Author: दीपक मोहिते

सफाळे प्रतिनिधी, वेढी गावात शॉक लागून एकाच मृत्यू, सफाळे पश्चिमेस असलेल्या वेढी गावातील रहिवाशी मोरेश्वर लोहार हे बकऱ्या चरण्यासाठी गावाच्या पश्चिम भागात गेले असता त्याना तुटून पडलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. काल रात्री अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीजेची तार तुटून पडली होती. ही तार मोरेश्वर लोहार यांना दिसली नाही,तारेवर त्यांचा पाय पडताच विद्युत प्रहावामुळे त्यांना विजेचा जोरदार झटका लागून ते मृत्युमुखी पडले. घटनेची खबर लागताच सफाळे पोलिसांनी पंचनामा केला व त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सफाळे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.या घटनेने वेढी गावावर शोकाकळा पसरली.

Read More

नवीन पाटील, सफाळे अवकाळी पावसामुळे सफाळ्यात मोठे नुकसान, पालघर जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.रात्री उसंत घेतल्यानंतर काल दुपारपासून पुन्हा सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित होवून नागरिकांची त्रेधा तिरापिट उडाली. परिसरातील अनेक घराचे पत्रे उडाले तसेच उन्हाळी भात पीक,आंबा बागायती,जांभूळ, मिरचीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे सफाळे भागातील आगरवाडी,चटाळे,, येथील घरांचे तर टेंभीखोडावे येथील शाळेच्या स्टेजवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. सफाळे,नांदाडे,गेरूचा ओहोळ आदी ठिकाणी घरावर आणि रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या असंख्य घटना घडल्या.यात उंबरपाडा- सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश बंटी म्हात्रे आणि सर्पमित्र टीमने काल दिवसभर दुर्घटनग्रस्त ठिकाणी मदतकार्य केले.अचानक पाऊस…

Read More

तलासरीत वादळी पावसामुळे ७० घरांचे नुकसान, सुरेश काटे – तलासरी दि. 07 काल व आज तलासरी भागात पडलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे तलासरी तालुक्यातील जवळपास ७० घराचे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात येत असून तलासरी तहसीलदार अमोल पाठक स्वतः नुकसान ग्रस्त घराची पाहणी करून माहिती घेत आहेत. काल रात्री तसेच आज दुपारपासून तलासरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.त्यामुळे भागातील अनेक घराचे नुकसान झाले,अनेक घरांचे पत्रे उडून गेले.घरकुल बांधण्यासाठी अनेकांनी आपली घरे मोडून ठेवली होती,पण अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील समुद्रीकिनारी असलेल्या झाई गावाला बसला तसेच या पावसामुळे वीटभट्ट्याचे मोठ्या प्रमाणात…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जगदंबा बोहाडा उत्सव ; १५ ते १७ मे २०२५ दरम्यान भव्य आयोजन, जव्हार तालुक्यातील मौजे चालतवड येथे १५ ते १७ मे दरम्यान जगदंबा बोहाडा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात ग्रामस्थ,नातेवाईक, आजूबाजूच्या गावांतील भाविक आणि लोककला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. या उत्सवात पारंपरिक सोंगे, आदिवासी लोककला सादरीकरण,मिरवणूक,आणि जगदंबा देवीचे पूजन,असे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.बोहाडा सोंगांचे संबळ वाद्य मिरवणूक,तसेच पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांचे सादरीकरण,ही या उत्सवाचे खास आकर्षण असते.त्यामुळे उपस्थित भाविकांना पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव मिळतो.चालतवड गावातील सार्वजनिक जगदंबा बोहाडा उत्सव हे गावाचे गौरवशाली…

Read More

दीपक मोहिते, युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिल, दहशतवाद्यांविरोधात भारतीय वायू दलाने मोठी कारवाई केल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं,काय उपाययोजना कराव्या,यासाठी नागरी संरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत.हे मॉक ड्रिल करताना हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅकआऊट कसा करावा,सुरक्षित ठिकाणी कसं जावं,इमारतींखाली कसं जमा व्हावं,याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही हायअलर्ट मोडवर आले आहे.प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना…

Read More

दीपक मोहिते, भारतीय वायू दलाकडून अतिरेक्याचे अड्डे उध्वस्त, अखेर आज भारतीय वायू दलाने काल मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ९ अड्ड्यावर जोरदार बॉम्बहल्ले केले.या हल्ल्यात आठ दहशतवादी ठार झाले,,तर ३५ जण गंभीर जख्मी झाले.मध्यरात्री भारतीय वायू दलाने “ऑपरेशन सिंदूर,” राबवले.अचानक झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तान अक्षरशः भांबावून गेला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांची मुख्यालये उध्वस्त झाली आहेत.मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायू दलाने राबवलेल्या या मोहिमेत एकूण २४ क्षेपणास्त्रे डागली.या हल्ल्यात ” जैशे ए महंमद,” या जहाल अतिरेकी संघटनेचे मुख्यालय पार उध्वस्त झाले.पहलगाम घटनेच्या पंधरा दिवसानंतर भारतीय सैन्याने बदला घेतला.हिजबूल मुजाहीदिन या अतिरेकी संघटनेचेही…

Read More

दीपक मोहिते, भारतीय वायू दलाकडून अतिरेक्याचे ९ अड्डे उध्वस्त, अखेर आज भारतीय वायू दलाने काल मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ९ अड्ड्यावर जोरदार बॉम्बहल्ले केले.या हल्ल्यात आठ दहशतवादी ठार झाले,,तर ३५ जण गंभीर जख्मी झाले.मध्यरात्री भारतीय वायू दलाने “ऑपरेशन सिंदूर,” राबवले.अचानक झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तान अक्षरशः भांबावून गेला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांची मुख्यालये उध्वस्त झाली आहेत.मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायू दलाने राबवलेल्या या मोहिमेत एकूण २४ क्षेपणास्त्रे डागली.या हल्ल्यात ” जैशे ए महंमद,” या जहाल अतिरेकी संघटनेचे मुख्यालय पार उध्वस्त झाले.पहलगाम घटनेच्या पंधरा दिवसानंतर भारतीय सैन्याने बदला घेतला.हिजबूल मुजाहीदिन या अतिरेकी…

Read More

राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे.जाने.२०२५पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली,तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्यामुळे राम नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.राम नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यामुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे,ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे ठाम मत झाले होते.योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे.जाने.२०२५पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली,तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्यामुळे राम नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राम नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यामुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे,ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे ठाम मत झाले होते.योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

दीपक मोहिते, ” नको असला विकास,” प्रस्तावित पुरंदर विमानतळ : पोलीसांच्या लाठीहल्ल्यात महिलेचा मृत्यू, ” देशाचा सर्वांगीण विकास,” या तीन गोंडस शब्दाविषयी ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.वाढवण,बुलेट,समृद्धी मार्ग,द्रुतगती मार्ग,रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट प्रकल्प व आता बारामती जिल्ह्यातील पुरंदर येथे होणारऱ्या प्रस्तावित विमानतळासाठी बळजबरीने होत असलेले जमिनीचे संपादन लक्षात घेता हा अशाप्रकारचा सर्वांगीण विकास आम्हाला नको,असे स्थानिक भूमिपुत्राचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी पुरंदर विमानतळासाठी जमीन संपादन प्रक्रियेच्या विरोधात सात गावातील स्थानिक भूमीपुत्रांनी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.सरकारच्या आडमुठे धोरणामुळे हे आंदोलन चिघळले.पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात…

Read More