- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
मनिष धानू,डहाणू, चिकू महोत्सवामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी – ना. अतुल सावे, शेती,उद्योग आणि संस्कृती यांचा पर्यटनाशी मेळ घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी चिकू महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे,असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी केले. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे आजपासून सुरु झालेल्या २ दिवसीय ” चिकू महोत्सव २०२५” या कार्यक्रमाचे उद्घाटन अतुल सावे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ.राजेंद्र गावित,आ.विनोद निकोले, संदीप राऊत,शारदा पाटील, फेस्टिव्हलचे अध्यक्ष उदय चुरी,पर्यटन विभागाचे सहसंचालक हनुमंत हेडे, तहसिलदार सुनिल कोळी, सरपंच श्याम दुबळा,नरेश राऊत,एन.के.पाटील,प्रभाकर सावे आदि मान्यवर उपस्थित होते. ना.सावे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,या महोत्सवात चिकू आणि…
वसंत भोईर,वाडा भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवींवर हद्दपारीची कारवाई, तालुक्यातील पाहुणीपाडा येथील राहत असलेले व विविध गुन्ह्यांची नोंद असलेले भास्कर लडकू दळवी याला पालघर नाशिक व ठाणे या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.वाड्याचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डाॅ.संदीप चव्हाण यांनी ही कारवाई केली आहॆ.प्रशासनाच्या या कारवाई मुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. भास्कर दळवी यांच्यावर खून,खूनाचा प्रयत्न,दरोडा, मारामारी,जुगार,बेकायदेशीर जमाव करून हिंसा घडवणे, नुकसान करणे,ऑर्म अँक्ट,शिवीगाळ,दमदाटी, मारामारी,शासकीय आदेशाचे जाणूनबुजून पालन न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्य़ात त्याला सजाही सुनावण्यात आली आहे.दळवी यांच्याकडून पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिसरात…
वसंत भोईर,वाडा, आदिवासी मुलींसाठी ज्युडो,कराटे व जीवन कौशल्य प्रशिक्षण – एक महत्त्वपूर्ण उपक्रम पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुलींना आत्मसंरक्षण तसेच कौशल्ये विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागपालघर यांच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत जुडो कराटे आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये प्रत्येकी ४० मुलींना जुडो व कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.कै.दिगंबरराव पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा,आंबिस्ते येथे भेट देऊन जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद,पालघर,प्रवीण भावसार यांनी आढावा घेतला. त्यांच्यासोबत बालविकास प्रकल्प अधिकारी,वाडा व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत विलास जाधव आणि माध्यमिक…
संजय लांडगे,वाडा, वाड्याच्या हरेश पाटील याला राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट छायाचित्रकाराचा राज्य पुरस्कार प्रदान, वाडा तालुक्यातील कुडूस, मागाठणे येथील हरेश गोपाळ पाटील यांना उत्कृष्ट छायाचित्रणासाठी ६४ व्या महाराष्ट्र शासन कला संचालनालय विभागातर्फे देण्यात येणारा व्यवसायिक कलाकार विभागाचा प्रतिष्ठित ” राज्य पुरस्कार २०२४-२५,” राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आला. महाराष्ट्रातून अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृती या स्पर्धेसाठी पाठवल्या होत्या.सुमारे १८० कलाकारांची निवड कला प्रदर्शनासाठी करण्यात आली होती.अंतिम टप्प्यात वेगवेगळ्या विभागामध्ये निवड झालेल्या १५ कलाकारांना राज्य पुरस्कार प्रमाणपत्र आणि ५२ हजार पाचशे रु. रोख देण्यात आले.हरेश पाटील याला मिळालेल्या राज्य पुरस्कराबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सन्मान म्हणजे त्याच्या कलासाधनेची मोठी…
दीपक मोहिते, अरविंद केजरीवाल यांचा गड जमिनदोस्त,पक्षाचे दिग्गज नेते पराभूत, आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रवेश वर्मा यांनी अटीतटीच्या लढतीत ३ हजार १८२ मतांनी पराभव केला.प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे चिरंजीव असून त्यांनी यापूर्वी २०१५ व २०२० च्या निवडणुकीत बाजी मारली होती.या निवडणुकीत त्यांनी केजरीवाल यांचा पराभव करत हॅटट्रिक साधली आहे. अरविंद केजरीवाल सह मनीष सिसोदिया,सत्येंद्र जैन,सोमनाथ भारती,सौरभ भारद्वाज व अवध ओझा, या सहा दिग्गज उमेदवारांना दिल्लीच्या मतदारांनी धूळ चारली.त्यांच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या कशाबशा जिंकल्या.गेल्या निवडणुकीत ६२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पार्टीची गाडी २३ जागांवर अडखळली.या लढतीत भाजपने मात्र ८ जागांवरून…
सुरेश काटे,तलासरी, यशराज रिसर्च फाऊंडेशनतर्फे अणवीर – तलासरी येथे स्तुत्य उपक्रम, यशराज रिसर्च फाऊंडेशनने २०२१ मध्ये तलासरी तालुक्यातील ” अणवीर,” हे गाव आदर्श गाव बनवण्यासाठी दत्तक घेतले आहे.गावाला आदर्श बनवण्यासाठी संस्थेने शिक्षण, शेती,रोजगार,उपजीविका, युवक आणि महिला सक्षमीकरण,या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून लहान मुले, युवक-युवती,महिला,शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले.त्यातून त्यांनी त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहॆ.गावातील शाळांचा चेहरा – मोहरा बदलून शाळांमध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. गावातील महिला,युवक आणि शेतकरी यांच्यासाठी उपजीविकेची साधने उपलब्ध करून,वेगवेगळी प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक पाठींबा…
वसंत भोईर,वाडा वाड्यात जिजाऊ संघटनेला खिंडार,नेते डाॅ.गिरीश चौधरी व शशिकांत पाटील यांचा भाजपात प्रवेश, जिजाऊ संघटनेचे नेते डाॅ.गिरीश चौधरी व शशिकांत पाटील यांनी आपल्या शेकडो सर्मथकांसह आज भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते बोईसर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश घेतला. या प्रवेशाने जिजाऊ संघटनेला मोठा धक्का दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. डाॅ गिरीश चौधरी, शशिकांत पाटील हे जिजाऊ संघटनेच्या स्थापनेपासून सक्रीय होते.चौधरी यांच्यावर भिवंडी लोकसभा उपाध्यक्ष तर पाटील यांच्यावर पालघर लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.या काळावधीत त्यांनी संघटनेत महत्वाची कामगिरी बजावून ते संघटनेत ताईत बनले होते.गिरीश चौधरी यांनी कुडूस ग्रामपंचायतीत आपली सत्ता प्रस्थापित करून काही…
शुभांगी शिंदे,नाशिक, इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत वाढवण बंदर नियोजनात समावेश करा – छगन भुजबळ, नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळचा इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये समावेश करून ” भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६, ” अंतर्गत येथे नवीन प्रवासी टर्मिनल प्रस्तावित करण्यात यावे,अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,केंद्रीय अर्थमंत्रालयाने २१ ऑगस्ट २०२० रोजी नाशिक विमानतळास आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनल (आय.सी.टी.) म्हणून मान्यता दिली आहॆ.सदर आय.सी.टी. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि निर्यात धोरणाला चालना देणारा असल्यामुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील…
मनिष म्हात्रे,वसई, पोलीसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला गांजाची पुडी देणा-याला अटक, वसई न्यायालयासमोर पोलीसांसोबत असलेल्या आरोपी मित्राला अमली पदार्थ देण्याचा प्रयत्न करणा-याला पोलीसांनी गजाआड केले आहे. काल सांयकाळी साडेचारच्या सुमारास सदर घटना वसई न्यायालयासमोर घडली.आनंद मलंगी,रा.गोरेगाव- संतोषनगर असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलीसांच्या समक्ष जर गंभीर गुन्ह्यातील आरोपींना त्यांचे साथीदार अमली पदार्थाचा पुरवठा करत असतील तर ती गंभीर बाब असून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहॆ. काल सकाळी ठाणे कारागुहातून गंभीर तसेच पोक्सो,फसवणूक आदी गुन्ह्यातील दहा आरोपींना पोलीस व्हॅनमधून वसई न्यायालयात आणण्यात आले होते.संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या सर्व आरोपींना पुन्हा ठाणे येथे कारागृहात नेण्यात येणार होते.बसमध्ये आरोपींना बसवण्यात येत असताना…
अनंत नगरकर,बोईसर, पालघर येथे भाजपचे संगठनपर्व संपन्न,सदस्य नोंदणीला प्रचंड वेग, भारतीय जनता पार्टीच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक आज पालघर येथे पार पडली.भाजपने राज्यात संघटनपर्व या उपक्रमाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी मोहिमेला चांगलाच वेग दिला आहॆ. संघटनपर्व अंतर्गत राज्यभरातून दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.या अनुषंगाने भाजपा परिवारातील प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन संपर्क करण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पालघर येथे झालेल्या संघटन पर्व कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. या बैठकीला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष…
