनुचित प्रकार घडू नये,यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत हद्दीत एका इमारतीत बिअर शॉप सुरू करण्यासाठी ग्रामसभेने दिलेल्या ना हरकत ठरावावरून हा वाद उफाळला.ग्रामपंचायतीने राठोड नावाच्या व्यक्तीला हा ठराव दिल्यामुळे अल्वी अल्ताफ रईस हा आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आला व त्याने ” ठराव दिलाच कसा ? ” असा जाब विचारत ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्याशी वाद…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, गरोदर महिला व स्तनदा माता यांना बाळंतविडा कीटचे वाटप, जन्माला येणारे बालक सुदृढ असावे,यासाठी आज महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद पालघर,अंतर्गत येणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील गरोदर महिला व स्तनदा मातांना बाळंत विडा किट वाटप करण्यात आले. सदर वाटप हे सुभाष भोये सदस्य व मंगू गढरी गटविकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्ण कामडी उपस्थित होत्या.मातांना बाळंत विड्याचं साहित्य देऊन त्याचे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू बनवण्यास सांगण्यात आले. दररोज एक लाडू खाण्याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.सदर आहाराचा समावेश का करण्यात आला आहे,याविषयी माहिती देण्यात आली.या आहारामध्ये स्तनदा मातेच्या पोषणासाठी असणाऱ्या…

Read More

सचिन परब,पालघर, शिवसेन नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे,जिल्हा सचिव दिनेश गवई यासह मनसेच्या पालघर तालुक्यातील तालुकास्तरीय पदाधिकारी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सदर प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेचे उपशहर प्रमुख सुनील पाटील,विळंगी गावचे उपसरपंच,मनसेचे उपतालुका प्रमुख चेतन पाटील,मनसेचे उपतालुका प्रमुख महाराष्ट्र कामगार सेनेचे पालघर चिटणीस सिद्धेश महाले, विभाग प्रमुख नांदगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य मनीष पाटील,आलेवाडी गावचे उपसरपंच सतीश ठाकूर,उप तालुकाप्रमुख रोहिदास भगत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष उदय अधिकारी,महाराष्ट्र नवनिर्माण…

Read More

दीपक मोहिते, मंथन, अजून वेळ गेलेली नाही,… आज एक अत्यंत महत्वाचा तसेच वसई – विरारकरांसाठी ज्वलंत असलेला विषय,मी या ब्लॉगमध्ये हाताळणार आहे.विषय तसा संवेदनशील आहेच,पण तो वसईच्या नागरिकांसाठी देखील जिव्हाळ्याचा असा आहे.त्यामुळे मलाही या विषयावर लिहिताना खूप विचार करून लिहावा लागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार उपप्रदेशात ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्या,त्या नक्कीच सगळ्यासाठी वेदनादायक ठरल्या.गेली तीस ते पस्तीस वर्षे बहुजन विकास आघाडीच्या अबाधित असलेल्या साम्राज्याला सुरुंग लागला.गेल्या पस्तीस वर्षात बलाढ्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेला आ.हितेंद्र ठाकूर यांचा गड भेदता आला नाही.डॉमनिक गोंसालवीस,दीपक गव्हाणकर,मनवेल तुस्कानो,विवेक पंडित,प्रदीप शर्मा,यांना जे शक्य झाले नाही,ते राजकारणात नवख्या असलेल्या स्नेहा दुबे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा ऊत येणार… राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांची इंडिया आघाडी व महाराष्ट्रात महाविकास आघाडी,या दोघांचे भवितव्य आता जवळपास अंधारात सापडले आहे.महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले,ते लक्षात घेता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सावध झाले आहेत. कारण बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत.ही निवडणूक नितीशकुमार हे भाजप सोबत लढतील,असे वाटत नाही.नितीश कुमार यांनी जर एनडीए पासून फारकत घेतली तर केंद्र सरकारकडे काठावरचे बहुमत राहील.त्यामुळे भाजप आता शरद पवार गटाचे खासदार गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे.दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देखील भाजपने लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आखलेल्या रणनितीमुळे सध्या अस्वस्थ…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाडा –  वडवली हद्दीतील टायर कंपन्या उठल्या शेतकऱ्यांच्या मुळावर, तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील मुसारणे पाडा व चिंचघरपाडा येथील टायर कंपन्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. त्यांच्या मातीभरावाने येथील शेतकऱ्यांची भातशेती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहॆ.त्यामुळे परिसरातील शेतजमिनी नापीक होणार आहेत.येथील शेतकरी आता देशोधडीला लागणार आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय या कंपन्यानी येथील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून पाण्याचा मार्ग बदलला आहे व नालाही अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा निचरा होणार नाही.त्यामुळे शेतजमिनीची नासाडी होणार होईल,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहॆ.या नाल्यात रसायन मिश्रित दूषित पाणी सोडले जात असल्यामुळे नागरिकांसह गुराढोरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.या कंपन्या इतरत्र…

Read More

दीपक मोहिते, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून लवकरच वसई – विरारचा  पाणीपुरवठा सुधारणार, वसई विरार शहरातील पाणी वितरण व्यवस्था आता लवकर सुधारणार असून शहरांसोबतच महापालिकेत समाविष्ट गावांनाही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.अमृत २.o अभियानांतर्गत शहरातील जल वितरण व्यवस्था बळकट आणि विस्तारित करण्यासाठी पालिका क्षेत्रात ९५ कि.मी. मुख्य जलवाहिन्या,४८७ किमी वितरण जलवाहिन्या आणि १० जलकुंभ उभारले जाणार आहेत.यासाठी प्रत्यक्ष कामाला डिसें. २०२४ पासून जलवाहिन्या अंथरण्याचे काम ठेकेदारांतर्फे सुरु करण्यात आले आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितिज ठाकूर आणि माजी आ.राजेश पाटील यांनी वसई विरारचा पाणीवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश येत शासनाकडून अमृत २.o पाणीपुरवठा योजना मंजूर करून शासनाने…

Read More

प्रकाश मेहेर,सातपाटी, पालघर – शिरगांव येथे ड्रोन प्रणालीचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, सीमाभागातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील ७ जिल्ह्यांतील ९ समुद्रकिनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख विशेष प्रणालीचे आज मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुंबई येथील मत्स्य आयुक्त कार्यालय येथे उद्घाटन झाले. त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील शिरगाव या समुद्रकिनाऱ्यावरून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ड्रोन उडवण्यास प्रारंभ केला. राज्यातील ७ जिल्ह्यांतील ९ समुद्र किनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख प्रणालीचे प्रात्यक्षिक यावेळी झाली. यासाठी मत्स्य आयुक्त कार्यालय येथे कंट्रोल रूम उभारण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी कंट्रोल रूममध्ये…

Read More

संजय परब,पालघर तलासरी येथे भव्य शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण शिबिर संपन्न, आज तलासरी पंचायत समिती सभागृह येथे जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा व पशुपालक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला होता.जिल्हा परिषद पालघर कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती संदिप पावडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य राजेश खरपडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी समिती सदस्य विजय उराडे,जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा, पंचायत समिती सदस्य भरत कडू,जयवंती गोरखना यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. सभापती संदीप पावडे यांनी कृषिप्रधान देशाच्या शेतकरी राजाने कोरोना सारख्या संकटामध्ये देशातील जनतेला…

Read More

सुरेश काटे,तलासरी, परुळेकर महाविद्यालयात ॲनिमियामुक्त भारत अभियान, कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे भारत विकास परिषद कोकण प्रांत तसेच माझगाव डॉक, महाविद्यालयाचे महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात भारत विकास परिषद महाराष्ट्र कोकण प्रांत यांच्यातर्फे डॉ.हेमंत बेहेरे , भूषण साळुंखे,पूजा गवळे, नितीन जावीर आणि राहुल पवार अशी टीम पाठवण्यात आली होती. प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी विद्यार्थिनींना रक्ताच्या चाचणीचे महत्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. डॉक्टर हेमंत बेहेरे यांनी विद्यार्थ्यांना ॲनिमियाविषयी माहिती दिली आणि ॲनिमिया नियंत्रित करण्याचे उपाय सांगितले. सदर रक्त चाचणी शिबिरामध्ये…

Read More