- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, महिला लोकशाही दिन १६ डिसें.रोजी, समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन १६ डीसें.रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,येथे आयोजित करण्यात आला आहे. महिला लोकशाही दिनाचा अर्ज जिल्हाधिकारी यांना उद्देशून असावा.तसेच तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्र.व तहसिलदारांच्या उत्तराची प्रत अर्जा सोबत जोडण्यात यावी.महिला लोकशाही दिनी घ्यावयाची तक्रार,अडचण सोडविण्यासाठी अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,कक्ष क्र. १०८,पहिला मजला, प्रशासकीय इमारत अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,कोळगाव रोड,…
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला पालघर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा, आज पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रविंद्र शिंदे यांनी गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी (पंचायत),विस्तार अधिकारी (सांख्यिकी),सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची समन्वय आढावा सभा घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी,ग्रामपंचायत,चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर,बापूराव नाळे,प्रभारी गट विकास अधिकारी,पंचायत समिती पालघर तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंत दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांची अपूर्ण घरकुले माहे जानेवारी २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुचना दिल्या.लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण…
नवीन पाटील,सफाळे, जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार ; तब्बल ३१ गावांचा भार एकाच तलाठ्यावर… पालघर जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अनेक गावातील तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.सफाळे पूर्व व पश्चिम भागातील तीन मंडळ अधिकाऱ्यांची जबाबदारी सध्या एकाच तलाठ्याकडे असून यामुळे ३१ गावांचा भार त्यांच्यावर देण्यात आला आहे. जमिनीची व इतर कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यात तलाठ्यांची कमतरता भासत असून अनेक ठिकाणी तलाठ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतीविषयी भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक होत नाही.तलाठ्यांना इतरही कामे असल्यामुळे तलाठ्यांची चांगलीच दमछाक होत असते. संपूर्ण जिल्ह्यात असा प्रकार सुरू असून शेतकऱ्यांची शेतीची कामे व विविध दाखल्यांवर तलाठ्यांच्या सहीसाठी विद्यार्थी व पालकांना वारंवार फेऱ्या…
संजय नेवे विक्रमगड बांगला देशाच्या निषेधार्थ विक्रमगड येथे मुक मोर्चाचे आयोजन, बांगला देशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत.अनेक हिंदुत्ववादी संघटना व सामाजिक संस्था या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. पालघर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज या मराठा संघटनांनी याविषयी एल्गार पुकारला आहे.गेल्या दोन दिवसात नालासोपारा व आज वाडा / विक्रमगड शाखेने मोर्चाचे आयोजन केले होते. आज विक्रमगड येथे या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला होता बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंना त्रास दिला जातो,त्यांच्यावर हल्ले होत आहेत,त्या निषेधार्थ विक्रमगड सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरातील विठ्ठल मंदिर येथून मुक मोर्चा निघून विक्रमगड तहसीलदार कार्यालय विकमगड आला. यावेळी सकल हिंदू समाजाच्या…
नवीन पाटील,सफाळे, सफाळे येथे तरुणाने इअरफोनमुळे गमावला जीव, पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकात रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली.कानात इअरफोन घातल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस गाडीचा हॉर्न ऐकू आला नाही आणि त्या तरुणाचा गाडी खाली येऊन मृत्यू झाला. नितेश चौरसिया,असे या तरुणाचे नाव आहे.याबाबत सफाळे रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईहून सफाळे येथे नेहमीप्रमाणे ओमटेक्स येथे क्रिकेटच्या सरावासाठी येत असताना रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली. सफाळे स्थानकात लोकलमधून उतरून तो मैदानाकडे चालला होता.मात्र, कानात इअरफोन असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना त्याला गाडीचा,तसेच लोकांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकू आला नाही.तो मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस…
पंकज चव्हाण,विरार, १२ व्या मॅरेथॉन धमाल धाव मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाला दुसरा क्रमांक, न्याय हा मानवी समाज जीवनाचा आणि समाज सुरळीत कार्यरत राहील, यासाठी आवश्यक असणारा घटक आहे.जेव्हापासून मनुष्य समाज म्हणून एकमेकांसोबत राहू लागला आणि समाज व्यवस्था अस्तित्वात आली.तेव्हापासून न्यायाचा मुद्दा वेळोवेळी अधोरेखित केला गेला.अर्थात कालानुरुप न्यायदानाची प्रक्रिया आणि पद्धतही बदलत गेली. कोणत्याही प्रांतामध्ये प्रशासनाचा वचक ठेवण्यासाठी न्याय हा फार महत्वाचा घटक असतो. हीच न्यायदेवता आणि विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार आणि आजची स्त्री सुरक्षित आहे का ? यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने नुकताच विरार येथे नुकत्याच पार पडलेल्या १२ व्या वसई राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये मुंबईच्या महाविद्यालयाच्या गर्दीत कायम आपले वेगळेपण जपत…
संजय लांडगे, वाडा शहर, हिंदुवरील अत्याचाराच्या विरोधात वाड्यात निषेध मोर्चा, बांगलादेशात अराजकता माजल्यानंतर हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत.अनेक मंदिरांची नासधूस करण्यात येत आहे.हे सर्व तातडीने थांबावे व इस्कॉनच्या साधूंची तत्काळ सुटका व्हावी,या मागणीसाठी वाड्यात सकल हिंदू समाजातर्फे आज निषेध मोर्चा काढण्यात आला. सर्व सकल हिंदू समाज मिळून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराचा तीव्र निषेध व्यक्त करतो व आपणास आवाहन करतो की,युनो आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी याची दखल घ्यावी व बांगलादेश मधील कट्टरतइस्लामी मानव विरोधी सरकार व आतंकवादी यांचेविरुद्ध कठोर पावले उचलावी,तसेच इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी.बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजास कायमस्वरूपी सुरक्षितता मिळण्यासाठी सर्व आवश्यक…
दीपक मोहिते, ” न्युजलाईन,” एक देश,एक निवडणूक ; संसदेच्या चालू अधिवेशनात सरकार विधेयक आणणार, ” एक देश,एक निवडणूक,” या निवडणूक पद्धतीवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार,चालू हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर करणार आहे.सरकार या विषयी सर्वसंमती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.त्यासाठी सर्वप्रथम संयुक्त संसदीय समितीकडे हे विधेयक पाठवले जाईल.त्यानंतर ही समिती देशातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीशी चर्चा करेल. याशिवाय विविध राज्याचे विधानसभा अध्यक्ष,विचारवंत व जाणकार व्यक्तींना या प्रक्रियेत सामील करून घेण्यात येणार आहे.गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या विषयी माहिती देताना,” पहिल्या फेजमध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होतील,त्यानंतर १०० दिवसाच्या आत म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका घेतल्या…
दीपक.मोहिते, सुर्यातीर, उर्जानिर्मिती;ग्रामीण भागाला न्याय हवा…. गेल्या ७५!वर्षात अनेक सरकारे आली आणि गेली,काँग्रेस,संपुआ व आता रालोआच्या काळात वित्त व आता मोदी सरकारच्या काळात नामकरण झालेले निती आयोग,असे एकूण १८ आयोग खर्ची पडले.पण ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकला नाही.आजही ग्रामीण भागातील भूमिपुत्र,शेतकरी वीज व शेतीसिंचनाच्या पाण्यावाचून तडफडत आहे.आजवर एकाही सरकारला हे दोन्ही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावेत,असे वाटले नाही. ग्रामीण भागात दिवसात केवळ दहा ते बारा तास वीज असते. विजेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील बनत चालला आहे.शहरी भागासोबत ग्रामीण भागातही नागरिकरणाला वेग आला असून या भागातील विजेची मागणी अस्मानाला पोहोचली आहे.वीजेच्या मागणीच्या प्रमाणात वीज उपलब्ध करण्याकामी एकाही सरकारकडे…
दीपक मोहिते, नव्या सरकारमध्ये पंकजा मुंडे क्रमांक दोनच्या नेत्या असतील, देवेंद्र फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ अद्याप आकाराला येऊ शकलेले नाही.महायुतीचा मुख्य घटक पक्ष असलेले भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांमध्ये चुरशीची रस्सीखेच सुरू आहे.ज्या गृहखात्यासाठी शिंदे अडून बसले होते,ते त्यांना मिळणार नाही,हे जवळपास निश्चित झाले आहे.याव्यतिरिक्त भाजप महसूल व जलसंपदा ही दोन खातीही स्वतःकडे ठेवेल,अशी चर्चा आहे.अर्थ व ग्रामविकास,ही दोन्ही खाती अजित पवार गटाकडे जातील,तर नगरविकास, सार्व.बांधकाम व शालेय शिक्षण,ही खाती शिंदे गटाला देण्यात येणार आहेत. एकूण ४३ मंत्रिपदापैकी २० ते २१ भाजपला तर उर्वरित २१ पदे पवार,शिंदे गट व १ पद अपक्षाला,असे वाटप होईल.नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात शिंदे…
