- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा नाल्यातील बांधकामामुळे भातशेतीचे नुकसान, वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोका-कोला कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.येथे असलेल्या नैसर्गिक नाल्यात या कंपनीने संरक्षक भिंत बांधल्यामुळे नाल्याचे संपूर्ण पाणी भातशेतीत जात असून भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाने या कंपनीवर कारवाईचा बडगा उभारून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. नैसर्गिक नाल्यांमध्येच बांधकाम केल्यामुळे हे संपूर्ण पाणी भातशेतीत जाऊन शेतीची नासाडी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडणार आहेत.या कुटुंबीयांचा उदरनिर्वांचा प्रश्न निर्माण झाला आहे.या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला आहे.नालाच अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे पूर्णपणे शेत जमिनीची नासाडी झाली आहे.प्रशासनाने सदर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई-विरार मनपातून २९ गावे वगळण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन…. वसई – विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावे वगळण्यासंदर्भात असलेला तिढा सुटणे कठीण आहे. सुमारे १५ वर्षे या गावांचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असुन तो लवकर सुटेल,अशी शक्यता नजीकच्या काळात अपेक्षित नाही.दोन वर्षांपूर्वी गावे वगळण्यात यावीत,यासाठी लढणाऱ्यानी गळ्यात हार घालत,गुलाल उधळत गावे वगळण्यात आली,म्हणून जल्लोष देखील केला होता. पण हा प्रकार वसईकर नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारा होता. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काही राजकारणी मंडळीनी तो आता पुन्हा ऐरणीवर आणला आहे.सध्या या गावातही होणारे शहरीकरण लक्षात घेता,उच्च न्यायालय ही गावे महानगरपालिकेतच राहू देतील,असे वाटते.ही गावे का वगळण्यात यावीत,याविषयी याचिकाकर्त्याकडे ठोस…
धनदांडगे,लुटेरे व नोकरशाही यांची अभद्र युती.. बँक राष्ट्रीयीकरणाची ५६ वर्षे, दीपक मोहिते, १९ जुलै १९६९ या दिवसाला भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.५६ वर्षांपूर्वी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील १४ खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण याच दिवशी केले.त्यांच्या या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटले.देशाच्या अर्थकारणाला वेगळा आयाम देण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता,व तो काही अंशी यशस्वीही ठरला.त्याकाळी या निर्णयाचे सर्वाधिक पडसाद काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात उमटले.या निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वी १० दिवस अगोदर बंगरुळू येथे झालेल्या ( ९ जुलै १९६९ ) काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या निर्णयावरून प्रचंड गदारोळ उठला होता.इंदिराजींच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने त्यावेळी उचल खाल्ली व या प्रश्नी तीव्र मतभेद…
जव्हार,प्रतिनिधी, जव्हार येथे वीस हजार वृक्षलागवडीचा संकल्प, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपूर्वा बासुर ( भा. प्र. से.)यांच्या संकल्पनेतून कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या ३० शासकीय आश्रम शाळा, १८ अनुदानित आश्रम शाळा व दोन एकलव्य मॉडेल निवासी स्कूल आणि १६ शासकीय मुला मुलींची वसतिगृह येथे ” एक झाड धरती आंबासाठी, ” या उपक्रमांतर्गत २० हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सर्व शाळा व वसतिगृह आपल्या शाळेमध्ये व परिसरात झाडे लावण्याबाबतचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार वृक्ष लागवड करण्याचे आवाहन कार्यालयातर्फे मुख्याध्यापक व गृहपाल यांना करण्यात आले आहे. या सर्वानी कालपासून वृक्ष लागवड करून या अभियानाची सुरुवात केली आहे.त्याचबरोबर एक…
दीपक मोहिते, जनसुरक्षा विधेयक २०२४ ; नव्या आणीबाणीची चाहूल, राज्यसरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक २०२५ बहुमताने मंजूर केले.या विधेयकाला केवळ मार्क्स.कम्यु.पक्षाने विरोध केला.इतर सर्व विरोधकांनी या विधेयकाला मूकसंमती दिली.समाजाला घातक असलेल्या या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध न करणे,संशयास्पदच होते.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे.या नोटीसा मिळाल्यानंतर विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन या विधेयकावर स्वाक्षरी करू नका,अशी विनंती केली आहे.पण राज्यपाल त्यांची विनंती डावलून या विधेयकावर स्वाक्षरी करतील. विरोधकांची ही कृती देखील संशयास्पदच आहे.” अर्बन नक्षलवाद,” मोडून काढण्यासाठी राज्यसरकारने केंद्राच्या निर्देशानुसार हे विधेयक मंजूर करून घेतले आहे.या विधेयकामुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येणार आहे,तसेच प्रसिद्धी माध्यमाची सरकारकडून…
दीपक मोहिते, ” लाज वाटते,” विधानसभेचा दर्जा दिवसेंदीवस खालावत चाललाय…. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे काल सुप वाजले.यंदाचे हे अधिवेशन पंधरवडाभर चालले,या अधिवेशनात फारसा गोंधळ न झाल्यामुळे कामकाज तहकूब करण्याची पाळी विधानसभा अध्यक्षावर आली नाही.ही समाधानाची बाब असली तरी प्रत्यक्षात जनहिताची कामे किती झाली,याविषयीचा लेखा – जोगा मांडायलाच हवा.या अधिवेशनात आरोप – प्रत्यारोप,अर्वाच्च भाषेत टीका – टिप्पणी,टोमणे व अपशब्दांचा सर्रास वापर,असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षात जवळपास प्रत्येक अधिवेशनात आमदारांचा आक्रस्ताळेपणा,खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे,एकमेकांच्या अंगावर धावून जाणे,असे प्रकार वाढीला लागले आहेत.पूर्वी सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांची अभ्यासपूर्ण भाषणे होत असत.सत्ताधारी व विरोधक या दोघांमध्ये वादविवाद व लोकांच्या प्रश्नावर आमने…
जव्हार प्रतिनिधी, जिल्ह्यातील २४ शिक्षकांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य,पुणे आणि ” शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, ” पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मूल्यवर्धन राज्यस्तरीय प्रशिक्षण ३.०’ कार्यक्रम वाघोली, पुणे येथे नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणाचा उद्देश राज्यातील शाळांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाचा पाया मजबूत करणे हा होता. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये संचालक राहुल रेखावार ( भा. प्र. से. ), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जैन संघटना,शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संचालक शांतिलाल मुथ्था,कार्यकारी सहसंपादक समता विभाग प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे प्रमुख मीनल दशपुत्रे,अशोक विद्याधर,गोपाल शुक्ल, मास्टर ट्रेनर बाळासाहेब ठोंबरे, सचिन वालुंजकर, सुहास…
सुरेश काटे,तलासरी तलासरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांना टाळे, पालघर जिल्ह्यात युरिया खत आणि भात बियाण्यांच्या अनियमित आणि अन्यायकारक विक्री विरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता, तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांवर करडी नजर ठेवली व शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या तलासरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांवर थेट कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले आहेत. तलासरी तालुक्यातील त्रिशा कृषी सेवा केंद्र आणि योगिता कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून युरिया खतासाठी सरकारने निश्चित केलेल्या २६६ रु.पेक्षा अधिक म्हणजेच ३०० ते…
वसंत भोईर,वाडा डाळिंबाला सोन्याचा भाव, मागणीमध्ये मात्र घट नाही… डाळिंब शेती फायदेशीर व्यवसाय असून त्यातून नफा मिळवण्यासाठी योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि परिश्रमाची आवश्यकता असते.पालघर जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पन्न नाहीच्या बरोबर आहे.आयात झालेल्या फळांच्या बळावरच आपली मदार असते.त्यातही यंदा पावसामुळे डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले आहे.त्यामुळे यंदा डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव आला आहे. डाळिंब हे खडकाल व माळ रानावर येणारे पीक आहे. इतर पिकांप्रमाणे या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही.कमी पाण्याचे हे पीक असले तरी अतिवृष्टीत या पिकाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्यामुळे यंदा भाव वाढले आहेत. डाळिंबाची मागणी सर्वत्र प्रचंड असते.वाड्याच्या बाजारपेठेतही ग्राहक डाळिंबाला मोठ्याप्रमाणावर पसंती देत असतात.शहरातील बाजारपेठेत १५० ते…
वसंत भोईर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय _सुनीता अग्रवाल वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणाच्या समस्या जाणून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही शाळांना फक्त भौतिक सुविधा देत नसून या तालुक्यातील दुर्गम, आदिवासी भागात तळागाळातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनच्या जोडीने आम्ही विविध स्तरांवर काम करीत असल्याचे मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल यांनी सांगितले. मोतीलाल ओसवाल फाउंडेशन व सेवा सहयोग फाउंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचघर येथील ह.वी. पाटील विद्यालय व कै.घ.बा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचची नवीन इमारत,नूतनीकरण व स्वच्छतागृह यांचा लोकार्पण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सेवा सहयोग फाउंडेशनचे प्रमुख किशोर मोघे,दिपाली देवळे,महर्षी वैष्णव,राम रोकडे,अश्विनी पवार,संदीप पवार…
