Author: दीपक मोहिते

नदीम शेख,पालघर, कौतुकास्पद उपक्रम, विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यासाठी सहकार्य. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी एक चांगलं घर असण्याची आवश्यकता आहे,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गृहनिर्माण क्षेत्रात काम करणारी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया,ही एक आघाडीची ना-नफा तत्वावरची संस्था आहे. सॅमसंग सी.अँड टी.या संस्थेसोबत भागीदारी करत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये सावरे,कंचाड आणि हमरापूर या गावांत राहणाऱ्या वारली आदिवासी कुटुंबांचे जीवन समृद्ध करण्यासाठी १५ घरे आणि जिल्हा परिषदेच्या ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा संकल्प केला आहे.पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या या दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी समुदायासाठी आवश्यक सुविधांची उभारणी,या प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमावर बोलताना हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे राष्ट्रीय संचालक…

Read More

दीपक मोहिते, आश्रमशाळा ; भयाण वास्तव, भाग क्र.,३, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरलेल्या आश्रमशाळा योजनेत सुधारणा करा, कालच्या भाग क्र.२ मध्ये आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे भयानक वास्तव प्रकाशात आणले, आजच्या भागात आश्रमशाळा या चांगल्या योजनेचा गेल्या पाच दशकात कसा करायचा बट्ट्याबोळ करण्यात आला,याविषयी माहिती घेणार आहोत.ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे,शिक्षणासोबत दोन वेळचे जेवण,कपडेलत्ते त्यांना मिळावेत,त्यांच्या निवासाची सोय व्हावी,यासाठी राज्यसरकारने १९७२-७३ साली ही योजना सुरू केली.त्यासाठी सरकार दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात हजारो कोटी रु.ची आर्थिक तरतूद करत असते.ही योजना सुरू करण्यामागे ग्रामीण भागाचा मूलभूत विकास व्हावा,त्या भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत,असा उद्देश होता.गेल्या ५० वर्षात तो कितपत यशस्वी…

Read More

मनोज कामडी, जागतिक एड्स दिनानिमित्त पालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन, जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय पालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, दुसऱ्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस. आर. बांदल,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे व डॉ.राजगुरू (मनोर), वाय.आर.जी.केअरच्या जानवी मॅडम,जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे रतन गाढवे,तसेच एम अँड ई रवि विशे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते या फेरीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दाखवण्यात आला.प्रभात फेरी दरम्यान एक चित्ररथ फिरवण्यात…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यातील नरेगाच्या कामांची पाहणी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर,रविंद्र शिंदे यांनी आज वाडा तालुक्याला भेट देऊन नरेगाच्या कामांची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प. ) चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( नरेगा ) अतुल पारसकर,गटविकास अधिकारी पं.स.वाडा,इ.अधिकारी उपस्थित होते.ही पाहणी झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत सुरु असलेल्या डीएस-गवळी पाडा,बाळा कडु यांच्या शेताजवळील बंधाऱ्यातील गाळ काढणे,या कामाला भेट दिली.सदर कामावर १४८ मजुर हजर होते.या भेटी दरम्यान रविंद्र शिंदे यांनी मजुरांची विचारपुस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तसेच पं.स.वाडा,ग्रामपंचायत परळी अंतर्गत सुरु असलेल्या एनएस-कदल नाला सरळीकरण करणे,या कामाला भेट…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वर्गाचा मॉनिटर आता शिपायाच्या भूमिकेत, देवेंद्र फडणवीस यांना मानलं बुवा,त्यांनी गेली अडीच वर्षे कार्यरत आलेल्या वर्गाच्या मॉनिटरला थेट शिपाई बनवले. बारा दिवस आढेवेढे घेणारे एकनाथ शिंदे यांनी शिपाई म्हणून काल सूत्रे हाती घेतली व भाजपवाल्यांचा जीव भांड्यात पडला.दुसरा आणखी एक शिपाई गुलाबी जाकीट घालून ” जी साब,जी साब,” बोलण्यासाठी सज्ज झाला आहे.या सर्व घटनाक्रमाने स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.आजवर एकाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर अशी पाळी आली नव्हती,ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली.असो ” राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य,” असते.एका मराठ्याला अशाप्रकारची मानहानी स्विकारावी लागली,याचे मनोज जरांगे पाटलाना देखील वाईट वाटले असावे.ज्या शिंदे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.२ ग्रामीण शिक्षण व्यवस्था, ग्रामीण भागातील जि.प.च्या प्राथमिक शाळा वाचवण्याचे  नव्या सरकारपुढे मोठे आव्हान, राज्याचे शिक्षण विभाग,हे कायम निद्रावस्थेत असलेले पाहायला मिळते.गेल्या काही वर्षात या विभागाचा कारभार इतका सैरभैर झाला आहे,की ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था मोडीत निघते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यास अधिकारीवर्गाचा भ्रष्ट कारभार व लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत ठरली आहे. गेल्या काही वर्षात राज्यात खाजगी शाळांचे वारेमाप पीक आले आहे.राज्य सरकारच्या या विभागाने खाजगी शिक्षण संस्थांना मुक्तहस्ते परवानग्या दिल्यामुळे खाजगी शाळा पावसाळ्यात रानात उगवणाऱ्या छत्र्यासारख्या उगवल्या.परिणामी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद हळूहळू मृत्युशय्येवर जाऊ लागल्या.आजच्या घडीला राज्यातील हजारो शाळांनी अखेरचा श्वास घेतला…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, महायुतीच्या सरकारचा शपथविधी ; घोडं अखेर गंगेत न्हालं.. तब्बल १२ दिवसानंतर आज अखेर तीन इंजिन सरकारचा शपथविधी आझाद मैदानात पार पडला.फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली.तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर चेहरा करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.यावेळी उपस्थित असलेल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली असली तरी,या समारंभावर नाराजीची गडद छाया पडली होती.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर गंभीर चेहरा करून बसलेले पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते.भाजपला मिळालेल्या जागा लक्षात घेता मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच जाणार,हे नक्की होते.पण एकनाथ शिंदे त्यास तयार नव्हते.त्यांनी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१, ” शेतीसिंचन,” शेतीसिंचनासाठी पाणी ; नवनिर्वाचित खासदार व आमदारांनी सरकार दरबारी प्रयत्न करायला हवेत, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.या निवडणुकीत भाजपने वसई,नालासोपारा व विक्रमगड तर शिवसेनेने ( एकनाथ शिंदे गट ) पालघर व बोईसर,अशा एकूण पाच जागा जिंकल्या.सहावी डहाणूची जागा मात्र त्यांना जिंकता आली नाही.ही जागा मार्क्स.कम्यु.कडेच राहिली.या निवडणुकीतही भाजपला मार्क्स.कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या तलासरी तालुक्यात दमदार कामगिरी करता आली नाही.त्यामुळे ही जागा त्यांना जिंकता आली नाही. आता निवडणुका पार पडल्या असून भाजपने या जिल्ह्यावर आपली चांगली पकड निर्माण केली आहे.जिल्हापरिषद,अनेक पंचायत समित्या,नगरपरिषदा, नगरपंचायती महायुतीच्या ताब्यात आहेत.मात्र…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिच्चारे एकनाथ शिंदे,नियती कोणाला सोडत नाही,हेच खरं… काल सायंकाळी एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक सुधारली व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात बंड करताना ते सुरत – गोवामार्गे गुवाहातीला गेले होते.यावेळी तसं न करता हेलिकॉप्टरने थेट आपल्या ” दरे,” गावी निघून गेले.” जैसी करनी,वैसी भरनी,” चा एक एपिसोड येथे संपला. त्यांना जडलेला आजार हा राजकीय होता,की त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या.यावर सध्या उलटसुलट चर्चा होत आहे.असो,पण आज एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जाणे कितीला पडले,यावर राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.राजकरणात कोण कोणाचा नसतो,हे शिंदे यांनीच अडीच वर्षांपूर्वी…

Read More

दीपक मोहिते, ” रस्सीखेच,” पालघरचे पालकमंत्रीपद पुन्हाकडेच,रविंद्र चव्हाण यांची पुन्हा वर्णी लागणार… पालघरचे पालकमंत्री पद हे भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्याकडे पालघर व सिंधुदुर्ग,अशा दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते.पण आता नितेश राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे सोपवले जाणार आहे.त्यामुळे पालघरच्या पालकमंत्रीपदी रविंद्र चव्हाण यांना पुढे चाल मिळण्याची दाट शक्यता आहे.शिंदे गटाचे पालघरचे आ.राजेंद्र गावित हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत,पण जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकहाती जिंकणाऱ्या रविंद्र चव्हाण यांना पहिली पसंती मिळेल असे वाटते. पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांनी वरील दोन्ही जिल्ह्यात सरस कामगिरी केली,तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात चांगले…

Read More