- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
नवीन पाटील,सफाळे सफाळे रेल्वे फाटक क्र. ४२ बंद करण्या प्रकरणी कृती समितीचे आमरण उपोषण सुरू, पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता ३१ मार्च २०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते.त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ कालपासून सफाळे विकास कृती समितीतर्फे उपोषण सुरू करण्यात आले आहे. रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे बंद होऊ नये,यासाठी कृती समितीने वेळोवेळी रेल्वे प्रशासन,स्थानिक प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या. मात्र त्यावर फक्त आश्वासने देण्यात आल.प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे समितीचे अध्यक्ष सिकंदर…
सुरेश वैद्य, पालघर पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.३८ टक्के ; मुलींनी मारली बाजी, फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या १० वीच्या ( माध्यमिक ) परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून, पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. यंदा मुलींनी मुलांपेक्षा चांगले यश मिळवत निकालात आघाडी घेतली आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण ६३ हजार ६१७ विद्यार्थी बसले होते.यामध्ये ३३ हजार ३५५ मुले व ३० हजार २६२ मुलीचा समावेश होता.त्यापैकी ३१ हजार ४४८ मुले व २९ हजार २३२ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ६० हजार ६८० इतकी आहे. मुलांचा निकाल: ९४.२८% मुलींचा निकाल: ९६.५९% एकूण जिल्हा निकाल: ९५.३८ % विद्यार्थ्यांनी…
सचिन भोईर,वसई चंद्रेपाडा उपसरपंचपदी हेमराज भोईर, वसई तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमराज भोईर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी विजय लोकरे व सरपंच दिनेश काटेला यांनी पाहिले. यशस्वी उद्योजक तसेच सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले हेमराज भोईर यांची चंद्रपाडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीच्यावेळी अविष्कार पाटील,गंगाधर भोईर, विश्वजित पाटील, हरेश भोईर,भूपेश पाटील, चेतन तांडेल, अभिषेक म्हात्रे, हर्षद पाटील, मंगेश पाटील, रोहिदास मादणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांचा फायदा ग्रामपंचायतीस मिळवून देऊन जास्तीत जास्त कामे मार्गी लावणे,सोपवलेली जबाबदारी पार पाडून माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,”.असे भोईर…
नवीन पाटील,सफाळे मायखोप गावात लाखो लिटर पाणी वाया… पालघर जिल्ह्यातील झांझरोळी धरणाची जीर्ण झालेली जलवाहिनी मायखोप गावात फुटल्याने परिसरात लाखो लिटर पाणी वाया गेले. जीर्ण झालेली जलवाहिनी बदलणे आवश्यक असताना कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटत आहे.त्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. पालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला कळवुनही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा सारख्या तालुक्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो तर दुसरीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे.काल सकाळी सहाच्या सुमारास केळवे रोड बंधारा धरणाची जलवाहिनी मायखोप गावात फुटली. केळवा, मायखोप व…
दीपक मोहिते, बाधित शेतकरी,मच्छीमार व ग्रामस्थांना तातडीच्या मदतीची गरज, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी,मच्छीमार व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे भयावह स्वरूप लक्षात घेता सरकारने तुटपुंजी नुकसानभरपाई न देता जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे.अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडाले,मच्छीमार बोटी क्षतीग्रस्त झाल्या व अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले,त्यामुळे,या घरांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे.तसेच या नैसर्गिक आपत्तीमध्ये शंभरहून अधिक मच्छीमार बोटीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.या मच्छीमाराना आपल्या बोटीची दुरुस्ती करण्यासाठी त्वरित आर्थिक सहाय्य मिळायला हवे.अन्यथा अनेक मच्छीमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग भितीच्या सावटाखाली…
जव्हार प्रतिनिधी, आदिवासी वस्ती मुलभूत सुविधांपासून वंचित ; आ.भोये यांची प्रत्यक्ष भेट, मोखाडा तालुक्यातील मोरांडा भागातील मुरबाटवाडी या आदिवासी वस्तीत आजही रस्ते,वीज,पाणी,आरोग्य, शाळा आणि अंगणवाडी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. शेतमाळरानावर वसलेली ही वाडी गेल्या पन्नास वर्षांपासून अस्तित्वात असतानाही शासनाच्या योजनांपासून कोसोंदूर आहे.या वाडीत सध्या १८ कुटुंबे राहतात आणि सुमारे १२५ लोकवस्ती आहे. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार,वस्ती उशिरा वसल्याचे कारण देत अधिकारी अनेक वर्षांपासून विकासकामांना टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील महिलांनी आ. हरिश्चंद्र भोये यांच्या जव्हार येथील कार्यालयात भेट देऊन वस्तीतील समस्या मांडल्या. त्यानंतर आमदार भोये यांनी काल मुरबाटवाडीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या…
वसंत भोईर,वाडा कुडूसमध्ये दोन तरूणांना बेदम मारहाण,१८ जणांवर गुन्हे दाखल, तालुक्यातील कुडूस येथे मांगाठणे येथील रूपेश पाटील हा तरूण आपल्या मित्रांसोबत काल सायंकाळी चायनीज पदार्थ खात असताना किरकोळ कारणावरून वादावादी झाली.काही तरुण जोराने ओरडत असल्याने त्याने चायनीज हॉटेल मालकाला आरोपींना हळू आवाजात बोलण्यास सांगितले.त्याचा मनात राग धरून रूपेश व कुणाल या दोघांना आरोपींनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या वादामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. सायम शेख,काल्या पूर्ण नाव माहीत नाही,सुभान सुसे, मोहाफीज सुसे,राजु सुसे, मोहम्मद घोस व अन्य १० ते १८👇 इसम अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सुत्रांनी…
नदीम शेख,पालघर नुकसानभरपाईसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे -आ.गावित, पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले आहे.तसेच मच्छीमार बांधवांचे देखील मोठे नुकसान झाल्याने पालघर जिल्ह्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून शेतकरी,आदिवासी आणि बागायतदार तसेच मच्छीमार बांधवांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले होते. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतकरी,मच्छीमार,सामान्य जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांचे दुबार भात शेती सह विट उत्पादक,पालेभाजी फळबाग लागवड शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आ.राजेंद्र गावित यांनी धाकटी…
सचिन परब,वसई २८७ वा “ वसई विजयोत्सव दिन,” मोठ्या जल्लोषात संपन्न, वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ” २८७ वा वसई विजयोत्सव दिन, ” आज मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. प्रथेप्रमाणे सकाळी ०७.०० वाजता वज्रेश्वरीदेवी मंदिर, वज्रेश्वरी येथे मशाल पूजन करून मशाल यात्रेला सुरुवात झाली. अग्निशमन विभागाच्या विशेष वाहनातून व बाईकस्वारांच्या सोबतीने वज्रेश्वरीहून निघालेली मशाल यात्रा राष्ट्रीय महामार्ग – वसई फाटा – वालीव नाका – गोखीवरे नाका – चिमाजी अप्पा उद्यान, नवघर पूर्व – माणिकपूर येथून पारनाका येथे पोहोचल्यावर या मशाल यात्रेत ढोल-ताशा पथक, लेझीम पथकांच्या जल्लोषपूर्ण गजरात मशाल यात्रा वसई किल्ल्यापर्यंत काढण्यात आली.यावेळी विविध पारंपारिक वेशभूषेत मान्यवर…
वसंत भोईर,वाडा स्वतःची शेती दुसराच कोणीतरी कसतोय , कृषी निविष्ठांमुळे उत्पादन खर्च वाढला असताना शेतीला नैसर्गिक आपत्तीचा फटका दरवर्षी बसत आहे.अशा परिस्थितीत मजुरांची टंचाई व वाढती मजुरी,यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे.घरी पिक कधी येईल,याची शाश्वती राहिली नाही.अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी शेती बटाईने दिली आहे. पालघर जिल्ह्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे.त्यातच कृषी निविष्ठांच्या वाढत्या दराने उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.शिवाय पेरणी,मजुरी व मशागतीचे दर वाढले आहेत.पिके काढणीच्या काळात पावसाचा तडाखा अन नेमके याचवेळी मजुरांचा तुटवडा असतो.त्यामुळे शेती करणे,हे बेभरवशाचे झाले आहे. शेती व्यवसाय परवडणारा नाही,त्यामुळे काही जणांनी रोजगाराच्या शोधात आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. आणि काही शेतकरी शेती बटाईने देण्याकडे…
