Author: दीपक मोहिते

संगीता तावडे,मुंबई, फेब्रु.महिन्यात दोन दिवसीय ” मुंबई शहर ग्रंथोत्सव,” चे’ आयोजन, राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो.मुंबई शहर जिल्ह्याचा ” मुंबई शहर ग्रंथोत्सव,” ५ व ६ फेब्रु. आयोजित करण्यात येणार आहे.मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात झाली. सदर बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे,कार्यवाह उमा नाबर,शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी विजय सावंत,बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सुनील कुबल…

Read More

दीपक मोहिते, उशीरा सुचलेले शहाणपण, गोड्या पाण्यातील मासेमारी ; राज्य सरकारकडून महत्वाचे पाऊल, काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात मत्स्यव्यवसाय विभागाच्या आगामी १०० दिवसाच्या नियोजनाचा आढावा घेतला.त्यांनी या आढावा बैठकीत गोड्या पाण्यातील मासेमारी संबधित विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये मत्स्यबीज उपलब्धता,व्यवसायाला प्रोत्साहन व आर्थिक निधी देणे,सागरी मासेमारी वाढीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे,धरण क्षेत्रातील मासेमारीला प्रोत्साहन देणे व मासेमारी सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक करणे,इ. महत्वाच्या विषयांचा समावेश होता. सरकारने राज्यातील मासेमारी व्यवसायासंदर्भात उचलेले हे महत्वाचे पाऊल असून भविष्यात सागरी मासेमारी व्यवसायासोबत गोड्या पाण्यातील मासेमारीलाही सुगीचे दिवस येतील,अशी अपेक्षा आहॆ.आपले राज्य व केंद्र सरकार कृषी क्षेत्रातील सुधारणाना जेवढे महत्व…

Read More

दीपक मोहिते, एसटी सेवा ; सर्वप्रथम वाचवा आणि मग भाडेवाढ करा, गरिबाची मर्सिडीझ अशी ओळख असलेल्या एसटीची १४.९५ टक्क्याने भाडेवाढ झाली आहे.एकीकडे महिला व वृद्ध प्रवाशांना मोफत प्रवास तर दुसरीकडे प्रचंड भाडेवाढ,सरकारचे हे धोरण सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे आहे.एसटी सेवा सक्षम होऊच नये,यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले.शासनाकर्त्यांच्या या प्रयत्नांना काही अंशी यशही आले.अनेक देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खाजगी वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत बळकट असावी,असे प्रयत्न केले जातात.पण आपल्या देशात नेमके उलटे होत आहे.त्यामुळे अनेक राज्यातील एसटी सेवा आज डळमळीत अवस्थेत असलेल्या पाहायला मिळतात.ही सेवा सक्षम होऊ नये,यासाठी राजकीय नेते,खाजगी सेवा देणारे ठेकेदार व सरकारी अधिकारी यांची अभद्र युती झाली आहे. राज्यसरकारने नुकतीच केलेली…

Read More

सुरेश काटे,तलासरी, चांगले चारित्र्य हा श्वास तर अखंड भारत,हाच आपला धर्म, – सतीश भिडे, भारत देश गतिमान, बलवान,सामर्थ्यवान बनवायचा असेल तर विद्यार्थ्यांनी उत्तम चारित्र्य हाच श्वास व अखंड भारत हाच आपला ध्यास मनोमनी जपावा,असे कळकळीचे आवाहन स्वातंत्रवीर वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे यांनी तलासरी तालुक्यातील कवडा येथे आयोजित कार्यक्रमात केले. तलासरी कवाडा ठाकरपाडा येथे जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरच्या ३ हजार १५२ व्या कार्यक्रमास सरपंच दर्शनाताई बोदले व मुख्याध्यापक अशोक धोडी तसेच हजारो विद्यार्थी व गुरुजन मंडळींचे उपस्थितीत सादर करतेवेळी सतीश भिडे यांनी भारत देश जगातली महासत्ता होण्यासाठी केवळ मंत्र नव्हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे,असे सांगून अब्दुल कलाम,लालबहादूर शास्त्री,डॉ.बाबासाहेब…

Read More

सुरेश काटे,तलासरी, नगर पंचायतीच्या नवीन कार्यालयामुळे तलासरीच्या विकासाला वेग, तलासरी नगरपंचायतीचे कार्यालय तहसील कार्यालया च्या जुन्या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर नगर पंचायतीच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना,नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये म्हणाले,नगर पंचायत कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे आता जागेची अडचण संपून कामाला वेग येणार आहॆ.नगर पंचायतीतर्फे अनेक विकासाची कामे करण्यात येत असून,तलासरी नगर पंचायतीचा विकास आराखडा मंजूर झाल्यास तलासरीच्या विकासाला वेग येणार आहे. नवीन नगर पंचायतीच्या कार्यालय उदघाटन कार्यक्रमांस तहसीलदार अमोल पाठक,पोलीस निरीक्षक विजय मूतदक,माजी आमदार श्रीनिवास वनगा, मुख्याधिकारी भूषण माने, जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा,तसेच उद्योजक अजित नार्वेकर तसेच नगर सेवक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्याधिकारी भूषण माने…

Read More

अनंत भोईर,पालघर, उत्कृष्ठ काम करणाऱ्या कुटूंबाचा सत्कार, स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.स्वच्छतेच्या सुविधांचा नियमित वापर व देखभाल करून स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोकचळवळ करण्याच्या उद्देशाने “ स्वच्छ माझे आंगण,” अभियान जिल्ह्यातील ८९८ गावांमध्ये राबवण्यात आले. यामध्ये वैयक्तिक शौचालय,शोषखड्डा अथवा परसबाग,कंपोस्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या वापर करणाऱ्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांना उत्कृष्ट कुटुंब म्हणून प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) चा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सर्व गावांत दृश्यमान स्वच्छता…

Read More

सचिन परब,विरार पूर्व, भाताणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न भाताणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. 50 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यात माजी आमदार राजेश पाटील यांचा महत्त्वाचा पाठपुरावा असून या कामांना सुरुवात झाली आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच हितेश बाडगा,उपसरपंच हेमराज कासार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार,ग्रामपंचायत सदस्य योगेश कडू,बबन नामकुडा, मंगळ भोये,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रंजना सायरे,तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी आ.राजेश पाटील आपल्या भाषणात. म्हणाले, “ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी निधी मिळवून आणण्यावर भर दिला…

Read More

संजय लांडगे,वाडा, वाडा येथे शेतकरी,प्रात्यक्षिक माहिती,प्रशिक्षण व जनसंपर्क शिबिर संपन्न, कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी शिबीर,प्रात्यक्षिक माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क शिबिर,नुकतेच वाडा तालुक्यातील मौजे मालोंडे येथील कृषी पर्यटन केंद्र वैतरणा रिव्हर रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद पालघरचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती सन्माननीय संदिप पावडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती वाडा,च्या सभापती अस्मिता लहांगे या होत्या. या तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० पशुपालक सहभागी झाले होते.यावेळी प्रशिक्षणामध्ये विविध विषयावरील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व…

Read More

दिपक मोहिते, अत्यंत विदारक चित्र, बीड जिल्ह्याचा सांस्कृतिक चेहरा पार काळवंडला गेला, बीड जिल्ह्याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव,हे एकेकाळी डोळे दिपवून टाकणारे होते.आज त्या जिल्ह्याचा बिहार झाल्याची टीका होत आहे.चारी बाजुंनी होणारी ही टीका बिडवासीयांच्या जिव्हारी लागणारी अशीच आहे.ज्या जिल्ह्यात अनेकांची कुलदेवता असणारी योगेश्वरी देवी,वैजनाथाचे मंदिर,मन्मथस्वामी मंदिर,थोर अभ्यासक भास्कराचार्य,आद्यकवी मुकुंदराज,दासोपंत, भगवानबाबा,अशा संत व गुरु यांचे वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक व पौराणिक बीड जिल्ह्याचे वैभव राज्यकर्त्यांनी पार धुळीला मिळवले. भाजपचे नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी बीड जिल्ह्याला राज्याच्या राजकीय नकाशावर आणले.त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाल्यापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची बीजे रोवली गेली. वाळूतस्करी,खंडणी,हत्या, टोळीयुद्ध,राखेची तस्करी, ऊसतोड कामगारांची पिळवणूक,इ.घटनामध्ये बेसुमार वाढ…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” कॉमन मॅन,” ते ” डेडिकेटेड कॉमन मॅन,” एक असह्य व जीवघेणा प्रवास, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका जाहीर सभेत म्हणाले, ” मी यापूर्वी कॉमन मॅन म्हणजे सीएम होतो,आता डेडीकेटेड कॉमन मॅन म्हणजे डिसीएम झालो. त्यांच्यावर हा जो असह्य प्रवास करण्याची पाळी आली आहे,ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणली.त्यामुळे शिंदे महाशयानी सध्या अमित शहा पुराण वाचणे बंद केले आहे.तसेच त्यांच्या दिल्ली वाऱ्याही आता थांबल्या आहेत.उठसुठ मोदी व शहा यांचे गोडवे गाणारे कॉमन मॅन आता डेडिकेटेड कॉमन होऊन आपल्या दरे गावात आपल्या शेतीमध्ये माती परीक्षण करताना पाहायला मिळत असतात. आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक योजना यशस्वीपणे…

Read More