- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेश नाईक यांचा बोलवता धनी कोण ? गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.एकाच मंत्रिमंडळात असलेल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यामध्ये असलेला बेबनाव दररोज समोर येऊ लागला आहे.वनमंत्री गणेश नाईक हे तर ताळतंत्र सोडत शिंदे यांना लक्ष्य करत आहेत.तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या कुरापतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.मात्र,त्यांचे सहकारी ( संजय शिरसाट,प्रताप सरनाईक व शंभूराज देसाई ) मात्र गणेश नाईक यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.ही सारी मंडळी दर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.जनतेचे सामूहिक नेतृत्व करताना ही मंडळी संविधानाने आखून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महाड हिंसाचार ; उच्च न्यायालयाने सरकारची लक्तरे वेशीला टांगली, रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या सत्तास्पर्धेत जे रणकंदन सुरु आहे,त्याला आवर घालण्याऐवजी सरकार व आपली पोलीस यंत्रणा खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या नगरपरिषद निवडणूकी दरम्यान महाड येथे शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) यांच्यामध्ये झालेल्या राड्यावरुन उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहखाते व भरत गोगावले यांना सुणावणी दरम्यान चांगलेच झापले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यावर टीप्पणी केली आहे.” राज्याचे मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत का ? ते आपल्याच युतीमधील…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना शिंदे पिता – पुत्राने घाम फोडला… उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय कोणाला फायदेशीर ठरला ? याविषयी चाचपणी केली असता उद्धव ठाकरे यांचे या निवडणुकीत फार मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ हा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाला ९ जागा कमी पडत आहेत.त्यामुळे मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक गळाला लावले आहेत.दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणखी दोन नगरसेवक बेपत्ता झाले आहेत.त्यामुळे ५३ नगरसेवक असलेल्या शिंदे…
दीपक मोहिते, नॅशनल डेस्कसाठी, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांचे आर्थिक धोरण आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारे… तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्न बघणाऱ्या आपल्या देशाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकामागोमाग धक्के देत आहेत.आपल्या शेअर मार्केटमधून विदेशी संस्थांनी सुमारे ३६ हजार ,५०० कोटी रु.ची गुंतवणूक काढून घेतल्यामुळे डॉलरच्या तुलनेत आपला रुपया ९१.९४ च्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरचे दिवसेंदिवस मजबूत होणे, इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे.परदेशात शिकणारे विद्यार्थी व प्रवासासाठी डॉलर्स खरेदी करणे,आता आपल्या आवाक्याबाहेर झाले आहे.अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण घनिष्ठ मित्र आहोत,असे भासवत असले तरी,दक्षिण आशियात असलेले भारताचे वर्चस्व मोडून…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” सरकारी यंत्रणा माध्यमावर दबावतंत्राचा वापर करू लागले आहे… हल्ली पोलीस यंत्रणेविषयी फारसे चांगले बोलले जात नाही.सर्वसामान्य माणूस सहसा पोलीसांवर विश्वास ठेवायला तयार नसतो,त्यामुळे तो न्यायासाठी पोलीस ठाण्यात जायला तयार नसतो.आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळणार नाही,अशी त्याची धारणा झाली आहे.सर्वसामान्य नागरिक व पोलीस यंत्रणे दरम्यान निर्माण झालेली ही दरी व अविश्वास,हा पोलीस यंत्रणेवरून लोकांचा विश्वास उडत चालल्याची चिन्हे आहेत.त्यामुळे भारतीय जनतेला केवळ न्याययंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे व पुढेही राहावे लागणार आहे. आपली पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते,हे आजवरच्या अनेक उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे.तसेच हल्लीच्या काळात आपली पोलीस यंत्रणा कशी सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेली आहे,हे जम्मू- काश्मीर…
दीपक मोहिते, ” दावोस ; एक पर्यटन,” स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशातील दावोस येथे भरणारी वर्ल्ड इकॉ.फोरम ही संस्था काय आहे व तिचे कामकाज कशा पद्धतीने चालते,हे आपण जाणून घ्यायला हवे.या परिषदेत सहभागी होणाऱ्या देशात आपण किती गुंतवणूक आणली,यावरून स्पर्धा सुरू होत असते.पण,या दावोसमध्ये जाऊन नेतेमंडळी नेमके करतात काय ? हे जाणून घेण्याची गरज आहे. हे वर्ल्ड इकॉ.फोरम म्हणजे नक्की काय आहे ? या प्रश्नाचे उत्तर आहे,ही एक खाजगी संस्था आहे.पण तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.जागतिक व्यापार,व्यवसाय,राजकारण,शिक्षण व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून प्रदेश विकासाला चालना देण्यासाठी १९७१ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.या परिषदेत सुमारे ३ हजार ५०० हुन अधिक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुंबईच्या मतदारांनी ठाकरे बंधूना का झिडकारले ? मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी बहुमतासाठी आवश्यक असलेला ११४ चा जादुई आकडा ठाकरे बंधूना गाठू दिला नाही.अर्थात या शहराच्या महापौरपदी महायुतीची व्यक्तीच विराजमान होणार आहे.८९ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे,तर शिवसेना ( उबाठा ) ६५ जागासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर शिंदे यांच्या गटाला २९ जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २४,एआयएमआयएम -०८,मनसे -०६,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) – ०३,समाजवादी पक्ष – ०२ व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) – ०१,अशी क्रमवारी आहे. भाजप व शिंदे यांच्या आक्रमणाला रोखण्यासाठी उद्धव व राज हे दोघे…
दीपक मोहिते, देशाच्या सर्वांगीण विकासात संविधानाचे मोठे योगदान, येत्या २६ जाने.रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.देशाचा अभिमान असलेला हा सोहोळा ही देशवासियांसाठी एक पर्वणी असते.ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून मुक्ती मिळाल्याचा आनंद व संविधान अंमलबजावणीचा उत्सव म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा होत असतो.१५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षानंतर देशाच्या संविधान समितीने २६ नोव्हें.१९४९ साली संविधानाचा मसुदा स्विकारला व २६ जाने.१९५० रोजी ते अमलात आले.स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला स्वतःचे संविधान नव्हते.१५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या १४ दिवसात २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली.या…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जल,जमीन व जंगल ; अस्मानी संकट घोंगावण्यास सुरुवात, गेल्या काही वर्षात मानवाने जल,जमीन व जंगलाचे लचके बेसुमार पद्धतीने तोडले.त्याचे दृष्यपरिणाम आता दिसू लागले आहेत.मानवी जीवनात या तिन्ही नैसर्गिक संसाधनांला अनन्यसाधारण महत्व असताना,मूठभर धनदंडग्यांना झुकते माप देत सरकारने सध्या मानवाला देशोधडीला लावण्याचे धोरण अवलंबले आहे.जमिनीची भूक काही मिटता नाही,तर ९० च्या दशकापासून जल व जंगल यावर सरकार व उद्योगसमूहांची वक्रदृष्टी पडू लागली आहे.त्यामुळे अवघ्या ४० वर्षात ही सारी नैसर्गिक संसाधने हळूहळू इतिहासजमा होऊ लागली आहेत.” विकासासाठी जमिनीचे संपादन,” या गोंडस नावाखाली शेती/ बागायतीच्या सुपीक जमीनी सरकारने बहुराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या घश्यात घालण्याचे धोरण अवलंबले.सरकारच्या या विनाशकारी धोरणामुळे ग्रामीण भागातील…
दीपक मोहिते, ” फ्रँटलाईन,” एकनाथ शिंदे व अजित पवार यांची सध्याची अवस्था ” सहनही होत नाही,आणि सांगताही येत नाही,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व शिवसेनेचा ( एकनाथ शिंदे गट ) चांगलाच बोलबाला राहिला.त्यांच्या युतीने २९ पैकी २६ महानगरपालिका जिंकत शहरी भागातही आम्हीच ” दादा,” असल्याचे दाखवून दिले आहे.त्यांच्या महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीत साफ पालापाचोळा झाला.ज्या पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका जिंकण्याची त्यांनी स्वप्ने पाहिली होती,ती भाजपने पार धुळीला मिळवली.अजित पवार यांचा उद्धटपणा, सहकारी मंत्र्यांचा मनमानी कारभार व मुलाचे प्रताप,अशा तीन कारणामुळे देवाभाऊंने या निवडणुकीत त्यांना उखडून फेकून दिले. ज्या सत्तेसाठी एकनाथ शिंदे व…
