Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, वाड्यात मशाल गौरव पुरस्काराचे वितरण, ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘मशाल’ या वृत्तपत्राच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमीत्त मशाल गौरव पुरस्कारांचे वितरण शरद नगर येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील,माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, खा.डॉ.हेमंत सवरा,सद्गुरु अलोकनाथ महाराज,उबाठाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामधे आदर्श लोकप्रतिनीधी खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा,आदर्श संस्थाचालक शिल्पा शिंदे, आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कमा कामडी,आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरु आलोकनाथ महाराज,आदर्श फोटोग्राफर दिपक गोळे,उत्कृष्ट पत्रकार दिपक चंदे,आदर्श युवा उद्योजक प्रितम भोपतराव, आदर्श सामाजिक…

Read More

दीपक मोहिते, अखेर शहाणपण सुचलं.. चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर करा- सर्वोच्च न्यायालय, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाची मुदत संपून तीन ते चार वर्षे पूर्ण होत आली पण या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याविषयी अंतिम सुनावणी झाली असता घटनापीठाचे प्रमुख न्या.सूर्य कांत यांनी येत्या चार आठवड्यात या निवडणुका करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश दिले. तसेच ही निवडणूक प्रक्रिया चार महिन्यात संपवावी अशी सूचना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना…

Read More

दीपक मोहिते, नेत्रदिपक कामगिरी, दि ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेला २१८ कोटी रु.चा नफा, सहकार क्षेत्रात अग्रेसर बँक आणि शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून प्रसिद्ध असलेली ठाणे आणि पालघरवासियांची बँक दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील आर्थिक वर्षात २१८ कोटी ९७ लाख रु.चा नफा चालू आर्थिक वर्षात मिळवला आहे.राज्यातील अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेने दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ठाणे नेहमीच अग्रेसर राहिली आहे.बँकेने वर्षअखेर १ हजार ५९३ कोटी २५ लाख रु.चा निधी उभारला आहे. सद्यस्थितीत बँकेकडे ९ हजार ६३१ कोटी ४७ लाख रु.च्या ठेवी आहेत.यात बँकेने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५५९ कोटी ७३ लाख रु.ची वाढ झाली आहे.बँकेने ४…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” राज्याच्या राजकारणाची अधोगती सुरू, ” युद्ध व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,” असं म्हंटल जातं ते खरंच आहे.पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे,त्याचे ” राजकारणाची अधोगती,” असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये.दीड दशकापूर्वी दोन ठाकरे बंधू एकमेकांच्या उरावर बसले होते,तर दोन वर्षांपूर्वी काका-पुतण्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष निर्माण होऊन पक्षाची दोन शकले झाली. स्वार्थी राजकारणाचा हा परिपाक होता.पुतण्याने पक्ष, चिन्ह व आमदार पळवल्याचे सांगत काकाश्रीनी राज्यभरात आपला ऊर बडवला.आज तेच काका/पुतण्या व दोन ठाकरे बंधू ” आम्ही एकत्र आलो तर आश्चर्य वाटता कामा नये,” असा ढोल पिटण्यात धन्यता मानत आहेत.गेल्या ६६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची…

Read More

दीपक मोहिते, ” विनाशकाले विपरीत बुद्धी, ” भारताने पाकची अनेक शहरे केली बेचीराख… काल पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या वायुदलाने तो हाणून पाडला.यावेळी झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानची चार ते पाच विमाने पाडली व त्यांच्या तीन वैमानिकांना ताब्यात घेतले आहे.आपण केलेल्या लष्करी कारवाईंनंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानच्या एक तृतीयांश भुभागावर मुसंडी मारली आहे. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानच्या सियालकोट शहरात अफरातफरी माजली आहे. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला पदावरून हटवण्यात यावे,अशा मागणीने जोर धरला आहे.दरम्यान तुर्कस्तानचे कार्गो विमान पाकिस्तानात पोहोचले असुन या विमानात ड्रोन असल्याची माहिती मिळाली आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात प्रखर हल्ले चढवल्यामुळे सर्वत्र ब्लँकआउट घोषित…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पाकिस्तान भितीच्या सावटाखाली ; चार शहरे स्फ़ोटानी हादरली, भारतीय वायू दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले.जैश ए मोहमद,लष्कर ए तोयबा व हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानातील तीन प्रमुख दहशतवादी गटाचे कंबरडे मोडले गेले.या कारवाईमुळे पाकिस्तानात हडकंप माजले आहे. भारतीय सैन्याकडून अधिक हल्ले होतील,अशा भितीमुळे सीमेवरील अनेक गावे ओस पडली आहेत.दरम्यान जगातील अनेक देशांनी पाकीस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये,तसेच भारतानेही या प्रश्नी संयम बाळगावा असे म्हंटले आहे.दरम्यान पाकिस्तानच्या लाहोर शहरात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी स्फोट झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बलुचिस्तान व पख्तुन ख्वा या दोन प्रांतात पाकिस्तान विरोधात वातावरण…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पाकिस्तान भितीच्या सावटाखाली ; चार प्रमुख शहरे स्फ़ोटानी हादरली, भारतीय वायू दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले.जैश ए मोहमद,लष्कर ए तोयबा व हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानातील तीन प्रमुख दहशतवादी गटाचे कंबरडे मोडले गेले.या कारवाईमुळे पाकिस्तानात हडकंप माजले आहे. भारतीय सैन्याकडून अधिक हल्ले होतील,अशा भितीमुळे सीमेवरील अनेक गावे ओस पडली आहेत.दरम्यान जगातील अनेक देशांनी पाकीस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये,तसेच भारतानेही या प्रश्नी संयम बाळगावा असे म्हंटले आहे.दरम्यान पाकिस्तानच्या लाहोर शहरात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी स्फोट झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बलुचिस्तान व पख्तुन ख्वा या दोन प्रांतात पाकिस्तान विरोधात…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरीत तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन, तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा पंचायत समिती तलासरी सभागृह येथे आ.विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी आर. यु.ईभाड यांनी केले.या कार्यशाळेत खरीप हंगाम नियोजन व २०२५ या वर्षात घ्यावयाचे कार्यक्रम याविषयी त्यांनी सादरीकरण केले. तसेच कृषी विभागाकडून लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील संनियंत्रण अधिकारी म्हणून विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी पालघर हे उपस्थित होते.त्यांनी भात लागवडीची माहिती देताना खर्चाच्या बाबी कशा कमी करता येतील,याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया,उगवण क्षमता चाचणी यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच…

Read More

सफाळे प्रतिनिधी, वेढी गावात शॉक लागून एकाच मृत्यू, सफाळे पश्चिमेस असलेल्या वेढी गावातील रहिवाशी मोरेश्वर लोहार हे बकऱ्या चरण्यासाठी गावाच्या पश्चिम भागात गेले असता त्याना तुटून पडलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. काल रात्री अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीजेची तार तुटून पडली होती. ही तार मोरेश्वर लोहार यांना दिसली नाही,तारेवर त्यांचा पाय पडताच विद्युत प्रहावामुळे त्यांना विजेचा जोरदार झटका लागून ते मृत्युमुखी पडले. घटनेची खबर लागताच सफाळे पोलिसांनी पंचनामा केला व त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सफाळे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.या घटनेने वेढी गावावर शोकाकळा पसरली.

Read More

नवीन पाटील, सफाळे अवकाळी पावसामुळे सफाळ्यात मोठे नुकसान, पालघर जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.रात्री उसंत घेतल्यानंतर काल दुपारपासून पुन्हा सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित होवून नागरिकांची त्रेधा तिरापिट उडाली. परिसरातील अनेक घराचे पत्रे उडाले तसेच उन्हाळी भात पीक,आंबा बागायती,जांभूळ, मिरचीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे सफाळे भागातील आगरवाडी,चटाळे,, येथील घरांचे तर टेंभीखोडावे येथील शाळेच्या स्टेजवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. सफाळे,नांदाडे,गेरूचा ओहोळ आदी ठिकाणी घरावर आणि रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या असंख्य घटना घडल्या.यात उंबरपाडा- सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश बंटी म्हात्रे आणि सर्पमित्र टीमने काल दिवसभर दुर्घटनग्रस्त ठिकाणी मदतकार्य केले.अचानक पाऊस…

Read More