- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, विनोद तावडे यांचे वागणे,” सौ चुहे खाकर,बिल्ली चली हजको,” अशीच… काल झालेल्या घटनेच्या वेळी आ.हितेंद्र ठाकूर यांनी माणुसकी व संयम दाखवला नसतात,तर नको ती घटना घडली असती.भाजपचा नेता आपल्या मुलाविरोधात कटकारस्थान करतोय,हे माहित असूनही आ.ठाकूर यांनी संयम राखत त्यांना आपल्या कारमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले.आ.ठाकूर यांनी माणुसकी व संयम दाखवला नसता तर भाजपच्या त्या नेत्याला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर पडू दिले नसते.आ.ठाकूर हे आपल्या मैत्रीला जागले,पण विनोद तावडे यांनी मुंबई येथे पोहोचल्यानंतर ” सरडा जसा रंग बदलतो,” तसा आपला रंग बदलला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी आ.ठाकूर धादांत खोटे बोलत आहेत,असा आरोप केला व हॉटेलमधील सीसीटीव्हीचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची निती ; ” मी नाही त्यातली,कडी लावा आतली,” काल विरार येथे जे काही घडलं,त्याचे कदापी समर्थन होऊ शकणार नाही.लाखो रु.चे वाटप व लाभार्थ्यांच्या नावे असलेली डायरी ताब्यात घेतल्यानंतरही भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस,सुधीर मुनगंटीवार व वाचाळवीर प्रवक्ते प्रवीण दरेकर निर्लज्जपणे त्याचा इंकार करत सुटले आहेत.” खोटे बोल,पण रेटून बोल,” याचा आधार घेत ही नतद्रष्ट मंडळी आता माध्यमांसमोर थयथयाट करत आहेत.घटना घडली तेंव्हा विनोद तावडे हे प्रचंड तणावाखाली आले होते.हातापाया पडत होते,मला कृपया जाऊ द्या,अशी विनवणी करताना चॅनेलवर पहायला मिळाले.आता ते विनोद तावडे देखील ” मी नाही त्यातली,कडी लावा आतली,” अशा पद्धतीने वागत आहेत.तावडे आता म्हणत आहेत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आजच्या घटनेने भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर निकालाच्या दिवशी तोंड लपवण्याची पाळी येणार, नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी नको तो प्रकार करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.विरार येथे आज जे काही महाभारत घडले,ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ व सुशिक्षित नागरिकांच्या मनाला पटले नाही.त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे.ही घटना म्हणजे राजन नाईक यांच्यासाठी ” आ बैल मुझे मार,” असाच होता. वसई व नालासोपारा मतदारसंघात गेली ३५ वर्षे आ.हितेंद्र ठाकूर यांची निर्विवाद सत्ता आहे.२००९ सालचा अपवाद वगळता या उपप्रदेशावर ठाकूर कुटुंबीयांचे कायम वर्चस्व राहिले.शिवसेना,भाजप त्यापूर्वी जनता दल या साऱ्या पक्षांनी ठाकुरांचा पराभव…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विनोद तावडे यांना अवदसा आठवली,कार्यकर्त्यांच्या अक्षरशः हातापाया पडावे लागले, बेगडी हिंदुत्वाचा मुखवटा लावून फिरणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या काळाकुट्ट चेहऱ्यावरचा मुखवटा विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी टराटरा फाडला.भाजपच्या नेत्यांनी निदान आता तरी साधनशुचितेच्या गोष्टी करणे,सोडून द्यावे.भाजप निवडणुका कसे जिंकते ? हे बहुजन विकास आघाडीने देशासमोर आणले आहे. पैसे वाटप करताना सापडलेले भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे अक्षरशः हातापाया पडत होते,मला जाऊ द्या,असे सांगत आक्रोश करत होते.नालायकपणा करण्याच्या साऱ्या मर्यादा भाजपवाल्यानी पार केल्या,त्यामुळे नियतीने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.नियती ही कोणालाही सोडत नाही,ती फक्त वेळ येण्याची वाट पाहत असते. केंद्रीय स्तरावर काम करणारे विनोद तावडे यांचा बिहार…
दीपक मोहिते, शुद्ध नालायकपणा… सारं काही संपल्यात जमा..भाजप नेते विनोद तावडे तावडीत सापडले, निवडणुकीची आचारसंहिता पूर्व व ती लागू झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पैश्याचा ओघ सुरू झाला आहे. हा पैसा कोण व कशासाठी पाठवण्यात हे आता लपून राहिलेले नाही.गेल्या महिन्याभरात राज्यात सुमारे एक हजार कोटीहून अधिक रकमा जप्त करण्यात आल्या आहेत.पालघर जिल्ह्यात तर गेल्या काही दिवसात २५ कोटी रु.पकडण्यात आले.हा सारा पैसा शेजारच्या गुजराथ व केंद्रशासित प्रदेशातून येत असतो. आज विरार पूर्व भागात नव्याने सुरू झालेल्या विवांता हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या भाजपचे लोक पैसावाटप करत असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हॉटेलवर हल्लाबोल करत भाजपच्या लोकांना रंगेहाथ पकडले.आश्चर्याची बाब…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भारतीय समाज सहिष्णू आहे,येथे ” व्होट जिहाद व बटेंगे तो कटेंगे,” या समाज विघातक धोषणाना येथे थारा मिळत नाही, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विविध हातखंडे वापरण्याचा प्रयत्न केला,पण ते आपल्यावरच उलटतील,हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते थांबवले.चला बघुया,त्यांनी कोणते मुद्दे प्रचाराच्या बाजारात आणण्याचा प्रयत्न केला व त्यांना माघार घ्यावी लागली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुपीक डोक्यातून ” व्होट जिहाद व बटेंगे तो कटेंगे,” हे दोन मुद्दे बाहेर आले व राज्यात सत्तेसाठी हपापलेले भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या मुद्द्यावर प्रचारास सुरुवात केली.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या लक्षात आले कि हे दोन्ही…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” विधानसभा निवडणुका ; महविकास आघाडी बाजी मारण्याची शक्यता, निवडणुकीत उभे असलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.मतदारराजा या निवडणुकीत आपला कौल कसा देतो ? याकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागले आहे.दैदिप्यमान इतिहास असलेले पुरोगामी राज्य व आर्थिक राजधानी असलेली मुंबई,आपल्या ताब्यात राहावी,यासाठी देव पाण्यात टाकून बसलेल्या केंद्रीय नेतृत्वाचे मनसुबे तडीस जातील का ? या प्रश्नाचे उत्तर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून मिळणार आहे. उद्या राज्यातील ९ कोटी मतदार एकूण २८८ लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतील.राज्यातील एकंदरीत राजकीय वातावरण लक्षात घेता या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.महायुती व महाविकास आघाडी,या दोघांनी या निवडणुकीत आपले सर्वस्व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपाच्या गुजराती नेत्याला ओरिजनल शिवसेना का संपवायची आहे ? ही सल आहे कुबेर नगरी हातातून निसटल्याची ही सल आहे,आंतराष्ट्रीय व्यापार-उद्योग असलेल्या शहरावरील कब्जा गेल्याची, ही सल आहे आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेचा ताबा नसल्याची.” १९६० ला जे जमलं नाही त्याचा “बदला” घेण्याची तयारी आता सुरू झाली आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत कधीही अखंड देश नव्हता. छोटी छोटी संस्थाने आणि थेट ब्रिटिश अंमलाखाली असलेले प्रांत मिळून स्वातंत्र्यानंतर आजचा ” भारत देश,” अस्तित्वात आला.भारताची मूळची प्रांतीय स्वायत्तता कायम ठेवण्याचे वचन घटनेने लोकांना दिले होते.प्रांतांची निर्मिती कशी करावी,यावर खूप चर्चा झाली.अखेरीस पंतप्रधान नेहरुंनी भाषावार प्रांत रचना करण्यास मान्यता दिली.त्यानुसार देशातील सगळे…
दीपक मोहिते, ” रणसंग्राम,” कुडाळ विधानसभा ; आ.वैभव नाईक यांचे पारडे जड, कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक व निलेश राणे,या दोघांमध्ये होणारी लढत केवळ मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नसून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) विद्यमान आ.वैभव नाईक विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राणे पुत्र निलेश राणे या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मतदारसंघातील वातावरण लक्षात घेता वैभव नाईक यांचे पारडे जड आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला,” अशी या मतदारसंघाची ओळख आहे.मात्र शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे.हे जरी खरं असलं तरी स्थानिक जनतेवर नाईक यांचा चांगला प्रभाव…
नवीन पाटील, ” रणसंग्राम,” बोईसर विधानसभा बविआसाठी प्रतिष्ठेची,शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत होणार चुरशीची लढत बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत चुरशीची स्पर्धा होणार असून बोईसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.मतदारसंघ निर्मितीपासून बोईसर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा बहुजन विकास आघाडीने विजय मिळवला आहे.बहुजन विकास आघाडीतून दोन टर्म आमदारकी भूषवलेले माजी आ.विलास तरे शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर बहुजन विकास आघाडीकडून विद्यमान आ.राजेश पाटील पुन्हा रिंगणात आहेत तर डॉ. विश्वास वळवी शिवसेनेच्या ( उद्धव ठाकरे ) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटनेकडून नरेश धोडी आणि मनसेचे शैलेश भूतकडे निवडणुकीच्या रिंगणात…
