Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, राज्यसरकार सपशेल अपयशी ठरले, राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्यामुळे अनेक शहरासह ग्रामीण भाग देखील जलमय झाला आहे.मात्र या अशा बिकट परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून खंबीर उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे,सांगली,मुंबई, कोल्हापुर,रायगड,रत्नागिरी,नागपूर,वर्धा,पालघर,ठाणे,दौंड,चंद्रपूर,ही सर्व शहरे व ग्रामीण परिसर पाण्याखाली गेली आहेत.पुण्यात तर परिस्थिती अतिशय बिकट झाली असून लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.तर शाळा व शासकीय कार्यालयेही बंद ठेवण्यात आली.अशावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कुठेही पाहायला मिळत नाही.कदाचित ते अमित शहा यांची मिनतवारी करण्यासाठी दिल्लीत असावेत. एकेकाळी ” पुणे तेथे काय उणे,” अशी ओळख असलेले पुणे शहर हे सध्या विविध कारणांमुळे सतत प्रकाशझोतात असते.विद्येचे माहेर…

Read More

दीपक मोहिते, ” शौर्यगाथा,” उद्या ” कारगिल विजय दिवस,” आपल्या जवानांची शौर्यगाथा, २५ वर्षांपूर्वी २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानने काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून सुमारे २०५ कि.मी.अंतरावर असलेल्या कारगिल भागात घुसखोरी करून युद्ध छेडले होते.पण आपल्या जवानांनी अत्यंत धाडसी मोहीम राबवत पाकिस्तानच्या लष्कराला पराभूत केले व माघार घ्यायला लावली. कारगिल,द्रास व मश्को खोऱ्यात हिवाळ्यात सैन्य तैनात करणे,अत्यंत जिकिरीचे असते.या काळात येथील तापमान उणे ४० अंशापर्यत खाली जात असते.त्यामुळे भारतीय व पाकिस्तानी सैन्य याकाळात माघारी जाते.हिवाळा संपला की दोन्ही सैन्य आपल्या मूळ जागी परत येत असतात,असा अलिखित समझौता या दोन्ही देशात झाला आहे.पण तत्कालीन लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी काश्मीर व सियाचेन प्रश्नी भारताला कोंडीत…

Read More

दीपक मोहिते, सुप्रसिद्ध साहित्यिक फा.दिब्रिटो कालवश, प्रसिद्ध साहित्यिक,लेखक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज सकाळी निधन झाले.मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते. ४ डिसें.१९४२ रोजी विरार पश्चिमेस नंदखाल या गावात त्यांचा जन्म झाला होता.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सेंट जोसेफ मराठी हायस्कुल मध्ये झाले.१९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरूपदाची दीक्षा घेतली.त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए.तर धर्मशास्त्रात एम.ए. केले.पुढील काळात त्यांनी विपुल लिखाण केले.आनंदाचे अंतरंग,ओअँसिसच्या शोधात,ख्रिस्ताची गोष्ट,ख्रिस्ती सण आणि उत्सव,तेजाची पावले,नाही मी एकला,संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्त्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास,सुबोध बायबल,न्यु टेस्टमेंट,सृजनाचा मळा, सृजनाचा मोहोर,मुलांचे बायबल,इ.चा त्यामध्ये समावेश आहे.तसेच त्यांचे वसईच्या अनेक आंदोलने व चळवळीत मोठे योगदान होते.हरित वसई चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड आंदोलन उभे…

Read More

दीपक मोहिते, जिल्ह्याच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, पालघर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या,बंधारे व धरणे,तुडुंब भरली आहेत.जिल्हा प्रशासनाने सूर्या व तानसा नद्यांच्या परिसरात असणाऱ्या अनुक्रमे ६५ व ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सूर्या नदीचे पाणी सतत वाढत असल्यामुळे या नदीला पुर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात सलग चार दिवस तुफान वृष्टी झाल्यामुळे धामणी व तानसा ही दोन्ही धरणे पूर्णपणे भरली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धामणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाणी सूर्या नदीत सोडण्यात येत आहे.सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा…

Read More

दीपक मोहिते, मच्छीमारांच्या विविध समस्यांवर बैठक संपन्न, राम नाईक,माजी राज्यपाल उत्तर प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली सुधीर मुनगंटीवार मंत्री,वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात मत्स्योद्योग विकास धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ.राजेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे व मत्स्यशेती करणा-यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले.त्यांच्या विविध समस्यांचा पाढा त्यांनी मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत वाचला.त्यांच्या रास्त मागण्यांना न्याय देण्यासाठी व जातीने या विषयी लक्ष घालण्याचे आश्वासन संबधित मंत्र्यांकडून मिळवले. मच्छिमार बांधवांना निधी व सोयीसुविधा देताना इतर जिल्ह्यापेक्षा पालघर जिल्ह्यावर अन्याय करण्यात येतो,याकडे आ.राजेश पाटील यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. तसेच पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारी काही बंदरे…

Read More

दीपक मोहिते, ” हालाबोल,” महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली, तीन इंजिन सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या धुसफूस सुरू झाली आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपच्या गिरीश महाजन यांनी आपल्या विभागाला निधी देण्यावरून अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते.या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी गिरीश महाजन यांनीही पवार यांना खडेबोल सुनावले.आपल्याकडे पैसा नाहीतर जमिनी विकून तुम्हाला पैसा देऊ का ? असा प्रतिप्रश्न पवार यांनी त्यांना विचारला.अजित पवार यांचे हे वक्तव्य भाजपच्या इतर मंत्र्यांनाही चांगलेच खटकले.अजित पवार यांच्याविषयी महायुतीचे अनेक मंत्री व आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.निधी देताना अजित पवार हे कायम ” आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” अस करतात,असा त्यांच्यावर सतत आरोप करण्यात येत असतात.खुद्द…

Read More

दीपक मोहिते, येणारा काळ मानवासाठी अत्यंत धोकादायक, सतत आदळणारी वादळे,वरुणराजाचे रौद्र रूप,पावसाचे प्रमाण सतत घटणे,वातावरणात होणारे बदल व तापमान वाढणे,ही सारी संकटे आता आपल्या पाचवीला पुजली आहेत.दरवर्षी जगभरात अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडत असतात.पण मानव, नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची आपली वृत्ती सोडायला तयार नाही. गेल्या काही वर्षांपासून जगभरात निरनिराळ्या वादळानी अनेक देशांचे अपरिमित नुकसान केले.आपला देशही त्यापासून अलिप्त राहू शकला नाही.दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला विशेष करून कोकणाला या अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे,गेली अनेक वर्षे निसर्गाच्या कोपाला सामोरे जात आहोत.गेल्या वर्षी चिपळूण,खेड या तालुक्यात निसर्गाने जो धुमाकूळ घातला,त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.जे कोकण निसर्गरम्य म्हणून ओळखले जाते,त्या कोकणावर…

Read More

दीपक मोहिते, नदीजोड प्रकल्प मार्गी लावा, दर पावसाळ्यात देशातील नद्यांना पूर येऊन सर्वत्र हाहाकार उडतो.कोट्यवधी रु.चे नुकसान होते,अनेकांना आपले जीव गमवावे लागतात.गावच्या गावे उध्वस्त होतात,त्यांच्या पुनर्वसनासाठी हजारो कोटी रु.खर्च होतात.पण यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गेल्या साडेसात दशकात प्रयत्न झाले नाहीत.त्यासाठी जी मानसिकता सरकारकडे असायला हवी ती आजवरच्या एकाही सरकारकडे नव्हती.त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी वाया जातेच पण आर्थिक हानी देखील होत असते.यावर उपाययोजना व्हावी,असे आजवर एकाही सरकारला वाटले नाही,हे तुमचे आमचे दुर्देवच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये ऑर्थर कॉटन यांनी देशातील नद्या जोडण्याची संकल्पना मांडली होती.त्यामागे जलवाहतुक सुरू करणे,असा उद्देश होता.पण त्याकाळी ती योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्यामुळे त्यावेळी या…

Read More

दीपक मोहिते, मातीचे बंधारे ; सरकारचे अपयश, ग्रामीण भागातील अनेक गावात आजही आपल्याला मातीचे बंधारे पाहायला मिळतात.वास्तविक सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारचे हे अपयश आहे.एकीकडे आपण डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहतो,तर दुसरीकडे ग्रामीण भागात अशी अवस्था….अतिवृष्टी झाली की या मातीच्या बंधारातील माती ढासळते आणि गावच्या गावे उध्वस्त होतात. हे वर्षानुवर्षे चालत आले आहे,गेल्या पाऊणशे वर्षात आपण मातीच्या बंधाऱ्याचे सिमेंट-काँक्रीटच्या बंधाऱ्यात रूपांतर करू शकलो नाही आणि आज आपले राज्यकर्ते ” आत्मनिर्भर भारत ” चे स्वप्न आपल्याला दाखवत आहेत.चार वर्षांपूर्वी मातीचा बंधारा फुटून गाव उध्वस्त झाल्याची घटना घडली होती.त्यावेळी आपले नेते खेकड्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे झाले होते.खेकड्यानी बंधाऱ्यांची माती उकरल्यामुळे हे संकट…

Read More

दीपक मोहिते, मातीचे बंधारे ; सरकारचे अपयश, ग्रामीण भागातील अनेक गावात आजही आपल्याला मातीचे बंधारे पाहायला मिळतात.वास्तविक सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारचे हे अपयश आहे.एकीकडे आपण डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहतो,तर दुसरीकडे ग्रामीण भागात अशी अवस्था….अतिवृष्टी झाली की या मातीच्या बंधारातील माती ढासळते आणि गावच्या गावे उध्वस्त होतात. हे वर्षानुवर्षे चालत आले आहे,गेल्या पाऊणशे वर्षात आपण मातीच्या बंधाऱ्याचे सिमेंट-काँक्रीटच्या बंधाऱ्यात रूपांतर करू शकलो नाही आणि आज आपले राज्यकर्ते ” आत्मनिर्भर भारत ” चे स्वप्न आपल्याला दाखवत आहेत.चार वर्षांपूर्वी मातीचा बंधारा फुटून गाव उध्वस्त झाल्याची घटना घडली होती.त्यावेळी आपले नेते खेकड्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे झाले होते.खेकड्यानी बंधाऱ्यांची माती उकरल्यामुळे हे संकट…

Read More